पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत : भारतीय मानसिकतेतला फंडामेंटल घोळ !
In reply to झाली ना बोलती बंद =)) by संगणकनंद
In reply to @ त्याचू वैलपान : त्याचू फार शोभा होतेयं ! by संजय क्षीरसागर
In reply to पुनर्जन्म by उन्मेष दिक्षीत
In reply to पुनर्जन्म या एकाच थिअरीला by उन्मेष दिक्षीत
पुनर्जन्म असं काहीही नाही ती लोकांना दिलासा द्यायला शोधलेली एक कल्पना आहे जेंव्हा आपण एखाद्याचा पुनर्जन्म झाला म्हणतो तेंव्हा काय झालेलं असतं ? तर एका जीवंत माणसाला दुसऱ्या मृत व्यक्तीचा भूतकाळ स्मरत असतो. या पलिकडे पुनर्जन्म म्हणजे काही नाही. ही स्मृती जीवंत व्यक्तीच्या मेंदूखेरीज कुठेही नसते. पण हा प्रकार कशामुळे होतो ? नॉर्मली माणूस गेल्यावर देहासमेत त्याचा मेंदूपण फुल्ली फॉरमॅट होतो > थोडक्यात सर्व स्मृती, कौशल्य, विव्दत्ता.... सर्व शून्य होते. या प्रोसेसमधे काही वेळा चुकून, स्मृतीच्या काही स्ट्रिंग्ज फॉरमॅट न होता अंतराळात रिलीज होतात. अशा स्ट्रींग्ज नवजात अभ्रकाच्या मेंदूत डायरेक्ट कॉपी / पेस्ट होतात > त्याला तो डेटा सक्रीय झाला की मृत व्यक्तीच्या जीवनपटाचा काही भाग दिसायला लागतो > आणि आपण म्हणतो पुनर्जन्म झाला ! अशाप्रकारे पुनर्जन्म वगैरे काही नसून, ती डिस्क फॉरमॅटींगमधे नकळत झालेली चूक आहे
In reply to पुनर्जन्म by उन्मेष दिक्षीत
In reply to उन्मेष by शा वि कु
> शोषितांवर होणारे अन्याय चालवून घेण्यासाठी वापरली गेली आहे.आणि देवभोळ्यांचा देवावरचा विश्वास कमालीचा फोफावत नेऊन सदैव तेवत ठेवण्यासाठी !
In reply to उन्मेष by शा वि कु
पूर्वसंचिताची कल्पना ही कायमच शोषितांवर होणारे अन्याय चालवून घेण्यासाठी वापरली गेली आहे.पूर्वसंचिताची शास्त्रिय बैठक घालवून, मोडकळीस नेऊन, विवीध भेदांवर आधरित शोषणव्यवस्था उभी करण्यासाठी पूर्वसंचिताची कल्पना वापरली गेली आहे. असंही असू शकतं. - (पूर्वसंचित) सोकाजी
In reply to उन्मेष by शा वि कु
पूर्वसंचिताची कल्पना ही कायमच शोषितांवर होणारे अन्याय चालवून घेण्यासाठी वापरली गेली आहे.पूर्वसंचिताची शास्त्रिय बैठक घालवून, मोडकळीस नेऊन, विवीध भेदांवर आधरित शोषणव्यवस्था उभी करण्यासाठी पूर्वसंचिताची कल्पना वापरली गेली आहे. असंही असू शकतं. - (पूर्वसंचित) सोकाजी
In reply to पूर्वसंचिताची कल्पना ही कायमच by सोत्रि
In reply to सोत्री by शा वि कु
ती कल्पना सांगाल तर बरे होईल. वाचायला आवडेलनक्की, ह्यावर एक लेख नक्कीच लिहायचा आहे. लवकरच ‘टंकाळा’ टाळून लिहीतो जे मला अनुभूतीतून उमगलंय ते! - (साधक) सोकाजी
In reply to सोत्री by शा वि कु
In reply to पुनर्जन्म by उन्मेष दिक्षीत
सोत्रींनी सगळ्यासाठी सायंटीफिक पुरावे मागितले आहेतते ह्यासाठी होते ->> सिद्धांत मांडणार्यांचा मानसशास्त्राचा अभ्यास फारसा नव्हता.
पुनर्जन्म या थिअरीला काय सायंटीफिक पुरावा आहेजिथे मुदलात जन्म मृत्युच नाही तिथे पुनर्जन्म कसला आलाय. - (सायंटीफिक पुराव्याने शाबित) सोकाजी
In reply to सोत्रींनी सगळ्यासाठी by सोत्रि
In reply to जिथे मुदलात जन्म मृत्युच नाही तिथे पुनर्जन्म कसला आलाय. by उन्मेष दिक्षीत

In reply to (No subject) by कपिलमुनी
स्मृती ही केवळ त्या व्यक्तीच्या मेंदूत असते आणि अस्तित्वात इतरत्र तो डेटा साठवण्याची कोणतीही सोय नाही याची त्यांना कल्पना नव्हती.अवयव प्रत्यारोपण झालेल्या ग्राहकात त्याच्या दात्याच्या आवडीनिवडी उत्पन्न झाल्याचे अनेक दाखले आहेत. यावरून स्मृती मेंदूशिवाय इतरत्रही साठवली जाते असं दिसतं. आ.न., -गा.पै.
In reply to अवांतर : स्मृतीसाठा by गामा पैलवान
यावरून स्मृती मेंदूशिवाय इतरत्रही साठवली जाते असं दिसतं.डॉ Bessel van der Kolk या सायकियाट्रीमध्ये एमडी असलेल्या डॉ़क्टरांनी संशोधन केलं आहे. आणि त्या संशोधनावर त्यांनी एक छान ओघवत्या भाषेत पुस्तक लिहीलं आहे.
(या पुस्तकाची मी छापील प्रत विकत घेऊन वाचली आहे. मात्र पुस्तकाचा सारांश सांगितला जाणार नाही. त्याबद्दल दिलगीर आहे)In reply to अवांतर : स्मृतीसाठा by गामा पैलवान
त्याच्या दात्याच्या आवडीनिवडी उत्पन्न झाल्याचे अनेक दाखले आहेत. यावरून स्मृती मेंदूशिवाय इतरत्रही साठवली जाते असं दिसतं.चुकीचा अप्रोच आहे गामाश्री ! १ > विषय व्यक्तीगत कर्माची स्मृती आणि त्याचं कर्मफल असा आहे > अवयव प्रत्यारोपणातून ट्रान्सफर झालेल्या गोष्टींचा नाही २> आणि इन्वर्सली, व्यक्तीचा एखादा अवयव काढून टाकला तर त्याचा स्मृतीवर काहीही परिणाम होत नाही
In reply to @ गामा पैलवान : अवयव प्रत्यारोपण झालेल्या ग्राहकात by संजय क्षीरसागर
In reply to एक व्यावहारिक प्रश्न by गामा पैलवान
कर्मफळ नावाची काही चीजंच अस्तित्वात नाही?हा देव या संकल्पनेतून निघालेला बोगस प्रकार आहे. तो देवभोळ्यांसाठी मॉरल पोलिसिंगचं काम करतो पण ते फार चाईल्डीश प्रकरण आहे. जो कुणाचा गैरफायदा घेत नाही आणि दुसर्याला स्वतःचा गैरफायदा घेऊ देत नाही, त्याला कोणताही कर्मलेप लागू शकत नाही.
In reply to @ गामा पैलवान : कुठल्या कुठे चाललात ! by संजय क्षीरसागर
In reply to स्मृतीभ्रंश नव्हे .... by गामा पैलवान
In reply to गा.पै. by शा वि कु
In reply to एक लेख सापडला by गामा पैलवान
१. > चार प्रकारच्या स्मृती ग्राहकात संक्रमित होतातविषय पूर्वसंचित आणि कर्मफलाचा आहे. शिवाय अवयव प्रत्यारोपण ही अपवादत्मक केस आहे आणि जरी अशा स्मृती संक्रमित झाल्या तरी > २. शिवाय मृत्यूत, देहासमेत मेंदूही विघटीत होऊन, एका व्यक्तीची संपूर्ण जीवन कहाणी तिथेच संपते. त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाही, इतकी उघड गोष्ट संतांच्या लक्षात आली नाही. ही गोष्ट निर्विवाद आहे आणि त्या विधानाला बाधा येत नाही.
२. मानवी स्मृती ही एक अत्यंत जटील रचना आहे. संगणकाच्या स्मृतीसारखी सरळधोप आजीबात नाहीती मॅनेज करणारी कोणतीही रिअल टाईम यंत्रणा नाही आणि मृत्यूत ती नष्ट होते याचा प्रतिवाद करुन दाखवा, कारण कर्मफलसिद्धांत या दोन गोष्टींवर आधारित आहे.
In reply to संक्षी सरांच्या या व इतर by मामाजी
In reply to संक्षी सर,या by मामाजी
In reply to संक्षी सर,या by मामाजी
सुरूवात का करता?Business Continuity Principal मुळे तो व्यावसाय, वर्षानुवर्ष असाच पुढे चालू राहिल हे गृहितक आहे. पण व्यक्तीगत जीवनात ते प्रिंसिपल लागू होत नाही; वाचा : २. शिवाय मृत्यूत, देहासमेत मेंदूही विघटीत होऊन, एका व्यक्तीची संपूर्ण जीवन कहाणी तिथेच संपते. त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाही, इतकी उघड गोष्ट संतांच्या लक्षात आली नाही.
In reply to @ मामाजी : accounts मधे opening balance घेउनच by संजय क्षीरसागर
त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाही
पुनर्जन्म असं काहीही नाही ती लोकांना दिलासा द्यायला शोधलेली एक कल्पना आहे जेंव्हा आपण एखाद्याचा पुनर्जन्म झाला म्हणतो तेंव्हा काय झालेलं असतं ? तर एका जीवंत माणसाला दुसऱ्या मृत व्यक्तीचा भूतकाळ स्मरत असतो. या पलिकडे पुनर्जन्म म्हणजे काही नाही. ही स्मृती जीवंत व्यक्तीच्या मेंदूखेरीज कुठेही नसते. पण हा प्रकार कशामुळे होतो ? नॉर्मली माणूस गेल्यावर देहासमेत त्याचा मेंदूपण फुल्ली फॉरमॅट होतो > थोडक्यात सर्व स्मृती, कौशल्य, विव्दत्ता.... सर्व शून्य होते.या प्रोसेसमधे काही वेळा चुकून, स्मृतीच्या काही स्ट्रिंग्ज फॉरमॅट न होता अंतराळात रिलीज होतात.
अशा स्ट्रींग्ज नवजात अभ्रकाच्या मेंदूत डायरेक्ट कॉपी / पेस्ट होतात > त्याला तो डेटा सक्रीय झाला की मृत व्यक्तीच्या जीवनपटाचा काही भाग दिसायला लागतो
> आणि आपण म्हणतो पुनर्जन्म झाला ! अशाप्रकारे पुनर्जन्म वगैरे काही नसून, ती डिस्क फॉरमॅटींगमधे नकळत झालेली चूक आहे
In reply to #१, २, ३ सारखी बालिश विधाने by कोहंसोहं१०
घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वरलोकलमधले भिकारी हे गाणं मन लावून म्हणतात, यापलिकडे त्याला काहीही पुरावा नाही. ईश्वर हीच मुळात अत्यंत बालिश कल्पना आहे. भोळसट वृत्तीच्या लोकांना भीती घालण्यासाठी किंवा त्यांना एक काल्पनिक आधार म्हणून आणि बसल्याबसल्या टाईमपास इतकाच तीचा उपयोग आहे.
२. > १, २, ३ सारखी बालिश विधाने वाचून खूप हसू आलेप्रतिवाद करुन तर दाखवा मग बघा कुणाचं हसूं होईल ते !
In reply to @ कोहंसोहं१० : जगी जीवनाचे सार by संजय क्षीरसागर
तस्मात, आपण कुणाचा गैरफायदा न घेणं आणि कुणाला आपला गैरफायदा न घेऊ देणं इतक्या साध्या तत्वानी व्यक्ती मुक्त, स्वच्छंद आणि अपराध शून्य जीवन जगू शकते. कोणतंही पूर्वसंचित नाही आणि अत्यंत पारदर्शक वागणुकीमुळे कोणताही कर्मविपाक नाही; ही खरी आणि वास्तविक मुक्त चित्तदशा आहे.पुन्हा अगदी थेऑरिटिकल विधान. कधीही क्रिकेट न खेळलेल्या समालोचकासारखी ही विधाने आहेत. एक उदाहरण देतो. कुठल्यातरी एका परदेश दौर्यात एका कसोटी सामन्यात दिवसाचा खेळ संपला तेव्हा सचिन नुकतेच शतक पूर्ण करुन नाबाद खेळत होता.कॉमेंटेटर बॉक्स मध्ये चारु शर्मा ह्या कधीही क्रिकेट न खेळलेल्या समालोचकाने"आता उद्या सचिनला २०० करायचा चान्स आहे. त्याचे पहिले द्विशतक "वगैरे सारखी स्टेटमेंट दोन तीन वेळेला केली. समालोचन कक्षात बाजुला बसलेले गावस्कर शास्त्री ढिम्म.त्यांच्याकडुन ह्यावर काहीच टिप्पणी नाही. दुसर्या दिवशीचा खेळ चालु झाला आणि सचिन त्यादिवशी एकही धाव न काढता बाद झाला. चारु शर्माने एक जरी क्रिकेट मॅच खेळली असती तर त्याला खेळातील अनिश्चिततेचा अंदाज आला असता. वरील स्टेटमेंटच्याच धर्तीवर..पोहोणे शिकणे अगदी सोपे आहे..हातपाय मारायचे..पोटाखाली पाणी घ्यायचे..आणि काहीही केले तरी स्वतःला बुडु द्यायचे नाही बरका...हया मूर्खांना पोहोणे शिकायला गुरु का लागतो बरे हे काही कळत नाही.. क्रिकेटचेच उदाहरण द्यायचे तर.. बॅटींग करणे अगदी सोपे आहे.. सरळ बॅटीने खेळायचे.. बॉलवर नजर ठेवायची...बाहेर जाणार्या चेंडुच्या नादी लागायचे नाही..मग कोणाची बिशाद आपल्याला आऊट करायची... सुनील सचिन सारख्या महान फलंदाजांना पण ही सोपी युक्ती समजली नाही.
In reply to तस्मात, आपण कुणाचा गैरफायदा न by कानडाऊ योगेशु
तस्मात, आपण कुणाचा गैरफायदा न घेणं आणि कुणाला आपला गैरफायदा न घेऊ देणं इतक्या साध्या तत्वानी व्यक्ती मुक्त, स्वच्छंद आणि अपराध शून्य जीवन जगू शकते. कोणतंही पूर्वसंचित नाही आणि अत्यंत पारदर्शक वागणुकीमुळे कोणताही कर्मविपाक नाही; ही खरी आणि वास्तविक मुक्त चित्तदशा आहे.इतकं सोपं मराठी आहे. यात तुम्हाला काय कळलं नाही ? किमान संवेदनाक्षमता असणार्याला सुद्धा, आपण दुसर्याचा गैरफायदा घेतांना कळतं आणि आपण दुसर्याला आपला गैरफायदा घेऊ देत असू तरी कळतं
In reply to @ कानडाऊ योगेशु : पुन्हा अगदी थेऑरिटिकल विधान ? by संजय क्षीरसागर
तस्मात, आपण कुणाचा गैरफायदा न घेणं आणि कुणाला आपला गैरफायदा न घेऊ देणं इतक्या साध्या तत्वानी व्यक्ती मुक्त, स्वच्छंद आणि अपराध शून्य जीवन जगू शकते.
हे अगदी बाळबोध विधान नाही वाटत तुम्हाला.
कमीत कमी महाराष्ट्रीयन संस्कृतीत तरी लहानपणापासुनच असे संस्कार केले जातात.
उदा. शत्रुबुध्दी विनाशाय.. सुसंगती सदा घडो. सुजनवाक्य कानी पडो वगैरे..
तुम्ही जे वर सांगता आहात समर्थांनी ते आधीच सांगितले आहे.
मना सज्जना भक्तिपंथेचि जावे
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे.
जनी निंद्य ते सर्व सोडुनि द्यावे
जनी वंद्य ते सर्व भावे करावे.
प्रभाते मनी राम चिंतीत जावा
पुढे वैखरी राम आधी वदावा
सदाचार हा थोर सांडु नये तो
जगी तोचि तो मानवी धन्य होतो
मना वासना दुष्ट कामा न येरे
मना सर्वथा पापबुध्दी नको रे..
मना सर्वथा नीती सोडू नको हो..
मना अंतरी सार विचार राहो..
नको रे मना क्रोध हा अंगिकारु
नको रे मना मत्सरु दंभ भारू.
मना त्वांचि रे पूर्व संचित केले
तयासारखे भोगणे प्राप्त झाले.
देवादिकांचे उल्लेख तूर्तास राहु द्या पण सुमारे ४००-४५० वर्षांपूर्वी समर्थ हे लिहुन गेलेत. लोकांना जर इतक्या सहजगत्या वळले असते तर इथे एव्हाना स्वर्ग अवतरायला हवा होता.
तुमच्याकडे हे कसे साध्य करायचे ह्याचे उपाय नसतील तर तुमचे विधान शब्द बापुडे केवळ वारा ठरते.
हे म्हणजे तरंगता येणे अगदी सोपे आहे फक्त बुडता कामा नये असे म्हटल्यागत झाले.
बुडायचे कसे नाही हे तुम्हाला सांगता आले तर तो सल्ला काहीतरी विधायक ठरेल.
केवळ देव नाही पूर्वसंचित नाही असे म्हणुन तुम्ही बुडत्याला मिळालेला काडीचा(तुमच्या मते) आधारही नाकारत आहात.In reply to संक्षी सर, by कानडाऊ योगेशु
ह्याचे उपाय नसतील ?तुम्ही पुन्हा तोच प्रश्न विचारतायं म्हणून उत्तर देतो. पूर्वीचे संत आणि इथले सदस्य काय म्हणतयंत ते सध्या बाजूला ठेवा. _______________________________________ तुम्ही फक्त एक आठवडा हा प्रयोग करुन पाहा : एकदम ऑथेंटिक व्हा. दुसर्याचा फायदा घेतांना शब्दांची जुळवाजुळव करायला लागते. दुसर्याशी वागतांना तुम्हाला काहीही विचार करायला लागणार नाही. जे आत तेच बाहेर. आणि जे झेपणार नाही किंवा जड होतंय ते सरळ खाली ठेवा. मग तो बॉस असो, बाप की आई, की मित्र, बिनधास्त सांगा की मला झेपणार नाही. हे जरा साहसाचं काम आहे. पण करुन पाहा तुम्हाला जन्मात कधी मागे पहायची वेळ येणार नाही ! _________________________________________ आता याचं कारण असं आहे की मुळात आपणच सत्य आहोत. आणि साक्षात्काराची साधी व्याख्या अशी आहे : The Ultimate Unfoldment of the Self ! थोडक्यात, स्वतःला पूर्णपणे खोलून टाका, जे आत तेच बाहेर. अशा व्यक्तीला मग कोणत्याही नीतीमत्तेची गरज उरत नाही, आणि त्याला कधीही पश्चात्ताप करावा लागत नाही. हा खरा कर्मसिद्धांत आहे ! _________________________________ इतर संतांसारखा हा गुहेत बसून आणि जगापासून विन्मुख राहून केलेला उपदेश नाही, किंवा अनुभवशून्य लोकांनी आणि रोज तेच ते रुटीन जगणार्यांनी, इथे निव्वळ टाईमपास म्हणून येऊन केलेली निरर्थक शेरेबाजी नाही. हा माझा पूर्णपणे संसारात राहून, व्यावसायिक यशस्विता साधून, जगण्याचा वास्तविक अनुभव आहे आणि याच मार्गानं मला सत्य गवसलं आहे.
In reply to तस्मात, आपण कुणाचा गैरफायदा न by कानडाऊ योगेशु
brain-wide process in which several different areas of the brain act in conjunction with one another (sometimes referred to as distributed processing)विकेंद्रित प्रक्रियन ( = distributed processing ) वरनं एक आठवलं. तुम्ही म्हणता कर्मफलाच्या अंमलबजावणीला प्रत्येक व्यक्तीचा अनेक जन्मांचा डेटा स्टोअर करुन तो प्रत्येक व्यक्तीचं ‘कर्मफल रिअल टाईम बेसिसवर’, मॅनेज करु शकेल अशी प्रणाली अस्तित्वात हवी. विकेंद्रित प्रक्रियन असेल तर अशा एकत्रित डेटाबेसची गरज नाही. प्रत्येक नोडचा ( म्हणजे माणसाचा ) स्वतंत्र डेटाबेस असला तरी चालेल. या वैयक्तिक डेटाबेसालाच संचित का म्हणू नये? आ.न., -गा.पै.
In reply to कर्मफळ विदागार व्यवस्थापन प्रणाली ( karmik detabase management ) by गामा पैलवान
> विकेंद्रित प्रक्रियन असेल तर अशा एकत्रित डेटाबेसची गरज नाही. प्रत्येक नोडचा ( म्हणजे माणसाचा ) स्वतंत्र डेटाबेस असला तरी चालेल. या वैयक्तिक डेटाबेसालाच संचित का म्हणू नये?हा डेटाबेस त्या व्यक्तीच्या मेंदू व्यतीरिक्त कुठेही नसतो आणि तो मृत्यूसमेत नष्ट होतो. शिवाय असे अनेक डेटाबेसेस रिअल टाईम बेसिसवर मॅनेज करणारी कोणतीही प्रणाली अस्तित्वात नाही. पण ती अस्तित्वात आहे या भोंगळ कल्पनेला भक्त देव म्हणतात !
In reply to @ गामा पैलवान : तोच तर मुद्दा आहे ! by संजय क्षीरसागर
In reply to एकीकडे म्हणायचं, " मानवी by कोहंसोहं१०
विषय पूर्वसंचित आणि कर्मफलाचा आहे. शिवाय अवयव प्रत्यारोपण ही अपवादत्मक केस आहे आणि जरी अशा स्मृती संक्रमित झाल्या तरी > २. शिवाय मृत्यूत, देहासमेत मेंदूही विघटीत होऊन, एका व्यक्तीची संपूर्ण जीवन कहाणी तिथेच संपते. त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाही, इतकी उघड गोष्ट संतांच्या लक्षात आली नाही. ही गोष्ट निर्विवाद आहे आणि त्या विधानाला बाधा येत नाही.शरीर विघटीत झालं तरी स्मृती इतरत्र सुरक्षित राहू शकतात. याचा अर्थ स्मृतींना शरीराव्यतिरिक्त अस्तित्व आहे. त्यालाच कर्मफळ का म्हणू नये? २.
ती मॅनेज करणारी कोणतीही रिअल टाईम यंत्रणा नाही आणि मृत्यूत ती नष्ट होते याचा प्रतिवाद करुन दाखवा, कारण कर्मफलसिद्धांत या दोन गोष्टींवर आधारित आहे.विकेंद्रित प्रक्रियनात ती म्यानेज करायला स्वतंत्र यंत्रणेची आवश्यकता नाही. हाच तर माझा मुद्दा आहे. प्रक्रियन विकेंद्रित असल्याने एकाच नोडवर ( म्हणजे एका माणसाच्या मेंदूत) इतरांच्या स्मृतीही साठवलेल्या असू शकतात. पुनर्जन्माच्या घटनेत आपल्या स्वत:च्या जुन्या स्मृती परत त्याच आकृतीबंधात कार्यान्वित होतात. हे प्रक्रियन विकेंद्रित असल्याने जुना मेंदू जाळून नष्ट झाला तरीही स्मृती इतरत्र ठिकाणाहून कार्यान्वित होतात. निदान असं अनुमान तरी काढता येतं. आ.न., -गा.पै.
In reply to विकेंद्रित प्रक्रियन by गामा पैलवान
In reply to विकेंद्रित प्रक्रियन by गामा पैलवान
शरीर विघटीत झालं तरी स्मृती इतरत्र सुरक्षित राहू शकतातइतरत्र? अंतराळात राहातात हे मागेच सिद्ध झालंय ना?
In reply to विकेंद्रित प्रक्रियन by गामा पैलवान
१. शरीर विघटीत झालं तरी स्मृती इतरत्र सुरक्षित राहू शकतात.कुठे राहतात ? आणि त्याला पुरावा काये ?
२. > विकेंद्रित प्रक्रियनात ती म्यानेज करायला स्वतंत्र यंत्रणेची आवश्यकता नाही. हाच तर माझा मुद्दा आहे. प्रक्रियन विकेंद्रित असल्याने एकाच नोडवर ( म्हणजे एका माणसाच्या मेंदूत) इतरांच्या स्मृतीही साठवलेल्या असू शकतात.इथे तर फंडामेंटल चूक झालीये. कर्मफल ही व्यक्तिनिष्ठ गोष्ट आहे. त्याच व्यक्तीचा डेटा प्रोसेस करुन त्याचंच कर्मफल ठरवायचं आहे. इतरांच्या स्मृती तुमच्या मेंदूत स्टोअर करुन उपयोग नाही आणि ते असंभव आहे. तुम्ही इतरांच्या जीवनात घडलेल्या घटना सांगू शकता का ? प्रोसेसिंग डिस्ट्रीब्यूटेड असेल तरी डेटा व्यक्तीनिष्ठच लागेल. नाही तर तुमच्या बॉसची, प्रेयसीची (असली तर) , ओसामा बीन लादेनची कर्मफलं तुम्हाला भोगायला लागतील ! थोडक्यात, तुमचा काहीही तर्क आणि ठोकाठोकी चाललीये.
३.> पुनर्जन्माच्या घटनेत आपल्या स्वत:च्या जुन्या स्मृती परत त्याच आकृतीबंधात कार्यान्वित होतात. हे प्रक्रियन विकेंद्रित असल्याने जुना मेंदू जाळून नष्ट झाला तरीही स्मृती इतरत्र ठिकाणाहून कार्यान्वित होतात. निदान असं अनुमान तरी काढता येतं.हे इतरत्र ठिकाण कुठे आहे ? असं काहीही आणि कुठेही स्टोअर करणारी सिस्टम अस्तित्वात नाही. तुमचा दावा सर्वस्वी निराधार आहे.
In reply to @ गामा पैलवान : डिस्ट्रीब्युटेड प्रोसेसिंग आणि डेटा by संजय क्षीरसागर
हे इतरत्र ठिकाण कुठे आहे ?तुम्हीच तर म्हणालेलात ना अंतराळात म्हणून? तुम्हाला माहीत असेलच.
In reply to @ गामा पैलवान : डिस्ट्रीब्युटेड प्रोसेसिंग आणि डेटा by संजय क्षीरसागर
कुठे राहतात ? आणि त्याला पुरावा काये ?कुठे राहतात ते माहीत नाही. त्याचा पुरावा काही नाही. मात्र धूर दिसतो याचा अर्थ आग लागली आहे, असं अनुमान काढता येतं. २.
नाही तर तुमच्या बॉसची, प्रेयसीची (असली तर) , ओसामा बीन लादेनची कर्मफलं तुम्हाला भोगायला लागतील !तशी ती लागतातंच. यालाच संगाने कर्मफळ भोगावं लागणं म्हणतात. अपघातात अनेक निरपराध लोकांचा मृत्यू होणे हे असंच नको त्या संगामुळे निर्माण झालेलं कर्मफळ आहे. पंचमहापातकांची यादी बघितली तर प्रत्यक्षात केवळ चारंच पापं आहेत. पाचवं पाप या चौघांच्या संगाचं आहे. कर्माची गती गहन आहे, असं प्राचीन तत्त्वज्ञांनी सांगून ठेवलंय. ३.
थोडक्यात, तुमचा काहीही तर्क आणि ठोकाठोकी चाललीये.बरोबर आहे. यालाच चाचपणी असंही म्हणतात. मी कुठलेही दावे करीत नाही. ४.
हे इतरत्र ठिकाण कुठे आहे ?नक्की सांगता येणार नाही. इलेक्ट्रॉन नेमका कुठे असतो हे कोणालाही सांगता येत नाही. हेही तसंच समजा. ५.
असं काहीही आणि कुठेही स्टोअर करणारी सिस्टम अस्तित्वात नाही. तुमचा दावा सर्वस्वी निराधार आहे.ज्याअर्थी धूर येतोय म्हणजे कुठेतरी आग लागलेली असणार. ज्याअर्थी जुन्या स्मृती नव्या बालकाच्या तोंडून बाहेर पडताहेत त्याअर्थी त्या देहाबाहेर कुठेतरी अस्तित्वात असणार. आ.न., -गा.पै.
In reply to कर्म दिसंत नसतं by गामा पैलवान
१. > कुठे राहतात ? आणि त्याला पुरावा काये ? कुठे राहतात ते माहीत नाही. त्याचा पुरावा काही नाही. मात्र धूर दिसतो याचा अर्थ आग लागली आहे, असं अनुमान काढता येतं.कल्पना काहीही करता येते !
२. > नाही तर तुमच्या बॉसची, प्रेयसीची (असली तर) , ओसामा बीन लादेनची कर्मफलं तुम्हाला भोगायला लागतील ! तशी ती लागतातंच. यालाच संगाने कर्मफळ भोगावं लागणं म्हणतात. अपघातात अनेक निरपराध लोकांचा मृत्यू होणे हे असंच नको त्या संगामुळे निर्माण झालेलं कर्मफळ आहे. पंचमहापातकांची यादी बघितली तर प्रत्यक्षात केवळ चारंच पापं आहेत. पाचवं पाप या चौघांच्या संगाचं आहे. कर्माची गती गहन आहे, असं प्राचीन तत्त्वज्ञांनी सांगून ठेवलंय.वाचा : ४. शिवाय डेटा नीती-अनीती किंवा पाप-पुण्याच्या कल्पनांवर सॉर्ट करण्यासाठी लिहावा लागणारा अल्गरिदम कुणाही देवाच्या देवाला सुद्धा, लिहिता येणं अशक्य आहे. कारण त्या कल्पनाच मुळात मानवी आहेत. समाज व्यवस्थेसाठी त्या उपयोगी असल्या तरी अस्तित्वात असा कोणताही मॉरल कोड नाही.
३., ४. ५. > सर्व अनुमानं आणि निव्वळ कल्पनाविलास !लेखात मांडलेल्या १ ते ५ पैकी एकाही विधानाचा प्रतिवाद तुम्ही करु शकत नाही.
In reply to @ गामा पैलवान : सगळाच कल्पनाविलास ! by संजय क्षीरसागर
कल्पना काहीही करता येते !मात्र ती सुसंगत हवी ना? इंद्रियांवर मर्यादा असल्याने माणसाला इलेक्ट्रॉन दिसंत नाही. म्हणून त्याची कल्पना करून गणिती सूत्र मांडावी लागतात. दुसरा कोणताही मार्ग नाही. २.
शिवाय डेटा नीती-अनीती किंवा पाप-पुण्याच्या कल्पनांवर सॉर्ट करण्यासाठी लिहावा लागणारा अल्गरिदम कुणाही देवाच्या देवाला सुद्धा, लिहिता येणं अशक्य आहे. कारण त्या कल्पनाच मुळात मानवी आहेत.DNA ही कल्पना सुद्धा मानवीच आहे. विषाणू ही सुद्धा अशीच मानवी कल्पना आहे. ३.
३., ४. ५. > सर्व अनुमानं आणि निव्वळ कल्पनाविलास !इलेक्ट्रॉन हा कल्पनाविलास असेल तर तसं नोबेल पारितोषिक समितीला कळवलं पाहिजे. तिने कल्पनाविलासला भुलून अनेकांना भौतिकशास्त्राची नोबेल पारितोषिकं बहाल केली आहेत. ४.
लेखात मांडलेल्या १ ते ५ पैकी एकाही विधानाचा प्रतिवाद तुम्ही करु शकत नाही.करेक्ट. मी फक्त मत मांडतो. आ.न., -गा.पै.
In reply to माझे दोन पैसे. by एस
पण मुळातच कर्मविपाक सिद्धांत आणि ईश्वर सिद्धांत हे दोन्ही सिद्धांत परस्परविरोधी आहेत. जर एखाद्याचे पूर्वसंचित किंवा कर्म त्याच्या आयुष्यातील सुखदुःखाचे गुणोत्तर ठरवत असेल तर तिथे ईश्वर हा फॅक्टर बिनकामाचा ठरतो. कारण कर्म हे ईश्वरापेक्षा जास्त शक्तिशाली ठरते. इथे आपसूकच ईश्वराच्या सर्वशक्तीशाली अशा रूपाची संकल्पना व्यर्थ ठरते. आणि जर ईश्वरच प्रत्येकाकडून कर्म करवून घेत असेल असे मानले तर कर्माचे सामर्थ्य इथे कुचकामी ठरते. थोडक्यात कर्मविपाक सिद्धांत आणि ईश्वर सिद्धांत हे दोन्ही केवळ काही मनुष्यांंच्या मनातून उद्भवलेले कल्पनाविलास आहेत.
ह्या सिद्धांतांंच्या आहारी न लागताही, कुठल्याही प्रकारची श्रद्धा न बाळगताही, उच्च नीतीमत्तेचे आयुष्य जगता येते आणि चंगळवाद टाळूनही भौतिक सुखांचा सम्यक आस्वाद घेत आपले जीवन सुखाने आणि संतोषाने व्यतीत करता येते हे महत्त्वाचे आहे. हे शक्य आहे. आणि हाच सम्यक विज्ञानवाद जगण्याचा योग्य मार्ग आहे.इतकी उघड गोष्ट, सुशिक्षित आणि किमान विचार करु शकणार्या कोणत्याही व्यक्तीच्या लक्षात येत नाही हे नवल आहे !
In reply to माझे दोन पैसे. by एस
In reply to माझे दोन पैसे. by एस
In reply to @उन्मेश दिक्षीत by अर्धवटराव
मुळात कर्मविपाक समजून घेण्यासाठी कर्म म्हणजे नेमकं काय हे समजावून घेणे गरजेचे आहे. execution of free will वगैरे कितीही शब्दात कर्माची डेफीनेशन पकडतो म्हटलं तरी कर्म हि इतकी गहन संकल्पना आहे कि मती गुंग व्हावी.थोडक्यात, तुम्हा दोघांनाही कर्मसिद्धांताला अपेक्षित कर्म काय आहे याची कल्पना नाही. तुम्ही जैविक स्मृतीत गेलात आणि सोत्री क्वांटम फिजिक्समधे ! १. कर्मसिद्धांताला अपेक्षित कर्म म्हणजे ज्यात तुम्ही उघडपणे कर्ता आहात, जे करणं किंवा न करणं तुमच्या हातात आहे असं ऐच्छिक कर्म. २. तुम्ही विचार करतायं त्या जैविक स्मृतींनी घडणार्या क्रिया (इम्युन सिस्टम, जिनोम, किंवा तत्सम रुधिराभिसरण, अन्नपचन) कर्मसिद्धांताच्या कक्षेतच येत नाहीत कारण त्यात कर्ता म्हणून व्यक्तीची कामगिरी शून्य असते. ३. सोत्रींनी क्वांटम फिजिक्समधे आणून असाच विपर्यास केला आहे. त्याचा आणि व्यक्तीगत कर्माचा सुतराम संबंध नाही. ४. गीतेत सांगितलेला कर्मयोग आणि तिथे अपेक्षित असलेलं कर्ता प्रभावित कर्म हा कर्मसिद्धांताचा विषय आहे कारण जैविक स्मृतींनी किंवा क्वांटम फिजिक्सनुसार घडणार्या कर्माचा कर्मविपाक शून्य आहे. थोडक्यात, तुम्ही दोघांनीही वेगळीच लाईन पकडली आहे ! ५. सोत्रींनी तर पुढे हाईट केली आहे :
पापपुण्य ह्या मानवनिर्मीत कल्पना आहेत. त्यांचा प्रत्यक्ष संचित आणि कर्मविपाक ह्याचाशी काहीही संबंध नाहीपूर्वसंचित आणि कर्मविपाकाचा पाप-पुण्याशी संबंध नसेल तर तो सिद्धांतच फेल जातो ही उघड गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली नाही. जर तसा संबंध नसेल तर देव या संकल्पनेलाही अर्थ उरत नाही कारण कर्मसिद्धांत मॅनेज करणारा कुणी राहातच नाही !
In reply to @ अर्धवटराव : कोणताही उपहास न करता by संजय क्षीरसागर
थोडक्यात, तुम्हा दोघांनाही कर्मसिद्धांताला अपेक्षित कर्म काय आहे याची कल्पना नाही. तुम्ही जैविक स्मृतीत गेलात आणि सोत्री क्वांटम फिजिक्समधे !तुम्ही 'कर्म' फार लिमीटेड अर्थाने घेताय. कर्म नेहेमी साकल्याने होते, आयसोलेशनने नाहि. घटक जैवीक असोत वा आधुनीक विज्ञान शस्त्रातल्या संज्ञा वापरुन निर्देशीत केलेले पदार्थाचे गुणधर्म असोत.. कर्म सगळ्या पातळ्यांना टच करतं. निसर्गात कुठलीच गोष्ट सुट्या पद्धतीने होत नाहि (निसर्ग म्हणजे केवळ झाडं, नद्या, पर्वत आणि ग्रह तारे नाहित. कंडक्टींग मटेरीअलच्या भोवती चुंबकीय प्रवाह नेला असता निर्माण होणारा विद्युत प्रवाह देखील निसर्ग आहे, व ज्या नियमांनी हि ऊर्जा ट्रान्स्फॉर्म होते ते नियमही निसर्गच आहेत)
१. कर्मसिद्धांताला अपेक्षित कर्म म्हणजे ज्यात तुम्ही उघडपणे कर्ता आहात, जे करणं किंवा न करणं तुमच्या हातात आहे असं ऐच्छिक कर्म.अगदी सिरीयसली विचारतोय... 'उघडपणे' म्हणजे काय? कायीक पातळीवर जी अॅच्युअल हालचाल होते ते ? मानसीक पातळीवर कर्माचा विचार झाला, अगदी सिंपल उदाहरण म्हणजे आणखी एक पोळी खावी कि नको, आणि तुम्ही प्रत्यक्ष्य पोळी पानात घेतलीच नाहि.. म्हणजे कुठलच कर्म झालं नाहि असा काहिसा अर्थ अभिप्रेत आहे का? असल्यास तो चुकीचा आहे. कर्म इतकं शॅलो नाहि. परत सिरीयसली विचारतोय... 'ऐच्छीक कर्म' म्हणजे काय ? कारण कर्मविपाकाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा फॅक्टर आहे. ढोबळ मानाने बघायचं झाल्यास 'इच्छा' परिणामांना प्रभावीत करणारी, परिणामांचा रोख निश्चित करणारी संज्ञा आहे. भौतीकीच्या नियमांनी चालणार्या जड व्यवहारांच्या वृत्तींना निवृती करणानी अशी हि 'इच्छा' नामक एण्टीटी स्थूलाची पुढली स्टेज डिसाईड करते. कर्त्याला इच्छा झाली, इच्छेने जडाला हलवलं. जड आपल्या वृत्तींसकट हललं. जडाच्या या बदललेया वृत्ती परत कर्त्यासमोर उभ्या ठाकल्या, बिकॉझ हि आस्क्ड फॉर इट. कर्म सिद्धांताचा ढोबळ मानाने हा बेस आहे. कर्ता सतत आपली फ्री विल एक्झीक्यूट करत असतो. मनाच्या, व्यावहारीक दृष्टीने आठवणीच्या पातळीवर हि फ्री विल शब्द रुपाने प्रकट होवो अथवा न होवो (सहसा ति होत नाहिच... अगदी ९९.९९% टाइम्स). कर्ता सतत मेनु ऑर्डर देत असतो. त्यानुसार त्याच्या समोर प्लेट येत असते. आपण हि प्लेट कधि ऑर्डर केली हे कर्त्याला आठवणे, न आठवणे हि फार क्षुल्लक बाब आहे, कारण हि आठवण देणारी मेमरीच मुळी अतीशय क्षुल्लक आहे (पाढे पाठ करणारी हिच ति बया). थोडक्यात काय, तर अशा पाढे पाठ करणार्या मेमरीचा आणि कर्माच्या मेकॅनिक्सचा काहि संबंध नाहि. असलाच तर, कर्म ज्याप्रमाणे सजीवाचा अखत्यारीत असलेल्या जड तत्वाला जसं प्रभावीत करतं तसं या मेमरीला देखील करतं. इतकाच तिचा रोल.
२. तुम्ही विचार करतायं त्या जैविक स्मृतींनी घडणार्या क्रिया (इम्युन सिस्टम, जिनोम, किंवा तत्सम रुधिराभिसरण, अन्नपचन) कर्मसिद्धांताच्या कक्षेतच येत नाहीत कारण त्यात कर्ता म्हणून व्यक्तीची कामगिरी शून्य असते.वर म्हटल्याप्रमाणे अशी कुठलीच गोष्ट नाहि जि कर्म सिद्धांताच्या कक्षेत येत नाहि. मग तो पदार्थ असो वा ऊर्जेची रुपं.
३. सोत्रींनी क्वांटम फिजिक्समधे आणून असाच विपर्यास केला आहे. त्याचा आणि व्यक्तीगत कर्माचा सुतराम संबंध नाही.अगदी १००% संबंध आहे. क्वांटम फिजिस्क भौतीकीच्या सूक्ष्म पातळ्यांचा अभ्यास करते. कर्म या सर्व पातळ्यांवर प्रभाव टाकतं. वर म्हटलय तसं कर्माने भौतीकाची वृत्ती बदलते (वृत्ती = करंट नेट टेण्डन्सी) वृत्तीतला हा बदल आत्यंतीक सूक्ष्म ते स्थूल पातळ्यांवर अभ्यासला जातो. त्यानुसार भौतीकशास्त्राच्या शाखा तयार होतात.
४. गीतेत सांगितलेला कर्मयोग आणि तिथे अपेक्षित असलेलं कर्ता प्रभावित कर्म हा कर्मसिद्धांताचा विषय आहे कारण जैविक स्मृतींनी किंवा क्वांटम फिजिक्सनुसार घडणार्या कर्माचा कर्मविपाक शून्य आहे.भगवद्गीतेत सांगीतलेला कर्म योग आणि तिथे अपेक्षीत कर्ता-कर्मच वर सांगितलं आहे. ** भगवद्गीता फार वेगळा विषय आहे. अशी सुट्या पद्धतीने गीतेतल्या विषयांची मांडणी करणं चुक आहे. भगवद्गीतेचा मुख्य , किंबहुना एकमेव विषय म्हणजे सजीवाची वासुदेव भक्तीत परिणीत होणारी अवस्था. सगळी गीता या एका कन्सेप्टवर तोलली आहे. गीतेत वर्णीलेला कर्मयोग देखील त्यापासुन वेगळा काढता येत नाहि. पण तो भिन्न विषय आहे. आणि कदाचीत इथे त्याची चर्चा कठीण आहे.
थोडक्यात, तुम्ही दोघांनीही वेगळीच लाईन पकडली आहे !आम्हाला जि लाइन प्रामाणीकपणे दिसली ति आम्हि टंकली. इतर लाइनींचा खुल्या दिलाने विचार करण्याचं आम्हाला अजीबात वावडं नाहि. प्रतिसादाची दिशा मात्र प्रश्नकर्त्याच्या टोनवर अवलंबुन असते. या धाग्यात कर्मविपाक आणि त्याचा मेमरी वगैरे विषयांशी अत्यंत उथळ आणि चुकाचा समंध दाखवला गेला, असं आम्हाला वाटलं. तसच ते संयतपणे नमुद देखील केलं होतं. असो.
पूर्वसंचित आणि कर्मविपाकाचा पाप-पुण्याशी संबंध नसेल तर तो सिद्धांतच फेल जातो ही उघड गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली नाही. जर तसा संबंध नसेल तर देव या संकल्पनेलाही अर्थ उरत नाही कारण कर्मसिद्धांत मॅनेज करणारा कुणी राहातच नाही !पाप-पूण्याच्या इतक्या वेगवेगळ्या छटा प्रचलीत आहेत कि विचारता सोय नाहि. मॉरल पोलिसींग, कुठलच अपिअरंट कारण नसता भोगायला लागलेली सुख-दु:ख, धार्मीक ग्रंथांमधे या दोन्हिचं फ्युजन, माणसाच्या अवस्थांवर प्रभाव टाकणारं आजवर कलेक्ट झालेलं मॅग्निट्युड, अगदी कॅश ट्रान्स्फर करावी तशा कर्म प्रभाव मॅनिप्युलेट करणार्या संकल्पना... पाप-पुण्याच्या बाबतीत हे सर्वच खरं आहे. राहिल प्रश्न देवाचा... तर देव.. ईश्वर म्हणुया, हा कन्सेप्ट देखील फक्त पाप-पुण्याच्या तराजुने मोजावा इतका उथळ नाहि. गोविंद = सर्व कारण कारणम् (root cause of all causes, and cause of itself). हा वाद-विवादाचा विषय नसुन रिअलझेशनचा आहे. कोणाला खरच ते रिअलाइझ करायचं असेल तर, आणि तरच, त्यावर चर्चा संभवते. अन्यथा नुसता वितंडवाद. पण तो सध्याचा विषय नाहि. धन्यवाद
In reply to जीन्स आणि इम्यून सिस्टम हे by कोहंसोहं१०
In reply to @ कोहंसोहं१० : वाचा ! by संजय क्षीरसागर
In reply to वरच्या प्रतिसादात मी by कोहंसोहं१०
In reply to कोहंसोहं१० : तुम्हाला कर्मसिद्धांताला अपेक्षित कर्मच by संजय क्षीरसागर
In reply to तात्पर्य by कपिलमुनी
In reply to माझे मत. by शा वि कु
जनुकामध्ये किंवा इतरत्र साठवली गेलेली माहिती म्हणजेच पूर्वसंचिताची कल्पना आहे हे म्हणणे मला अतार्किक वाटते.इतक्यात अतार्किक वाटून घेऊ नका. क्वांटम फिजिक्सच्या क्वांटम एन्टॅन्गलंमेंट आणि क्वांटम फील्ड ह्या संकल्पना समजून घेतल्याखेरीज असे मत बनवू नका!१
पापपुण्याची कल्पना ही सामाजिक स्थैर्य आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नव्हती काय ?अगदी! पापपुण्य ह्या मानवनिर्मीत कल्पना आहेत. त्यांचा प्रत्यक्ष संचित आणि कर्मविपाक ह्याचाशी काहीही संबंध नाही. मुळात कर्मविपाक समजून घेण्यासाठी कर्म म्हणजे नेमकं काय हे समजावून घेणे गरजेचे आहे. २ कर्म म्हणजे काय हे नक्की केल्याशिवाय (टू बी ऑन सेम पेज) संवाद न होता वादच होऊ शकतो. (अर्थात, ज्यांना फक्त वादच करायचा आहे त्यांना वगळून). --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- १ क्वांटम फिजिक्सच्या संकल्पनांवर एक लेखमालिका लिहायचा मानस आहे, अभ्यास चालू आहे. २ हा प्रतिसाद आणि एका लेखाच्या पलीकडचा आवाका आहे, ह्यावरही एक लेखमालिका लिहायचा मानस आहे. - (क्वांटम साधक) सोकाजी
In reply to माझे मत. by शा वि कु
जनुकामध्ये किंवा इतरत्र साठवली गेलेली माहिती म्हणजेच पूर्वसंचिताची कल्पना आहे हे म्हणणे मला अतार्किक वाटते.इतक्यात अतार्किक वाटून घेऊ नका. क्वांटम फिजिक्सच्या क्वांटम एन्टॅन्गलंमेंट आणि क्वांटम फील्ड ह्या संकल्पना समजून घेतल्याखेरीज असे मत बनवू नका!१
पापपुण्याची कल्पना ही सामाजिक स्थैर्य आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नव्हती काय ?अगदी! पापपुण्य ह्या मानवनिर्मीत कल्पना आहेत. त्यांचा प्रत्यक्ष संचित आणि कर्मविपाक ह्याचाशी काहीही संबंध नाही. मुळात कर्मविपाक समजून घेण्यासाठी कर्म म्हणजे नेमकं काय हे समजावून घेणे गरजेचे आहे. २ कर्म म्हणजे काय हे नक्की केल्याशिवाय (टू बी ऑन सेम पेज) संवाद न होता वादच होऊ शकतो. (अर्थात, ज्यांना फक्त वादच करायचा आहे त्यांना वगळून). --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- १ क्वांटम फिजिक्सच्या संकल्पनांवर एक लेखमालिका लिहायचा मानस आहे, अभ्यास चालू आहे. २ हा प्रतिसाद आणि एका लेखाच्या पलीकडचा आवाका आहे, ह्यावरही एक लेखमालिका लिहायचा मानस आहे. - (क्वांटम साधक) सोकाजी
In reply to जनुकामध्ये किंवा इतरत्र by सोत्रि
मुळात कर्मविपाक समजून घेण्यासाठी कर्म म्हणजे नेमकं काय हे समजावून घेणे गरजेचे आहे.execution of free will वगैरे कितीही शब्दात कर्माची डेफीनेशन पकडतो म्हटलं तरी कर्म हि इतकी गहन संकल्पना आहे कि मती गुंग व्हावी. होऊन जाऊ दे फक्कड लेखमाला.
@ त्याचू वैलपान : त्याचू फार शोभा होतेयं !