विळखा -४
लेखनप्रकार
विळखा -४
डॉ पै यांच्या बाह्य रुग्ण विभागात येऊन सकाळी आठ वाजताच दाखल झालो.माझा एक वर्ग मित्र टाटा मध्ये विभागप्रमुख आहे त्याला फोनकरून सांगून ठेवले होते कि डॉ. पै यांच्याशी बोलून ठेव. नऊ वाजेपर्यंत तेथे १०० एक रुग्णांची गर्दी झाली. यथावकाश त्यांचे सहाय्यक तेथे आले आणि रुग्ण पाहायला सुरुवात केली. आमचा नंबर लवकर आल्यामुळे बराच लवकर लागला. आत गेलो आणि मी डॉक्टर आहे अशी ओळख करून दिली आणि सर्व पार्श्वभूमी त्या डॉक्टरना समजावून सांगितली( मानेला गाठ कधी आली पासून येथपर्यंत कसे पोहोचलो पर्यंत) त्यांनी आईला तपासले फाईल मध्ये नोंदी केल्या आणि सांगितले कि तुम्ही बाहेर बसा डॉक्टर पै येतीलच.
आता आम्ही बाहेर बसलो दोन अडीच तास झाले तरी डॉक्टर पै काही आले नव्हते. मग मी माझ्या मित्राला फोन केला. त्यावर त्याने मला सांगितले कि डॉक्टर पै ना त्याने फोन केला तो त्यांनी उचललेला नाही आणि त्यांच संदेश पाठवला होता त्याचे उत्तर आलेले नाही. मी परत एकदा प्रयत्न करतो.
साधारण साडे बारा वाजता त्याच परत फोन आला. तो म्हणाला डॉक्टर पै काल केलेल्या तातडीच्या शल्यक्रियेत पहाटे तीन पर्यंत रुग्णालयातच होते त्यानंतर काही तरी गुंतागुंत झाल्यामुळे शेवटी पहाटे पाच साडेपाच ला घरी गेले. परंतु ते साडे आठला रुग्णालयात परत आले आहेत परंतु काहीतरी महत्त्वाच्या मिटिंग मध्येच आहेत आणि त्यांनी माझा व्हॉट्स ऍप चा संदेश अजून पाहिलेला नाही. पण ते बाह्य रुग्ण विभागात नक्की येणार आहेत.
आता आम्ही मधल्या काळात थोडे खाऊन घेतले आणि परत वाट पाहत बसलो. शेवटी अडीचला मित्राचा फोन आला कि आताच मी त्यांना जेवणाच्या टेबल वर भेटलो. ते जेवून तेथेच येत आहेत. त्यांना मी तुझ्या आईबद्दल बोलून ठेवले आहे.
साधारण तीन वाजता डॉक्टर पै आले. आल्या आल्या त्यांनी आम्हाला बोलावणे पाठवले. आईला तपासले मी केलेला सिटी स्कॅनच्या प्रतिमा आणि अहवाल पाहिला आणि मी त्यांना प्रथम अहवाला नुसार MTC असण्याची शक्यताच जास्त आहे असे सांगितले. त्यानंतर त्यांनी आमच्या आईला समजावून सांगितले कि हा कर्करोग तेवढा काही आक्रमक नाही. शल्यक्रिया केल्यावर तुम्हाला ५ वर्षे नक्की मिळतील आणि पुढच्या ५ वर्षाबद्दल ५०:५० आहे.
मग माझ्याशी बोलताना त्यांनी काही तपासण्या DOTA PET स्कॅन( हा कर्करोग शरीरभर पसरला आहे का यासाठी), एन्डोस्कोपी आणि एंडोस्कोपिक सोनोग्राफी( कर्करोग अन्न नलिकेच्या आणि स्वरयंत्राच्या आत शिरला आहे का यासाठी) टाटा मधूनच करून घ्या. बाकी काही रक्त चाचण्या(CALCITONIN) ज्या टाटात अजून उपलब्ध नाहीत त्या बाहेरून करून घ्या असे सांगितले. या सर्व चाचण्या झाल्या कि मग आपण शल्यक्रियेची तारीख नक्की करू. MTC आहे त्यामुळे तेवढी घाई नाही पण जर ATC असता तर मी त्यांना यादीत कुठेतरी कसातरी घुसवलं असतं.
चार पाच मिनिटात त्यांच्या बरोबर सल्ला मसलत आटोपली( त्यांनी पाहण्यासाठी ३० ते ३५ रुग्ण त्यांच्या सहाय्यकानी थांबवून ठेवलेले होते) आणि आम्ही बाहेर आलो. हि गोष्ट २४ जून ची.
टाटा रुग्णालयाची सद्य स्थिती-- २४ जून पासून सर्व चाचण्या पूर्ण करून मी ८ जुलै रोजी परत डॉ पै यांच्याकडे सल्ला मसलत आणि शल्यक्रियेच्या तारखेसाठी गेलो. तेंव्हा सर्वात लवकरची तारीख २५ जुलै ची मिळत होती. अर्थात यात आमच्या आईला छाती आणि मान अशा दोन शल्यक्रिया एकाच वेळेस करणे आवश्यक आहे आणि असे दोन्ही शल्यचिकित्सकांचा गट फक्त गुरुवारी उपलब्ध असतो. त्यामुळे आठवड्यातील एकच दिवस अशा शल्यक्रियांना उपलब्ध आहे. दुर्दैवाने २५ तारीख ठरली असताना छातीची शल्यक्रिया करणारे चिकित्सक उपलब्ध नव्हते त्यामुळे आता हि शल्यक्रिया १ ऑगस्ट रोजी होणार आहे.
टाटा या रुग्णालयाची स्थिती मुंबईच्या लोकल सारखी आहे. तुम्ही पहिल्या वर्गाचे तिकीट काढले तरीही गर्दीत फारसा फरक पडत नाही. आणि या प्रचंड वाढत्या गर्दीचे कुणीच काहीही करू शकत नाही.
तेथिल कर्मचारी वर्ग अतिशय संयमी आणि सेवावृत्तीने काम करतो हे मी डोळ्याने पाहिलेले आहे. मी इतक्या दिवसात एकही कर्मचाऱ्याला कोणावरही ओरडताना पाहिलेले नाही.( अशा स्थितीत डोके शांत ठेवणे हे फार कौशल्याचे काम आहे)
मी स्वतः डॉक्टर असल्याने मला जरी प्राधान्य द्यायचे असले तरीही तेथील डॉक्टरना ते शक्य नाही. अगोदर दिलेल्या तारखेला एखादा रुग्ण जर आला नाही तरच तुमचा नंबर लागू शकतो.
DOTA PET ची तारीख मला लवकर मिळाली याचे कारण त्या दिवशी तारीख दिलेल्या एका रुग्णाला २६ हजार रुपये परवडत नसल्याने त्याने पुढची तारीख मागून घेतली त्यात माझा नंबर लागला. (मी मुंबईत राहणार आहे आणि डॉक्टर आहे त्यामुळे त्यांनी मला फोन केला कि मी बाकी सर्व सोडून तेथे खात्रीने पोहोचणारच यामुळे त्यांनी आदल्या दिवशी मला बोलावून घेतले.)
या रुग्णाला तेथे असलेले समाजसेवक पैशाची उपलब्धता करून देतात पण त्यासाठी लागणारी प्रक्रिया करावीच लागते कारण कुठेही गेलात तरी लांबच लांब रांग असतेच.
तेथील डॉक्टर हे कामाच्या बोज्याने अत्यंत वाकलेल्या स्थितीत आहेत. मी माझ्या मित्राला भेटायला गेलो (तो लहान मुलांच्या ल्युकेमियाचा विशेषज्ञ आहे) दुपारी अडीच वाजता त्यांच्याकडे( तो आणि इतर त्याचे तीन सहाय्यक) १८५ रुग्ण प्रतीक्षेत होते.
अशी रुग्णालये प्रत्येक राज्यात किमान चार तरी असली पाहिजेत तरच टाटा वर येणार हा लोंढा थांबेल. अर्थात हि स्थिती माझ्या आयुष्यात तरी येणार नाही याची मला पूर्ण जाणीव आहे
मी "टाटा मध्येच" जाण्याचे कारण--
१) मला मुंबईतील कोणत्याही खाजगी रुग्णालयात शल्यक्रिया करणे परवडधा, परंतु रोज रोज अशा शरीराच्या दोन ठिकाणी एकत्र शल्यक्रिया करणारी टीम कमी रुग्णालयात आहे आणि त्यातून ते सातत्याने अशी शल्यक्रिया करत नाहीत याउलट टाटा येथे अशा शल्यक्रिया नित्यनियमाने होत असल्याने तेथे जायचा निर्णय घेतला शल्यकौशल्य हे सतत धार लावलेल्या शस्त्रासारखे अणकुचीदार असते.
२) डॉ प्रथमेश पै यांच्या कौशल्याबद्दल या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वानीच खात्री दिली.
३) आपण (सर्वसामान्य माणूस) वैद्यकीय सेवा आणि इतर सेवा यात गल्लत करतो.
रुग्णालयात गर्दी नाही, भेटायचे तास सोयीचे आहेत, घराच्या जवळ आहे, वेगळी खोली आहे, तेथे जेवण घरून न्यावे लागत नाही, टीव्ही चांगला आहे या सर्व इतर सेवा आहेत.
शल्यक्रिया करणारे डॉक्टर किती निष्णात आहेत या बरोबरच शल्यक्रियेच्या नंतर काळजी घेणारा कर्मचारी वर्ग किती निपुण आहे यावरसुद्धा बऱ्याच वेळेस शल्यक्रियेचे यश अवलंबून असते.
४) आमच्या घरापासून रुग्णालय लांब असले तरीही आई भरती झाल्यावर तिला प्रवास करायचा नाही. माझ्या त्रासाची किंमत माझ्या आईने चुकवायचे काहीच कारण नाही.
५) आईच्या कर्करोगासाठी शल्यक्रिया हाच सर्वात उत्तम पर्याय आहे आणि अगदी आतापर्यंत या कर्करोगासाठी उपयुक्त अशी रेडिएशन किंवा केमोथेरपी उपलब्धच नव्हती. गेल्या ३-४ वर्षात असे उपचार उपलब्ध झाले आहेत.
६) आईचा कर्करोग मंदगतीने वाढणारा आहे आणि तीन इतर तज्ज्ञांकडून खात्री करून घेतली आहे कि एक महिना थांबण्याने फारसा फरक पडणार नाही.
सामान्य माणसांसाठी सल्ला (आगाऊ)-- असे असले तरीही ज्यांच्या नातेवाईकांच्या कर्करोगासाठी अशी गुंतागुंतीची शल्यक्रिया लागणार नाही त्यांनी परवडत असेल तर टाटा ऐवजी टाटा मध्ये प्रशिक्षित डॉक्टरांकडून इतर ठिकाणी शल्यक्रिया करून घ्या असाच सल्ला मी देईन.
कारण आपण जर मुंबईत राहत नसलात तर प्रत्येक वेळेस मुंबईत खेपा मारणे शक्य होणार नाही.
माझा स्वतःचा व्यवसाय असल्यामुळे मला "रजा" हा प्रश्न नाही. हा प्रश्न "काट्यावर" नोकरी असणाऱ्या माणसासाठी गंभीर प्रश्न असू शकतो.
टाटा मध्ये आपल्या संयमाची अगदी परीक्षा होते. तेंव्हा उतावीळ असणाऱ्या माणसाने तेथे जाऊच नये.
हि लेखमाला टाकण्याचा हेतू -- कर्करोगासारख्या दुर्धर आजार झाल्यावर प्रत्यक्ष स्थिती काय होते हे यथातथ्य आणि सद्यस्थिती मांडण्याचा प्रयत्न आहे.
प्रत्येक माणसाची अशा स्थितीस सामोरी जाण्याची मानसिक स्थिती वेगवेगळी असू शकते. सामान्य पणे कितीही गंभीर स्थिती असली तरी माझी विचारशक्ती स्थिर असते म्हणून मी अजून शल्यक्रिया व्हायची असतानासुद्धा मी हे लेख लिहू शकलो.
यात शल्यक्रियेनंतर अजून काही लिहिण्यासारखे असेल तर लिहेन.
सर्व मिपाकरांना त्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि दाखवलेल्या काळजी साठी मनापासून शुभेच्छा आणि दंडवत.
मी आपला ऋणी आहे __/\__
वाचने
18721
वाचनखूण
प्रतिक्रिया
50
शल्यक्रिया झाल्यावर ती यशस्वी
In reply to शल्यक्रिया झाल्यावर ती यशस्वी by यशोधरा
+१
In reply to शल्यक्रिया झाल्यावर ती यशस्वी by यशोधरा
अगदी हेच.
In reply to अगदी हेच. by श्वेता२४
+१
In reply to शल्यक्रिया झाल्यावर ती यशस्वी by यशोधरा
+1
In reply to शल्यक्रिया झाल्यावर ती यशस्वी by यशोधरा
असेच
In reply to शल्यक्रिया झाल्यावर ती यशस्वी by यशोधरा
+१
ऑल द बेस्ट डॉक.
डॉ क
सदिच्छा
सर वाचतेय
डॉक
आमच्या सदिच्छा सदैव तुमच्या
१ ऑगस्ट रोजी होणारी
आपल्या मातोश्री लवकर सुखरुप
कंबर दुखी किंवा मानेचे दुखणे
In reply to कंबर दुखी किंवा मानेचे दुखणे by सुबोध खरे
थोडं अवांतर
डॉक,
आपल्या मातोश्रींसाठी सदिच्छा.
अश्या प्रसंगातून जात असताना,
केमोथेरपी नंतर होणारे
In reply to केमोथेरपी नंतर होणारे by सुबोध खरे
हो, अगदी असंच झालं होतं
डॉक्टर
तुमच्या रॅशनल विचार प्रणालीला
अतिशय उत्कृष्ट
डॉ पै आणि त्यांच्या सारखे इतर
खरे सर,
शुभेच्छा!!
तुमच्या आईच्या जिद्दीला (या
नमस्कार!
आम्हा सर्वांच्या सदिच्छा
आज आपल्या आईंची शल्यक्रिया
आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि
In reply to आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि by सुबोध खरे
वाचून बरं वाटलं
In reply to आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि by सुबोध खरे
अभिनंदन
In reply to आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि by सुबोध खरे
डॉ. खूप चांगली बातमी.
In reply to आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि by सुबोध खरे
खुप चांगली बातमी
In reply to आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि by सुबोध खरे
छान!
In reply to आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि by सुबोध खरे
अभिनंदन
सर्व स्थिरस्थावर झाले की
छान बातमी
+१११
अत्यानंद झाला..शुभेच्छा..
शुभेच्छा
ऑपरेशन यशस्वी झाले याबद्दल
खूप चांगली बातमी
शुभेच्छा. केवळ इतरांच्या
ऑपरेशन यशस्वी झाले याबद्दल
चांगली बातमी, त्या लवकरात
डॉ बाणावली