" कशी आहेस ? "
लेखनविषय:
" कशी आहेस ? "
वेशीमधून बाहेर पडताना
उरले सुरले बळ एकवटून
त्याने शेवटी विचारलेच
" कशी आहेस ? "
निर्विकार डोळ्यांनी
निर्विचार मनाने मग
मीही फक्त मान हलवली .
शब्द खूप जड असतात ........
परत कोण ..... ...
ते ओझं वाहणार........
नाहीतर सांगितलं असतं त्याला
"जशी सोडून गेलास ....... तशीच आहे !"
-----------------फिझा !
वाचने
5813
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
वा मस्त!
जे घडाघडा बोलायला ते न बोलता समोरच्याने समजावून घ्यावे अशी त्यांची अपेक्षा असते.
त्यामुळे अपेक्षाभंगाचे दु:ख आयुष्यभर वागवत बसावे लागते,
पैजारबुवा,
In reply to हाच तर प्रॉब्लेम आहे बायकांचा... by ज्ञानोबाचे पैजार
आणि पुरुषांचा हा प्रॉब्लेम आहे की तिच्या मनात आपल्याबद्दल काही भावना आहेत की नाही ते कळायला मार्ग नाही. त्यामुळे उगाच सॅंडलचा टॅटू कशाला गालावर गोंदवून घ्या म्हणून ते पण दुसऱ्या मुली शोधायला लागतात. =)))
In reply to आणि पुरुषांचा हा प्रॉब्लेम by सोन्या बागलाणकर

क्या बात!
याला म्हणतात खरी कविता.
किमान शब्द कमाल आशय.
छंदफंद याच्या चरकातून काढला आणि उपमा चंद्र यांच आलं लिंबू मारून केलेल्या ऊसाच्या रसाच्या कविता महीनाभर धुमाकूळ घालत होत्या...
दिवस सार्थकी लागला.
चुकार आडवाटेचा पांथस्थ वाचकांची पत्रेवाला नाखु
दोन चारोळीच्या तुकड्यानी
जीवन घट्ट पेलून धरलं
तू निघून गेलास जिथून
तिथेच मनाला पुरून टाकलं
तेच तेच बघून बघून
मी पुन्हा पुन्हा तिथेच जाते
त्याच प्रहरांशी , झाडावेलींशी खेळत
तुझी वाट बघत असते
माझी स्वाक्षरी ( प्रेरणा मदनबाण साहेब )
सिद्धेश्वर विलास पाटणकर
जमलीये...
+१
आवडली.. नेमकी तरीही सूचक
प्रभावी झाली आहे.
लिहा अजून
लिहा अजून
वा मस्त!