समुद्रकिनारा
लेखनविषय:
सुखस्पर्शी लाटा अविरत वारा
अफाट जल अथांग
आणी हा समुद्रकिनारा
भावनांचा उद्रेक कधी उदासीनतेचा मारा
मनी आठवणींचे काहुर
आणी पारवा भिरभिरणारा
एकांताचा खडक विचारांचा झरा
कल्लोळ दाटलेला
आणी माझ्यातला मी तळमळणारा
मिटलेले ओठ डोळे पाणावले जरा
भरुन येई ऊर
आणी सुर्य मावळणारा
मन शांत होईपर्यंत बसे मी त्या समुद्रकिनार्यापाशी
तो विचारे मग मला, येशील ना रे उद्या?
आणी मी परतणारा..
वाचने
1864
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
अहाहा! किती सुंदर कविता.
"तो विचारे मग मला, येशील ना रे उद्या?
आणी मी परतणारा.."
कसला उद्दा येतो.साता समुद्रा पलिकडे गेल्यावर?
"आठवतो मज तो वेसाव्याचा किनारा."
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
(एकटा)बेसनलाडू
In reply to कविता आवडली by बेसनलाडू
कल्पना आवडली.
रचना कल्पक आहे. (पण स्वतःच पहिल्या दुसर्या कडव्यात घातलेले रचनेचे बंधन पुढे अर्धवट का तोडले आहे. पटत नाही.)
कविता आवडली.
सुंदर कविता ..
एकांताचा खडक विचारांचा झरा
कल्लोळ दाटलेला
आणी माझ्यातला मी तळमळणारा ....सुरेख !
सुंदर कविता...
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
ने मजसी ने