मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

ट्रेड मार्क · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे. काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे. असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल. मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय? हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे. http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-1000-notes/ कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल. धन्यवाद.

वाचने 310644 वाचनखूण प्रतिक्रिया 1112

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 11/17/2016 - 10:09
अंबानी अडानी व मोठ्या उद्योगपतींना ही आधीच माहित होते वा कळवण्यात आले होते. https://www.youtube.com/watch?v=RuwaFm5bgBs भाजपाच्या आमदाराची कबूली! जे लोक पक्षाला आर्थिक मदत देतात वा विमानाच्या प्रवासाचा खर्च करतात त्यांना नरेंद्र्,अरूण अंधारात ठेवतील हे संभवत नाही असे हे गेल्या आठवड्यातच म्हणाले होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 11/17/2016 - 10:32
असे असेल तर आमच्या गावाच्या पतसंस्थेत खाते आहे अंबानी चे चेक करावे लागेल किती अब्ज टाकलेत ते.

शब्दबम्बाळ गुरुवार, 11/17/2016 - 11:40
एकंदरीत सरकारचे समर्थक जोरात दिसत आहेत! म्हणजे त्रास होतोय असे एखाद्याने नुसते म्हटले तरी तो काळा पैसेवाला, देशाभिमान नसलेला, भ्रष्टाचाराच्या विरोधात नसलेला होतोय!! ६ दिवस झाले भारतात येऊन. विमानतळावर नोटा बदलून घेण्याची कोणतीही सोया नव्हती(बंगलोर). तिथल्या अधिकाऱ्यांना विचारल्यावर त्यांनी इथे ATM बंद आहे आणि नोटा बदलून मिळणार नाहीत इतकेच उत्तर दिले! त्यांना प्रधानमंत्री स्वतः अशी सोय देणार बोलले आहेत असे सांगितल्यावर, "हम को मत पूछो" उत्तर मिळाले. विमान पहाटे आल्यामुळे ओला उबेर च्या टॅक्सी ऑनलाईन दिसत नव्हत्या. १-२ तास थांबल्यावर मिळाली आणि मग पुढे निघालो. बरेच लोक याच परिस्थितीत होते पण चिडचिड नाही केली. पैसे काढायची किंवा बदलून घ्यायची घाई नव्हती त्यामुळे उगाच गर्दीत भर नको म्हणून ३ दिवस ATM किंवा बँक इकडे गेलोच नाही. या दरम्यान १०० रुपये होते ते संपले. गेले २ दिवस ATM मधून पैसे मिळत आहेत का बघत आहे २-३ वेळा रांगेत उभा राहिलो पण तिथले पैसे संपल्याने निघावे लागले. बँकेत सांगण्यात आले कि ३:३० पर्यंत नोटा बदलून देणार. आता ऑफिस करू कि पैसे घेऊ हा प्रश्न पडला पण एका मित्राने थोडी दया दाखवून त्याच्याकडचे ३०० रुपये उधार दिले. इथे देखील छोट्या दुकानांमध्ये रोख पैसेच द्यावे लागतात. अगदी काही जीवघेणे संकट नाही आले पण आता निर्णय होऊन जवळपास १० दिवस होत आलेत तरीही रांगा संपत नाहीयेत. शनिवार रविवारी पुन्हा मोठ्या रांगा लागण्याची शक्यता आहे. याला ढिसाळ नियोजन म्हटले तर काही चुकले का? ५०० च्या नोटा काल उपलब्ध झाल्यात म्हणे मग २००० च्या नोटा घेऊन काय व्यापार खेळायचा होता का लोकांनी? १०० च्या इतक्या नोटा आहेत का कि एखाद्याने २००० दिल्यावर सुटे देता येतील. बर इतके सगळे चाललेय त्यात त्या रेड्डीने ५०० कोटी खर्चून मुलीचं लग्न लावून दिल!! बहुतेक सगळा स्वच्छपणे कमावलेला पैसा असेल कदाचित! आणि राजकीय पक्षांमध्ये 'भाजप'वालेच फक्त स्वच्छ राहिलेत ना सध्या... बाकी सगळे चोर लुटारू पण भाजप म्हणजे साधू संतांचा पक्ष असेच चाललंय जणू!

In reply to by शब्दबम्बाळ

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 11/17/2016 - 15:33
भाजपाच्या मण्त्र्याच्या मुलीचे लग्न टी.वी.वर पाहिले रे शब्दबण्बाळा.भाजपा व कॉन्ग्रेसच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती.ईतका प्रचण्ड काळा पैसा असणार्या माणसाबद्दल ना भाजपावाले काही बोलत ना कॉन्ग्रेस्वाले. ईकडे ए.टी.एम.च्या लायनीत उभे रहायला त्रास होतो म्हंटले तर हे फडणवीस देशभक्ती शिकवता आहेत जगाला.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 11/17/2016 - 22:00
अश्या लोकांची पक्ष, पक्षातील स्थान, इ कडे दुर्लक्ष करून चौकशी करून, खटला भरून योग्य ती शिक्षा ठोठावायला हवी.

राही गुरुवार, 11/17/2016 - 22:22
आज बँक ऑफ इण्डियाच्या तीन ब्रॅन्चेसमध्ये कॅशव्यतिरिक्त इतर काही कामांसाठी जावे लागले. तीनही ठिकाणी भल्या मोठ्या रांगा होत्या. विलेपारलेसारख्या सुशिक्षित सुसंस्कृत लोकांच्या वस्तीतही शंभर-दीडशे(अंदाजे) माणसांच्या रांगा होत्या याचे आश्चर्य वाटले. लोक सकाळी सहापासून रांगेत उभे राहातात असे तिथल्या शिपायाने सांगितले. दिंडोशीलाही रांगेने वळणे वळणे (झिग झॅग) घेतली होती. टोकन्स दुपारी १.४५ पर्यंत रांगेत असलेल्यांना मिळतील असा काहीसा बोर्ड लावला होता तो जवळ जाउन वाचण्याचा प्रयत्न गर्दीमुळे केला नाही. पारले येथे एटीएम् बंद होते. रांगेत आपापसात भांडणे होत होती. एनकेजीएसबीची एक ब्रॅन्च दिसली तिथे रांग फारशी नव्हती. आठदहा माणसेच होती.

In reply to by राही

माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 11/17/2016 - 23:00
सरकारचा हेतू चांगला होता रे राही पण अंमलबजावणी साफ गंडली असे हयांचे मत. नविन नोटा आल्यावर काळा पैश्यावर नियंत्रण कसे येणार हे काही अजूनही कळले नाही.

In reply to by राही

पुंबा Sat, 11/19/2016 - 11:17
विलेपारलेसारख्या सुशिक्षित सुसंस्कृत लोकांच्या वस्तीतही शंभर-दीडशे(अंदाजे) माणसांच्या रांगा होत्या याचे आश्चर्य वाटले.
हे कळलं नाही. उपरोध असेल तर ठीक आहे. पण नसेल तर,माझे प्रश्न.. सुसंस्कृत लोक रांगा लावत नाहीत? रांगा लावणारे सुसंस्कृत नाहीत? सुसंस्कृत लोकांनीं रांगा लावू नयेत? रांगा लावणे असंस्कृतपणाचे लक्षण आहे? बँकेत रांग लागली असेल तरी लोकांनी आपला सुसंस्कृतपणा दाखवण्यासाठी रांगेत उभं राहू नये? माझे मत: रांग हि एक सोय आहे, तिचे फायदे सर्वांना मिळतात जर प्रत्येकाने तिचे नियम पाळले तर. नियम पाळणे, त्यांना बायपास करून आपले काम करून घेणे हे असंस्कृतपणाचे लक्षण आहे.

In reply to by पुंबा

राही Sat, 11/19/2016 - 13:55
छे छे. उपरोध अजिबातच नाही. मला खरेखुरे आश्चर्य वाटले. कारण रोज सहा वाजल्यापासून मोठ्य सख्येने रांगा लावायला येणे, रांगेमध्ये भांडणे होणे हे मला अधिरेपणाचे(इम्पेशन्स) आणि लोक कावल्याचे लक्षण वाटले. पार्ल्यातले लोक कावतील, इम्पेशन्ट असतील असे वाटले नव्हते. दिन्डोशी, कांदिवलीचा क्राउड वेगळा आहे. तिथे शाब्दिकच काय, प्रत्यक्ष मारामारीसुद्धा घडू शकते. या आणि इतर स्थळांवरच्या चर्चांमध्ये काहींची 'लोकांनी धीर धरायला हवा, उगीच गर्दी करू नये' अशी मते आणि आवाहने वाचली होती. म्हणून.

श्रीगुरुजी Fri, 11/18/2016 - 08:44
Adani and Ambani are not standing in the queue to exchange notes. They must have aleady changed all notes. - Kejriwal Couldn't agree more. But Kejriwal, Vadra, Ratan Tata, Narayan Murty'Lalu, Kalmadi, Anna Hajare etc. are not standing in the queue as well to exchange notes. Seems they too were aware of this decision well in advance.

आबा Fri, 11/18/2016 - 12:29
आठवडाभर निष्कारण छळ होऊन आणि 47 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा याला चांगला निर्णय म्हणणारे असंवेदनशिलतेच्याही पलिकडे पोचलेले आहेत. आणि नोटा बदलून काळ्या पैश्यावर नियंत्रण आणू पाहणार्यांच्या बुद्धिसाठी तर मराठी मध्ये विशेषणही नाही

राही Fri, 11/18/2016 - 14:46
संततीच्या लग्नासाठी एकदाच अडीज लाख रुपये बँकेतून मिळू शकतील अशी सवलत सरकारने दिली आहे अशी आज किंवा कालची बातमी आहे. या विषयी एक दोन शंका आहेत. तर कुणी जाणकार खुलासा करेल काय? १) हे कर्ज असणार आहे की आपल्याच खात्यातून काढण्याची परवानगी आहे? २)सध्या खातेदाराने मागणी करूनही बँका ठराविक रक्कमच प्रत्येकाला देऊ शकत आहेत, कारण त्यांच्याकडे रोकड नाही. त्या मानाने अडीज लाख ही खूपच मोठी रक्कम आहे; तर ती कशी काय देणार? ३) मुला/मुलीचे लग्न आहे याचा पुरावा काय द्यावा लागेल? ४) समजा लग्न अचानक रद्द झाले किंवा ठरवल्या तारखेस होऊ शकले नाही, पुढे ढकलले गेले, तर पैसे परत बँकेत भरावे लागतील का? प्रश्न प्रामाणिक आहेत. उत्तरही तसेच असावे अशी अपेक्षा आहे.

In reply to by राही

लग्नाच्या मान्य पुराव्यासह (पुराव्यासंबंधी बँकेत चौकशी करा) आणि पुरेसे पैसे असलेल्या खात्यावरचा (जास्तीत जास्त रु२.५ लाखाचा) बेअरर चेक द्या, बँक नोटांच्या स्वरूपात चेकवर लिहिलेले पैसे तुम्हाला देईल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सुबोध खरे Fri, 11/18/2016 - 19:14
रडारड करणाऱ्या लोकांबद्दल काय बोलावे. परवा मी बँकेच्या रांगेत एक तास बसून १३. ५६ ते १४. ५३( होय बँकेने बाहेर प्लॅस्टिकच्या खुर्च्या ठेवल्या होत्या) आपले पैसे भरले. काही जुन्या नोटा होत्या काही नव्या नोटा होत्या.( दोन्ही रुग्णांकडून आलेल्या). सगळं शिस्तबद्ध होतं. बँकेच्या शिपायाने लोकांना पाणी सुद्धा दिलं. तेथे असलेल्या जवळ जवळ १०० लोकांपैकी एकही माणूस बोम्ब मारत नव्हता. तीन वेगवेगळ्या रांगा होत्या. एक पैसे भरण्यासाठी एक पैसे काढण्यासाठी आणि एक नोटा बदली करण्यासाठी. वरिष्ठ नागरिकांना रांग नव्हती. एकदा तुम्ही मानसिक तयारी केली कि काहीही त्रास होत नाही. इंडिया टुडे चा अंक घेऊन गेलो आणि व्हाट्स अँप होतंच. रांगेत आत गेल्यावर एक "प्रिव्हिलेज" कस्टमर मला वेगळी "सोय" हवी, रांगेत उभा राहणार नाही म्हणून फोन वर वाद घालत होता. आणि बँकेच्या कर्मचारी बाई त्यांना शांतपणे असे शक्य नाही म्हणून सांगत होत्या. काही लोक हुच्च्भ्रू असतात आणि त्यांना लोण्यावरच चालायची सवय असते. हा उद्या इंग्रजीत "डीमॉनेटायझेशन" ला शिव्या घालणार असे दिसते.

In reply to by सुबोध खरे

डीमॉनेटायझेशनला कोणीच शिव्या घालणार नाही. पण जे काही नियोजन होते ते ढिसाळ होते हे मान्य करणार की नाही? रांगेत उभे राहण्याचा व देशप्रेमाचा संबण्ध लावणार्या फडणवीस्,राम माधव ह्या मंडळींबद्दल काय बोलणार? हेच कॉन्ग्रेसच्या राज्यात झाले असते तर हेच लोक 'लोकांकडून पैसा घेऊन तो ईटालीला पाठवत आहेत' म्हणाले असते व आर.बी.आय.समोर रास्ता रोको केले असते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ट्रेड मार्क Sat, 11/19/2016 - 00:53
नियोजन फारसे चांगले नव्हते किंवा करता आले नाही हे मान्य केले तरी १००% लोकांना खूष करेल आणि काही त्रास होणार नाही असे नियोजन कसे करायचे ते सांगा. मुळात क्रियाच बऱ्याच लोकांना त्रासदायक होती त्यामुळे ते दंगा करणार हे गृहीतच आहे. तुमच्या ह्यांना पण फुलप्रूफ प्लॅन विचारा. अजून दोघे तिघे पण प्लॅन देणार होते/ आहेत (त्यांची मुदत उलटून गेली आहे पण आम्ही आशा सोडलेली नाही) तर सगळे मिळून किंवा वेगवेगळे प्लॅन द्या. आपण त्यावर चर्चा करू आणि चांगला असेल तर PMO ला कळवू. कसे?

In reply to by ट्रेड मार्क

थोडा त्रास सहन करायला काहीच हरकत नाही रे ट्रेड्मार्का. लोक तो सहन करता आहेतच.काळा पैसा जमवणारे मुख्य्त्वे असतात हॉटेल्वाले,सोनार्,किराणा मालाचे व्यापारी,आय.ए.एस.,आय.पी.एस.,कस्टमवाले. ह्या लोकाण्ची आता अडचण होते की हे लोक २०००च्या नव्या नोटांनी पुनःश्च हरिओम करतात ते येणारा काळ सांगेल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सुबोध खरे Sat, 11/19/2016 - 12:54
माईसाहेब व्यापारी व्यावसायिक किंवा उद्योजक हे मुळात काळा पैसा जमा का करतात हे पाहिले पाहिजे. मी जर सचोटीने सगळे पैसे बँकेत भरून त्यावर कर भरत असेन पण माझे काम करण्यासाठी माझ्या घामाच्या पैशातून सरकार दरबारी काम करण्यासाठी लाच द्यावी लागत असेल किंवा मला घर घ्यायचे असेल तर तेथे काळा पैस द्यावा लागत असेल तर तो मी कुठून आणायचा? हि घाण साफ झाली तर वरील तीन श्रेणीतील माणसे काळ्या पैशाच्या मागे कमी लागतील. माणूस स्वार्थी आणि लोभी आहे त्यामुळे काही टक्के लोक तरीही कर चुकवेपणा करण्याचा प्रयत्न करणारच. कर भरण्यामुळे कोणता फायदा होणार असेल तर लोक तो भरतील यापेक्षा कर चुकवल्यामुळे आपले काहीच बिघडत नाही हे लक्षात आल्यामुळे लोकांना कर न भरता पैसा घरात ठेवावासा वाटतो. शिवाय आजूबाजूची माणसे मी इतका पैसा कर ना भरता वाचवला हि फुशारकी मारताना दिसतात आणि त्यांचे आतापर्यंत काहीच वाकडे होत नव्हते यामुळे प्रामाणिक माणसाला एक फसवले गेल्याची भावना होती. आता एका फटक्यात अशा लोकांचा तोंडाला फेस आलेला पाहून जे लोक मुळात प्रामाणिक आहेत अशा लोकांना दिलासा मिळाला आहे. असे लोक आपला कर प्रामाणिकपणे भरण्यास नक्की तयार आहेत. येणाऱ्या काळात जर सरकारने काळा पैसा असणाऱ्या लोकांवर सज्जड कारवाई केली तर यातील बरेच लोक परत असा पैसे बाळगण्यास कचरतील. निर्ढावलेले लोक तरीही कर चुकवण्याचा प्रयत्न करतीलच. राहिली गोष्ट खाबू सरकारी अधिकारी, स्मगलर गुंड आणि अंडर वर्ल्डचे लोक यांची त्यांचे उत्पन्न मुळातच अनैतिक आहे त्यामुळे त्यांच्या कडे काळा पैसे येतच राहणार.साकारणे कितीही कार्यवाही केली तरी हे लोक नवीन नवीन भ्रष्ट मार्ग शोधून काढत राहणारच. आणि हा मांजर उंदराचा खेळ अनंत कला पर्यंत चालूच राहील. या लोकांवर किती सक्तीने आणि निष्ठेने सरकार कार्यवाही करेल त्यावर या समांतर अर्थव्यवस्थेत किती काळा पैसे येईल हे अवलंबून असेल. परंतु मानवाची स्वार्थी आणि लोभी वृत्ती जोवर बदलत नाही टोकावर काळा पैसे जमा होणारच. देश भ्रष्टाचार "मुक्त" होईल हे कधीही शक्य नाही. भ्र्रष्टाचार आणि काळा पैसे जितका कमी तितकी देशाची प्रगती जास्त होईल हि वस्तुस्थिती.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

राही Sat, 11/19/2016 - 12:55
बँकेत गर्दी असल्याने कर्मचारी तपशीलवार उत्तरे देत नाहीयेत. शिवाय काही नोटिफिकेशन्स त्यांच्याकडेसुद्धा लगेच पोचत नसावीत. महत्त्वाचे म्हणजे मिपावर लोक आपल्याला माहीत असेल तर त्वरित माहिती देतात. त्यामुळे विचारले. आज मुश्किलीने एका बँकेत प्रवेश मिळवताना बाहेर अशी माहिती मिळाली की ती योजना रद्द केली गेली आहे. अर्थात हे हिअरसे. आतमध्ये गेल्यावर माझे काम संपल्यावर संबंधित अधिकार्‍याला विचारण्याचा प्रयत्न केला तर त्याला आधीच काही जणांनी भंडावून सोडल्याचे त्याच्या बोलण्यावरून समजले. अशा बातम्या पेपर आणि टीवीवर आम्हाला समजण्याआधी येतात आणि लगेचच लोक इथे येवून सतावतात, असे काहीसे तो बोलला. आणि बॅंक एका आठवड्यात जास्तीत जास्त २४००० (चौवीस हजार) देते आहे हे तिथे कळले. कदाचित ही चौवीस हजारांची बातमी अगोदर प्रसिद्ध झाली होतीही असेल.

In reply to by राही

राही Sat, 11/19/2016 - 12:58
डॉक्टर साहेब,(सुहास म्हात्रे) बँकेतून पैसे कसे काढावे याचे मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद.

निओ१ Sat, 11/19/2016 - 01:07
मी आज माझ्या युको बॅन्कमध्ये दुपारी गेलो, विचारले थोडी रक्क्म हवी आहे कशी काढता येईल, एटीएम बंद आहे. त्या ताईंनी एक फॉर्म दिला व म्हणाली द्या भरून. दिले, हवे असलेले पैसे मिळाले व मी बाहेर आलो. शुन्य गर्दी! परत आत आलो व विचारले की येथे गर्दी कशी नाही? उत्तर मिळाले, तुम्ही उशीर केलात, २-३ दिवस आधी आला असता तर... असे म्हणत फुठलेल्या काचेच्या दरवाज्याकडे बोट दाखवले व एका कर्मचारीच्या हातातवर असलेल्या जख्मेवर. काहीच न बोलतो बाहेर आलो व परत मनात आले म्हणून परत गेलो व सर्वांना एकू जाईल या आवाजात म्हणालो, तुम्ही लोकांनी या काही दिवसात खूप कष्ट व खूप काही भोगले असेल, त्याबद्दल मी समाजाच्यावतीने माफी मागतो व प्लीज याबद्दल लोकांच्या बाबतीत राग मनात ठेऊ नका. जश्या तुम्हाला अडचणी येत आहेत, त्यापेक्षा जास्त इतरांना देखील येत आहेत. बाकी अजून काही लिहणे योग्य नाही.

मोदक Sat, 11/19/2016 - 01:35
संदिप डांगे, लोकांची दिशाभूल कोण करत आहे आणि असंबद्ध प्रतिसाद कोण देत आहे हे नोटा बंदी व परिणाम या धाग्यात उघडकीस आले आहेच त्यामुळे "आपण काय लिहीत आहोत याचा विचार करून प्रतिसाद लिहावेत" हा सल्ला आणखी एकदा देत आहे. सर्वप्रथम, हा देश कुणाच्या एकाच्या मालकीचा नाही. सर्वांचा आहे. सर्वांचाच या देशावर समान हक्क आहे. 10%-90% अशी विभागणी करणे देशभक्तीचे ठिसूळ दृश्य उभे करत आहे हे ध्यानात घ्यावे. येथे १०%-९०% अशी विभागणी कोणी केली..? तुम्ही केलीत. तुम्ही ही विभागणी 'होणार्‍या त्रासाच्या अनुषंगाने' केली. हे ही मान्य. मात्र नंतर दोन दोन प्रतिसादात लिहिलेले वाक्य "१०% लोकांना त्रास होतो आहे ही परिस्थिती कोणीच नाकारणार नाही." हे तुम्ही वाचले नाहीत की सोयीस्कररीत्या याकडे दुर्लक्ष केलेत..? त्यामुळे सुरूवातीला आपण विभागणी करायची आणि त्यावरील प्रतिवादाचे उत्तर स्वतःकडे नसेल तर देशभक्ती पणाला लावून "संविधान खतरे में..!" अशा आरोळ्या देण्याचे कारण कळाले नाही. "देशाच्या सर्व नागरिकांच्या सोयीसुविधांची जबाबदारी सरकारची असते, ह्यात सरकार कुठेही कमी पडत असेल तर त्याचा जाब विचारण्याचा हक्क प्रत्येक नागरिकाला आहे. त्यात सरकारी निर्णयामुळे कुणाचीही कसलीही गैरसोय होऊ नये हे बघणे सरकारचे काम आहे, त्यात काहीही कमतरता येत असेल तर त्याबद्दल जाब विचारणे नागरिकांचा हक्क आहे, ह्यात कोणतेही % मांडू शकत नाही. सहमत - म्हणूनच तुम्ही १०% - ९०% अशी विभागणी करणे अयोग्य आहे. सरकार आपल्या वचनबद्धतेत कुठेतरी कमी पडतंय म्हणून त्याला देशभक्ती, ग्रेटर गुड अशा गोडगोड दिशाभूल करणाऱ्या शब्दांनी झाकण्याचा प्रयत्न करणे ही सरकारची संवेदनशीलता, जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा नसल्याचे लक्षण आहे. अशा सरकारला समर्थन करणारे नागरिकही तितकेच असंवेदनशील म्हणवले जातील यावर थोडा विचार करून प्रतिसाद देईन - इसे उधार रखिये. "अशा सरकारला किंचितही विरोध करणारे, किंवा सरकारी पक्षाच्या विचारसरणीला विरोध करणारे हे राष्ट्रद्रोही, आतंकवादी-नक्षलवाद्यांचे पाठीराखे, गैरव्यवहाराला समर्थन देणारेच आहेत असा कांगावा करणे, त्यांनी मांडलेले मुद्दे हे निरर्थक रडारड आहेत असा उच्चरवात सतत बोलत राहणे हे लोकशाहीस खचित उत्तम नाही. लोकशाही व्यवस्थेत विरोधकही ह्याच देशाचे नागरिक आहेत, त्यांनाही जगण्याचा, आपले मत मांडण्याचा पूर्ण हक्क आहे, ते मांडत असलेले मुद्दे हे उचित असो वा नसो त्यांना तो मांडण्याचा अधिकार आहेच" कोण कांगावा करत आहे..? "तुम्ही मांडलेल्या एकांगी विचारांचा आम्ही केलेला प्रतिवाद म्हणजे कांगावा" असे काही आहे का..? तुम्ही दिलेल्या रवीश कुमारच्या बातमीचे म्हात्रे सरांनी परिक्षण केले, ट्रक ड्रायव्हरकडे असलेल्या २० लाखाचा पंचनामा झाला. बँकेत लावलेल्या पत्रकाचा फायदा घेऊन तुम्ही केलेली दिशाभूल उघडकीस आली आणि असंबद्ध लिंकांचाही लोकांनी समाचार घेतला म्हणून तुम्ही असले भावनीक आवाहन करून सहानुभूती गोळा करत आहात का..? तुम्हाला मुद्दे मांडण्यापासून कोणी अडवले आहे..? "डांगे तुम्ही आणि तुम्ही मांडलेले मुद्दे फ्रॉड आहेत, काँग्रेसचे दलाल नकोत मिपावर" अशी भाषा कोणी वापरली आहे का..? (ही भाषा तुम्ही पूर्वी वापरली आहे, त्यावेळी तुमच्या मतांच्या विरोधकांचे नागरिकत्व, देशाशी बांधिलकी, मत मांडण्याचे हक्क वगैरे गोष्टी सोयीस्कररीत्या विसरला होतात का..?) ह्या देशातल्या 125 कोटी नागरिकांमधल्या एकाही नागरिकाला सरकारी धोरणामुळे गैरसोय होत असेल तर सरकार त्या जबादारी पासून अंग चोरून घेऊ शकत नाही. सहमत. तुम्ही तिघेही ज्यापद्धतीने हि मांडणी करत आहात ते बघता अल्पसंख्य मतांना, त्यांच्या जीवनाला कोणतेच महत्त्व नाही असा भयावह विचार आंतरप्रवाही दिसत आहे. हे एक प्रचंड काळजीचे लक्षण आहे. किती खोटेपणा करणार आहात डांगे..? ही असली भावनीक आव्हाने अश्रू ढाळत कॅमेर्‍यासमोर केली असती तर थोडा टीआरपी तरी मिळाला असता. मिपासारख्या फोरमवर काय उपयोग नाही असल्या नक्राश्रूंचे. ;) अल्पसंख्यांकांच्या जीवाला कोण किंमत देत नाहीये..? अल्पसंख्यांकांच्या मतांचा अनादर म्हणजे लगेच त्यांना कापून काढावे अशी काही थिअरी तुम्ही बनवली आहे का..? मुळात मी हेच विचार मांडत आहे की तुम्ही केलेल्या १०%-९०% विभागणीमध्ये जर १०% लोकांना त्रास होत असेल तर त्यासाठी ९०% लोकांच्या अधिकारावर / हक्कावर गदा आणणे चुकीचे आहे. १०% लोकांचे त्रास दूर करणे सरकारचेच काम आहे पण ९०% लोकांना त्रास होत नसेल तर तो का होत नाहीये याचा विचार १०% लोकांनीही करणे आवश्यक आहे. विशेषतः सरकारने शक्य त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही जर त्याचा उपयोग करून न घेतल्याने १०% लोकांना त्रास होत असेल तर याची जबाबदारीही सरकारची कशी काय असणार आहे..? येथे मी किंवा म्हात्रे सरांनी किंवा खरे साहेबांनी कोठेही १०% लोकांना त्रास नाकारला आहे का..? किंवा त्यांनी त्रासाची तक्रार करू नये असे कोठेही प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरीत्या ध्वनीत केले आहे का..? १०% लोकांना त्रास होत आहे या गृहीतकाची दुसरी बाजू "९०% लोकांना त्रास होत नाहीये" हे तुम्ही सोयीस्कररीत्या विसरत आहात का..? (तुमचे रेल्वेचे उदाहरण इथे लागू करून वरील प्रतिसाद आणखी एकदा वाचलात तरी चालेल.) भाजपने काँग्रेसच्या प्रत्येक धोरणाचा कडाडून विरोध केलेला आहे, आधार, मनरेगा, एफडीआय, इत्यादी. हि काही फार 1857ची गोष्ट नाही, गेल्या दहा-बारा वर्षातलीच. तेव्हा काँग्रेसच्या प्रत्येक धोरणाला विरोधक म्हणून विरोध करणारा भाजप हा देशद्रोही, इत्यादी नव्हता काय, आज तेच सारे निर्णय नाव बदलून किंवा कायम ठेवून भाजप सरकार काम करत आहे. कारण हे सर्व भारतासाठी आहे, कोण्या पार्टीच्या समर्थक विरोधकांसाठी नाही. दुसऱ्या कोणाही विरोधी पार्टीच्या समर्थकांना थेट देशद्रोही, देशाच्या भल्याच्या विरोधात म्हणणे हे अतिशय संकुचित विचाराचे व अधीर भीतीचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत ग्रेटर गुड, देशभक्तीच्या संकल्पना बेगडी आणि फक्त स्वार्थी असतात. ओके.

In reply to by संदीप डांगे

माहितगार Sat, 11/19/2016 - 12:03
सरकार आपल्या वचनबद्धतेत कुठेतरी कमी पडतंय म्हणून त्याला देशभक्ती, ग्रेटर गुड अशा गोडगोड दिशाभूल करणाऱ्या शब्दांनी झाकण्याचा प्रयत्न करणे ही सरकारची संवेदनशीलता, जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा नसल्याचे लक्षण आहे. अशा सरकारला समर्थन करणारे नागरिकही तितकेच असंवेदनशील म्हणवले जातील
संदिपरावांचे सर्व प्रासंगिक प्रतिसाद आणि चर्चा वाचलेल्या नाहीत त्यामुळे माझ्या या प्रतिसादात उणीव राहू शकते नाही असे नाही पण ढोबळ मानाने संदिपराव मोदी सरकारच्या निर्मुल्यकरणाचा निर्णय किंवा त्याची अंमलबजावणी या बद्दल साशंक असावेत. भारतातील निरक्षरता आणि साधनांची कमतरता हे त्यांचे मुद्दे समजण्यासारखे आहेत नाही असे नाही. पण संदिपरावांच्या वरील परिच्छेदातून व्यक्त होणारा मोदी सरकारवरील बेजबाबदारीचा आरोप तर्कावर टिकतो का या बद्दल साशंकता वाटते. बेजबाबदारी कशास म्हणावे ? जबाबदारी न घेण्यास अथवा जबाबदारी न निभावण्यास; जिथपर्यंत नरेंद्र मोदी सरकारची चलन निर्मुल्यनाची कृती केवळ जबाबदारी घेणारीच नव्हे तर त्यांच्या पक्षाच्या व्यावसायिक वर्गासही ह्या निर्णयाचा फटका बसू शकतो त्यांच्या भविष्यातील पाठींब्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तरीही देश हिताचा निर्णय घेण्याची जबाबदारी घेतलेली दिसते, जगाच्या इतिहासातील कदाचित आता पर्यंतच्या सर्वात मोठ्या निर्मुल्यन कार्यात अडचणी आल्या असतील तर त्यात नवल नाही पण अडचणी निवारण्यात यंत्रणेत यशापयशही येईल पण म्हणून त्यांनी जबाबदारीच नाकारली आहे असा सरसकट अर्थ कसा काढता येतो आणि सरकारला बेजबाबदार कसे ठरवता येते हे उमगलेले नाही.

jp_pankaj Sat, 11/19/2016 - 11:44
धाग्याचे १००० व्हावे हीच गांधी बाबा चरणी प्रार्थना. बाकी सगळ्यांना माझ्यासारख्या गरीबाकडुन सत्कार भेट. 1

साधा मुलगा Tue, 11/29/2016 - 13:21
नोटबंदीमुळे CCD बरिस्ता स्टारबक्स, आणि overpriced मल्टिप्लेक्स आणि तेथील खाद्यपदार्थ यावर फरक पडला का हो? मला तर येथे येणारे सर्व पब्लिक कडे नं. २ चा पैसे आहे असे राहून राहून वाटते. ५-१० रुपयाची कोफि चक्क १५०-४०० च्या रेंज मध्ये लावणे आणि लोक त्यावर खर्च करणे आणि फेसबुक वर प्रदर्शन करणे हे काही समाजत नाही, कि उगाच फुकाचा स्टेटस सिम्बॉल?

महेन्द्र ढवाण Sun, 12/04/2016 - 19:02
दिनांक ८ ला विमानतळावर उतरलो रात्री ११.३० ला समजले ५०० व १००० च्या नोटा बंद आहेत , थोडे रियाल बदलून घेतले आरामात पुण्यात पोहचलो , १५ ला बँकेत गेलो जवळील सर्व ५०० व १००० बँकेत जमा केले व अकाउंट मधून २४००० काढले , गर्दी अजिबात नव्हती , बँकेने १०,२०, ५० च्या सुट्ट्या नोटात पैसे दिले अजिबात त्रास झाला नाही .

अभिजित - १ Sat, 08/18/2018 - 18:00
भक्तांनी सत्य स्वीकारायला नकार देऊन जोरदार धुमाकूळ घातला !! पण श्री नमो यांनी १५ ऑगस्ट 2018 ला जे निवडणुकी पूर्वी शेवटचे म्हणून जे भाषण केले त्यात या महान नोटबंदीचा उल्लेख हि केला नाही ?? देशाचे १.२८ लाख कोटी ( cost of demonetization ) पाण्यात घालवले. निष्पन्न काय ? एक मोठठे शून्य !! https://www.loksatta.com/agralekh-news/pm-narendra-modi-speech-from-red-fort-on-72nd-independence-day-1732145/ या भाषणात पंतप्रधानांनी आपल्या गेल्या चार वर्षांतील यशदायी योजनांचा, निर्णयांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते योग्यच. परंतु त्यात निश्चलनीकरणाचा मुद्दा मात्र सुटून गेला, असे दिसते. हे अनवधानाने झाले की या निर्णयाचा अपेक्षित लाभ दिसून न आल्यामुळे त्याचा उल्लेख टाळला, हे समजणे अवघड. परंतु निश्चलनीकरणाची अनुपस्थिती लक्षणीय होती. त्याचप्रमाणे गेल्या तीन भाषणांत असलेला भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या ‘यशा’चाही उल्लेख पंतप्रधानांच्या यंदाच्या भाषणात नव्हता. --------------------------------------------- आता इथेच थांबा रे बाबानो .. नाहीतर मोदी बोलले नाहीत नोटबंदी बद्दल म्हणून काय झाले ? ती यशस्वी झाली म्हणजे झालीच करून वाद वाढवू नका. केवळ एक पूर्वानुलोकन म्हणून हा जुना टॉपिक वर आणलाय. कोणाच्या जखमेवर मीठ चोळायला नाही हे नीट लक्षात घ्या :) :) आपले लोक असेच आहेत. त्यांनी नोटबंदी हणून पाडली वगैरे बोलू नका. जनते तुन आलेल्या नेत्याला आपली जनता कशी आहे ? काय करू शकते ? हे पूर्ण माहित पाहिजे . इतके मोठे निर्णय घ्या पूर्वी .

In reply to by अभिजित - १

सुबोध खरे Sat, 08/18/2018 - 18:32
Income Tax collection in the country stood at a record Rs 10.03 lakh crore. during 2017-18 a record number of 6.92 crore I-T returns were filed, which was 1.31 crore more than 5.61 crore returns filed in 2016-17. Read more at: //economictimes.indiatimes.com/articleshow/65441783.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst हे कशामुळे झालं म्हणायचं? कदाचित लोक स्वतःहून प्रामाणिक झाले असावेत. बेंबट्या हिंदुस्थानी लोकांच्या ढुंगणावर हंटरच पाहिजे-- इति पु ल

In reply to by सुबोध खरे

अभिजित - १ Sat, 08/18/2018 - 18:42
उगाच पु ल , व पु इ इ मोठ्या साहित्यिकांची वचने उद्धृत केली कि आपण काढलेल्या चुकीच्या / अर्धवट निष्कर्ष ना पण एक नैतिक अधिष्ठान प्राप्त होते , असे तुम्हाला वाटत असेल तर बर बुवा , तसेच ..

In reply to by अभिजित - १

सुबोध खरे Sat, 08/18/2018 - 20:45
आमचा निष्कर्ष साफ चूक आहे असं समजा आणि पुलंचं हि सोडून द्या. नैतिक अधिष्ठानहि बाजूला ठेवू पण आयकर भरणाऱ्यांच्या संख्येत २३% वाढ कशामुळे झाली आणि जवळ जवळ १७ % अधिक कर मिळकत कशामुळे वाढली हे सांगता येईल का? (हे आकडे सर्व वृत्तपत्रात उपलब्ध आहेत). भारतीय लोकांना एकदम उपरती झाली आणि ते लगेच प्रामाणिकपणे आयकर भरायला लागले काय?

In reply to by सुबोध खरे

नितिन थत्ते Sat, 08/18/2018 - 21:02
२०१६-१७ मध्ये १५-१६च्या तुलनेत मोठी वाढ दिसते आहे पण १५-१६ मध्ये अ‍ॅक्च्युअली पर्सनल इन्कमटॅक्स कलेक्शन १४-१५ पेक्षा कमी झाले होते. २०१४-१५ च्या १८८३ बिलियनच्या तुलनेत १६-१७ मधील २१५० बिलियनचे कलेक्शन फार वाढलेले नाही.

In reply to by सुबोध खरे

मार्मिक गोडसे Tue, 08/21/2018 - 12:12
भारतीय लोकांना एकदम उपरती झाली आणि ते लगेच प्रामाणिकपणे आयकर भरायला लागले काय? ह्यापूर्वी आयकर भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ कधीच झाली नव्हती का? घट वाढ होतच असते. नोटबंदीचे मुख्य उद्दिष्ट करदाते वाढवणे हाच असेल ,तर करदाते वाढविण्यासाठी ह्या सरकारने नोटबंदी पूर्वी काय प्रयत्न केले? किंवा भविष्यात कोणते मार्ग अवलंबले जाणार आहेत? की प्रत्येकवेळी नवीन करदाते वाढविण्यासाठी नोटबंदी हाच पर्याय वापरणार? (तसा समज करून घेतल्यामुळे) नोटबंदीची मुख्य उद्दिष्टे साध्य करण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे हे स्पष्ट झाल्याने मोदी आता कुठेही नोटबंदीचा उल्लेख करत नाहीत.

In reply to by मार्मिक गोडसे

सुबोध खरे Tue, 08/21/2018 - 19:14

घट

वाढ होतच असते. हायला गोडसे बुवा तुम्ही एवढा मोठा विनोद कराल असे वाटले नव्हते. १९४७ साली आपली लोकसंख्या ३६ कोटी होती आता ती साडे तीन पट झाली आहे. शिवाय भारताची आर्थिक प्रगती पण बऱयापैकी झाली आहे असे असूनही आपण आयकर दात्यांच्या संख्येत घट वाढ होतच असते म्हणताय ह ह पु वा बाकी आपला एकंदर प्रतिसाद हास्यास्पदच आहे तेंव्हा तो सोडूनच देऊ या आपला एकंदर प्रतिसाद म्हणजे पूर्वग्रहदूषित आणि अभ्यासाविना केलेले आरोप आहेत त्यामुळे मी आपल्या कोणत्याच वाक्याचा प्रतिवाद करु इच्छित नाही.

In reply to by सुबोध खरे

मार्मिक गोडसे Tue, 08/21/2018 - 19:50
असे असूनही आपण आयकर दात्यांच्या संख्येत घट वाढ होतच असते म्हणताय दरवर्षी करदात्यांच्या वाढीचा दर हा कायम चढाच राहील असं तुमचं गृहितक असेल तर धन्य आहे. अडचणीच्या प्रश्नांना बगल देण्याची कला आत्मसात केल्याबद्दल अभिनंदन.

In reply to by अभिजित - १

ट्रेड मार्क Sun, 08/19/2018 - 06:46
नोटबंदी फेल झाल्यामुळे त्याचा उल्लेख केला नाही हा तर्क पण हास्यास्पद आहे. खरे साहेबांनी लिहिल्याप्रमाणे कधी नव्हे ते करवसुलीत बरीच वाढ झाली आहे. शेल कंपन्या बंद झाल्या, त्याचे कर्ते करविते जाळ्यात अडकले. सामान्य माणसाला याचा त्रास झाला हे कोणीच नाकारत नाहीये. पण म्हणून सरसकट फेल झाली असे म्हणणे चुकीचे आहे. तसेच फक्त नोटबंदी हे एक कृती घेऊन मोजमाप न करता त्याच्या पाठोपाठ आलेल्या जीएसटी चा निर्णय हे दोन्ही किंबहुना तुमच्या दुसऱ्या धाग्यात चर्चिले जात असलेले FRDI बिल हे सगळे विचारात घ्यायला पाहिजे. आता निवडणूक फार लांब नाही. तुम्ही मोदींना मत देणार नाही हे तर स्पष्टच आहे, पण बाकी जनता काय म्हणते ते त्या निकालातून कळेलच. पण एक मित्रत्वाचा सल्ला देतो. व्यक्तीद्वेष करू नका, कारण त्यामुळे त्या व्यक्तीच्या सगळ्याच कृती चुकीच्या वाटू लागतात. तुमच्या बहुतांशी लेखांतून व प्रतिसादांमधून तुमचा मोदीद्वेष दिसून येतो. कुठलीच गोष्ट पूर्ण चांगली किंवा पूर्ण वाईट असत नाही.

In reply to by ट्रेड मार्क

नितिन थत्ते Sun, 08/19/2018 - 08:31
करवसुलीतील वाढ ही नोटबंदीमुळे किती आणि जीएसटीमुळे किती? जीएसटीच्या फॉरवर्ड बॅकवर्ड इंटिग्रेशनमुळे आणि क्रेडिट मिळवण्याचे बर्डन अ‍ॅसेसीवर टाकल्यामुळे करसंकलनात वाढ झाली. हे जीएसटीचे क्रेडिट आहेच. पण ते क्रेडिट नोटबंदीचे म्हणून दाखवण्यासाठी जीएसटी घाईघाईने राबवण्यात आला.

In reply to by ट्रेड मार्क

अभिजित - १ Sun, 08/19/2018 - 17:55
पैसे पांढरे केले आणि कंपन्या बंद केल्या किंवा टॅक्स फाईल करणे बंद केले इतकेच झाले आहे. मुख्य कर्ता कधीच शेल कंपनीचा डायरेक्टर नसतो. तो काही बकरे गाठतो. त्यांना डायरेक्टर बनवतो. त्यांना महिना काही पैसे देतो. ते पण खुश , कर्ता ( झोल मास्टर ) पण खुश. जरा माहिती घ्या. कोणी अनुभवी माहितगार CS कंपनी सेक्रेटरी शी बोला. तोच फक्त तुमचे भाबडे समज दूर करू शकतो. निरव मोदी ने हेच केले, पेपर मध्ये आले होते. आत्ता लिंक मिळत नाहीए. पण दुसरी तशीच लिंक खाली ( second link ) देतो. ती वाचा. हे सगळे प्रकार फार पूर्वी पासून चालत आले आहेत. https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/govt-identifies-16-5k-entities-as-shell-companies-another-80000-under-lens/articleshow/64515593.cms (RoCs) have identified and removed the names of 2.26 lakh companies with close to 3.1 lakh directors getting disqualified. Another 2.26 lakh companies have been identified for not filing returns. पैसा फिरवून झाला. काम झालं. कंपनी बंद करायची असेल तर CS कडे जाऊन form भरावे लागतात. विविध सोपस्कार असतात. त्याला पैसे पडतात !! त्या पेक्षा सोडून द्या. नाहीतरी डायरेक्टर्स डमी, regd ऑफिस पण डमी !! https://www.firstpost.com/politics/gadkaris-purti-group-gets-murkier-driver-is-director-of-six-companies-499380.html Gadkari's Purti group gets murkier: driver is director of six companies

In reply to by अभिजित - १

ट्रेड मार्क Wed, 08/22/2018 - 00:35
मुख्य कर्ता कधीच शेल कंपनीचा डायरेक्टर नसतो. तो काही बकरे गाठतो. त्यांना डायरेक्टर बनवतो. त्यांना महिना काही पैसे देतो. ते पण खुश , कर्ता ( झोल मास्टर ) पण खुश. जरा माहिती घ्या. झोल मास्टरबद्दल बरीच माहिती दिसतेय. तिकडे FRDI च्या धाग्यावर पण जरा आपले ज्ञानकण पसरवा. तर गेली कित्येक वर्षे या कंपन्यांमार्फत बेनामी व्यवहार बोनभोबाट चालू होते का नाही? आता मोदी काकांनी काहीतरी उद्योग करून यावर उपाय करायचा प्रयत्न केला. आता काहींच्या मते काही निर्णय चुकीचे असतील. पण जर सगळे निर्णय, म्हणजे नोटबंदी, जीएसटी, रेरा वगैरे सगळ्यांचा एकत्रित परिणाम बघितला तर काय चित्र दिसतंय? २-३ तिमाही जीडीपी खाली गेला होता पण नंतर वर आला. घरांच्या बेसुमार वाढणाऱ्या किमती स्टेबल किंवा थोड्याफार कमी तरी झाल्या. बँकेतले व्यवहार वाढले. जरी ९९% पैसे बँकेत परत आले असतील तर त्याचा अर्थ काय होतो? रिझर्व्ह बँकेकडे त्यांनी किती नोटा बाजारात पाठवल्या आहेत त्याची नोंद असते. समजा यातील ७० टक्केच नोटा चलनात असतील, म्हणजे बाकी कुठेतरी दडून बसलेल्या असतील तर? या ३०% पैश्यांचा उपयोग फक्त टेरर फंडिंग मध्ये नसून बाकी कितीतरी अनैतिक गोष्टींमध्ये होत असतो उदा. अवैध लॉटरी/ सट्टा, अवैध दारू, बेनामी प्रॉपर्टीचे व्यवहार, स्थानिक गुंडगिरी, कर चुकवेगिरी ईई. जर १००% वाटलेल्या नोटांपैकी ९९% परत आल्या म्हणजे हे दडून बसलेले धन परत लीगल सिस्टिम मध्ये आले ना? अर्थात याच्या मुळे हे सगळे अवैध धंदे संपूर्णपणे बंद झाले का? तर नक्कीच नाही. जे काही बंद झाले ते कायमचे बंद झाले का? तर नक्कीच नाही. कारण हा चोर पोलिसांचा खेळ आहे तो अनंत काळापर्यंत चालूच राहणार. पण म्हणून मग पोलिसांनी कारवाई करणे थांबवावे का? आता निदान या २-३ निर्णयांमुळे थोडी फार तरी जरब बसली असेल? ऑपेरेशन करताना डॉक्टरने कट दिल्यावर जर कोणी म्हणू लागले की हे काय तू तर नुसताच कट दिलाय, तर ती प्रिमॅच्युअर कमेंट असेल ना? संपूर्ण ऑपेरेशनचा परिणाम बघायला पाहिजे. तसेच ऑपरेशन झाल्यानंतर थोडा काळ त्रास होणारच. पण एकदा रिकव्हरी झाली की मग तब्येत वेगाने सुधारते. आता कॅन्सरचा पेशंट असेल तर ऑपरेशन करून, रेडिएशन देऊनहे जर योग्य ती काळजी घेतली नाही तर तो परत उद्भवणारच. मग परत ऑपरेशनची गरज भासू शकते. बाकी मी काही दुवे वगैरे देणार नाही कारण ते तुम्ही योग्य ते कीवर्डस टाकले की गूगलमध्ये मिळतात. Bad effects of demonetization असं टाकण्याऐवजी effects of demonetization असा टाकलं की बरेच पॉसिटीव्ह आणि निगेटिव्ह धागे मिळतील. सगळ्याचा नीट अभ्यास करा आणि मग जर तरी मोदी चुकलेच आहेत अश्या मतावर तुम्ही ठाम असाल तरी ठीकच आहे. मोदी आपल्या कर्माची फळे भोगतीलच!

In reply to by अभिजित - १

भक्तांनी सत्य स्वीकारायला नकार देऊन जोरदार धुमाकूळ घातला !! पण श्री नमो यांनी १५ ऑगस्ट 2018 ला जे निवडणुकी पूर्वी शेवटचे म्हणून जे भाषण केले त्यात या महान नोटबंदीचा उल्लेख हि केला नाही ?? देशाचे १.२८ लाख कोटी ( cost of demonetization ) पाण्यात घालवले. निष्पन्न काय ? एक मोठठे शून्य !!
एकवेळ दोनहजाराच्या नोटेत चीप सापडेल पण भक्तांच्या डोक्यात मेंदू सापडणे अशक्य आहे. काहीही उपयोग नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गब्रिएल Sun, 08/19/2018 - 13:00
एकवेळ दोनहजाराच्या नोटेत चीप सापडेल पण भक्तांच्या डोक्यात मेंदू सापडणे अशक्य आहे. यकदम बर्रोबर डॉसायेब. मलाबी त्येच वाटून र्‍हायतंय बगा पप्पूभक्त बगून ! पप्पूभक्त भ्येटला की मी त्येला तुजा पोरगा बी पप्पूसारकाच ग्र्येट व्हवू दे म्हंतो. तेवा ते रागानं काळंनिळं व्हत्यात. काब्रे ?! ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ट्रेड मार्क Mon, 08/20/2018 - 22:46
मोदींनी लालकिल्ल्यावरच्या भाषणात नोटबंदीचा उल्लेखही केला नाही, त्यामुळे नोटबंदी फेल झाली यावर शिक्कामोर्तब झालं आहे. याची शिक्षा म्हणून २०१९ मध्ये कोणीही भाजपाला मतदान करू नये. आम्हाला कित्येक लाख कोटी भ्रष्टाचारामुळे राजकारण्यांच्या खात्यात गेले तरी चालतील पण यापुढे मोदी आणि भाजप नको.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Tue, 08/21/2018 - 20:31
एकवेळ अबकड सापडेल पण हळक्षज्ञच्या डोक्यात मेंदू सापडणे अशक्य आहे. काहीही उपयोग नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ट्रेड मार्क Wed, 08/22/2018 - 00:42
तुम्ही साक्षात प्रा. डॉ. असल्याने तुमच्या सारखा मेंदू कुठल्या भक्ताच्या डोक्यात सापडणे अवघडच आहे. पण तुमच्या हुशारीचा उपयोग करून नोटबंदीऐवजी काय करायला पाहिजे होते हे सांगा बघू. किंवा नोटबंदीचे व्यवस्थापन नीट केले नव्हते असे म्हणणे असेल तर मग कसा अमलात आणायला पाहिजे होता याचा एक मस्त प्लॅन द्या. एक छान धागा काढा ज्यात मोदींचा निर्णय १ - कसा चुकला आणि त्याऐवजी दुसरं काय केलं असतं तर इप्सित साध्य होऊनही समस्त जनतेला काही त्रास झाला नसता. निर्णय २ - कसा चुकला आणि त्याऐवजी दुसरं काय केलं असतं तर इप्सित साध्य होऊनही समस्त जनतेला काही त्रास झाला नसता. असे किंवा तुम्हाला पाहिज तश्या फॉरमॅट मध्ये तुम्ही लिहा. काय म्हणता? घेता चॅलेंज? एक माननीय सदस्य देणार होते पण नंतर ते गायबलेच. तुम्ही द्याल अशी आशा करतो.

In reply to by ट्रेड मार्क

नितिन थत्ते Wed, 08/22/2018 - 10:31
>>निर्णय १ - कसा चुकला आणि त्याऐवजी दुसरं काय केलं असतं तर इप्सित साध्य होऊनही समस्त जनतेला काही त्रास झाला नसता. इप्सित काय होतं हे मोदीजी स्वतः निश्चितपणे सांगू शकले तरी पुष्कळ झालं......

In reply to by नितिन थत्ते

ट्रेड मार्क Wed, 08/22/2018 - 18:52
मोदी जाऊ दे हो, तुमच्यामते चायवाला तर आहेत ते. असे कितीसे हुशार असणार? तेव्हा उगाच कशाला अपेक्षा ठेवताय? पण आमच्या तुमच्यासारख्या दिग्गजांकडून अपेक्षा आहेत, तेवढ्या पूर्ण करा. चॅलेंज स्वीकारा!

In reply to by ट्रेड मार्क

नितिन थत्ते Wed, 08/22/2018 - 19:03
अहो पण त्यांनी केली ना नोटाबंदी? त्यांचं काय इप्सित होतं हे मी कसं सांगणार? त्यांनी नोटाबंदी करताना काही उद्दिष्ट सांगितली. त्यातली कुठलीच पूर्ण झाली नाहीत. थोड्या दिवसांनी कॅशलेस-लेसकॅश हे उद्दिष्ट सांगितलं तेही खरं वाटत नाही. कारण बाजारातली कॅश पुन्हा मूळ पदाला आली आहे. https://economictimes.indiatimes.com/news/economy/finance/after-16-months-currency-in-circulation-back-to-pre-demonetisation-levels/articleshow/63304790.cms त्यांचं उद्दिष्ट बहुधा सांगितलेल्यापैकी काहीच नव्हतं. केवळ मी कायपण करू शकतो असं दाखवण्याचं असावं,

In reply to by नितिन थत्ते

नितिन थत्ते Wed, 08/22/2018 - 19:07
एक उद्दिष्ट असू शकेल जे यशस्वी झाले असेल. "काळा पैसा सुलभतेने साठवता यावा म्हणून लहान आकाराच्या आणि मोठ्या किंमतीच्या नोटा पुरवणे" पण हे उद्दिष्ट नसावं असं मी म्हणतो कारण थोर लोक म्हणून गेलेत की "डोण्ट अ‍ॅट्रिब्यूट मॅलिस टू व्हॉट कॅन बी एक्स्प्लेन्ड अ‍ॅज स्टुपिडिटी".

In reply to by नितिन थत्ते

ट्रेड मार्क Wed, 08/22/2018 - 20:13
अहो पण मी म्हणतोय मोदींचं उद्दिष्ट काही का असेना, त्यांना तसेही स्टुपिड समजताय मग त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्षच करून टाका. तुमच्या मते हा उपदव्याप काळा पैसा सुलभतेने साठवता यावा म्हणून लहान आकाराच्या आणि मोठ्या किंमतीच्या नोटा पुरवणे असो किंवा सामान्य लोकांना त्रास देण्यासाठी असो. तुम्हाला साधारणपणे प्रॉब्लेम्स माहित आहेत जे सोडवायचे आहेत जसे की लोकांनी रोखीत साठवून ठेवलेला पैसा बाहेर काढणे, रोखीत होणारे अवैध व्यवहार थांबवणे, रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रात चालू असलेले रोखीतले व्यवहार आटोक्यात आणणे, शक्य तेवढा पैसा बँकिंग सिस्टीम मध्ये आणून त्यांना कराच्या जाळ्यात ओढणे, खोट्या नोटांना आळा घालणे, जरी कॅश व्यवहार केले तरी वैध बिल देणे/ घेणे याची लोकांना सवय लावणे, रोख पैश्यांच्या जीवावर चाललेल्या अतिरेकी कारवायांना तसेच गुंडगिरीला आळा घालणे. तर ही आपली उद्दिष्टे आहेत. कोण आणि कधी देताय फुलप्रूफ प्लॅन? याच बरोबर हे पण महत्वाचे आहे की हा प्लॅन सगळ्यांना आवडला पाहिजे. वरची उद्दिष्टे निदान ९०% तरी साध्य झाली पाहिजेत आणि अमलात आणताना/ आणल्यावर कोणीही नाराज नाही झालं पाहिजे, अमलात आणल्यावर लगेच त्याचे रिझल्ट्स दिसले पाहिजेत.

In reply to by ट्रेड मार्क

नितिन थत्ते Wed, 08/22/2018 - 22:01
हे सगळे प्रॉब्लेम सोडा, वन टाईम नोटबंदी करून यातले काही प्रॉब्लेम तरी सुटतील असा समज आहे का तुमचा? मोठ्या नोटा रद्द करून काळा पैसा साठवणे, फिरवणे या गोष्टी अवघड करता येतात हे खरे आहे. पण त्यासाठी एका झटक्यात नोटबंदी करावी लागत नाही. वाईट गोष्ट ही की त्यात सामान्यांच्या सामान्य व्यवहारात असलेल्या ५०० च्या नोटा बंद करून (काळे पैसेवाल्यांसोबतच सामान्य) सर्वांचे कंबरडे मोडले. आणि दुसरी वाईट गोष्ट (की स्टुपिड गोष्ट) म्हणजे वापरण्यासारख्या ५०० च्या नोटा प्रथम न आणता २००० च्या नोटा प्रथम बाजारात आणल्या. त्याने दिसायला रीमोनेटायझेशन लवकर झाल्यासारखे दिसले तरी त्या साधारण व्यवहारायोग्य नोटा नसल्याने व्यवहारास येणार्‍या अडचणी अधिक काळ चालू राहिल्या. >>त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्षच करून टाका. काय आहे; त्यांच्या स्टुपिडिटीला मास्टरस्ट्रोक म्हणून वाहवा करणारे आहेत. माझ्या नात्यातल्या आणि ओळखीतल्या बहुतांश सुशिक्षित लोकांचा "नोटबंदीने काळा पैसा नष्ट झाला" यावर दृष विश्वास आहे. मुळात असलेल्याइतकी कॅश पुन्हा बाजारात आली असेल तर "रोखीत होणारे अवैध व्यवहार थांबवणे" हे उद्दिष्ट तर ढगातच गेलं ना? पण असो. मास्टरस्ट्रोक इज मास्टर स्ट्रोक.

In reply to by नितिन थत्ते

स्वधर्म Wed, 08/22/2018 - 23:42
काय तुम्ही पण! एकदा अापलं ठरलंय ना, की मास्टरस्ट्रोक? मग पुन्हा परत परत कशाला वाद घालताय? ह. घ्या. असो, माझ्यापुरते बोलायचे तर, नोटबंदी अाधी केंव्हातरी अर्थक्रांती काकांचे भाषण ऐकले होते अाणि सरकार ते एवढ्या सिरियसली घेतेय याचा धक्काच बसलेला. सुखद होता तो. पण लागलीच दोन हजाराची नोट काढली अाणि सरकारच्या हेतूंवरचा पूर्ण विश्वास उडाला. तेव्हापासून मी नोटबंदीचे समर्थन फक्त ऐकतो. श्रध्दावानांना पटवणं खूप अवघड असतं सर!

In reply to by नितिन थत्ते

ट्रेड मार्क गुरुवार, 08/23/2018 - 00:40
तुम्ही मोदींनी काय केलं ते सोडा. मी जे प्रॉब्लेम सांगितलेत ते रिअल लाईफ प्रॉब्लेम्स आहेत, हे तर मान्य आहे?. ते आपल्याला सोडवायचेत, तर एक प्लॅन मोदींनी दिला तो तुम्ही फालतू आहे म्हणून फाडून टाकलात. मग आता तुम्ही एक असा प्लॅन द्या जो सगळे प्रॉब्लेम्स तर सोडवेल पण दिलेल्या सगळ्या कंडिशन्स पण पूर्ण करेल. वन टाईम नोटबंदी करून यातले काही प्रॉब्लेम तरी सुटतील असा समज आहे का तुमचा? माझा असा समज आहे की तुम्ही, प्रा. डॉ. वगैरे हुशार मंडळी सहज हे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी एक मस्त प्लॅन देऊन शकाल. कृपया हा समज चुकीचा ठरवू नका. मोदींच्या कृतीला मास्टर स्ट्रोक म्हणून वाहवा करणारे, स्वतः मोदी, त्यांचे तथाकथित पेड मीडिया वाले, संघी, भाजपावाले, मिपावरील मोदींचे समर्थन करणारे सगळे बाजूला ठेवा. ते मूर्ख आहेत असं तुमचं पक्कं मत आहे ना? मग कशाला उगाच त्यांच्या नादी लागताय?

In reply to by नितिन थत्ते

ट्रेड मार्क गुरुवार, 08/23/2018 - 00:47
तुम्हाला पाहिजे असल्यास अभिजित - १, स्वधर्म, मार्मिक गोडसे, कपिलमुनी वा इतर कुठल्याही मिपासदस्याची किंवा मिपावर उपस्थित नसलेल्या कोणाची मदत घ्यायची असेल तर घेऊ शकता. आपलं उद्दिष्ट फक्त एकच आहे - फुलप्रूफ प्लॅन तयार करणे.

In reply to by ट्रेड मार्क

नितिन थत्ते गुरुवार, 08/23/2018 - 10:10
पण असं का? ममोसिंग अणि कं मूर्ख आहेत असं हे गृहस्थ सगळीकडे सांगत फिरत होते. आता मी आलोय आणि सगळे प्रॉब्लेम सोडवणाराय असं यांनी सांगितलं. त्याच्यावर विश्वास ठेवून बर्‍याच लोकांनी त्यांच्यावर "हे काम सोपवलं आहे". ती त्यांचीच जबाबदारी आहे. उनको साठ साल दिये, मुझे ६० महिने दीजिये असं त्यांनी सांगितलं. ते त्यांना दिलेत.

In reply to by ट्रेड मार्क

स्वधर्म गुरुवार, 08/23/2018 - 11:40
>> माझा असा समज आहे की तुम्ही, प्रा. डॉ. वगैरे हुशार मंडळी सहज हे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी एक मस्त प्लॅन देऊन शकाल. कृपया हा समज चुकीचा ठरवू नका. >> तुम्हाला पाहिजे असल्यास अभिजित - १, स्वधर्म, मार्मिक गोडसे, कपिलमुनी वा इतर कुठल्याही मिपासदस्याची किंवा मिपावर उपस्थित नसलेल्या कोणाची मदत घ्यायची असेल तर घेऊ शकता. आपलं उद्दिष्ट फक्त एकच आहे - फुलप्रूफ प्लॅन तयार करणे. सर, अापण हे कुठलं लॉजिक लावताय? समजा एखाद्या रुग्णाला डॉक्टरचा गुण अाला नाही म्हणून जर तो डॉ.ना सांगू लागला, की बरं वाटत नाही अजून, अौषध लागू झालं नाही. तर डॉ.नी असं म्हणायचं का, की चल, तू बरा करून दाखव रोग, मगच मला बोलायला ये! जर तुला अौषध माहीत नसेल तर माझ्यावर टीका करण्याचा तुला अाधिकारच नाही. अाणि हो, मी कुठे सरसकट मोदी विरोध केला ते दाखवा. कपिलमुनी म्हणतात तसे शिक्के नकाच मारू.

In reply to by स्वधर्म

ट्रेड मार्क गुरुवार, 08/23/2018 - 20:15
मी शिक्के मारत नाहीये पण स्वधर्म यांच्या या प्रतिसादावरून त्यांना सुद्धा नोटबंदी/ नोटबदली आवडलेली नाही असं दिसतंय. मुनिवर्य, गोडसे याच्या एकूण प्रतिसादांचा रोख मोदींच्या विरुद्धच असतो, म्हणून म्हणलं तुम्हालासुद्धा आमंत्रित करावं. पण ठीक आहे हे चॅलेंज स्वीकारणं सगळ्यांनाच जमेल असं नाही. त्यामुळे चॅलेंज स्वीकारायचं का नाही हे तुम्ही ठरवा. मी फक्त आमंत्रित केलं. @थत्ते साहेब - उनको साठ साल दिये, मुझे ६० महिने दीजिये असं त्यांनी सांगितलं. ते त्यांना दिलेत. दिलेत ना? मग त्यांच्या वकुबाप्रमाणे त्यांनी केलं आणि करत आहेत. मी आधीच म्हणल्याप्रमाणे त्यांना (त्यांना म्हणण्यापेक्षा त्यांच्या कृतीला) नावं ठेवण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार सुद्धा आहे. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की, नोटबदली वगैरे निर्णय जे चुकले असं तुम्ही म्हणताय तर त्याबदल्यात काय करता आलं असतं हे तुम्ही सांगावं. आता कोणी जर चुकीची कृती केली असेल तर त्याला आपण नुसतं तू चूक केली असं सांगून काय होणार? बरोबर काय ते पण सांगायला पाहिजे ना? मी काय म्हणतो, प्रयत्न तर करून बघायला काय हरकत आहे? प्लॅन चुकला तर चुकला, असं म्हणतात जो काहीतरी करतो त्याच्याकडूनच चुका होतात. मग कोण स्वीकारतंय चॅलेंज?

In reply to by ट्रेड मार्क

सुबोध खरे गुरुवार, 08/23/2018 - 20:22
विराट कोहलीला काय अक्कल आहे का? बाहेर जाणाऱ्या चेंडूला बॅट लावली आणि आऊट झाला. मूर्ख लेकाचा. ता क:- याचा वरच्या लेखनाशी काहीही संबंध नाही हे कृपया ध्यानात घ्यावे.

In reply to by ट्रेड मार्क

अभ्या.. गुरुवार, 08/23/2018 - 21:01
हायला, ह्या नियमाने तर काथ्याकूट बंद करुन रोजची काकडाआरती ते शेजारती धागा चालु करायला काही हरकत नाहीये. बर्‍याच आयडींना ते करण्यासाठी डूआयडीचा सहारा तरी घ्यावा लागणार नाही. . असो... मी काहीहि लिहिणार, ते बरोबरच असणार, मी प्रतिवाद करणार नाही, माझी तो करायची इच्छा नाही.

In reply to by अभ्या..

ट्रेड मार्क गुरुवार, 08/23/2018 - 22:30
ह्या नियमाने तर काथ्याकूट बंद करुन रोजची काकडाआरती ते शेजारती धागा चालु करायला काही हरकत नाहीये. हे काही कळलं नाही. इथे कोणीच कुठला नियम घालून दिलेला नाहीये. पाहिजे तसे आणि पाहिजे तसे (अर्थात मिपाच्या नियमात बसतील असे) धागे आपल्या सर्वांनाच काढता येतात. मी काहीहि लिहिणार, ते बरोबरच असणार, मी प्रतिवाद करणार नाही, माझी तो करायची इच्छा नाही. आजकाल याला फॅसिस्ट वृत्ती म्हणतात. बऱ्याच जणांचा हा पण आरोप आहे की मोदी असंच करतात.

In reply to by शब्दबम्बाळ

ट्रेड मार्क Fri, 08/24/2018 - 02:15
कोणाचा असा समज झाला असेल की डॉ. खरे आणि मी एकच व्यक्ती आहोत तर तो चुकीचा आहे. मी सरळसरळ एक चॅलेंज दिलं आहे, ते स्वीकारायचं सोडून उगाच फाटे फोडत काय बसलात?

In reply to by सुबोध खरे

थॉर माणूस Tue, 08/28/2018 - 00:38
तेच ना, बाहेर जाणार्‍या चेंडूला बॅट लावणे हा खरंतर मास्टरस्ट्रोकच. पण हे नतद्रष्ट लोक तरीही त्याला चूकच म्हणणार. मी काय म्हणतो, आपण अशा लोकांना चॅलेंज द्यायला पाहीजे... तुम्ही कुठला शॉट मारला असता ते करून दाखवा म्हणून.

In reply to by ट्रेड मार्क

मार्मिक गोडसे Fri, 08/24/2018 - 11:09
तुम्हाला साधारणपणे प्रॉब्लेम्स माहित आहेत जे सोडवायचे आहेत जसे की लोकांनी रोखीत साठवून ठेवलेला पैसा बाहेर काढणे, रोखीत होणारे अवैध व्यवहार थांबवणे, रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रात चालू असलेले रोखीतले व्यवहार आटोक्यात आणणे, शक्य तेवढा पैसा बँकिंग सिस्टीम मध्ये आणून त्यांना कराच्या जाळ्यात ओढणे, खोट्या नोटांना आळा घालणे, जरी कॅश व्यवहार केले तरी वैध बिल देणे/ घेणे याची लोकांना सवय लावणे, रोख पैश्यांच्या जीवावर चाललेल्या अतिरेकी कारवायांना तसेच गुंडगिरीला आळा घालणे. नोटबंदी फेल गेल्याचं बरंच जिव्हारी लागलेलं दिसतंय. मूर्खपणाला विरोध केला हे चुकीचे नव्हते हे सिद्ध झालेच आहे. तूम्ही दिलेले प्रॉब्लेम सोडविण्यासाठी एकमेव फुलप्रूफ प्लॅन असूच शकत नाही. उदा: अतिरेकी कारवाया किंवा गुंडगीरी रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा अधिक कार्यक्षम असणे गरजेचे आहे, त्यांची अचानकपणे आर्थिक कोंडी केल्याने तात्पुरता कारवाया थंड होऊ शकतात, कायमच्या नाही. सरकारने फक्त देशातील सर्व लोकप्रतिनिधी व सरकारी कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्रोत तपासले तर बराच काळा पैसा बाहेर येईल. काळा पैसा निर्मितीत आणि मुरवण्यात हेच आघाडीवर आहेत. आणि हो, फुलप्रूफ चा दावा मी कधीच केला नव्हता.

In reply to by मार्मिक गोडसे

नितिन थत्ते Fri, 08/24/2018 - 15:25
बा द वे त्या तुमच्या प्रतिसादाला उत्तर म्हणून खरे साहेबांनी जो प्रतिसाद दिला होता - भाजप खासदारांना म्हणे आपल्या व्यवहारांची माहिती अमित शहांना कळवायला सांगितली होती- त्याची पुढे काय प्रगती झाली ते अजून कळलं नाही. (आणि त्या सो कॉल्ड ८० लाख खात्यांची सुद्धा).

In reply to by मार्मिक गोडसे

सुबोध खरे Fri, 08/24/2018 - 20:18
एक शहाणा ( उंटावरचा) विराट कोहलीला काय अक्कल आहे का? बाहेर जाणाऱ्या चेंडूला बॅट लावली आणि आऊट झाला. मूर्ख लेकाचा. ता क:- याचा वरच्या लेखनाशी काहीही संबंध नाही हे कृपया ध्यानात घ्यावे.

In reply to by मार्मिक गोडसे

ट्रेड मार्क Sat, 08/25/2018 - 03:07
नोटबंदी फेल गेल्याचं बरंच जिव्हारी लागलेलं दिसतंय. फेल गेली हे सिद्ध करा. केवळ मोदींनी लाल किल्ल्यावरील भाषणात उल्लेख केला नाही म्हणून फेल झाली असं म्हणणं हा मूर्खपणा आहे. मूर्खपणाला विरोध केला हे चुकीचे नव्हते हे सिद्ध झालेच आहे. मूर्खपणा हा सापेक्ष असतो. तुम्ही ज्याला मूर्खपणा समजताय त्याला शहाणपणा (मास्टरस्ट्रोक?) समजणारे लोक पण बरेच आहेत. त्यांना ते मूर्ख कसे आहेत हे समजावून द्यायला, काय चुकलं आणि बरोबर काय होतं किंवा कसं चांगल्या पद्धतीने करता आलं असतं/ येईल हे सांगा. हेच मी गेले २ दिवस सांगतोय की प्लॅन द्या, तर सगळे झुडुपाच्या आजूबाजूला मारत बसलेत. तूम्ही दिलेले प्रॉब्लेम सोडविण्यासाठी एकमेव फुलप्रूफ प्लॅन असूच शकत नाही. दिलेली यादी मुख्यत्वे पैश्यांशी निगडित अडचणींची आहे. ते सोडवण्यासाठी एकच प्लॅन द्या असं कुठे म्हणलंय, एक द्या किंवा एका पेक्षा जास्त प्लॅन द्या. पण द्या तर खरं! पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर नोटबंदी हेच एकमेव पाऊल मोदींनी उचललंय असं दाखवून आरडाओरडा होतोय ना? सरकारने फक्त देशातील सर्व लोकप्रतिनिधी व सरकारी कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्रोत तपासले तर बराच काळा पैसा बाहेर येईल. काळा पैसा निर्मितीत आणि मुरवण्यात हेच आघाडीवर आहेत. यात हे मुख्य असले तरी बाकी पण बरेच लोक सामील आहेत. आम्ही बँकेच्या वसुलीला गेलो असताना एकाने नोटा भरलेली एक खोली उघडून दाखवली होती. म्हणजेच त्याच्याकडे पैसे होते पण बँकेत भरायचे नव्हते. रोख होते म्हणजे अनैतिक मार्गानेच मिळवले असणार. आता हा एक माणूस झाला, असे देशात किती असतील विचार करा. हे पैसे कसे बाहेर काढायचे? फुलप्रूफ चा दावा मी कधीच केला नव्हता. फुलप्रूफ राहूदे, पण प्लॅन तर द्या. मग आपण चर्चा करू. काय?

In reply to by ट्रेड मार्क

नितिन थत्ते Sat, 08/25/2018 - 09:31
>>म्हणजेच त्याच्याकडे पैसे होते पण बँकेत भरायचे नव्हते. रोख होते म्हणजे अनैतिक मार्गानेच मिळवले असणार. आता हा एक माणूस झाला, असे देशात किती असतील विचार करा. हे पैसे कसे बाहेर काढायचे? याबाबतीत ओरिजिनली मी आणि नंतर अलिकडे सरकारने "तुम्हाला माहिती असलेल्या भ्रष्टाचार्‍यांची माहिती द्या" असे आवाहन केले होते. तुम्ही या खोलीभर नोटावाल्याची खबर सरकारला दिलीत का? नसली दिलीत तर काळा पैसा नष्ट व्हावा अशी तुमचीही इच्छा नाही असे दिसते किंवा हा खोलीभर नोटावाला भाजपचा असेल किंवा ही खोलीभर नोटांची ष्टोरी बंडल आहे असे म्हणावे लागेल. आता नोटाबंदी फेल झाली याचं थोडं विश्लेषण करू..... १. नोटाबंदीनंतर "काळा पैसा असणारे लोक बँकेत भरणार नाहीत कारण प्रश्न विचारले जातील" असं जेटली म्हणाले. म्हणजे काळा पैसा नष्ट होईल अशी सरकारची अपेक्षा होती. २. सुमारे चार लाख कोटी रुपये बँकांमध्ये जमा होणार नाहीत अशी अपेक्षा असल्याचं अ‍ॅटर्नी जनरलनी न्यायालयाला सांगितलं. https://www.hindustantimes.com/india-news/sc-refuses-to-stay-demonetisationmove-govt-hopeful-of-recovering-rs-10l-cr/story-6w7uzKFZ2UkrY863aFONUO.html ३. शेवटी ऑलमोस्ट सर्व रद्द नोटा बँकेत जमा झाल्या असं रिझर्व बँकेने कबूल केलं. ४. टीव्हीवर सांगितलेल्या उद्दिष्टांपैकी टेरर फायनान्सिंग वाला भाग तात्पुरता यशस्वी झालेला दिसला. पण एकुणात दहशतवादावर काही विशेष परिणाम झाला नाही. ५. काळा पैसा नष्ट झालाच नाही आणि पकडलाही गेला नाही. तसेही नोटाबंदी हा केवळ कॅश स्वरूपात असणार्‍या काळ्या पैशावरचा हल्ला असू शकत होता. जो साधारण ४-६ टक्के असतो असे आयकर खात्याला आधीपासून ठाऊक होते. सर्व बाबी नोटबंदी फेल झाली असेच दर्शवतात. नोटबंदी नंतरच्या काळात कॅशलेसचा जो गवगवा झाला तोही फुकाचाच होता. आधीच्या काळात होत्या तितक्या नोटा सरकारने स्वतःच बाजारात पुन्हा सोडल्या. नोटबंदीचा एकमेव फायदा झालेला दिसला तो म्हणजे पूर्वी क्रेडिट कार्ड सर्व दुकानदार स्वीकारत नसत ते आता स्वीकारतात (म्हणजे नाही म्हणत नाहीत- बाकी कार्ड चालत नाही, नेटवर्क नाही वगैरे नुस्खे ते वापरतातच).

In reply to by नितिन थत्ते

ट्रेड मार्क Sat, 08/25/2018 - 19:06
नसली दिलीत तर काळा पैसा नष्ट व्हावा अशी तुमचीही इच्छा नाही असे दिसते किंवा हा खोलीभर नोटावाला भाजपचा असेल किंवा ही खोलीभर नोटांची ष्टोरी बंडल आहे असे म्हणावे लागेल. स्टोरी काँग्रेसच्या काळातली आहे आणि पैसे साठवून ठेवणारा काँग्रेसचा नगरसेवक होता. त्यामुळे तक्रार करून काही फायदा नव्हता आणि त्यावेळेला सरकारने भ्रष्टाचाऱ्यांची माहिती द्या असे काही आवाहनही केले नव्हते कारण संपूर्ण सरकारच भ्रष्टाचारी होते. १. नोटाबंदीनंतर "काळा पैसा असणारे लोक बँकेत भरणार नाहीत कारण प्रश्न विचारले जातील" असं जेटली म्हणाले. म्हणजे काळा पैसा नष्ट होईल अशी सरकारची अपेक्षा होती. २ आणि ३ हे मुद्दे... पहिले काळा पैसा म्हणजे काय ते बघा. जे व्यवहार कर चुकवण्यासाठी रोखीत केले जातात आणि त्यातून मिळालेला पैसा ना बँकेत भरला जातो ना कुठे नोंद होतो. म्हणजे जर रिझर्व्ह बँकेने एकूण बाजारात १६ लाख कोटी वितरित केले असतील पण त्यातले फक्त १२ लाख कोटीच चलनवलनात असतील. म्हणजे ४ लाख कोटी कुठे तरी दडून बसले आहेत आणि त्याचा वापर अवैध गोष्टींसाठी होतो आहे. हे पैसे जर बँकेत जमा झाले तर परत चलनात आले ना? तुम्हाला आठवत असेल तर रोख बँकेत भरण्यासाठी या धनदांडग्यांनी लोकांना नियुक्त केलं होतं. अशी अचानक पैसे भरली जाणारी खाती सरळ सरळ बाजूला काढता आली. आपल्या लोकांची एक खासियत आहे, करू नका सांगितलं की करायचं. म्हणजे बँकेत भरणार नाहीत असं म्हणलं की लोकांनी बँकेत भारण्यासाठीचे उपाय शोधून काढले. कुठल्या का मार्गाने होईना पण हा दडून बसलेला पैसा बाहेर तर आला! ४. टीव्हीवर सांगितलेल्या उद्दिष्टांपैकी टेरर फायनान्सिंग वाला भाग तात्पुरता यशस्वी झालेला दिसला. पण एकुणात दहशतवादावर काही विशेष परिणाम झाला नाही. तुमची काय अपेक्षा होती की एक फक्त कारवाई केली की दहशतवाद पूर्णपणे थांबेल? तरी पण बराच फरक पडला आहे हे तर तुम्हीच मान्य करताय. काश्मीर मधील दगडफेक आता किती प्रमाणात होतेय? नक्षलवाद पण बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. हे या सरकारच्या आधी कधी झाल्याचं आठवत असेल तर पुरावे द्या. सर्व बाबी नोटबंदी फेल झाली असेच दर्शवतात. अहो मग मी गेले २-४ दिवस तेच तर म्हणतोय की तुम्हाला फेल झाली असं वाटतंय तर मग या प्रतिसादात सांगितलेल्या प्रॉब्लेम्स ना सोडवण्यासाठी एक किंवा अनेक प्लॅन तर द्या. नसेल तर हार मान्य करा, काय?

In reply to by ट्रेड मार्क

मार्मिक गोडसे Sat, 08/25/2018 - 12:18
फेल गेली हे सिद्ध करा. यशस्वी झाल्याचे तुम्हीच सिद्ध करा. मूर्खपणा हा सापेक्ष असतो. तुम्ही ज्याला मूर्खपणा समजताय त्याला शहाणपणा (मास्टरस्ट्रोक?) समजणारे लोक पण बरेच आहेत. जगात एक समुदाय आहे जो पृथ्वी गोल नसून चपटी आहे असा दावा करतो. त्यांना उपग्रहाद्वारे काढलेला पृथ्वीचा फोटो दाखविला तर ते म्हणतात ,गोल आहे हे मान्य,परंतू चेंडुसारखी नाही तर चपाती सारखी गोल आणि चपटी आहे. अशांच्या नादी न लागणे हाच शहाणपणा आहे. एकात्मिक कीडनियंत्रणासाठी उपलब्ध अनेक पर्याय वापरले जातात , ज्यामुळे कीड संपूर्ण नष्ट जरी होत नसली तरी बरीच आटोक्यात येते. हेच काम सरकारने करायचे आहे, लाचलुचपत, प्राप्तिकर, सुरक्षा यंत्रणांना कामाला लावून नियंत्रणात आणायचे आहे. म्हणजेच त्याच्याकडे पैसे होते पण बँकेत भरायचे नव्हते. रोख होते म्हणजे अनैतिक मार्गानेच मिळवले असणार. चहावाला, पकोडे विकणारा ह्यांचे व्यवहार रोखीत होतात, शेतकऱ्याला सुद्धा शेतमाल विक्रीतून रोख पैसे मिळतात ,मग तो पैसा अनैतिक होतो का?

In reply to by मार्मिक गोडसे

सुबोध खरे Sat, 08/25/2018 - 13:38
ट्रेड मार्क साहेब का उगाच बहिऱ्या लोकांना संगीत साधनेचा फायदा सांगण्याचा प्रयत्न करत आहात? शेतीचे उत्पन्न म्हणून रोख पैसे मिळाले तरी ते करमुक्त असून ते उत्पन्नात दाखवल्यास त्यावर कर लागत नाही आणि असे आपले उत्पन्न दाखवले तर नडी अडचणीला बँकेतून कर्ज मिळते अन्यथा सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते हे लोकांना समजूनच घ्यायचे नाही. चहा पकोडा वाला खिशात भरपूर पैसे असले तरी बँकेत कर्जासाठी उभा राहिला तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जातो हे माहित असूनही चहा पकोड्याचीच अर्थव्यवस्था चांगली आहे असे मानणाऱ्या लोकांना का काही समजावून सांगायचे? मोदीं भाजप किंवा रा स्व संघाने काहीही केलं तरी ते चूकच असे मानणाऱ्या कम्युनिस्ट लोकांना समजावून काहीच फायदा नसतो कारण आपली विचारसरणी गंडलेली आहे हे जगभर सिद्ध झाले तरी रशियात पाऊस पडला कि इकडे छत्री उघडणारे लोक ते ते कसे सुधारणार? सोडून द्या.

In reply to by सुबोध खरे

ट्रेड मार्क Sat, 08/25/2018 - 21:08
प्लॅन देता येत नाही म्हणून हे कसे इकडून तिकडे उड्या मारत आहे ते बघतोय. ते करत आहेत तो कुठलाच दावा त्यांना सिद्ध करता येत नाहीये. तसेच नुसती नावं ठेवायला काय लागतंय, त्याला काही पर्याय, उपाय किंवा कसं चांगल्या तर्हेने करता आलं असतं हे पण ते सांगू शकत नाहीयेत. ध्रुव राठी आणि तत्सम लोकांचे व्हिडिओ बघून हे मत बनवतात. ते विडिओ बघतानाच त्यात काय गफलत करत आहेत हे पण यांच्या लक्षात येत नाही याचे एकमेव कारण म्हणजे आधीच माईंडसेट ठरवलेला असतो. बघू तरी कसे आणि किती वेळ उड्या मारतात.

In reply to by सुबोध खरे

मार्मिक गोडसे Tue, 08/28/2018 - 13:51
मोदीं भाजप किंवा रा स्व संघाने काहीही केलं तरी ते चूकच असे मानणाऱ्या कम्युनिस्ट लोकांना समजावून काहीच फायदा नसतो https://www.misalpav.com/comment/743055#comment-743055 आता ही योजना कोणाची? आणि तिचे स्वागत कोणी केले? जरा पूर्वग्रह आणि शिक्के बाजूला ठेवा तुमचे.

In reply to by मार्मिक गोडसे

ट्रेड मार्क Sat, 08/25/2018 - 20:25
तुम्ही जरा मार्मिक टिपण्णी करायला पण शिकायला पाहिजे. यशस्वी झाल्याचे तुम्हीच सिद्ध करा. वर चाचाजींना दिलेला प्रतिसाद वाचा. जगात एक समुदाय आहे जो पृथ्वी गोल नसून चपटी आहे असा दावा करतो. तुम्ही या समुदायात मोडताय असं वाटतंय. वर्ल्ड बँक, आयएमएफ यासारख्या संस्थांनी मोदींच्या निर्णयांची पाठराखण केली आहे. जसे नासाने जरी पृथ्वी गोल आहे म्हणून सांगितले तरी पृथ्वी चपटी आहे म्हणणारा समुदाय ऐकत नाही तसेच जागतिक तज्ज्ञांनी सांगूनसुद्धा तुम्ही ऐकत नाही. एकात्मिक कीडनियंत्रणासाठी उपलब्ध अनेक पर्याय वापरले जातात , ज्यामुळे कीड संपूर्ण नष्ट जरी होत नसली तरी बरीच आटोक्यात येते. हेच काम सरकारने करायचे आहे, लाचलुचपत, प्राप्तिकर, सुरक्षा यंत्रणांना कामाला लावून नियंत्रणात आणायचे आहे. बरोबर. पण मग जर कीड नष्ट करण्यासाठी काहीच कीडनाशक न फवारता नष्ट करता येईल का? लाचलुचपत, प्राप्तिकर, सुरक्षा यंत्रणा हे सगळे बऱ्याच वर्षांपासून होते पण त्याचा काय उपयोग होत होता? Pesticide Paradox हे कधी ऐकले नसेल तर गुगलून पहा. अश्या वेळेला काय करायला लागतं हे पण शोधा. चहावाला, पकोडे विकणारा ह्यांचे व्यवहार रोखीत होतात, शेतकऱ्याला सुद्धा शेतमाल विक्रीतून रोख पैसे मिळतात ,मग तो पैसा अनैतिक होतो का? पैसा अनैतिक नसतो तर तो मिळवण्याचा मार्ग अनैतिक असू शकतो. जर मिळकत उत्पन्न म्हणून न दाखवता कर चुकवला तर तो काळा पैसा होतो. उदाहरण म्हणून - पुण्यातला एक वडापाववाला रोज दोन एक हजार तरी वडापाव विकत असेल, १० रुपयांना एक वडापाव म्हणलं तर २०,००० रुपये रोज रोख जमा होतात. हा माणूस कच्चा माल रोखीत घेतो, कामगारांना पण रोखीत पैसे देतो. यातलं कोणीच कर भरत नाही. हे सगळे लोक त्यांना घरी लागणाऱ्या वस्तू पण रोखीत घेतात. मालक त्याच्या बायकोला सोन्याचे दागिने घेतो ते पण रोखीत घेतो. बिल नको असं सांगितल्याने त्याचे कराचे पैसे वाचतात. हा माणूस फ्लॅट घ्यायला जातो तेव्हा जास्तीत जास्त रोखीत पैसे देतो. आता बरीच वर्ष धंदा करत असल्याने बरीच रोख जमा झाली आहे, मग गुंतवणूक म्हणून हा नवीन हाऊसिंग स्कीम मध्ये पैसा लावतो, म्हणजे काय करतो तर नुसती स्कीम जाहीर केली की १० फ्लॅट ची बुकिंग अमाऊंट भरतो. जसं जसं बांधकाम चालू होतं तसा भाव वाढत जातो मग हा चढ्या भावाने हक्क विकून अजून पैसे मिळवतो. अशी ही सगळी रोखीची साखळी तयार होते. यात नुसतं कर नुकसान होतं असं नाही तर मधेच कोणीतरी इतर अवैध धंद्यात असतो तो या रोखीचा वापर तिकडे करू लागतो. बिल्डर गुंडांना रोख देऊन एखादी जमीन हडपतो. ईई. हेच जर या वडापाव वाल्याने हे रोख पैसे बँकेत भरले आणि सरळ सरळ जे उत्पन्न मिळतंय त्यावर कर भरला तर हा सगळा प्रश्नच येणार नाही काय. म्हणजे फक्त नोकरदार लोक जे नाईलाज म्हणून कर भरतात त्यात हे असे व्यावसायिक पण कर भरायला लागून करसंकलन वाढेल. हे सगळं सांगतोय मी पण आता तुम्ही तो प्लॅन द् यायचं तर बघा.

डँबिस००७ Sat, 08/18/2018 - 21:03
२०१९ आल !! आता तरी कंबर कसुन तयारी करा !! आपल्या लाडक्या युवराजाला देशाची सुत्र सांभाळायची आहेत !! जे जाणार आहेत ! ज्यांनी देशाची वाट लावली असा तुम्ही दावा केला मग , 2014 नंतर सुरु झालेल ईव्हळण अजुन बंद का होत नाही ?

अभिजित - १ Tue, 08/21/2018 - 17:16
डॉ खरे - नोटबंदी मुळे IT रिटर्न्स वाढले. 18 Aug 2018 - 6:32 pm | सुबोध खरे ट्रेडमार्क - नोटबंदी मुळे शेल कंपन्या बंद पडल्या. त्याचे करते करविते जाळ्यात अडकले. 19 Aug 2018 - 6:46 am | ट्रेड मार्क वरील दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. हे इथे सिद्ध झालेलं आहे. वाचा नितीन थत्ते यांचे GST & IT रिटर्न्स हा प्रतिसाद. 19 Aug 2018 - 8:31 am & 18 Aug 2018 - 9:02 pm माझा - शेल कंपन्या वरील मेसेज - 19 Aug 2018 - 5:55 pm चा मेसेज उद्या समजा मोदी म्हणाले कि माझे चुकले, तरीही भक्त काही ते मान्य करणार नाहीत . मोदी कसे बरोबरच आहेत हे ते मोदींनाच पटवून द्यायचा प्रयत्न करतील !! याला शुद्ध इंग्लिश मध्ये म्हणतात - LOYAL THAN KING !! तर अशा लोकांना सोडून द्या. पण जे लोक स्वतंत्र बुद्धीने विचार करतात त्यांनी वरील हे ५ प्रतिसाद वाचून पाहावेत. कोण चूक / कोण बरोबर हे त्यांनाच कळेल.