मि.पा. वर धागा काढण्यापुर्वी काही नियम पाळायचे असतात, ते तुम्ही वाचलेले दिसत नाहीत. एकोळी धागा असू नये असा संकेत आहे. हा प्रश्न तुम्ही व्य.नि. किंवा खरडफळ्यावर विचारू शकता.
बाकी तुमच्या धाग्याला प्रतिसाद म्हणून ईतकेच सांगेन कि शक्यतो सोलो ट्रेक करु नका. पुण्याच्या आसपास पुरंदर, तोरणा, राजगड, लोहगड्,विसापुर्,तुंग्,तिकोणा, शिवनेरी,जीवधन, राजमाची,कोरीगड,रायरेश्वर, रोहिडा असे अनेक ईतिहास प्रसिध्द किल्ले आहेत. ईंदोरे, बहादुरगड, बारामती असे भुईकोट आहेत. कावळ्या, जननीचा दुर्ग, कैलासगड, घनगड, हडसर्,चावंड्,निमगिरी, नारायणगड असे फारचे प्रसिध्द नसलेले किल्ले देखील आहेत. मात्र या बहुतेक गडांवर अनेक ट्रेकिंग ग्रुप रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी ट्रेक नेत असतात, त्यांच्याबरोबर जाणे श्रेयस्कर. यांच्याबरोबर जाणे नको असल्यास पायथ्याच्या गावातून वाटाड्या नेउ शकता.
या शिवाय एक दिवसातच ट्रेक करायचा असेल तर रायगड जिल्ह्यातील रायगड, सुधागड, सरसगड, मंगळगड, कोथळीगड्,पेब्,प्रबळगड तसेच सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा, पांडवगड, वैराटगड, कमळ्गड, प्रतापगड, मधुमकरंदगड, सज्जनगड, केंजळगड, नांदगिरी, वारुगड्,संतोषगड असे अनेक किल्ले बघता येतील.
जरा आणखी माहिती घालून लेख वाढवा. कोणती पुस्तकं वाचली, ट्रेकमध्ये अगोदर कुठे गेलात? काय अनुभव आले? सोलो का करावासा वाटतो? गडच हवेत का इतरही ठिकाणं चालतील?
प्रतिक्रिया
मि.पा. वर धागा काढण्यापुर्वी
जरा आणखी माहिती घालून लेख
सहज प्रश्न
ते हे नसावेत. बाकी सध्याचे
In reply to सहज प्रश्न by गामा पैलवान
अरे वा ....
In reply to ते हे नसावेत. बाकी सध्याचे by दुर्गविहारी