Skip to main content

कुठे जावे?

लेखक भावना कल्लोळ यांनी गुरुवार, 14/05/2015 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळाच्या सुट्ट्या लागल्या आहेत. पुढच्या महिन्यापासून मुलांची शाळेची वारी सुरु होईल. सहकुटुंब गावी जावे तर बजेट कोलमडतय. पण मुलांना याचा भुर्दंड का? म्हणून एक दिवशीय पिकनिक करायची ठरवली आहे. पण सारखेच रिसोर्टला जाऊन पाण्यात बेडकासारखे डुंबत बसणे याचा कंटाळा आला आहे. तेव्हा मिपाकरांनो … मुंबईच्या जवळपास असे कोणते ठिकाण ज्यात रिसोर्टची मज्जा, थोडे निसर्गसौंदर्य, गावचा फील येईल असे जेवण, बैलगाडीची सफारी असे कोणते ठिकाण असेल ते सुचवा.आम्ही सगळ्या लेडीज आहोत त्यामुळे जास्त लांबचे ठिकाण नको आहे. साधारण वसई ते पालघर किंवा ठाणे भागात असेल असे काही. आंजावर खूप शोधाशोध केली पण मामाचा गाव या शिवाय काही पर्याय दिसत नाही आहे म्हणून मिपाकराच्या मदतीच्या अपेक्षेत.

वाचने 6568
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

In reply to by आदूबाळ

हेच ठीकाण सुचवणार होतो. पण त्यांना सेंट्र्लवर ठाण्यापुढे नकोय असे वाटल्याने गप्प बसलो. मुरबाडजवळ सरळगाव येथे माझ्या मित्राचे फार्म हाउस आहे. लिंक देतोय http://www.visawaresort.com/about.html

In reply to by गणेशा

कदाचित अ‍ॅग्री टुरिझम असावे. बारामतीचे पांडुरंग तावरे यांनी कृषी पर्यटनाच्या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली. माझ्या भविष्यातल्या भारतभेटीत माझ्या बारामतीच्या कॉलेजला भेट द्यायची आहे. त्यावेळी या ठिकाणी भेट देण्याचा मानस आहे.

नेहमीची सहल ठिकाणे कधीही पहाता येतात. मुले बऱ्यापैकी मोठी - दहा वगैरे वर्षे असतील तर सूरत हे छान ठिकाण आहे. मुलाना ट्रीपचा प्लान बनवायला सांगावा. आपण आपला बनवून ठेवावा. मुंबईतून सुरतला जायला रेल्वेने चारपाच तास लागतात. ते हिरे आणि कपड्याचे निर्मिती- व्यापार केंद्र आहे. याशिवाय ऐतिहासिक महत्व अभ्यासून जावे. तुघलकाने बांधलेला १४ व्या शतकातला किल्ला आहे . शहराच्या मधोमध तापी नदी वहाते. १९९४ मधल्या प्लेगच्या साथीनंतर सुरतने कात टाकली आहे. तेव्हा सर्वात गलिच्छ शहर असलेले सुरत आता देशातले सर्वात छान आणि स्वच्छ शहर झालंय. भारतातल्या एका सुंदर शहरात राहण्याचा अनुभव आनंददायक असतो. मी नोकरीनिमित्य बऱ्याचदा घेतलाय . एक दिवस राहिल्यास मस्त खरेदी आणि फिरणे दोन्ही होऊ शकते. मी जुलैमधे अशी एक तीन दिवसांची ट्रीप करतोय.

वाडा येथे (विक्रमगड) ठाण्याच्या दिवेकरांचा रिझॅाट आहे ,महागडा आहे .डिजे सोडा रेडिओ पण लावायला बंदी आहे .हल्लीचे रेटस माहित नाहीत पण आमच्या कंपनीतील गट जाऊन मजा करून यायचे .

साधारण वसई ते पालघर किंवा ठाणे भागात असेल असे काही.
डहाणू-बोर्डी हाही एक चांगला पर्याय आहे. बोर्डीत एमटीडीसीतर्फे अलीकडे काही सोय झाली आहे, असं वाचलं - त्याशिवाय खासगी छोटेखानी रिसॉर्ट्सही आहेत.

दुसरा एक रिझॅाट विरार वेस्टला आहे त्याची पुर्वी जाहिरात यायची -एक दिवस फक्त महिलांनाच प्रवेश असायचा. नाव आठवत नाही परंतू तिकडे तो फेमस आहे. आता उन्हाळ्याचे एक दिवसात होणार नाही{आणि यावर्षी डिसेंबर पर्यंत नाही} परंतू त्र्यंबकेश्वर मार्गे सापुतारा खासच आहे.

हे बघा बरे .. बहुतेक पाल्घर- वाडा येथे आहे.. मी गेलेलो नाही, परंतु फोन करुन विचारपुस केलेली आठवते आहे.. चांगले वाटले होते. http://hideout.co.in/

=))

हेमे, त्र्यंबकेश्वर च्या पुढे नाशिकला एन्ट्री मारण्याआधी संस्कृती नावाचं रीसोर्ट येतं, छान गावच्या थीमवर आहे, जेवणाला भारतीय बैठक आहे, गरम गरम पुरणपोळ्याही बनवुन मिळतात.