मिपाकर कुठेही का भेटेनात; मिपावरील आयडी, डू आयडी, खादाडी ह्या सगळ्या चर्चा संपल्या की मध्येच कोणीतरी भटकंतीचा विषय काढतं. काही वेळा हा विषय पब्लिक लैच सिरीयसली घेतं मग व्हॉट्स अॅप वर ग्रूप क्रीएट होतात भटकंतीच्या चर्चेसाठी!! अशीच एक पब्लिकने मनावर घेतलेली भटकंती म्हणजे हरिश्चंद्रगडाची. सात डिसेंबर तारीख पक्की झाली आणि मग कसं जायचं कुठे थांबायचं यावर चर्चा रंगायला लागल्या. आता जाणारे सगळेच नवखे, त्यात कळलं की गडावर जायच्या पाच (?) वाटा आहेत. त्यातली नळीची वाट म्हणजे कठीण आणि पाचनई गावातून जाणारी बर्यापैकी सोपी.
शेवटी पाचनईच्या वाटेने जायचं ठरलं. त्यासाठी आम्ही निवडलेला मार्ग म्हणजे कल्याण्-ईगतपूरी-राजूर-पाचनई. जाणार्या मंडळीत मी एकटाच पुणेकर (पक्षी: पुण्याहून जाणारा!! लगेच बाटगा बाटगा म्हणून चोच मारायला येऊ नये, अपमान केला जाईल). मग जास्तीची मेजॉरिटी बघता मीही कल्याणहून सगळ्यांसोबत प्रवास करायचं ठरवलं. हां हां म्हणता ट्रेकचा दिवस जवळ आला. कल्याणहून गाडी सात तारखेला सकाळी सात वाजता, मग सगळ्यांसोबत कल्याणहून जायचं म्हटल्यावर मला इथून आदल्या दिवशीच निघणं भाग होतं. आदल्या दिवशी हापिसातलं काम पटापट आटपून रात्री अकराची मुंबई पॅसेंजर पकडायला साडेदहाला पुणे स्टेशन गाठलं. गाडी वेळेवर आली, पण वेळेवर निघाली मात्र नाही. अकरा पाचला निघणार्या गाडीने सवाअकराला एक धक्का दिल्यासारखा केला आणि पुन्हा ढिम्म!! दरवाज्याजवळच्या पॅसेजमध्ये उभा होतो तोच समोर बसलेल्या काकू शिवाजीनगरला उतरणार असल्याचं कळलं आणि त्यांची जागा आपल्याला मिळून,आपल्याला निवांत बसून प्रवास करता येणार ह्या विचाराने मन में लड्डू फुटले. शेवटी अकरा पंचवीसला आणखी एक धक्का देऊन ट्रेन चालती झाली. कासवाच्या गतीनं का होईना शिवाजीनगर गाठलं आणि मला डुलक्या काढायला जागा मिळाली.
ट्रेनमधली एकंदर अवस्था बघून मला पु.ल. देशपांडेंचं म्हैस वारंवार आठवत होतं. समोरच्या सीटवर एक काका बसले होते. त्यांच्याकडे बघून त्यांना थोडी जास्त झाली असावी असा वारंवार संशय येत होता. पायापासच्या जागेत अख्खं कुंटुंब नसलं तरी एक सद्गृहस्थ आसर्याला आले होते, आसर्याला आले होते म्हणजे काय चक्क आडवेच झाले होते. त्यांनी झोपेत लाथा मारल्या तर काय सांगा अशा विचाराने आमचे पाय सांभाळून बसावं लागत होतं आणि आमचा जरा डोळा लागतोयसं वाटलं की पलिकडच्या सीटवरल्या बाईंचं पोरगं भोकाड पसरत होतं. त्या पोराला थो(धो)पटून त्या बाई पोराचं रडं वाढवित होत्या. ट्रेनने घेतलेला वेग आणि गार वारा यामुळे या सगळ्या गदारोळातही डोळा लागला. गाडी थांबलीशी वाटली म्हणून डोळे उघडून पाह्यलं तर साडेबारा झालेले आणि स्टेशन कोणतं तर चिंचवड !! झाली का पंचाईत आता!! म्हणलं गाडी पोचवतेय का नाय वेळेत. पण तसं काही झालं नाही. लोणावळ्यानंतर गाडीने बराच वेग पकडला आणि पहाटे तीनला आम्ही बदलापूर मुक्कामी पोचलो. येवढ्या सगळ्यानंतर प्रवासाची दगदग संपलीसं वाटलं होतं. पण खरी मजा तर सकाळी होती.
घरी जरा पाठ टेकून सातच्या गाडीसाठी सकाळी साडेसहाला कल्याण स्टेशन गाठलं, नेहमीपेक्षा गर्दी थोडी जास्त दिसत होती. तसं का असावं त्याचा अंदाज काही लागेना. नंतर लोडशेडिंग नंतर लाईट्स लागावेत तसा लख्ख उजेड पडला डोक्यात. सहा तारखेला आपल्या परमप्रिय नेत्याचं दर्शन घ्यायला आलेला जनसमुदाय परतीच्या प्रवासाला निघाला होता. गाडीत चढल्या चढल्या दुसरं सरप्राईज होतं. आम्ही बुक केलेल्या शीटांच्या दिशेने निघालो तो साक्षात एक नामवंत प्राध्यापक कवी एका सीटवर बसलेले होते. त्यांनी खास त्यांच्या प्राध्यापकी शैलीत, "आता बरं का, तुम्ही तुमच्या रिझर्वेशन केलेल्या जागा यांच्याकडून कशा मिळवता यात तुमचं स्किल आहे." असं सांगितलं. आवाजात शक्य तितका खवचटपणा एकवटून "हो!! ते बघूच !!" असं उत्तर मी कधी दिलं ते माझं मलाच कळलं नाही. शेवटी त्या भाविकांच्या गयावया केल्यानंतर आम्ही रिझर्व केलेल्या सहा शीटांपैकी चार शीटा त्यांनी आम्हाला आमच्यावर दया येऊन देऊ केल्या आणि इगतपूरीचा प्रवास सुरु झाला. बसायला ज्यांना म्हणून जागा मिळाली होती ते माझ्यासारखे लोक झोपेची थकबाकी गोळा करायचा प्रयत्न करीत होते. त्यातही गप्पा, थट्टामस्करी चालूच होती. इतक्यात इगतपुरी कधी आलं ते कळलं पण नाही.
इगतपुरीत एकेक उसळ वडा हाणून सगळे पुढच्या प्रवासाला निघालो. राजूरची बसही वेळेत मिळाली पण राजूरला पोचून खाण्याच्या गोष्टी खरेदी करेपर्यंत राजूर पाचनई यष्टी निघून गेली. मग राजूर पाचनई प्रवास एका जीपड्यातून घडला. पाचनईला पोचेपर्यंत एक-दिड वाजला होता आणि पोटात रेडे पळायला लागले होते. मग भाकरी पिठल्यावर ताव मारला आणि सुसाट निघालो.
पिठलं भाकरी तयार होईपर्यंतची भटकंती:
सुरुवात:
अर्ध्या वाटेत:
पायर्या चढून पुढे आल्यानंतरची वाट:
जवळपास पोचलोच!!:
हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर (हा फोटु सकाळी निघता निघता काढलेला आहे):
गडावर रमतगमतच चाललो होतो, पोचेपर्यंत पाच वाजले होते. सर्वांनी बॅगा हरिश्चंद्रेश्वराच्या देवळाशेजारच्या गुहेत ठेवल्या आणि सुर्यास्त बघायला कोकणकड्याच्या दिशेने निघालो.
सुर्यास्ताचा फोटो काढण्याचा एक प्रयत्न:
सूर्य मावळला तसं पुन्हा मंदिराच्या दिशेने निघालो. दिवस मावळताच हवेत प्रचंड गारवा जाणवायला लागला होता. जाकिटं, स्वेटर अशा तयारीनिशीच कोकणकड्यावर पोचल्यामुळे परतताना फार काही वाटलं नाही. परत येऊन थोड्या गप्पाटप्पा झाल्या आणि रात्रीच्या जेवणाचे वेध लागले. म्यागीची जी काही पाकिटं राजूरला उतरून खरेदी केली होती ती उपयोगी आली.
मॅगी शिजून तयार:
मॅगी खाण्यात गुंग मंडळी:
दिवसभराचा थकवा आणि नुकतीच पोटात पडलेली मॅगी यांनी रंग दाखवायला सुरुवात केली होती. काही मंडळी पेंगून गुहेत आडवी झाली. हवेतला गारवा वाढला होता, त्यात काही (आमच्यासारखी) हौशी मंडळी रात्रीच्या जेवणानंतर गडावरच्या टपर्यांमध्ये कुठे चहा मिळतो का बघायला रवाना झाली. परत येऊन अंग टाकलं. जमिनीवर नुसतीच एखादी चादर अंथरलेली आणि त्यात हवेतला गारवा बर्यापै़की होता. सकाळी जाग आल्यानंतर काहीसं असं चित्रं होतं.
सकाळची आन्हिकं आटोपून तारामती शिखर गाठलं. शिखरावर पोचल्यानंतरचा आनंद शब्दात सांगता येणार नाही. शिखरावर थोडा क्लिकक्लिकाट करुन परतीच्या वाटेला लागलो.
अशी ही पाचा उत्तराची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण!!
फोटो सौजन्यः किसन शिंदे, स्पा, सौरभ उप्स
टीपः माझ्या शब्दात वृत्तांत लिहायचा प्रयत्न केला आहे, तरी काहीसं कमी पडल्यासारखं वाटतंय. ट्रेकला हजर मंडळींनी आपल्याकडचे चार शब्द लिहून आणि पदरचे चार अधिक फोटो टाकून धाग्याची शोभा वाढवावी ही विनंती. ;)
अर्ध्या वाटेत:
जवळपास पोचलोच!!:
हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर (हा फोटु सकाळी निघता निघता काढलेला आहे):
गडावर रमतगमतच चाललो होतो, पोचेपर्यंत पाच वाजले होते. सर्वांनी बॅगा हरिश्चंद्रेश्वराच्या देवळाशेजारच्या गुहेत ठेवल्या आणि सुर्यास्त बघायला कोकणकड्याच्या दिशेने निघालो.
सुर्यास्ताचा फोटो काढण्याचा एक प्रयत्न:
सूर्य मावळला तसं पुन्हा मंदिराच्या दिशेने निघालो. दिवस मावळताच हवेत प्रचंड गारवा जाणवायला लागला होता. जाकिटं, स्वेटर अशा तयारीनिशीच कोकणकड्यावर पोचल्यामुळे परतताना फार काही वाटलं नाही. परत येऊन थोड्या गप्पाटप्पा झाल्या आणि रात्रीच्या जेवणाचे वेध लागले. म्यागीची जी काही पाकिटं राजूरला उतरून खरेदी केली होती ती उपयोगी आली.
मॅगी शिजून तयार:
वाचने
12423
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान वर्णन अन फोटोही छान!
मस्त
मस्त भटकंती आणि फोटो
शिर्षक वाचून वाटले की राजा
काय बे सूडक्या, आँ.......
आयला, हरिश्चंद्रगडला (किंवा
हा घ्या कोकणकडा
In reply to आयला, हरिश्चंद्रगडला (किंवा by राजेश घासकडवी
मस्त खुसखुशीत वृत्तांत!
भटकंती म्हटली.....
मस्त खुसखुशीत वृत्तांत >> +१
ले भारी
भारी..
भारी रे
खिरेश्वर गावातल्या नागेश्वर
उपवृतांत
मस्त उपवृत्तांत.
In reply to उपवृतांत by स्पा
>> बाकी गडाचे काही फोटो
In reply to मस्त उपवृत्तांत. by प्रचेतस
अरेरेरे.
In reply to >> बाकी गडाचे काही फोटो by सूड
ते काहीही असो सुडा, निदान या
In reply to >> बाकी गडाचे काही फोटो by सूड
जे ब्बात !
In reply to उपवृतांत by स्पा
टीप वाचलेली दिसत नाहीये
कोकण कड्याच्या सनसेट हा
>>>डावीकडून: अल्पेश, सूड,
In reply to कोकण कड्याच्या सनसेट हा by सौरभ उप्स
हे घ्या >>
In reply to कोकण कड्याच्या सनसेट हा by सौरभ उप्स
ऐश केलीसा म्हणा की!
भारी आली फिरून पोरं,भारी आली
हॅ!!! त्यात काय! आजकाल कोणीही
मस्त रे
मस्त!
वा, मस्त वृतांत,
फोटोझ !!!!!! कूल आहेत
आम्हीसुधा गेलोहोतो १४/१५ डिसें. त्याचे काही फोटो-आणि आमचा उपक्रम
अरे वा!
In reply to आम्हीसुधा गेलोहोतो १४/१५ डिसें. त्याचे काही फोटो-आणि आमचा उपक्रम by विजयराजे
त्या फ्लेक्सवर काय लिवलंय ते
In reply to आम्हीसुधा गेलोहोतो १४/१५ डिसें. त्याचे काही फोटो-आणि आमचा उपक्रम by विजयराजे
भगवा आणि हा फ़्लेक्स
In reply to त्या फ्लेक्सवर काय लिवलंय ते by सूड
फ़्लेक्स
In reply to भगवा आणि हा फ़्लेक्स by विजयराजे
हरिश्चद्रंगडावार मिपाकरांचा
फ़्लेक्स
असाच एक फ्लेक्स मढे घाटाच्या
In reply to फ़्लेक्स by विजयराजे