Skip to main content

काही संवाद, काही विषाद...

लेखक यशोधरा यांनी शुक्रवार, 09/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4130
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

यशोताई, खुपच सुंदर. अगदी मनापासून लिहिलेले आहे हे जाणवतंय. काही काही वाक्यं, खरं तर त्या वाक्यांच्या मागे दडलेले पण जे खरे सांगायचे आहे ते, खूपच हलवून गेले. विशेषतः ते मातीचे पाय आणि मैत्र वगैरे... बाकी, चरैवैती, चरैवैती हेच केवळ एक अटळ आणि अंतिम सत्य आहे आयुष्यातलं. चेंज इज द ओन्ली कॉन्स्टंट थिंग इन लाइफ.... सनातन सत्य. 'नंतर लिहिण्या'ची वाट बघतोय. बिपिन कार्यकर्ते

सगळ्या कोलाहलाबरोबर कळत नकळत आपणही त्याच कोलाहलाचा एक भाग बनून वाहत राहतो, इच्छा असो वा नसो. मुक्तक आवडले. का कोण जाणे हे गाणे आपसूक आठवले.

आपले मुक्तचिंतन आवडले, बोरकरांची कविता आणि इमर्सनच्या व्याख्येसकट. "समोरची व्यक्ती त्रासदायक वागली ह्याहीपेक्षा त्या व्यक्तीला समजून घेण्यात जी स्वत:ची हार झालेली असते, ती अंतर्मनाला अधिक कष्टदायी ठरते, म्हणून अधिक त्रास होतो.." १००% सहमत! "Great Power Comes With Great Responsibilities"

मनापासून लिहिलंय, क्लास लिहिलंय! तात्या.

अगदी मनातलं बोललीस गं.

जुन्या, चांगल्या (थोडयाफार वाईट) आठवणींमुळे होणारी मनाची सैरभैर अवस्था खूप सुंदररीत्या मांडली आहे. बरेचदा असं होतं माझ्याही बाबतीत :|

समोरची व्यक्ती त्रासदायक वागली ह्याहीपेक्षा त्या व्यक्तीला समजून घेण्यात जी स्वत:ची हार झालेली असते, ती अंतर्मनाला अधिक कष्टदायी ठरते, म्हणून अधिक त्रास होतो? पण कोणाच्याही वागण्याचा असा ठराविक साचा कुठे असतो नाहीतरी? खरंच! खूप सहज आणि सुरेख लिहिलंस यशो! क्रान्ति अग्निसखा

सुरेख लेखन --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सुरेख लिहिले आहेस.. मनातली चलबिचल.. आणि नाही म्हंटलं तरी प्रत्येकाच्या मनाची कहाणी सांगणारं मुक्तक आवडलं.. - प्राजक्ता पटवर्धन http://praaju.blogspot.com/

मुक्तक आवडले... :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

एकदम फक्कड लिखाण! वाईट अनुभव हे आपल्या मनाचा धांडोळा अधिक सक्षमतेने आपल्याला घ्यायला लावतात, म्हणून हे अनुभव मुद्दाम घ्यावेत असं नाही पण आलेच तर जास्तितजास्त सकारात्मक विचाराने सामोरे जावे! समोरचा कसा वागेल हे आपल्या हातात नसतं पण आपला प्रतिसाद तर नक्कीच हातात असतो! दिवाळी येण्याआधीच कुरकुरीत कडबोळी मिळावीत ना थंडगार दह्याबरोबर खायला तसं वाटलं बघ अगदी! :) फार पूर्वी रीडर्स डायजेस्टमध्ये वाचलेली एक छोटी कथा आठवली - आर्थर अ‍ॅश हा एक सुप्रसिद्ध टेनिस खेळाडू होता. ह्या महान विंबल्डन विजेत्याला एड्स झाला (त्याच्या दोन हार्ट सर्जरी पैकी एकावेळी त्याला जे रक्त दिले गेले त्यातून). मरणशय्येवर एकाने त्याना प्रश्न विचारला "की तुझ्या मनात असं कधी येत नाही का, की जगात इतके लोक आहेत पण मग मलाच का एड्स झाला? व्हाय मी?" तेंव्हा आर्थर म्हणतो "नाही. कारण मी जेंव्हा विंबल्डन विजेतेपद जिंकलं होतं तेव्हा अनेक खेळाडू त्या क्षमतेचे होते तेव्हाही माझ्या मनात हा प्रश्न आला नाही की मीच का जिंकलो? व्हाय मी?" चतुरंग

आता बाहेर पाऊस पडण्याची हवा आहे, त्यात असे काही लिहीलेले -आवडले असे म्हणण्यापेक्षा पोचले. बोरकरांची कविताही आवडली.

लेख आवडला. अभिनंदन व धन्यवाद!

आपला लेख वाचून खूपच बरे वाटले.माझ्याच मनातील सल आपल्या लेखातून प्रकट झाला असे वाटले.असेच लिहीत रहा.

एकदम सुरेख लेखन, मनापासून लिहलेले ! अनुभव माणसाला जगणे शिकवतो व सकारात्मक जाणीव दिशा दाखवते. *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

सर्व वाचकांचे आणि अभिप्राय नोंदवणार्‍यांचे खूप आभार. :)

उत्तम मुक्तक! मैय्या मनुष्य हा जैवरासायनिक यंत्रमानव नाही. विचार, भावना आणि वर्तन यात सुसंगती / समतोल राखताना दमछाक होत असते.
कोणीही व्यक्ती आपल्या आयुष्यात स्वत:शी आणि इतरांशी पूर्ण शंभर टक्कॆ प्रामाणिक असू शकते का? स्वत:शी किंवा इतरांशी? हो? खरंच? नक्की?
स्वतःशी तरी प्रामाणिक राहु असे म्हणताना स्वतः शी 'कमीत कमी अप्रमाणिक' रहाण्याचा प्रयत्न तरी करु असे म्हणायचे असते. आदर्शवाद अव्यवहार्य आहे हे माहीत असुनदेखील आपल्याला आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर खुणावत असतो. आपले विचार भावना म्हणजे मेंदुतील केमिकल लोच्याच! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

खूप आवडले. स्वत:शी प्रामाणिक असणे अत्यंत कठीण आहे, प्रयत्न करत रहावयाचे, जमत नाही मात्र. सुनिताबाईंचे 'आताशा मी येथे नसतेच इथे' पुन्हा काही मनात जागवून गेले. असेच लिहीत चला.

समोरची व्यक्ती त्रासदायक वागली ह्याहीपेक्षा त्या व्यक्तीला समजून घेण्यात जी स्वत:ची हार झालेली असते, ती अंतर्मनाला अधिक कष्टदायी ठरते, म्हणून अधिक त्रास होतो? पण कोणाच्याही वागण्याचा असा ठराविक साचा कुठे असतो नाहीतरी? मस्तचं . सुरेख....

"काहीबाही सुचलेलं आणि तसंच्या तसं गिरगटवलेलं लेखन" खूप आवडलं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

यशोताई, छानच लिहिलंय. मनाची ही अवस्था असतेच. एकदा 'निशाणी डावा अंगठा'कार रमेश इंगळे उत्रादकरांशी बोलत होतो त्यांनी फार छान म्हटलं, ते म्हणाले, या माणसं, मुखवटा घेऊन वावरतात. त्यांचं जगणं खोटं आहे. पण जगण्याच्या नादात खोटं नि खरं जगणं मिसळून गेलं आहे. खोट्यालाच ती खरं समजू लागली आहेत. खरं आणि खोट्यातलं द्वंद्व आहे. आज प्रत्येक जण मुखवट्याआड हरवून गेलाय. चेहरा नि मुखवट्याचा खेळ आहे हा सगळा. म्हणूनच स्वतःशी प्रामाणिक रहाणंही अवघड बनलंय. माझा बॉस बिऩडोक आहे, तरीही केवळ पदाने तो बॉस असल्याने त्याचं ऐकून घ्यावं लागतं. इलाज नाही. तरीही घाटपांडे काकांनी म्हटल्यासारखं स्वतःशी कमीत कमी अप्रामाणिक रहाण्याचा प्रयत्न करायचा हे पटतं.
समोरची व्यक्ती त्रासदायक वागली ह्याहीपेक्षा त्या व्यक्तीला समजून घेण्यात जी स्वत:ची हार झालेली असते, ती अंतर्मनाला अधिक कष्टदायी ठरते, म्हणून अधिक त्रास होतो?
अगदी खरंय. बाकी लेखनशैलीबद्दल क्या कहने. मजा आला. (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे? हा आहे आमचा स्वभाव

पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप आभार. हे लिखाण तसं बरंच विस्कळीत आहे, कसं काय आवडेल, असं वाटलं होतं मला. लिखाणाला मिळालेला प्रतिसाद पाहून खरंच खूप छान वाटलं. थँक यू :)