काटकोन
लेखनप्रकार
Sir, I think your data is irrelevent in Indian weather conditions. मी
What is your degree and experience and degree in the field sir?हॉलंडवरुन आलेला तज्ञ.
Experience 1 year and degree 90 degrees
१९९८ साली एका पंचतारांकित हॉटेल मधील एका कॉनफरन्स मधील प्रसंग.
--------------------------------------------------------------------------------------------------------
१९९२ सालानंतर जागतिकरणाचे वार भारतात वाहु लागले. भारतिय कुक्कुट पालनामधे सुद्धा आधुनिकरण आले. ऑटोमेशन मुळे एका स्क्वेअर फुटात एकाच्या एवजी ३ कोंबड्या ठेवण्याइतकी प्रगती झाली. त्याला नाव पडले 'एअरकंडीशन पोल्ट्री'.
कामशेत पासुन सुमारे २० किलोमिटर आत टाटा धरणाच्या जवळ माझ्या एका मित्राने असाच एक फार्म उघडला होता. शनिवार रविवार सुट्टीसाठी एकदा या फार्म वर गेलो होतो.ते दोन दिवस संपुर्ण आयुष्याला कलाटणी देउन गेले. थंडीचे दिवस होते. रात्रीचे तपमान ४ डीग्री इतके खाली आले होते. ऑपरेटींग मॅन्युअल मधे ह्या परिस्थितीवर काय करायचे ह्याची माहीती नव्हती. ब्रुडर्स ची उष्णता कमी पडत होती. सुमारे २२००० ४ दिवसाची पिल्ले उब मीळण्याकरता गर्दी होउन मरण्याची शक्यता निर्माण झाली होती. मित्र पण गोंधळलेला होता. फोन करुन कुणाला विचारावे तर फोन बंद.
माझा पोल्ट्री सायन्स शी अजिबात काही ही संबंध नव्हता. ओ का ठो माहीती नव्हती. हिमत करुन शेड मधे गेलो. आणि मग जवळ जवळ आठ वर्षे बाहेर च आलो नाही. ह्या निमित्ताने नाबार्ड, बॅ़कांचे अधिकारी ह्यांच्याशी चांगले संबंध आले. शेतकर्यांच्या पुरक व्यवसाया बद्दलची राज्य सरकारची भुमिका लक्षात आली. महाराष्ट्रातील कानाकोपर्यातील कुक्कुट पालनात गुंतलेल्या शेतकर्यांची दुरावस्था बघितली. त्याच्या करता सर्वांकडे भांडलो. पुण्यामधील अमृत फीड च्या डॉक्टर वैद्यांनी 'टेररीस्ट' हे नामकरण केले. आजही कंट्रोल्ड फार्मिंगवर मी केलेला रिसर्च कुणीही फारसा पुढे नेलेला नाही.
____________________________________________________________
२००६साल
'सुकड्या' संपर्क सुटुन जवळ जवळ ४ वर्ष झाली होती. त्याने मी दिलेला सल्ला पाळला होता. घेतलेले कर्ज मेहनत करुन वेळे आधी फेडले होते.
त्या मुळे परत कधी धंद्याच्या वाढीसाठी पतपुरवठा सुकड्याला कमी पडला नाही. मी पाठवलेली ४ मुले त्याने कामावर ठेवली होती. आ.टी.आय मधे जाउन तिथल्या मुलांना नोकरी देण्याचा नियम तो आजही पाळतो.
बैठ्या घरातुन प्रशस्त फ्लॅट मधे पोचलेल्या सुकड्याची प्रगती खरेच वाखाणण्यासारखी होती.
अचानक एकदा फोन आला. भेटायला यायचे होते त्याला.
भेटल्यावर पहीले वाक्य, "सर, भिकारी झालो." चेहृयावर खंत नव्हती ह्याचे मला बरे वातले.
एकंदरीत झालेली परिस्थिती त्याने मला सांगितली. चला म्हटले २००४ सालनंतर उतरवलेला 'झगा' परत चढवुया.
मी सुकड्याला पुर्ण कागदपत्र घेउन यायला सांगितली. बरोबर कंपनी च्या सिनियर मॅनेजर ला पण घेउन यायला सागितले.
मी कागदपत्र पुर्ण तपासली.
१९९४ साली सुकड्याला त्याच्या गावाकडच्या एम्.आय्.डी.सी मधे एक बंद पडलेली मोठी कंपनी चालवायची ऑफर आली. ही ऑफर बॅकेनेच दीली होती. ह्या कंपनीत बँकेचे पैसे अडकलेले होते. १९% व्याजाने बँकेने कर्ज मंजुरी देउन ह्या कंपनीचे मालकी हक्क सुकड्याला हस्तांतरीत केले होते.(रिस्क फॅक्टर चे २% जास्त). खरे म्हटले तर आधीच्या मालकाने हात वर केले होते. बँकेने जागेसकट लिलाव पुकारला होता. २५% रिकवरी एवढी सुद्धा बोली आली नव्हती. अर्थात हे सर्व सुकड्याला नंतर कळले.
सुकड्या फक्त 'ज्या गावातुन अन्नान होउन मुंबईला आलो, त्याच गावात आज मानाने परतलो' ह्या भावनेत अडकला होता.
पण ह्या ही परिस्थितीत सुकड्याने धंदा वाढवला. बॅ़केने वाढीकरता अगदी 'आमंत्रण' पाठवुन पतपुरवठा केला. शेवटी त्यांना सुद्धा 'कोटा' पुर्ण करायचा होता ना.
२००३ साली एक्स्पोर्ट ओरियंटेड युनीट नावाच्या खुळात सुकड्या अडकला. रातोरात एक लिमिटेड कंपनी एकदम बंद कशी पडते हे सुकड्याला कधीच समजले नाही. सुकड्याचे (आणि त्या बरोबर आणखी कितितरी)सुमारे २५ लाख बुडवुन हा एक्स्पोर्ट युनीट चा मालक कंपनी बंद करुन चालता झाला. आज राजकारणात आहे.
सुकड्याने तरी सुद्धा धीर सोडला नाही. बॅ़केला विश्वासात घेउन धंदा चालु ठेवला. हप्ते भरत राहीला. २००४ साली एका नैसर्गिक आपत्तीत कंपनीचे नुकसान झाले. विमा होता. पण पॉलीसीच्या किरट्या अक्षरातील एका वाक्याने सुक्ड्याचा घात झाला. दात कोरण्या इतपत विम्याची रक्कम सुकड्याला मिळाली. गंमत म्हणजे ही पॉलीसी बॅ़केनेच काढून दीली होती.
आता सुकड्याची सुटका नव्हती हप्ते थकत चालले. व्याज, पेनल्टी वाढत होते. एन्.पी.ए. झाल्यावर बॅकेच्या नोटीसा सुरु झाल्या.
सर्व परित्थिती लक्षात आल्यावर मॅनेजर ला मी एक पत्र डीक्टेट केले. सुकड्याच्या मॅनेजर ला त्या पत्राचा प्रयोजन व अर्थ दोन्ही ही कळाले नाही.
त्याने तसा प्रश्न उपस्थित केल्यावर सुकड्याने माझ्या समोरच त्याला झापला. मी सुकड्याला धीर दीला. त्याला म्हटले तुझे नशिब चांगले असेल तर बॅ़क ह्याला उत्तर देईल. उत्तर आले तर तु सुटलास. नाही तर काय करायचे ते नंतर बघु.
सुकड्याने बॅकेला पत्र पाठवले. सुमारे पंधरा दिवसाने त्याचे उत्तर आले. सविस्तर उत्तर होते. माझ्या प्रत्येक मुद्द्याला नंबर घालुन उत्तर दिले होते.
सुकड्याचे दैव बलवत्तर नाहीतर we deny the contents हे एका वाक्याचे उत्तर आले असते. आणि पुढची कोर्ट कचेरी बोडक्यावर बसली असती.
पत्र वाचल्यावर मी हसलो.
सुकड्याला आणखी एक पत्र लिहुन दीले.
गेल्या वर्षी बुकात लिहीलेल्या (नोशनल) रकमेच्या ३०% रकमेत बॅकेने सुकड्याला कर्जमुक्त केले. आता रंक झालेला सुकड्या परत राजा होइल. पुन्हा काही ढेकळांना अन्नाला लावेल.
जाता जाता: बर्ड फ्लू बद्दलच्या गैरसमजाला सरकार आळा न घालु शकल्याने हजारो मराठी शेतकरी भिकारी झाले. त्यात माझा मित्र सुद्धा होता.
सुमारे दहा लाखाच्या पुरस्कारापासुन मी वंचीत झालो. फक्त एकच उन्हाळा हवा होता मला माझा रिसर्च पुर्ण करायला. ना खंत ना खेद
ता.क. : ते पत्र लय भारी क्रिप्टीक
वाचने
3938
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
हाहाहा
In reply to हाहाहा by टारझन
+१
In reply to +१ by दशानन
काय मास्तर
किस्सा
भरपाई
In reply to भरपाई by विनायक प्रभू
काटकोन
In reply to काटकोन by ३_१४ विक्षिप्त अदिती
काटकोन
In reply to काटकोन by विनायक प्रभू
इमोशनल इंटेंसिटी ???
उत्तम. हेच
हम.. ही बर्ड
गुर्जी
आईग्ग!!!!
तुम्ही नक्की काय काय करता सर !
बाप रे!
मास्तर,
In reply to मास्तर, by पिवळा डांबिस
मास्तर,
शेती हा