मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घटना

अविनाशकुलकर्णी · · जनातलं, मनातलं
, पारा असा चढला आहे कि जीवाची लाही लाही होते माणसांची हि अवस्था तर मुक्या प्राण्यांचं काय होत असेल ? नागनंदिनी सोसायटीत एक घटना घडली उन्हात तापलेला एक साप साने काकूंच्या किचन मध्ये शिरला काकू कुकर लावत होत्या आत डाळ व पाणी होते त्या पाण्यात त्याने डुबकी मारली कुकर लावायचे म्हणून काकूं कुकर जवळ गेल्या झाकण लावताना त्यांना तो साप दिसला सापाला पहाताच त्यांची बोबडी वळाली व त्यांनी मदती साठी धावा सुरु केला सोसायटीचे लोक्स मदतीला आले व सापाला पहाताच त्यांची पण भीतीने गाळण उडाली सोसायटीत नागनाथ सर्प मित्र होता तो धावत आला सापाला पकडले अन डाळ पिशवीत भरली व सर्पोद्याना कडे निघाला वाटेत कचरा कुंडीत डाळीची पिशवी टाकली इकडे काकू पण नॉर्मल ला आल्याहोत्या सोसायटीचे लोक्स पण पांगले अघटित टाळले म्हणून काकू नी देवाचे अआभार मानले जर काकूंच्या लक्षात न येता त्यांनी डाळ कुकरली असती तर साने गुरुजींना "साप डाल तडका " खायला मिळाला असता मात्र पावशेर डाळ वाया गेली म्हणून काकूंना दिवस भर चूटपूट लागली

वाचने 3559 वाचनखूण प्रतिक्रिया 7

खिलजि 29/04/2019 - 13:54
अकु काका , तुम्ही वोटिंग करता का ? नाही म्हणजे , मी आपलं सहजच इचारलं हि घटना खरी मानायची कि खोटी ? त्याच काय आहे , आज आमच्या मुंबैत इलेक्षन हाय सर्वाना सुट्टी आणि आम्हालाच न्हाय साप डाळीत होता कि पाण्यात ते तुम्ही नीट लिवलंच न्हाय त्वरा करा,, चला उठा लवकर टंकून टाका बरं

खिलजि 29/04/2019 - 14:39
काका मला तुमचे निरागस लेखन फार आवडते .. माझ्या प्रतिसादांना सकारात्मक आणि हलके घ्या .. आणि लिहीत राहा .. मी तुमचा फ्यान हाय