Skip to main content

काटा वजनाचा --४

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 03/02/2016 01:08 या दिवशी प्रकाशित केले.
काटा वजनाचा -३ काटा वजनाचा --४ आतापर्यंत आपण वजन जास्त म्हणजे किती आणि ते का वाढते याची साधारण कारणे पाहिली काही लोक आपल्याला भरपूर खाताना दिसतात तरीही त्यांचे वजन वाढत नाही. याउलट बहुसंख्य स्थूल लोकांची एक तक्रार असते कि आम्ही एवढा डाएट करतो तरी आमचे वजन कमी होत नाही. या दोन्ही गोष्टीत थोडे फार तथ्य आहे याचे विवेचन. काही वैद्यकीय शास्त्रज्ञांनी एक सिद्धांत मांडला कि जसे आपल्या मेंदूत एक थर्मो स्टेट(THERMOSTAT) असतो जो शरीराचे तापमान स्थिर ठेवतो तसाच एक एडीपोस्टेट (ADIPOSTAT) असतो. याचे प्रत्यक्ष अस्तित्व अजून मिळालेले नाही परंतु हा सिद्धांत असे सांगतो कि आपल्या मेंदूच्या तळाशी असलेल्या HYPOTHALAMUS या मेंदूच्या भागात याचे अस्तित्व असते आणी हा एकदा एका वजनाला स्थिर(SET) झाला कि तो विशिष्ट मर्यादेत आपल्या शरीराचे वजन वाढू अथवा कमी होऊ देत नाही. जर आपले वजन ६० किलो असेल आणी आपण त्याला आवश्यक अशा २१०० कॅलरी इतके अन्न खात असू तर आपले वजन स्थिर राहील परंतु आपण जर २४०० कॅलरी इतके अन्न खालले तर हा एडीपोस्टेट आपल्या वरच्या ३०० कॅलरी वेगवेगळ्या स्वरुपात खर्च करून वजन स्थिर ठेवतो. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली तपकिरी चरबी ( BROWN FAT) येथे मेंदू संकेत पाठवितो ज्यामुळे हि बरीचशी खाल्लेली अतिरिक्त चरबी (उर्जा) अक्षरशः जाळून टाकली जाते. याशिवाय आपली आतडी अतिरिक्त अन्न शोषण करण्या ऐवजी पुढे ढकलून देतात त्यामुळे स्थूल माणसे बरेच अन्न दुसर्या दिवशी अक्षरशः वाया घालवतात. यांच्या आतड्यातील जीवाणू पण याला जबाबदार आहेत असा एक सिद्धांत(THEORY) आहे. साधारण पणे आपले शरीर जेंव्हा एक ग्राम चरबी जाळते तेंव्हा साडेचार कॅलरी उर्जा या ए टी पी(ATP) मध्ये साठवून ठेवली जाते जी तुमच्या चयापचयासाठी(METABOLISM) साठी वापरली जाते आणी उरलेल्या साडेचार कॅलरी उष्णतेच्या रुपात बाहेर पडतात.जेंव्हा आपली तपकिरी चरबी ( BROWN FAT) काम करू लागते तेंव्हा एक ग्राम चरबीतील बहुतांश उर्जा हि उष्णतेच्या स्वरुपात बाहेर पडते आणी फारच थोडी उर्जा साठविली जाते. थोडक्यात तेच काम करायला आपले शरीर जास्त उर्जा खर्च करते. आपले शरीर साधारणपणे ५० % उर्जा कार्यक्षमतेचे (EFFICIENCY) असते आपण पाहिले असेल कि स्थूल माणसाना सदासर्वदा घाम येतो याचे एक कारण म्हणजे त्यांच्या शरीरावरील अतिरिक्त चरबीचा थर उष्णतारोधक असल्याने उर्जा बाहेर टाकत नाही आणी दुसरे कारण हि तपकिरी चरबी ( BROWN FAT) त्यांनी खाल्लेले "अतिरिक्त" अन्न जाळून वजन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करते. महत्त्वाचा मुद्दा -- आपले वजन जास्त असेल आणी आपलयाला थंड बसलेल असताना सुद्धा सतत घाम येत असेल तर त्याचा साधारण अर्थ असा आहे कि आपण आपल्या गरजेपेक्षा जास्त अन्न खात आहात. आता एखाद्या ६० किलो वजनाच्या व्यक्तीने आपल्या गरजेच्या पेक्षा बरेच जास्त अन्न बरेच दिवस (८०-१०० दिवस) खाल्ले तर काय होते आपला एडीपोस्टेट (ADIPOSTAT ) वरच्या बिंदूवर स्थिर होतो. म्हणजे ६० ऐवजी ६३ किलो वर स्थिर होतो. आता या व्यक्तीला रोजचे कामकाज चालविण्यासाठी २१०० ऐवजी २३०० कॅलरी चे अन्न लागते. असे बरेच जास्त अन्न बरेच दिवस खाणे चालू राहिले तर त्या व्यक्तीचे वजन वाढतच जाते. म्हणून वर्षभरात लोकांचे १०-१२ किलोने वजन सहज वाढते. केसरी ट्राव्हल्स सारख्या संस्थेत १५ दिवसांच्या सहलीला जाऊन आलेली माणसे ३-४ किलोने वजन वाढवून येतात कारण तेथे दिवसात ५ वेळेस मिळणारे सुग्रास जेवण आणि न्याहारी, नाश्ते. ते जवळजवळ ४५०० कॅलरी इतके असतात. आणि एकदा पैसे भरले आहेत तर का सोडा? खाउन घ्या अशी आपली वृत्ती. जेंव्हा हि व्यक्ती वजन कमी करायचा प्रयत्न करते तेंव्हा हाच एडीपोस्टेट (ADIPOSTAT) आपले वजन कमी होऊ देत नाही. आपण कमी कॅलरी चा आहार घेतो तेंव्हा आपले शरीर जास्त कार्यक्षम होते आणी एक गरम चरबी जाळल्यावर सहा ते सात कॅलरी ए टी पी मध्ये साठवते. थोडक्यात तेवढेच काम करण्यासाठी आपल्या शरीराला कमी उर्जा खर्च करायला लागते. यामुळे मिताहार सुरु केला तरी वजन सहज सहजी कमी होत नाही याउलट त्याच व्यक्तीला थंडी वाजू लागते. थंडी वाजली किती व्यक्ती अंगावर अधिक कपडे चढवून घेते आणी उर्जेचा अपव्यय कमी होतो. थोडक्यात आपले वजन कमी होत नाही. शिवाय आपली आतडी सुद्धा जास्त कार्यक्षम होतात आणी जास्त अन्न शोषून घेतात. म्हणजे जर पूर्वी ४०० ग्राम अन्नापैकी २०० ग्राम शोषले जात असे तर आता २४० ग्राम अन्न शोषले जाते. त्यामुळे आहार तुम्ही ४० ग्राम नि कमी केलात(१०%) तरी प्रत्यक्षात शोषलेले अन्न तेवढेच राहते (२०० ग्राम) चरबी बरोबर शरीरात बरेच पाणीसुद्धा साठवलेले असते. त्यामुळे जेंव्हा एखादी व्यक्तीने वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण आणी व्यायाम केले असता सर्वात पहिल्यांदा हे पाणी बाहेर टाकले जाते. यामुळे आपले वजन ५ ते ८ % कमी होते हि स्थिती पहिल्या ३-४ आठवड्यात होते. म्हणजेच एखादी व्यक्ती ८० किलोची असेल तर तिचे वजन ७२ ते ७५ किलो पहिल्या एक महिन्यात सहज होते. पण दुर्दैवाने हा वजन कमी होण्याचा दर लगेचच मंदावतो आणी पुढचे ५ टक्के कमी करण्यासाठी तुम्हाला भगीरथ प्रयत्न करायला लागतो. बहुसंख्य लोक जे VLCC, तळवलकर सारख्या केंद्रात जातात तेथे पहिल्या एक महिन्यात दैदिप्यमान असा फरक वजनाच्या काट्यावर दिसतो. या नन्तर त्यांच्या व्यायामात खंड पडला कि हे ५-८% पाणी परत शोषले जाते आणी पुढच्या २-३ आठवड्यात वजन पुन्हा जैसे थे होते. दुर्दैवाने या कमी झालेल्या वजनाच्या उत्साहात लोक हे सर्वाना सांगत सुटतात कि वजन काय आरामात कमी होईल. मी गेल्या महिन्यात ८ किलो कमी केले होते . आणी याची पुनरावृत्ती मग परत २ -३वर्षांनी होते. बर्याच लोकांनी असे पाच आकड्यात पैसे तीन चार वेळेस खर्च केलेले असतात आणी त्यानंतर ते वजन कधी कमी होत नाही. and then they lived happily ever after with their original weight. हि गोष्ट VLCC किंवा तळवलकर मध्ये कोणीही तुम्हाला सांगत नाही. हेच तर त्यांच्या यशाचे गमक आहे. महत्त्वाचा मुद्दा -- एक महिन्यात ७-८ किलो वजन कमी करणे हा हेतू न ठेवता दर महिन्याला एक ते दीड किलो वजन कमी होईल या उद्देशाने आपण जायला हवे.म्हणजे वर्षभरात आपण १२-१५ किलो वजन कमी करू शकू. वजन जर एकदम कमी केले तर हवा गेलेल्या फुग्यासारख्या आपल्या चेहर्याला किंवा शरीराला सुरकुत्या पडतात. (गरोदर स्त्रियाना प्रसुतीनंतर पोटाच्या त्वचेवर अशाच सुरकुत्या पडतात). लक्षात ठेवा. एक ग्राम चरबी म्हणजे ९ कॅलरी ( KILOCALORIES) म्हणजे जर रोज आपण ५० ग्राम चरबी कमी करायची असेल तर आपल्याला ४५० कॅलरी व्यायामात किंवा आहारात कमी करून खर्च करायला पाहिजेत. असेच दुसर्या टोकाला असलेले बारीक लोक -- बारा महिने बत्तीस काळ हे लोक वाटेल ते खात असतात पण त्यातील बराच भाग शरीर शोषुनच घेत नाही त्यामुळे कितीही खाल्ले तरी "अंगी" लागत नाही. यांच्या आतड्यातील जीवाणू पण याला जबाबदार आहेत असा एक सिद्धांत(THEORY) आहे. शिवाय जे अन्न खातात त्यातील बरेचसे अन्न तपकिरी चरबी ( BROWN FAT) जाळण्यास मदत करते यामुळे हे लोक काही अंगी लावून घेत नाहीत आणी बर्याच वजनदार लोकांच्या हेव्याचे मानकरी होतात. क्रमशः
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 37983
प्रतिक्रिया 73

प्रतिक्रिया

In reply to by अव्यक्त

सहमत. हा लेख जास्तच तांत्रीक झालाय. कृपया आमच्यासारख्या सऊदरांना काही सोप्या भाषेत मार्गदर्शन करा.

Dear sir, 2 month ago I was read a book effortless weightloss written by Dr. Jaganath dixit & Late Dr. Shrikant jichakar. In his book he state that u take your lunch & dinner in specified time. He mean if u take ur lunch at 9 AM then take your dinner at 9 PM. nothing to be eat during this two meals. he said hunger is psycological. If you hungry between two meals u can take buttermilk or orange juice without sugar. also he write u have to finish ur eating in 55 minuts. he advice protine food like chiken, mutton, fish, eags & soyabin. he also writes that if u eat no of time in a day more insulin creat by our body and this insulin causes increas in weight. To follow this he gave two conditions ur age is more than 25 & u r not suffer from diabetes. I am following this from last two months & I loss my weight 4 kg. He also advice that check ur fasting insulin & HB1C. Pleas give ur opinion

खूपच माहितीपूर्ण लेख लिहीलायात. विशेषतः ADIPOSTAT का काय ते माहीतच नव्हत. बारा झाल सांगितलात ते. लेख माला अशीच चालू राहूद्या...मज येतेय वाचायला (आणि समजून पण घायला :x )