२३४ मुलींपैकी ती एक. इयत्ता सहावीत, म्हणजे तेरा-चौदा फार फार तर पंधरा वर्ष वय असेल तिचं. ३९ शाळांमधून प्रत्यकी सहा अशा निवडलेल्या या २३४ मुली. त्यापैकी ही एक ‘रापारिगा लीडर’ किंवा ‘लीड गर्ल’.
कोणत्याही शाळेत गेलं की या मुलींची भेट घेणं, त्यांच्याशी गप्पा मारणं हे एक महत्त्वाचं काम. त्यांची जिल्हानिहाय निवासी शिबिरं ठरल्यावर घरोघरी जाऊन, आई-वडिलांना भेटून मुलीला शिबिरात पाठवण्यासाठी त्यांची परवानगी घेणं. एक दोन नव्हे तर तब्बल १९४ घरं. इथल्या समाजाचं विराट दर्शन घडवणारी ती एक यात्राच.
दरम्यान अनेकदा या मुलींची नावं संगणकाच्या पडद्यावर उमटली. कधी वयानुसार गट, कधी भाषेनुसार, कधी कुटुंबाच्या माहितीनुसार. वडील नसलेल्या मुली किती, नातलगांकडे राहणा-या मुली किती, सावत्र आई/वडील असलेल्या मुली किती....वेगवेगळ्या पद्धतीनं माहितीचं विश्लेषण आणि त्या अनुषंगाने नवनव्या कल्पना.
शिबीर आठ जिल्ह्यांत झालं, आता हा शेवटचा जिल्हा. या जिल्ह्यात सहा शाळा. प्रत्येक शाळेची भेट आणि त्यात ‘रापारिगा लीडर्स’शी संवाद. जमलं तर गृहभेट आणि पालकभेट.
भर दुपारी बारा वाजता आम्ही शाळेत पोचलो. मुलींचा वर्ग बारा वाजता सुरु होतो, त्यामुळे ही योग्य वेळ त्यांना भेटायची. पाचेक मिनिटांत लाजून, मान खाली घालून, तरीही उत्सुक तिरक्या नजरेने पाहणा-या सहा मुली माझ्यासमोर उभ्या. एकेक नाव सांगतेय आणि मी हातातल्या यादीवर ‘बरोबर’ची खूण करतेय. एक, दोन, तीन, चार, पाच.... वा! इथं एकही ‘रापारिगा लीडर’ शाळा सोडून गेली नाहीये तर! अरेच्चा! पण ही सहावी मुलगी वेगळंच नाव सांगतेय – कागदावर ते नाव नाहीये. हं! म्हणजे इथंही गळती झालीय तर! लग्न झालं की काय तिचंही?... एका क्षणात मनात किती ते विचार!
मी त्या नव्या सहाव्या मुलीची आधी व्यवस्थित विचारपूस करते.
मुख्याध्यापकांकडे वळून मी प्रश्न विचारणार – तितक्यात विचार बदलून मी मुलींना विचारते, “पण सेलेस्टिना कुठेय? ती फक्त आज नाही आली शाळेत की बरेच दिवस गैरहजर आहे?”
“ela morreu” (ती मेली) निर्विकार चेह-याने एक मुलगी सांगते.
मला काय बोलावं ते सुचत नाही.
“काय झालं”, मी विचारते.
“माहिती नाही. एक दिवस आजारी पडली, दुस-या दिवशी गेलीच ती डॉक्टरकडे न्यायच्या आत.” मुख्याध्यापक सांगतात.
“कधी झालं हे?” मी विचारते.
आपापसात चर्चा करून ‘आठ दिवस’ या निष्कर्षाप्रत ते येतात.
“तिच्या आई-वडिलांना भेटता येईल का?” या माझ्या प्रश्नावर ते सध्या कामासाठी गाव सोडून गेल्याचं कळलं.
मृत्यू मला नवा नाही. जिवलगांच्या जाण्यातून त्याची अनेकदा चाहूल घेतली आहे.
पण मृत्यूची सवय होता होत नाही; प्रत्येकवेळी तो नवा असतो. तितकाच अंतर्मुख आणि हतबल करणारा असतो. त्याच्या अपरिहार्यतेची जाणीव लख्ख करणारा असतो.
परक्या भूमीतल्या, जिला मी कधीही भेटले नव्हते अशा या मुलीच्या निमित्ताने मृत्यू आज पुन्हा भेटला. पुन्हा एकदा डोळे ओलावून गेला.
प्रश्न मरण्याचा नसतो तर जगण्याचा असतो हे अधोरेखित करणारी पुनर्भेट.
अजून किती बाकी आहेत?
वाचने
4909
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
आईग्ग........
!!
लेख वाचला पण संदर्भ नीट
खेडूत आणि त्रिवेणी,
In reply to लेख वाचला पण संदर्भ नीट by त्रिवेणी
संवेदनशील चिंतन. अजून विस्तृत
'मृत्यू जामीन होऊनी यावा,
In reply to संवेदनशील चिंतन. अजून विस्तृत by एस
कधीकधी जिथे जीवन ओंगळवाणे
In reply to संवेदनशील चिंतन. अजून विस्तृत by एस
कधीकधी जिथे जीवन ओंगळवाणे
+११११११११११
In reply to कधीकधी जिथे जीवन ओंगळवाणे by तुडतुडी
हे उमजेपर्यंत
:-(
In reply to हे उमजेपर्यंत by नाखु
आभार
देवा!
ज्योताई...
In reply to देवा! by पैसा
लहान मुलीने मृत्यूबद्दल
In reply to देवा! by पैसा
अस्वस्थ करणारा लेख
लहान मुलीने मृत्यूबद्दल निर्विकार होणे फार म्हणजे फार भयानक वाटलं+१ इथे कुणाच्याही अनपेक्षित मृत्यूने होणारा मानसिक त्रास अभिप्रेत असला तरीही, अशा 'समाज सुधारतो आहे' असं वाटता-वाटता बसणार्या स्त्रियांच्या अपमृत्यूचा धक्का हाही मुद्दा आहेच असं वाटतं. गेल्या दोनच दिवसांत दोन काहीश्या संबंधित बातम्या वाचायला/पहायला मिळाल्या आणि हा लेख वाचून वाटलं तसंच अस्वस्थ व्हायला झालं: मानवी संघर्षांच्या घडामोडीत प्रामुख्याने frontline वर स्त्रियाच का बळी जातात? हे कोणत्या उत्क्रांतीचं लक्षण आहे? सिरियासारख्या निर्वासितांच्या घटनांमध्ये स्त्रियाच प्यादं म्हणून वापरल्या जात आहेत. कालच, मानवी तस्करी आणि स्त्रियांना गुलामासारखी वागणूक मिळणं हे global warming चा अपरिहार्य परिणाम आहे आणि तो थांबवण्यासाठी जगभरातून प्रयत्न झाले पाहिजेत असं पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकन येथे महापौरांच्या जागतिक परिषदेत सांगितलं.दुव्यांसाठी आभार.
In reply to अस्वस्थ करणारा लेख by बहुगुणी
@ आतिवास