Skip to main content

मोदी आणि मोदी

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 18/07/2013 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
रॉयटर्सचा वार्ताहर मोदींची मुलाखत घेत आहे. मुलाखतीचे थेट प्रक्षेपण सुरू आहे. वार्ताहरः मोदीजी, तुमचे आवडते फळ कोणते? मोदी: आंबा क्षणार्धात सर्व वाहिन्यांवर ब्रेकींग न्यूज येते. "मोदींना पेरू आवडत नाही" . . . पुढच्या क्षणी प्रतिक्रिया येऊ लागतात. जितेंद्र आव्हाडः महात्मा गांधींना केळ्यासारखे साधे आणि स्वस्त फळ आवडत असे. मोदी हे मुळातच महात्मा गांधींच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांच्या आवडत्या फळात केळ्याचा उल्लेख नाही याचे आश्चर्य वाटत नाही. ज्या गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली त्याच गोडसेचे मोदी हे प्रतिनिधी आहेत. मनीष तिवारी: मोदींना पेरू हिरव्या रंगामुळे आवडत नाही. ही त्यांची मुस्लिमविरोधी मानसिकता आहे. अजय माकनः मोदींना आंब्यासारखे महागडे फळ आवडते. त्यांनी गरीबांची थट्टा केली आहे. अमूल बेबी उर्फ पप्पू: मला मोदींसारख्या ठराविक गोष्टीच आवडत नाही. माझा आहार सर्वसमावेशक आणि सर्वधर्मसमभावी आहे. मला जसा केशरी आंबा आवडतो तसाच हिरवा पेरू आणि पांढरा आवळा पण आवडतो. मी उद्याच उत्तर प्रदेशातल्या एका दलिताच्या झोपडीला भेट देऊन केळी खाणार आहे. डॉग्विजयः मोदी स्वतःच एक नासका आंबा आहेत. हा नासका आंबा अढीतून बाहेर नाही काढला तर संपूर्ण अढी नासेल. अशा नासक्या आंब्यांना उदारमतवादी भारतीय समाजात काहीही स्थान नाही. रात्री १० वाजता आयबीएन-लोकमत वर निखिल वागळे: नमस्कार. आयबीएन्-लोकमतवर आपलं स्वागत आहे. आजचा नवा दिवस आणि नवा चर्चेचा नवा विषय. मोदींनी आपल्याला केशरी आंबा आवडतो असे सांगून आपला जातीयवादी भगवा चेहरा उघड केला आहे. त्याचवेळी आपल्या आवडत्या फळात हिरव्या पेरूचे नाव मुद्दामच टाळून आपली मुस्लिमविरोधी मानसिकता दाखवून दिली आहे. आज आपल्याबरोबर चर्चेमध्ये आहेत भाजपचे माधव भंडारी, काँग्रेसचे सचिन सावंत आणि ज्येष्ठ विचारवंत मार्केंडेय काटजू. आपण सुरूवात करूया माधव भंडारींपासून. माधव भंडारी, तुम्ही उत्तर द्यायला हवं. काय म्हणायचंय तुम्हाला मोदींच्या या खळबळजनक वक्तव्याबद्दल? . . . चर्चा सुरू होते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 16990
प्रतिक्रिया 71

प्रतिक्रिया

;)मस्त विडंबन. मोदींनी एका समाजाला कुत्रा म्हणुन हीणवले ही बातमी वाचुन तर चाट पडलो होतो परवा. बाद्वे..आयबीएन-लोकमत किंवा तत्सम मराठी व्रुत्त्वाहिन्यांवर वाद्-विवाद करायला पैसे मिळतात का हो? आम्हाला पैसे घेउन काथ्या कुटायला खुप आवडेल. :)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

अलीकडे मोदी bashing ची हद्द झाली आहे.

In reply to by रमेश आठवले

>>> अलीकडे मोदी bashing ची हद्द झाली आहे. +१ मोदींनी काहीही केले तरी माध्यमे व विरोधी पक्ष त्यांना झोडपून काढतात. त्यांनी पाणी पिण्यासाठी उजवा हात वापरला तर ते प्रतिगामी उजव्या विचारांचे आहेत अशी टीका होऊ शकते. त्यांनी पूर्वी एका सभेत मुस्लिमांची टोपी घातली नाही. तेव्हा म्हणे त्यांनी बरेच विचित्र हातवारे केले होते. म्हणजेच ते मुस्लिमविरोधी आहेत अशी त्यांच्यावर टीका होते. परवा बोलताना त्यांनी बुरखा शब्द वापरला, मुखवटा किंवा चादर हा शब्द का नाही वापरला, म्हणजेच ते मुस्लिमविरोधी आहेत, बुरखा मुस्लिम स्त्रियांशी संबंधित आहे, काँग्रेस धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरते म्हणजे काँग्रेस बुरखा वापरणार्‍या प्रतिगामी स्त्रीसारखा दुर्बल पक्ष आहे . . . असे वाटेल ते अर्थ त्यांच्या बोलण्यातून काढून त्यांना झोडपले जाते. यावरून एक गोष्ट आठवली. एका चित्रप्रदर्शनात अनेक नामवंत समीक्षक एका अमूर्त चित्राभोवती उभे राहून रसग्रहण करत असतात. एक समीक्षक म्हणतो की हे एका आगीत झोपलेल्या बैलाचे चित्र आहे. दुसरा म्हणतो हे चित्र म्हणजे गरूडाचा भेदक डोळा आहे. तिसर्‍याला ते चित्र म्हणजे युगायुगांची पोकळी वाटते. चवथ्याला ते चित्र म्हणजे फांदीवर मजेत झुलणारा पोपट वाटतो. एवढ्यात एक व्यक्ती पुढे येऊन ते चित्र उचलून ते उलटे ठेवते. सर्व समीक्षक भडकून त्याला मारायला जातात. यावर तो सांगतो की तोच या चित्राचा चित्रकार असून ते चित्र चुकुन खालची बाजू वर असे ठेवले गेले होते आणि आता ते सरळ ठेवले आहे. मोदींच्या वाक्यातून स्वतःच्या मनाने अनेक अर्थ (की अनर्थ) काढून त्यांना झोडपणार्‍यांना पाहून या कथेची आठवण झाली.

In reply to by रमेश आठवले

मोदीच नव्हे.. इतरही सर्व पक्षाच्या नेत्यांचे bashing आणि glorification ची हद्द झाली आहे.. facebook च्या माध्यमातून कार्टून जोक्स यामध्ये फार खालच्या पातळीवर जाउन वैयक्तिक टीका होताना दिसते.. याच धाग्यातील एका प्रतिसादातील कार्टून त्यातलेच एक.. सगळे एकाच माळेचे मणी..

In reply to by बाळ सप्रे

>>> मोदीच नव्हे.. इतरही सर्व पक्षाच्या नेत्यांचे bashing आणि glorification ची हद्द झाली आहे.. facebook च्या माध्यमातून कार्टून जोक्स यामध्ये फार खालच्या पातळीवर जाउन वैयक्तिक टीका होताना दिसते.. "bashing" बाबतीत सर्वात वाईट संकेतस्थळ म्हणजे "रीडीफ" आणि "मटा". रीडीफवर इतक्या घाण, अश्लील आणि असभ्य कॉमेंट्स असतात की वाचतानाच शरम वाटते. बरीच संकेतस्थळे (इंडियन एक्सप्रेस्, द हिंदू इ.) कॉमेंट्स सेन्सॉर करून किंवा तपासून मगच प्रकाशित करतात. पण आउटलुक किंवा रीडिफमध्ये कॉमेंट लगेचच प्रकाशित होते. आउटलुकवरील बर्‍याच कॉमेंट्स सभ्य असतात, पण रिडीफवरील कॉमेंट्सचा दर्जा अत्यंत खालच्या थराचा आहे. "मटा" कॉमेंट्स तपासून २ तासांनी प्रकाशित करतात. पण तिथेही अत्यंत खालच्या दर्जाची शिवराळ भाषा असते.

याच पद्धतीचा जोक वाचला होता चेपू वर. वरील सर्व कमेंट्स टाकून झाल्या सगळ्यांच्या की तोच रिपोर्टर पुन्हा मोदींकडे जातो. मोदी म्हणतात - "मजा आवे छे| नेक्स्ट क्वश्चन.. " :D

अवांतरः परवाच फर्ग्युसन कॉलेजमधील सभेत मोदी म्हणाले होते की 'मला एक दिवस पुण्यात फिरवुन लोकमान्य टिळक, शिवाजी महाराज यांची माहिती देणारा गाईड मिळेल का? मला वाटत नाही मिळेल असं' हे ऐकुन मला वल्लीशेटची गाईड म्हणुन आठवण झाली.

फेस्बूक वरचे विनोदी स्टेटस मिपा वर धागा म्हणून प्रकाशित करण्याचा नवीन ट्रेंड सुरू करण्याचे श्रेय श्री गुरुजीना मिळेल काय?

मस्तच .... डोळ्यांसमोर चित्रच उभे रहिले... ७० % लोकांच मत आहे हो .... त्याना पण आंबाच आवडतो, आणि ३० % लोकांना पेरु आवडतो.... :-)

ह. ह. पु. वा. धम्माल लिहिलंय !

In reply to by अत्रुप्त आत्मा

अ आ चला आणखी एक स्मायली येउद्या बरं! डॉग्विजय ला काही जणं पिग्विजय पण म्हणतात.

In reply to by कापूसकोन्ड्या

http://mocomi.com/wp-content/uploads/2012/02/Mocomi_entertainment_3Dimage_polarus_vi_01.jpg http://misalpav.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/mosking.gif http://misalpav.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/mosking.gif http://misalpav.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/mosking.gif http://misalpav.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/mosking.gif http://misalpav.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/mosking.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

छायाचित्र त्रिमिति आहे का?

जितेंद्र आव्हाडांचे नाव वाचून मस्तक आदराने झुकले.
महाराष्ट्रातील एक थोर तत्त्ववेत्ते म्हणून त्यांचे नाव घ्यावे लागेल.

In reply to by आशु जोग

जितेंद्र आव्हाडांचे नाव वाचून मस्तक आदराने झुकले. महाराष्ट्रातील एक थोर तत्त्ववेत्ते म्हणून त्यांचे नाव घ्यावे लागेल.
अगदी मान्य. दिव्यत्वाची जेथ प्रचिति, तेथे कर माझे जुळती | उदा:- आदर्श मधल्या काही फ्लॅटची मालकी, ठाण्यातले अनधिकृत बांधकाम न पाडण्याचे आंदोलन आणि अण्णांच्या आंदोलनाच्या वेळेस त्याना न. गो. ची उपमा देउन त्यांचा पुतळा जाळून केलेले ''अहिंसक'' आंदोलन हे त्यांपैकी काही नमुने. आनंद परांजपे ना "इकडे" आणण्याचे त्यांचे कार्य तर थोरच आहे. असो.

In reply to by आशु जोग

>>> जितेंद्र आव्हाडांचे नाव वाचून मस्तक आदराने झुकले. महाराष्ट्रातील एक थोर तत्त्ववेत्ते म्हणून त्यांचे नाव घ्यावे लागेल. +१ थोरल्या साहेबांनी ज्या उदात्त हेतूने जनकल्याणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला, त्यात आव्हाडांसारखे गांधीजीभक्त अगदी चपखल बसतात. आदर्शमधली सदनिका, बेकायदा बांधकामे पाडण्याविरूद्ध ठाणे बंद, इशरत जहाच्या परिवाराला मदत या व अशा अनेक प्रसंगी त्यांचे कर्तृत्व सोन्यासारखे उजळून निघाले आहे. महाराष्ट्राचे भाग्य थोर की या भूमीत अशी नररत्ने अवतार धारण करतात!

आव्हाडांचे नाव अतीराष्ट्रवादी म्हणौन दुमदुमते आहे. त्याने बलवा जमीन प्रकरणी जी मुक्ताफळे उधळली होती ती ऐकणेबल होती ( ऐकण्यासाठी बल लागते म्हणून)

टीवीवर बोलताना ते जो आव आणून बोलतात त्याचे कौतुक वाटते.
निखिल वागळेच्या कार्यक्रमात ते अर्धवेळ नोकरी करतात असा अंदाज आहे.

In reply to by कापूसकोन्ड्या

आणि दुसर्‍या एका नोबेल लॉरिएटचे पी.एच.डी गाईड काय म्हणतात हे पण बघा: दुवा . तेव्हा एका अर्थतज्ञाचे काही मत असेल तर तेच प्रमाण सगळ्यांना वाटलेच पाहिजे असे अजिबात नाही.

In reply to by क्लिंटन

माझ्या समजुतीप्रमाणे अमर्त्य सेन हे डाव्या विचारसरणीचे अर्थशास्त्री आहेत. १९९० च्या दशकातील नरसिंहराव सरकारने केलेल्या व नंतर वाजपेयींनी पुढे सुरू ठेवलेल्या आर्थिक सुधारणांना त्यांचा पाठिंबा नव्हता. त्यांना अर्थशास्त्रात नोबेल मिळाले असले तरी त्यांची आर्थिक थिअरी भारत किंवा इतर देशांनी स्वीकारल्याचे दिसत नाही. गुजरातेत अल्पसंख्याकांना व मागासवर्गियांना सुरक्षित वाटत नाही हे त्यांचे विधान राजकीय व अत्यंत ढोबळ वाटते. आपल्या विधानाच्या समर्थनार्थ त्यांनी आकडेवारी व पुरावे द्यावयास हवे होते. ज्याप्रमाणे निव्वळ पर्सेप्शनवर अर्थशास्त्राची थिअरी मांडता येत नाही, त्याचप्रमाणे निव्वळ पर्सेप्शनवर असे आरोप करता येत नाही. त्यांची मते ही निव्वळ राजकीय आहेत असे दिसून येते.

In reply to by श्रीगुरुजी

माझ्या समजुतीप्रमाणे अमर्त्य सेन हे डाव्या विचारसरणीचे अर्थशास्त्री आहेत.
हो. अर्थतज्ञांमध्ये डावे विरूध्द उजवे हा कधी न संपणारा वाद आहे.मी स्वतः उजवा असल्यामुळे मला अमर्त्य सेनांपेक्षा जगदीश भगवती अधिक भावतात.तर इतर कोणाला अमर्त्य सेन भावतात.पण अमर्त्य सेनांनी अमुक एक विधान केले म्हणून तेच प्रमाण असे म्हणणार्‍यांची मात्र गंमत वाटते. अवांतरः जे नावापुरते भारतीय नागरिकत्व ठेवतात, परदेशात राहून ज्यांना भारतात परत यायची अजिबात इच्छा नसते आणि ते परत आले तरी डॉलरच्या तुलनेत रूपया सिनिअर सिटिझन झाल्यामुळे इथल्या सामान्य लोकांप्रमाणे अशांना झगडावे लागणार नाही अशांनी भारताचा पंतप्रधान म्हणून कोण योग्य/अयोग्य आहे अशी विधाने करून उंटावरून शेळ्या हाकल्या की तो प्रकार भयंकर डोक्यात जातो.सध्या भारतातील जनतेला जर काही हवे असेल तर महागाई आणि भ्रष्टाचारापासून सुटका आणि काहीतरी करणारे सरकार.या उंटावरून शेळ्या हाकणार्‍यांच्या सेक्युलॅरिझमला रस्त्यावरचे कुत्रंही तंगड वर करायचे नाही काही दिवसांनी.

In reply to by क्लिंटन

+ १

In reply to by कापूसकोन्ड्या

हे गृहस्थ देशाची फाळणी झाल्यावर ४७ साली पूर्व पाकिस्तान मधून पळून आले. खूप श्रीमंत घराण्यातील आणि सेक्युलर असूनसुद्धा सध्या बरेच हिंदू रहात आहेत तसे बंगला देश मध्ये न रहाता भारतात निघून आले. ते सध्या कायम इंग्लंड अथवा अमेरिकेत राहतात आणि येथे आले म्हणजे त्यांची सेक्युलर मते मांडतात. त्यांच्या पहिल्या भारतीय बायकोशी घटस्फोट झाल्यावर त्यांनी एका विदेशी महिलेशी विवाह केला आणि तिच्या निधना नंतर दुसर्या विदेशी महिलेशी विवाह केला. त्यांची मुले अमेरिकेत स्थायिक आहेत. तेंव्हा त्यांनी जरी भारतीय नागरिकत्व सोडले नसले तरी हे गृहस्थ पूर्णपणे anglicized आहेत असे म्हणावयास हरकत नसावी. भारतात राहणार्या लोकाना ज्या परिस्थितून जावे लागते त्याचा त्यांना अनुभव नाही. अर्थशास्त्रातले विद्वान असतील तरी त्यांच्या राजकारणातील मतांना स्वदेशी लोकांनी महत्व दिले पाहिजे असे नाही.

In reply to by कापूसकोन्ड्या

आता यांच्या मनातली खरी इच्छा बाहेर पडली. मोदींचं गुजरात विकासाचं मॉडेल, गुजरातमध्ये अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत वगैरे कारणे उगाचच पुढे केली होती. अंतस्थ हेतू वेगळाच होता. http://maharashtratimes.indiatimes.com/nation/rahul-gandhi-might-be-an-…

Amartya Sen: As an Indian citizen, I don't want Modi as my PM

अमर्त्य सेन यांच्याकडे भारताचे नागरिकत्व आहे का? माझ्या समजूतीप्रमाणे ते इंग्लंडचे नागरिक आहेत. (चूभूद्याघ्या). ते काहीही असले तरी मोदींवर टीका करणार्‍यांमध्ये आता ते सुद्धा सामील झालेले दिसतात. "समाजातील मागास आणि अल्पसंख्य घटकाला मोदींच्या विकासामध्ये सुरक्षित वाटत नाही, असे ते म्हणतात." त्यांच्या या वाक्यावरून ते अर्थशास्त्री या नात्याने बोलत आहेत की काँग्रेसचा प्रवक्ता या नात्याने बोलत आहेत हे कळत नाही. हे वाक्य त्यांचे नाव न घेता वाचले तर मनीष तिवारी, राहुल गांधी अशांपैकी कोणीतरी हे वाक्य म्हटले असावे अशी समजूत होईल. "नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या मॉडेलमधील कोणते मॉडेल देशासाठी योग्य यावर सध्या अर्थशास्त्रज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे डॉ. सेन यांनी मोदींच्या मॉडेलवर टीका करून नितीश कुमार यांची केलेली स्तुती फक्त अर्थशास्त्राच्या दृष्टीने नव्हे तर राजकीय दृष्टीनेही महत्त्वाचे मानली जात आहे." या वाक्यांवरून तर त्यांनी आर्थिक दृष्टीकोनातून नव्हे तर एक राजकीय विधान केले असावे असे वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

अमर्त्य सेन हे भारतीय नागरीकच आहेत. ते केंब्रिज, अमेरीका (बॉस्टन) येथे रहातात आणि हार्वर्डमध्ये प्राध्यापकी करतात... त्यांच्या किती बायका आहेत वगैरे हा त्यांचा खाजगी मामला आहे. पण त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही असे वाटते. त्यांचे ९३ आणि ९४ साली रामजन्मभूमीवरून कडाडून टिका केलेली भाषणे ऐकण्याचे भाग्य मला लाभले होते. वास्तवीक अशा व्यक्तीने तात्विक दृष्ट्या रामजन्मभूमी आंदोलनकर्त्याबरोबर उभे रहाणे देखील अयोग्य आहे. पण काय झाले, त्याच लोकांच्या राज्यात त्याच लोकांच्या शिफारसीवरून त्यांना भारतरत्न मिळाले... Bharat Ratna तेंव्हा उद्या खरेच जर मोदी पंतप्रधान झाले तर एक भारतीय नागरीक म्हणून अमर्त्यसेन यांची सद्य भुमिका अमर्त्यच राहील असे काही वाटत नाही. असो.

In reply to by कापूसकोन्ड्या

कसला पुरावा ते समजले नाही. पण जेंव्हा मोदींना व्हिसा नाकारण्यात आला होता तेंव्हाची पंतप्रधानांची भुमिका योग्य होती असे वाटते... PM upset over Modi's visa denial बातमीतील काही भागः Sharing the concern of members from all sides in the House, the Prime Minister said, "When I came to know of the denial of visa to Modi yesterday I immediately instructed our external affairs minister to call the US Ambassador and explain to them that we are greatly concerned and we greatly regret the decision that has been taken by the US government." He said the government had taken note of the developments arising from the US decision and was also "greatly concerned" at the American action to revoke other categories of US visas already issued to the Gujarat chief minister.

ओबामा विसा विकायच्या बारीवर (खिडकीवर) बसले असून मोदी त्या लायनित धक्के खात उभे आहेत असे चित्र डोल्यासमोर उभे रहिले.

.. मोदी हे महाराष्ट्र द्वेषी आहेत, त्यांनी महाराष्ट्राच्या शौर्याला कमी लेखण्याची चुकभूल करु नये, मराठी जनतेमुळेच गुजराथी लोकांची प्रगती झाली; अशा आशयाचे पोस्टर आज (रविवार) सकाळ पासून ठाणे शहरात अनेक ठिकाणी झळकत आहेत. संभाजी ब्रिगेडने हे पोस्टर लावले आहेत. अलिकडेच मोदींनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये केलेल्या भाषणात महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या होत्या. या भाषणामुळे नाराज झालेल्या संभाजी ब्रिगेडने पोस्टर लावून मोदींना उघडपणे विरोध सुरू केला आहे. संभाजी ब्रिगेडने लावलेल्या पोस्टरवरील मजकूर जसाच्या तसा - उत्तराखंडमध्ये १५ हजार गुजराथी बांधवांना आपण वाचवले. पण, भारतीयांना मात्र आपण विसरलात. हे कबूल की, गुजराथी धंद्यामध्ये खूप मोठे आहेत. पण मराठी माणसाने परीश्रमातून घाम गाळून महाराष्ट्र मोठा केला. हा देश तुम्हांला धंदा करण्यासाठी सुरक्षित ठेवला आणि म्हणूनच आज धंद्यामध्ये तुम्ही ८० टक्के आहात. धंदा सुरक्षित ठेवण्यासाठी देश सुरक्षित असायला हवा. देश सुरक्षित ठेवण्यासाठी सीमेवर लढणार्‍यांमध्ये आम्ही 'मराठी' ८० टक्के आहोत. 'मराठा' आणि 'महार' या नावाने दोन मराठी माणसांच्या रेजिमेंट भारतीय सैन्य दलात आहेत. हा देश सुरक्षित आहे. म्हणूनच तुम्ही धंदा करु शकता याची आठवण असावी. देश सुरक्षित तर धंदा सुरक्षित!

In reply to by अविनाशकुलकर्णी

संभाजी ब्रिगेड मोदींबद्दल काय म्हणते हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण सैन्याबद्दल गैरसमज पसरवणे मुळीच चांगले नाही कारण त्यांचा या दोन रेजिमेंट वर दावा लावणे हे चुकीचे आहे. या न्यायाने भारताचे संरक्षण नेपाल किंवा पंजाब करीत आहे असे म्हणायला लागेल कारण ७ गुरखा रेजीमेंटस आणि त्यात ३९ बटालियन आहेत. एकट्या सिख रेजिमेंट च्या १९ बटालियन आहेत( सिख LI किंवा पंजाब रेजिमेंट अजून वेगळ्या आहेत) मराठा आणि महार या दोन रेजिमेंटस आणि त्यातील पाच पाच म्हणजे दहा बटालियन या संख्यात्मक दृष्ट्या एक चतुर्थांश आहेत. सर्वच रेजिमेंटचा इतिहास गौरवशाली आहे आणि त्यात तुलना करणे चुकीचे आहे.पण बहादुरी आणि मर्दुमकी कोणा एका गटाची किंवा समूहाची मक्तेदारी नाही. परन्तु संभाजी ब्रीगेड लष्कराला राजकारणात ओढत आहे हे अत्यंत अश्लाघ्य आहे असे माझे स्पष्ट ( वैयक्तिक)मत आहे.

In reply to by सुबोध खरे

७ गुरखा रेजीमेंटस आणि त्यात ३९ बटालियन आहेत. एकट्या सिख रेजिमेंट च्या १९ बटालियन आहेत
लक्षात घ्या.. संभाजी ब्रिगेड आहे ती.. गुढघ्यातच..

उत्तराखंडमध्ये १५ हजार गुजराथी बांधवांना आपण वाचवले.---- ही बातमी times ऑफ इंडिया ने प्रथम दिली. भाजप आणि मोदींच्या ऑफिस मधून मोदींनी असा दावा केला नाही असा खुलासा करण्यात आल्यावर times ने त्यांच्या पुढील अंकात दिलगिरी जाहीर केली आणि ही बातमी पाठविणार्या त्यांच्या उत्तरा खंड मधील वार्ताहराचे नाव ही छापले. या वार्ताहराने उत्तरा खंड मधील एका भाजप च्या कार्यकर्त्याचे नाव त्याचा source म्हणून सांगितले. आता त्या कार्यकर्त्याने अब्रू नुकसानीचा दावा केला आहेत. मोदी मुरलेले राजकारणी आहेत. तेंव्हा त्यांनी महाराष्ट्रातील कॉंग्रेस शासनावर टीका केली कि महाराष्ट्रावर टीका केली हे त्यांच्या भाषणाची फीत बघून मगच ठरवता येईल.

In reply to by रमेश आठवले

नरेंद्र मोदी यांनी पुण्यात दोन भाषणे केली. त्या पैकी बी. एम. मेडिकल कोलेजच्या मैदानावर केलेले ४५ मिनिटाचे भाषण येथे ऐका. त्यात कुठेही महाराष्ट्रा वर टीका टिप्पणी नाही . कोन्ग्रेस वर आणि महराष्ट्राच्या कोन्ग्रेस शासनावर टीका केली आहे पण विरोधी पक्षाचे प्रमुख नेते म्हणून हे त्यांचे कामच आहे. तेंव्हा संभाजी ब्रिगेडच्या पोस्टर मध्ये लिहिलेल्या मजकुरात तथ्य नाही आणि ते पोस्टर कोन्ग्रेस प्रेरित आहे असे मानण्यास जागा आहे. http://www.youtube.com/watch?v=sDpdHIbC-ak याच्या आधीचे भाषण फर्गुसन कॉलेजे मध्ये मध्ये झाले. ता भाषणात ते फक्त शिक्षण या विषयावर बोलले. त्याचा दुवा खाली देत आहे. http://www.youtube.com/watch?v=Zb3433C9urA

नरेंद्र मोदींना व्हिसा देऊ नका - भारताच्या ६५ खासदारांची ओबामांना विनंती (23-07-2013 : 17:34:36) ऑनलाइन टीम नवी दिल्ली, दि. २३ - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना व्हिसा देऊ नये अशी विनंती भारताच्या ६५ खासदारांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना केली आहे. भारतातल्या १२ राजकीय पक्षांच्या खासदारांचा यात समावेश असून यामध्ये राज्यसभेचे २५ तर लोकसभेचे ४० कासदार आहेत. यामध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या सिताराम येचुरी व एम. पी. अचुतानंद यांचा समावेश आहे. नरेंद्र मोदींना व्हिसा न देण्याचे सध्याचे जे धोरण आहे ते सुरू ठेवावे अशी आम्ही तुम्हाला आदरपूर्वक विनंती करतो अशा आशयाचा मजकूर या सगळ्यांच्या पत्रात आहे. विशेष म्हणजे ही पत्रे सहा महिन्यांपूर्वीच ओबामा यांना पाठवण्यात आली आहेत, परंतु राजनाथ सिंह यांनी अमेरिकेने आपल्या धोरणाचा फेरविचार करावा असे सुचवल्यानंतर अशी पत्रे ६५ खासदारांनी पाठवल्याचे समोर आले आहे. इंडियन अमेरिकन मुस्लीम काउन्सिलने या पत्रांच्या प्रती उपलब्ध करून दिल्या आहेत. राज्यसभेचे अपक्ष खासदार मोहम्मद आदीब यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी सहा महिन्यांपूर्वी पाठवलेली ही पत्रे ओबामांना पुन्हा पाठवली आहेत. राजनाथ सिंह यांनी रविवारी अमेरिका भेटीमध्ये मोदींना व्हिसा देण्यात यावा अशी मागणी अमेरिकी सरकारकडे केली होती. दरम्यान, येचुरी यांनी अशा स्वरुपाच्या कोणत्याही पत्रावर स्वाक्षरी केलेली नाही असा खुलासा केला आहे. येचूरी म्हणाले,'मी पत्रावर स्वाक्षरी केली नसून हा कट पेस्टचा प्रकार दिसतोय. अमेरिका प्रशासनाला पत्र लिहीणारा मी अंतिम व्यक्ती असीन.देशाच्या अंतर्गत प्रश्नावर परकीयांनी हस्तक्षेप करावे ही भुमिका मला अमान्य असल्याचे येचूरी यांनी सांगितले आहे.

In reply to by अविनाशकुलकर्णी

मोदी योग्य का अयोग्य, धर्मांध की धर्माभिमानी....आणि कायकाय..हे असले प्रश्न राहुद्या क्षणभर बाजूला. एक नाही, दोन नाही, तब्बल पासष्ट खासदारांनी हे असलं दळभद्रीपणाचं कृत्य करावं? थ्थू: तिच्यायला ह्यांच्या जिनगानीवर! घरच्या भानगडी घरात सोडवाव्यात...चव्हाट्यावर बोंबलत जाऊ तर नयेच, आणि ज्यांना जिथंतिथं लुडबुड करायचा भोचकपणा असतो, निदान त्यांच्या हातात तरी कोलित देऊ नये इतकी साधी अक्कल नाही ह्या 'लोकप्रतिनिधीना'? हूण मुघलांपासून ते इंग्रजांपर्यंत ही अशीच आमंत्रणं जात राहिली होती की माजघरातली भांडणं सोडवायला! पुढे काय झालं? त्या घरबुडव्या स्वार्थी बेअकल्यांचे वंशज म्हणवून घेण्याच्या लायकीचे आहेत हे खासदार. अरे, त्या अमेरिकेचा व्हिसा नाय मिळाला...काय बिघडू शकतं मोदी नावाच्या माणसाचं? निवडणूक लढवायला ते काय अमेरिकेत जाऊन बसणार हैत काय? जिंकण्याचे चान्स असतील तर मोदी देशात राहूनच ह्यांना आसमान दाखवणार नायत काय? फक्त अपशकुन करायचाय म्हणून स्वतःचं नाक कापण्यासारखी गत झाली ही! राजकारणात माणसं निवडताना फक्त पैसा आणि गेमा करता येण्याची कुवत एव्हढंच पाहिलं जातं हे अगदी मान्य आहे. पण निदान एक किमान पातळीवरची अक्कल असण्याचीही अपेक्षा करणं आता चूक आहे असं समजायचं काय जन्तेनं? ह्या पासष्टच्या पासष्ट खासदारांची एकडाव आय.क्यु. टेष्ट घ्यायला पायजे राव. ५५ ते ६९ च्या रेंजपलिकडं एकतरी शानं जाऊ शकतंय का बघू. - (हतबुध्द अन उद्विग्न) धम्या.

In reply to by धमाल मुलगा

कीव वाटली त्यांच्या बुद्धीची, संताप झाला तो वेगळाच! त्या ६५ जणांची नाव जाहीर करुन देशद्रोहच भरला पाहिजे तिच्यायला. पुन्हा अशा कागाळ्या करणार नाही कोणी देशाच्या बाहेर!

In reply to by धमाल मुलगा

आंधळा द्वेष.. आणखी काय? उद्या मोदी पंतप्रधान झालेच, तर अमेरीका झकत विसा देईल त्यांना.. बाकी 'परंपरेचे पाईक' आहेत हे खासदार म्हणजे. बादवे, धम्याभौ हामेरीकेला मोदींपेक्षा जास्त कामाचा वाटतो.. ;-)

In reply to by चिगो

अहो पेश्शालिटी स्किल्ड लेबर (कमी पैशातलं) कुनाला नकोय? ;) आणि, साक्षात हामेरिकन लोकान्ला सरकारी प्रोजेक्ट म्यानेजमेंट आणि इम्पिमेंटेशनचं ट्रेनिंग द्यायला येणार्‍या भारतातल्या सनदी अधिकार्‍याबद्दल काय म्हणणं आहे? ;)

In reply to by धमाल मुलगा

ट्रेनिंग घ्यायला आलो होतो, साहेब.. द्यायला नाही. चला, ह्याच बहाण्याने उसाचा देश त्याच्या वेगवेगळ्या रंगढंगांसह पहायला मिळाला.. ;-)

ही मोदींची अजून एक अभिनव, उपयुक्त व महत्वाकांक्षी योजना. या योजनेचे नांव "कल्पसार". http://www.kalpasar.gujarat.gov.in/mainpage.htm येथे विस्त्रुत माहीती मिळेल. गुजरातमधल्या ५ मोठ्या नद्या अरबी समुद्राला मिळण्याआधी सुमारे १०-१२ किमी अंतरावर अडवून व तिथे नद्यांवर बांध घालून मोठ्या प्रमाणात गोडे पाणी अडवायचे ही योजना आहे. समुद्राला मिळण्याआधी नदीमुख खूपच विस्तारते व समुद्राला मिळण्याआधीच बांध घालून पाणी अडविल्यावामुळे पाणी समुद्रात जाऊन वाया जाणार नाही व अडविलेले पाणी शेती, उद्योगधंदे इ. साठी वापरता येईल. ही योजना प्रत्यक्षात आली तर भारतातील अशा प्रकारचा तो पहिला प्रकल्प ठरेल. यापूर्वी २ वर्षांपूर्वी मोदींनी गुजरातमध्ये नर्मदा धरणाच्या कालव्यांवर आवरण घालून त्यावर सौरपॅनेल्स बसवून रोज ९०,००० किलोवॅट (चूभूदेघे)इतकी वीजनिर्मिती करून दाखविली होती. अशा अभिनव योजना प्रत्यक्षात आणणारे ते देशातील कदाचित पहिले नेते असतील. दुर्दैवाने माध्यमांनी अशा योजनांना पुरेशी प्रसिद्धी दिलेली नाही.

In reply to by श्रीगुरुजी

कदाचीत मुळ विषयास अवांतर ठरेल पण नद्या जोडणे अथवा तत्सम प्रकल्प करत असताना त्याचे दिर्घकालीन परीणाम पण लक्षात घेणे महत्वाचे असते. मोदींचा म्हणून गुजरात मधील प्रकल्प म्हणूनच हे लिहीत नसून ते एक निमित्त आहे. एकंदरीतच अथवा कुठल्याही मोठ्या प्रकल्पाच्या संदर्भात, "कधीकधी" पर्यावरणवाद्यांच्या अतिरेकी आग्रहामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते अथवा कमी लेखले जाते, तर "कधीकधी" त्यात व्यापारी संबंध गुंतलेले असल्याने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते अथवा वाढवून चढवून सांगितले जाते. पण तसे होऊ नये इतके नक्की वाटते... संतुलीत अभ्यास करणे हे कदाचीत तात्काळ वर्तमानाची गरज कदाचीत नसेलही पण भविष्यात त्यामुळे होणारे परीणाम, विशेष करून भारतासारख्या लोकसंख्येत अधिकच होऊ शकतात असे वाटते. त्यातून अधिक योग्य इंजिनिअरींगचे उत्तर मिळू शकेल असे वाटते. हे आत्ता एकदम वाटायचे कारण म्हणजे सकाळीसकाळीच मिसिसिपी नदी बद्दल ऐकत होतो. लुइजिआना आणि एकूणच दक्षिणेकडील प्रांतात तीचे पात्र शेतीची जागा वाढवण्यासाठी कधीकाळी बदलले गेले आणि त्याचे परीणाम नंतरच्या काळात झाले. हरीकेन कट्रीनाच्या वेळेस ते अधिकच झाले. आता पर्यावरण बदलामुळे समुद्रपातळी वाढत असून लुइजिआना प्रांताची किनारपट्टी ही समुद्रपातळीच्या खाली जात असल्याने त्याला जेथे मिसिसिपी नदी मिळते तेथे (त्रिभूज प्रदेशात) त्याचे अधिकच परीणाम दिसू लागले आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

१. खेलोत्सव ... म्हणे प्रत्येक सरकारी नोकराने एक तास कोणता तरी खेळ खेळलाच पाहिजे.... सर्कारी दवाखान्यात बाई डिलिवरीला गेली तर डॉक्टर सांगणार ... थांब, एक तास खेळून येतो. २. वाचनोत्सव.... फतवा >> प्रत्येक सर्कारी नोकराने एक तास जवळच्या वाचनालयात जाऊन एक तास काहीतरी वाचावे, या योजना सध्या सुरु आहेत का? आचार्य अत्र्यांचे साष्टांग नमस्कार नाटक आठवले.

In reply to by श्रीगुरुजी

आण्णा, धरण बांधायचे असेल तर नदी साधारणपणे उगमानंतर काही काळ डोंगराळ भागात असते, तिथे बांधायचे असते.. तिथे डोंगर तीन बाजुला असतात. एका बाजूला भिंत बांधायची असते. नदी समुद्राला मिळायच्या वेळेला सपाट पठारी भाग असतो... सगळ्या बाजूने सपाट मैदानच असेल, तर मोदी नेमका कसा काय बांध घालणार आहे बुवा? का त्या कुठल्या धौम्य का कोणत्या ऋशीपुत्रासारखा स्वतः आडवे पडणार आहेत नदीसमोर?

In reply to by उद्दाम

सपाट भागात वाहणार्या नदीवर बंधारे बांधतात. प्रसिद्ध उदाहरणे म्हणजे सिंधू नदीवरील सक्कर बराज आणि गंगा नदीवरील फरक्का बराज. कल्पसर योजनेमध्ये मध्ये असा बंधारा ख्म्बात च्या आखातात बांधण्याचे प्रयोजन आहे.त्या मुळे बंधार्याच्या मागे नर्मदा व इतर नद्यांचे गोडे पाणी आधीच्या खार्या पाण्याच्या ऐवजी साठवले जाइल आणि गोड्या पाण्याचे मोठे सर( सरोवर) निर्माण होईल. बंधार्यावरून वाहने जाऊ येऊ शकतील आणि सौराष्ट्राच्या किनार्यावरून दक्षिण गुजरात मध्ये पोचण्यासाठी सद्ध्या जो द्राविडी प्राणायाम करावा लागतो तो टळेल .इंधन व वेळ यांची बचत होईल. शिवाय सौर उर्जा,पवन उर्जा आणि tidal उर्जा निर्माण करता येतील .अशा बहुउद्देशीय योजना Netherland व दक्षिण कोरिया या देशात सध्या राबवल्या जात आहेत.

यापूर्वी २ वर्षांपूर्वी मोदींनी गुजरातमध्ये नर्मदा धरणाच्या कालव्यांवर आवरण घालून त्यावर सौरपॅनेल्स बसवून रोज ९०,००० किलोवॅट (चूभूदेघे)इतकी वीजनिर्मिती करून दाखविली होती. आता काय अवस्था आहे या प्रोजेक्टची समजू शकेल का?

In reply to by उद्दाम

गुजरात मध्ये या अधिकृत अहवालाप्रमाणे ८७२ मेगॅवॅट (८७२००० किलोवॅट) इतक्या क्षमतेची सौरउर्जा करण्याचे प्रकल्प आहेत. त्यातील अस्तित्वात आलेले प्रकल्प हे ८५२.३१ मेगॅवॅट इतके आहेत.

In reply to by उद्दाम

https://www.facebook.com/photo.php?fbid=351543128259373&set=a.186519208… गुजरात मध्ये आपण लिहिले आहे ते काम प्रयोगात्मक स्तरावर करण्यात आले होते . त्याचा फोटो वरील दुव्यात पहाता येईल. या पद्धतीने वीज निर्मितीसाठी कालवे झाकण्याचा दुसरा एक फायदा म्हणजे कालव्यातील पाण्याचे बाष्पिभवन कमी होते. गुजरातच्या काही भागात तलावात किंवा इतर ठिकाणी उघड्यावर साठवलेल्या पाण्यातून वर्षाला साडेतीन मीटर्स पर्यंत बाष्पिभवन होऊ शकते असे हवामान खात्याच्या मोजणीत मिळालेल्या आकड्यांवरून सांगता येईल . पाण्यावर कवर असल्यास हे प्रमाण खूप कमी होते

मोदी फॅक्टर भाजपसाठी किती महत्त्वाचा आहे ते खालील संकेतस्थळावर वाचा. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदाता सर्वेक्षणाचे हे निकाल आहेत. http://www.ibtl.in/blog/2119/a-storm-narendra-modi-is-coming-%E2%80%93-… मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे आणले तर भाजपला तब्बल ४४ जागांचा फायदा होण्याची शक्यता आहे. मोदी भाजपला १८४ जागांपर्यंत नेऊ शकतात. अर्थात मोदींचा चेहरा पुढे आला तर काँग्रेस मुस्लिमांच्या मनात मोदींविषयी भीति निर्माण करून स्वतःला ८ जागांचा फायदा मिळवू शकते.

मोदींवरचा माझ्या मनीचा एक जोक. एक दाढीवाला - मोदी जर पी एम बनले तर देशाची राष्ट्रभाषा गुजराथी होइल. सूज्ञ माणूस - अरबी भाषेपेक्षा गुजराथी खूप चांगली.

In reply to by आनंदी गोपाळ

का राक्शस आहे पोप्कोर्न खाणे सम्पतच नाही,यु पी ए सरकारचे प्रतिक वाटत आहे.

काल एक विरोधाभास लक्षात आला. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येनंतर निखिल वागळे प्रतिक्रिया देताना सांगत होते की, "जादूटोणा विधेयक गेल्या अनेक वर्षांपासून विधिमंडळात प्रलंबित आहे. या विधेयकाबाबतीत सर्व राजकीय पक्षांनी बुरखे पांघरले होते." काही आठवड्यांपूर्वी नरेंद्र मोदींनी पुण्यातल्या भाषणात "काँग्रेसने सेक्युलॅरिझमचा बुरखा पांघरला आहे" असे म्हटले होते. त्यावेळी संध्याकाळी झालेल्या चर्चेत नरेंद्र मोदी कसे जातीयवादी आहेत, त्यांनी मुस्लिमांशी संबंधित बुरखा हाच शब्द का वापरला, चेहर्‍यावर चादर पांघरली आहे किंवा घुंघट घेतला आहे किंवा आवरणाखाली चेहरा झाकला आहे असे का म्हणाले नाहीत, मुस्लिमांशी संबंधित असलेला "बुरखा" हा शब्द मुद्दाम वापरून त्यांनी आपला मुस्लिमविरोध प्रकट केला आहे इ. बेछूट आरोप करून मोदींना झोडपण्यात मग्न होते. आणि त्याच वागळ्यांनी काल "बुरखा" हाच शब्द वापरला!