दु:खचा महाकवी ग्रेस
मराठी भाषेत काव्य प्रकारात विपुल साहित्या निर्मिती झाली आहे. गेली २०-२५ वर्षात जे कवी झाले किंवा आधीपासून होते त्यांना आपण ढोबळ मानाने २ प्रकारात वीभागु शकतो. एक मुख्य प्रवाहातले आणि दुसरे मुख्य प्रवाहातून वेगळे असलेले. या दुसर्या प्रकारच्या कवींना फार प्रसिद्धी लाभली नाही पण जे त्यांचे चाहते आहेत ते अत्यंत निस्सीम आणि निष्ठावान चाहते आणि रसिक आहेत. या प्रकारात अशा निस्सीम चाहत्यांच्या हृदयावर ज्यांनी खर्या अर्थाने अधिराज्य केले त्यात अग्रक्रमांकावर निसंशयरीत्या माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस यांचे नाव आहे.
ग्रेस यांच्या कवितेचे वैशिष्ठ्य हे की एकदा ती वाचून झाली की तिच्या पासून सुटका मिळत नाही. मन त्याच गूढ अशा अर्थाचे मनन करत रहाते. जेवढा वेळ विचार कराल तेवढेच वेग वेगळे अर्थ त्यातून निघतात.
"स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझा स्मरणाचे || "
या ओळींचे जेवढा विचार कराल तितके विविध पैलू आणि अर्थ दर वेळी लागतात. यात सतत एक हूर हूर असल्याची जाणीव मनाला होत असते. त्यांची प्रत्येक कविता मनाला एक वेगळीच चुटपूट लावून जाते. ग्रेस यांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे तिच्या मध्ये कधीही कृत्रिम यमक जुळवणे किंवा कवितेला गती देण्याचा प्रयत्न दिसत नाही. जे सुचलं आणि जसं सुचलं तसं कागदावर उतरवलं असं वाटतं. त्यामुळे ही कविता जास्त नैसर्गिक बनते आणि कवीच्या भावना त्यात नेमक्या उतरतात. त्यांनी कधीही सर्वांना समजले पाहिजे, याचा अर्थ लागेल का याचा विचार केलेला असेल असे वाटत नाही.
बर्याचवेळा अशी टीका केली जाते की ग्रेसांच्या कविता समाजत नाहीत, शब्द रचना किचकट आहे. या सर्व टीकांना ग्रेस यांनी दिलेले उत्तर फारच बोलके आहे. ग्रेस म्हणतात "मी माझ्या कवितेचा प्रियकर किंवा पाठीराखा नाही". यावरून असे लक्षात येते की त्यांनी कधीही कविता निर्माण करायचा प्रयत्न नाही केला. जे आतून आले तेच लिहिले.
ग्रेस यांचे अजून एक केले गेलेले वर्णन म्हणजे दु:खचा महाकवी. पण ग्रेस यांच्या कवितेतून दिसणारे दु:ख हे इतरांपेक्षा वेगळे आहे.
"सुज्ञ देखणा चेहरा माझा, बिगुल मुखातून वाजे
पराभवाच्या पर्वांमध्ये, जसे उजळती राजे || "
या ओळींमधून लक्षात येते की ग्रेस यांच्या कवितानमध्ये दिसणारे दु:ख हे वेगळे आहे. त्यात नवी उभारी घेण्याची धमक आहे. माझा मते ग्रेस यांची कविता समजावी लागत नाही. त्यांच्या कविता वाचायला सुरुवात केली की एका वेगळ्याच trance मध्ये आपण जातो आणि मग जो अनुभव येतो त्याचे खरच वर्णन करता येत नाही. सर्वच कविता सगळ्यांनाच समजतात असे नाही पण एकदा त्या trance मध्ये आपण गेलो की मग कविता समजली काय किंवा नाही समजली काय, फार फरक पडत नाही कारण अर्थापेक्षा मिळणारे जे समाधान किंवा लागणारी हूरहूर आहे तीच जास्त महत्वाची असते.
आज ग्रेस हयात नाहीत. सर्वांना काव्यसुतकात ढकलून त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांची जागा भविष्यात कोणी घेईल की नाही हे सांगणे कठीण आहे पण त्यांना जे मराठी काव्य विश्वात जे आढळपद मिळाले आहे ते कायमच अढळ राहील याचाशी कोणाचेही दुमत असणे शक्य नाही.
याद्या
4097
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
आयच्या गावात !
पराशी सहमत. आयला आपल्याला तर
In reply to आयच्या गावात ! by परिकथेतील राजकुमार
"आयला आपल्याला तर शरदिनीच्या
In reply to पराशी सहमत. आयला आपल्याला तर by कपिल काळे
वाईट वाटलं प्रतिक्रिया वाचून..
In reply to पराशी सहमत. आयला आपल्याला तर by कपिल काळे
सांजसंध्या जी , तुमच म्हणण बरोबर आहे
In reply to वाईट वाटलं प्रतिक्रिया वाचून.. by सांजसंध्या
सहमत..
In reply to वाईट वाटलं प्रतिक्रिया वाचून.. by सांजसंध्या
आम्ही गेलेल्या व्यक्तीबद्दल
In reply to वाईट वाटलं प्रतिक्रिया वाचून.. by सांजसंध्या
आम्ही गेलेल्या व्यक्तीबद्दल
In reply to वाईट वाटलं प्रतिक्रिया वाचून.. by सांजसंध्या
तुमच्या भावनांबद्दल काही
In reply to आम्ही गेलेल्या व्यक्तीबद्दल by कपिल काळे
शैलेन्द्र माझा प्रतिसाद
In reply to तुमच्या भावनांबद्दल काही by शैलेन्द्र
तुमचा रोख मा़झ्यावर आहे का
In reply to शैलेन्द्र माझा प्रतिसाद by कपिल काळे
>>काल अनिल अवचट सांगत होते"
In reply to पराशी सहमत. आयला आपल्याला तर by कपिल काळे
देवा बॅटमॅना
In reply to >>काल अनिल अवचट सांगत होते" by बॅटमॅन
परासाहेब, एकवचन काय आणि
In reply to देवा बॅटमॅना by परिकथेतील राजकुमार
स्वानंद वागळे साहेब, लेख उत्तम आहे .
धन्यवाद..........
In reply to स्वानंद वागळे साहेब, लेख उत्तम आहे . by निश
--^--^--^--
निवांत वाचतो .. सुरवातीवरुन
शब्दाशब्दाशी सहमत! _/\_
समयोचित
धन्यवाद..........
In reply to समयोचित by पैसा
खुप छान लिहिले आहे
निराशा
+1 सहमत
In reply to निराशा by प्रदीप
@ते सर्व ज्यांनी प्रतिक्रिया दिल्यात
तुमचा रोख मा़झ्यावर आहे का