कोलेज संपल्यापासून २६ जानेवारी,१५ ओगस्ट , २ ऑक्टोबर (शाळेचा वाढदिवस) यादिवशी आम्ही शाळेत जाण्याचा प्रयत्न करतो.परत एकदा शाळेत जायला मिळणार म्हणून ४-५ दिवसांपासूनच मन एकदम हळवं झालेलं असत.मागच्या आठवणी परत येतात.दंगा ,मस्ती,शिक्षा,बाई,एकेका बाईंचा स्वभाव.यावेळेस एक गोष्ट राहून राहून खटकत होती.
ती म्हण्जे आपली प्रतिज्ञा.प्रतिज्ञेचे 'भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.माझ्या देशावर माझे प्रेम आहे'.यापुढच काही नीट आठवतच नव्हत.काही ओळी तोडक्या मोडक्या आठवत होत्या.पण नीट नाही.मी नवऱ्याला,सासू-सासरे,बहिण काही मैत्रीणीना विचारून बघितलं...त्यांनाही इथवरच आठवत होत.'अरे अशी कशी विसरले मी?' सगळ्यांच्या चेहऱ्यावर साधारण असेच भाव होते.
प्रतिज्ञा विस्मृतीत कशी काय गेली.अगदी न कळत्या वयापासून आपण ती अगदी रोज म्हणत आलोय.एकच लयीत.तरीही विसरलो.तुमच्या पैकी किती जणांना आठवतीये?मुलांच्या किवा अन्य कोणाच्या पुस्तकात न बघता तुमच्या पैकी किती जण हि प्रतिज्ञा पूर्ण म्हणू शकतील?
वाचने
2044
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही घ्या!
इतर कोठेही न वाचता स्वतहाच्या
अरे ..
आधी मला प्रतिज्ञा पाठ आहे का
जाउ द्या हो किचेन तै कशाला या
अहो किचेनताई, प्रतिज्ञा
जुनी चर्चा