मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काठावरून निरखलेला कामाठीपुरा

यशोधरा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार

वाचने 12976 वाचनखूण प्रतिक्रिया 28

विजुभाऊ Fri, 05/16/2008 - 17:52
ll या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिता l नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम: ll औरत ने जनम दिया मर्दो को.मर्दो ने उसे बाजार दिया............... पण विदारक शब्दाचा अर्थ त्या दिवशी प्रत्यक्ष पाहिला लाज वाटते रे माणुस म्हणायची असे काही पाहिले की. पण आपण साले पुचाट षंढ असतो नुसते सगळे फक्त शब्दांचे बुडबुडे काढत बसतो

मनस्वी Fri, 05/16/2008 - 17:56
समोरच्या व्यक्तीशी? नशीबाशी? नियतीशी? दैवाशी?? की देवाशी?? काहींची स्वप्नं चुरगाळली गेली असतील, या लेकी बाळी ही कधी काळी निरागसपणे कुठे तरी, आपापल्या घरच्या अंगणात बागडल्या असतील, या मुलांच निरागस मन निब्बर व्हायला किती लवकर सुरुवात होत असेल! काय पाहत होती आई उघड्या डोळ्यांनी?
यशोधरा.. अगदी अशाच भावना मनात येतात अशा वस्त्या पाहिल्या की.. तंतोतंत उतरवलंस..

मदनबाण Fri, 05/16/2008 - 17:59
हे भयानक आयुष्य खरच कोणत्याही स्त्रीच्या वाटेला येऊ नये.... पण हे जगच अस झालय...की इथ प्रतेक गोष्टीचा बाजारच मांडला जातो..... विकणारा आणि विकत घेणारा !!!!!इतरांच्या क्षणीक सुखासाठी यांना मात्र आयुष्यभर मोबदला चुकवत बसावे लागते..... पैसा फेक तमाशा देख....खरच यांच्या आयुष्याचा तमाशाच होऊन राहतो..... जो पर्यन्त तारुण्य तो पर्यन्त चलती पण पुढे काय????? अंधार-अंधार-अधांर------ मग पुर्णपणे निराधार.......... (व्यथित झालेला.....) मदनबाण.

In reply to by मदनबाण

राजे Fri, 05/16/2008 - 18:21
हे भयानक आयुष्य खरच कोणत्याही स्त्रीच्या वाटेला येऊ नये.... पण हे जगच अस झालय...की इथ प्रतेक गोष्टीचा बाजारच मांडला जातो..... विकणारा आणि विकत घेणारा !!!!!इतरांच्या क्षणीक सुखासाठी यांना मात्र आयुष्यभर मोबदला चुकवत बसावे लागते..... पैसा फेक तमाशा देख....खरच यांच्या आयुष्याचा तमाशाच होऊन राहतो..... जो पर्यन्त तारुण्य तो पर्यन्त चलती पण पुढे काय????? अंधार-अंधार-अधांर------ मग पुर्णपणे निराधार.......... १०० % सहमत. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

आनंदयात्री Fri, 05/16/2008 - 18:01
ते अतिशय भकास वातावरण, आणि तसेच उदास चेहरे. रस्त्यातली वर्दळही तशीच. कोणाची दखल न घेता, अलिप्त आणि मख्ख देहबोली घेऊन जगणारी, आपल्या आपल्या आयुष्याचे भार सांभाळणारी अन ओढणारी, दैन्य पांघरलेली गर्दी. रोज घरी जातांना लागणारी बुधवार पेठ अगदी अशीच, पहावत नाही.

स्वाती दिनेश Fri, 05/16/2008 - 18:05
यशोधरा,तुझा काठावरचा अनुभव इतका अस्वस्थ करून गेला, (तर तात्या.. तुझी रौशनी किती अस्वस्थ करते रे बाबा..) लेख उत्तम झाला आहे हेवेसांनल. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

प्राजु गुरुवार, 05/22/2008 - 20:17
इतक्या तरलपणे इथे मांडलीत.. आपले अभिनंदन.. उगाचच एक वाक्य आठवल होत तेह्वा. स्त्री ही क्षणकालची पत्नी अन अनंतकालची माता असते.... किती वेगळ्या अर्थाने ते वाक्य तिथे साकार झाल होत! हे वाक्य मात्र मन विषण्ण करून गेलं. म्हंटलं तर ज्वलंत सत्य आहे हे... मी शाळेत असताना, माझ्यापेक्षा वरच्या वर्गात असणारी एक मुलगी म्हणे कोणा बरोबर तरी पळून गेली. आणि या बातमी नंतर काही दिवसांनी असे ऐकले की, त्या नराधमाने तिला विकले. यातले सत्य नक्की काय माहिती नाही. पण आपला हा लेख वाचून वाटले की, ती मुलगी तिथेच तर नसेल..... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर Fri, 05/16/2008 - 18:29
यशेधराजी, हृदयाला हात घालणारे लेखन! इतक्या तरल विषयावर आपण आपल्या भावना तितक्याच मनमोकळेपाणाने येथे मांडल्यात याचे खरंच कौतुक वाटते! नक्की कोणाशी भांडत असायच्या कोण जाणे? समोरच्या व्यक्तीशी? नशीबाशी? नियतीशी? दैवाशी?? की देवाशी?? या स्त्रियांना बघणे, त्यांच निरीक्षण करणे हा एक कडवट अनुभव होता माझ्यासाठी. मीही या अनुभवाला अगदी जवळून सामोरा गेलो आहे. माझी जवळजवळ उठबसच या मंडळीत असायची. अगदी रोजच्या रोज! रोज एक नवा अनुभव, रोज एक नवं दैन्य पाहायला मिळायचं! आणि रस्त्यालगतच बागडणारी या माउल्यांची लहान मुल?? त्यांच्या आठवणी आजही मला अस्वस्थ करतात!! त्या निरागस, निर्व्याज लहानग्यांना रस्त्यावर अजाणता बागडताना पाहून खर तर मला उदास, अस्वस्थ व्हायला झाल…। काय भविष्य आहे यांच, अगदी खरं आहे. माझ्या नशिबी काय योग होता पहा, यातल्या एका वेश्येच्या मुलाला त्या रगाड्यातून, नरकातून बाहेर काढून बाहेरच्या सुधिक्षित, सुसंस्कृत जगात आणण्याचं भाग्य मला लाभलं! असो, अत्यंत वास्तववादी लेखन! हा लेख वाचून कधी काळी मीही फॉकलंड रोड, फोरास रोड व कामाठीपुर्‍याच्या १४ गल्ल्या हिंडलो आहे व हे सगळं दैन्य उघड्या डोळ्यानी पाहिलं आहे याची आठवण झाली! अजून काय लिहू?? आपला, (रौशनीच्या आठवणीत किंचित उदास!) तात्या. एक्स मॅनेजर, झमझम देशी दारू बार, रौशनीच्या चाळी शेजारी, फोरास रोड, मुंबई. -- या सगळ्या चिखलात, आमची रौशनी खरंच खूप वेगळी होती, सुसंस्कृत होती!

सुवर्णमयी Fri, 05/16/2008 - 20:17
यशोधरा, हा विषय अतिशय विषण्ण करणारा . तो मांडल्याबद्दल धन्यवाद. कविता महाजन यांचे भिन्न नावाचे पुस्तक याच विषयाशी निगडित समस्यांवर आहे. त्यातली एक ओळ वाचून पुढे जाण्याकरता अंगात हिम्मत आणावी लागते एवढे विदारक प्रसंग आहेत. नशिबाने, देवाच्या दयेने आपण किती सुरक्षित आणि सुखाचे आयुष्य जगत आहोत याची जाणीव प्रत्येक वेळी मनाला होत असते.

गृहिणि Fri, 05/16/2008 - 21:29
मन विषण्ण करणार लेखन. खरच आपल्या मध्यम्वर्गिय जिवनात आपण किति गुंतुन जातो ना कि त्या पलिकडेहि जग असत याचि आठवणच रहात नाहि. साध्या साध्या गैरसोयि खुप मोठ्या वाटायला लागतात आणि इथे ह्या बिचार्या जिवंतपणि नरकात रहात असत्तात. खुप प्रामाणिकपणे लिहलयस मनाला भिडल अगदि.

प्रगती Fri, 05/16/2008 - 22:31
मी सुद्दा बरेच वेळा बसने जाताना (फोर्ट)हे दॄश्य अगदी मन घट्ट करुन पाहीलं आहे ,पाहताना हमखास डोळ्यातुन पाणी येतं. देवाने ह्यांच्या नशीबी हे भोग का दिले असतील? प्रश्न पडतो आपण त्या स्त्रियांसाठी, मुलांसाठी काही करु शकतो का? नुकतंच वाचनात नवीन पुस्तक आलं आहे " बारबाला - वैशाली हळ्दनकर" मन हेलावुन टाकणारा अनुभव कथन केला आहे, लहानपणापासूणच तिच्यावर अत्याचार होतात्,स्वत:च्या सख्ख्या मुलाने सुद्धा आईचा वापर करावा ह्यापे़क्षा भयानक शोकांतिका काय असावी?

वाचक Fri, 05/16/2008 - 22:56
हृदयस्पर्शी लिखाण प्रविण पाटकरांच्या 'सति' पुस्तकामधे ह्या 'वस्तीवर' आधारित २ लेख वजा कथा आहेत ('लाल काळोख' आणि 'जगबूड') - अतिशय वास्तववादी चित्रण केले आहे. स्वत: प्रविण पाटकरांचे कामही खूप चांगले आहे ह्या विभागात....

बेसनलाडू Sat, 05/17/2008 - 00:18
लेखनातून संवेदनशीलता आणि धग दोन्ही जाणवले. (वाचक)बेसनलाडू

चतुरंग Sat, 05/17/2008 - 00:45
दाहक आणि संवेदनशील लेखन आणि अत्यंत समर्पक शीर्षक! समाजाचे हे एक भेदक आणि पचवायला अवघड वास्तव असे अलगद पुढे आणून ठेवण्याची विलक्षण किमया आपण केली आहे. धन्यवाद! चतुरंग

ईश्वरी Sat, 05/17/2008 - 00:58
यशोधरा, तुम्ही लिहीलेला लेख मन अस्वस्थ करून गेला. छान लिहीलंत, अनुभव चांगल्या शब्दात मांडला. त्या निरागस, निर्व्याज लहानग्यांना रस्त्यावर अजाणता बागडताना पाहून खर तर मला उदास, अस्वस्थ व्हायला झाल…। काय भविष्य आहे यांच, हा प्रश्न सतत मनत आल्याशिवाय राहिला नाही… यातल्या मुली असतील, त्यांच हे हसू असच कायम राहील?? का आसूंत बदलेल? खरोखर - काय भविष्य आहे यांच? ईश्वरी

यशोधरा Sat, 05/17/2008 - 08:50
लेखाला अभिप्राय दिल्याबद्दल आणि आपापले विचारही मांडल्याबद्दल सार्‍यांचेच आभार. मन विषण्ण करणारा विषय आहे तर खराच... असंही आयुष्य जगतात काहीजण...

अरुण मनोहर Sat, 05/17/2008 - 09:29
बाकी "कामाठीपुरा" एकदम डोळे उघडणारा आहे बघा. हे जसे मनाच्या नजरेतून होते, तेच डोळ्यांच्या कॅमेरातून शब्दबद्ध केले तर भारी होईल. इस्टोरी सांगायची फक्त कॅमेराला दिसते तशी. येकदम पिच्चर वगैरे काढता येईल.

शितल Sun, 05/18/2008 - 01:38
यशोधरा ताई, तुम्ही खुप छान लिहीले आहे, मन अस्वस्थ करते अशा महिला॑ना पाहिल्यावर आणि त्या॑चे रोजचे जगणे म्हणजे नेहमीचे नवे मरण असेच असते, मी एक बातमी वाचली होती की एक वेश्या एडस मुळे मरून पडली होती तीला साधा खा॑दा देण्यासाठी कोणीही पुढे येईना . पण हे ही तितकेच खरे की त्या आज समाजात आहेत म्हणुन इतर स्त्रीया॑चे आयुष्य भयावह नाही, नाही तर घरातुन बाहेर पडणे ही स्त्रीस शक्य नव्हते.

यशोधरा Sun, 05/18/2008 - 08:41
अगदी खरय शीतल. या स्त्रिया समाजात आहेत, म्हणून बाकीच्या स्रिया वाचल्या आहेत हे म्हणणे अगदी पटले.... आणि मला ताई वगैरे म्हणू नको गं.. नुसतं यशोधरा म्हण पाहू....

यशोधरा Sun, 05/18/2008 - 16:47
कदाचित आपल्यापैकी काहीजणांनी हे वाचलही असेल, हा लेख वाचून इतकं अस्वस्थ व्हायला झालं!!! अस्वस्थ हा शब्द देखील तोकडा पडावा अशी वागतात माणसं ..... सीतेच्या जन्मभूमीत घडलेलं क्रौर्य!! :( :(

धमाल मुलगा गुरुवार, 05/22/2008 - 17:14
लेख वाचला........... काय बोलु? छान म्हणू? भट्टी उत्तम जमलीये म्हणू? जबरदस्त म्हणू? की अस्वस्थ मनाची हाक ऐकून नुसताच सुन्न बसुन राहू? आम्ही साले पांढरपेशे. काठावरुन पाण्यात खडे मारणारे... जाऊ दे...डोकं सुन्न झालं हे मात्र खरं!
ll या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिता l नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम: ll काय पाहत होती आई उघड्या डोळ्यांनी? मानवरुपातल्या स्त्रीशक्तीची, मातृरुपाची विटंबना? दैन्य, लाचारी, असहायता??? का सगळे फक्त शब्दांचे बुडबुडे केवळ???

ऋचा गुरुवार, 05/22/2008 - 18:16
तू खुप सुंदर लीहीले आहेस. अगदी मनापर्यंत पोहोचतय

मी मिपा गुरुवार, 05/22/2008 - 19:40
तुम्ही फारच छान लिहले आहे पण ...... जे पुरुष घरापसुन दुर राहतात त्यान्च्यासाठि याचि गरज आहे म्हणुन सरकार याला कायदेशिर मान्याता देण्याचा विचार करत आहे / होते याचि गरज आहे अस वाटते का ??????? मी मिपा (कायम संयमी असणारा)

वरदा गुरुवार, 05/22/2008 - 22:49
भयंकर ..सुन्न झालेय्..शब्द नाहीयेत माझ्याकडे काहीच बोलायला... ती बातमीही वाचली मी....किती क्रुर असु शकतात माणसं.....

राजेश Fri, 05/23/2008 - 05:07
अप्रतिम लेख. अनिल अवचटांच्या "वस्त्या वेश्यांच्या" या लेखाची आठवण झाली. राजेश.

केशवराव Fri, 05/23/2008 - 06:24
यशोधरा, खुप चांगले लिहायला अनुभव आणि संवेदनशील मन असायला लागते. समाजाचा एक भागच असा नासलेला / सडलेला आहे; हे किती भयानक आहे? ' त्या आहेत म्हणून आपण सुरक्षीत आहोत.' असे म्हणताना ' त्या आपल्याला सुरक्षीत ठेवतात म्हणून आपण त्यांच्यासाठी काहीतरी करुया ' असे वाटते का? का आपणही नुसतेच शब्दांचे बुडबूडें सोडतो? काही नाही तरी आपण त्यांच्या मुलांसाठी काहीतरी करुया. मुलांचे कल्याण झाले तरी मातेला समाधान वाटते. कुणी काही मार्गदर्शन करील का? सर्वांनी त्या मुलांचे पुनर्वसन करण्यास सहाय्य केले, आपापल्या परीने, तरी खुप काही होईल. अशा काही संस्था आहेत का? कदाचीत त्या वस्तीत कार्य केलेले तात्या काही मार्गदर्शन करु शकतील. अन्य कुणालाही काही सुचवता येइल.

निरंजन मालशे Fri, 05/23/2008 - 16:15
यशोधरा खरच सुन्दर लेख लिहीलायस तरी अता ती वस्ती बरीच कमी झालेय. पुर्ण बेलासिस रोड आणि सात रस्त्यापर्यंत भरलेला फोरास रोड होता. ही गोष्टही खुप अस्वस्थ करते की कुठे गेली असतील त्या बायका त्यांची ती मुल. फोर्ट मधे तर काही वर्षांपुर्वी खांबन खांब त्यांचा होता. त्या खांबानाही कित्येक वर्षांच्या किती कहाण्या माहीत असतिल