Skip to main content

प्राणी आणि पक्षी माणसाप्रमाणे बोलायला लागले तर काय होईल...?

लेखक राम दादा
Published on सोमवार, 22/09/2008

याद्या 1748
प्रतिक्रिया 47

प्रतिक्रिया

माणसे प्राण्यांवर जास्त प्रेम करतील..

In reply to by राम दादा

माझ्या सर्व मित्रांनो... तुमचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे... हे जर प्राण्यानी वाचले तर ...ते काय बरं विचार करतील. राम दादा...

कॉल सेंटर मधे प्राण्यांना नोकर्‍या मिळतील. मेनका गांधीला अनेक मुद्दे मिळतील. चावट बोलणार्‍या पोपटांच्या किमती वाढतील. प्राण्यांवरच्या लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी नविन कायदे बनतील. मिपाकरांनो येउ द्या तुमचे मुद्दे.

In reply to by आनंदयात्री

हलकट लोकांना विरोध करणार्‍यांच्या संख्येत हजारोंनी भर पडेल! ;) (ह घ्या वा नका घेउ) - टिंग्या!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

ब्रिटनमधे पण चांगल्या पोपटपंची करणार्‍या हजारो लोकांना वाव मिळेल.

असे (दिवसाला एक एवढे) कौल का घेता असा जाब प्राणी विचारु शकतील. माणूस येडा आहे का खुळा यावर यावर प्राण्यांमधे भांडण होईल. जया बच्चनच्या मैनेनी मराठी बोललं पाहिजे म्हणून अमिताभ बच्चनचा पोपट मौनव्रत धारण करेल. माणसं आपल्याबरोबर आपल्या प्राण्या-पक्षांना स्थलांतर करायला लावत असतील तर प्राण्यांना नवीन ठिकाणची भाषा शिकावी लागेल. 'झंडू बाम' यांनी लिहिलेली प्रेमकथा वाङमय-चौर्य मानले जाईल. रोज सकाळी चिमण्या खिडकीत येऊन हिमेशभाईंची गाणी म्हणतील ... लिवा आता तुम्हीपण!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जया बच्चनच्या मैनेनी मराठी बोललं पाहिजे म्हणून अमिताभ बच्चनचा पोपट मौनव्रत धारण करेल. +१ 'झंडू बाम' यांनी लिहिलेली प्रेमकथा वाङमय-चौर्य मानले जाईल. रोज सकाळी चिमण्या खिडकीत येऊन हिमेशभाईंची गाणी म्हणतील ... लय भरी. १. इंडियन आयडॉल वा तस्तम रियालिटी शो मध्ये कोकीळांमध्ये स्पर्धा होईल आणि गाढव जज्ज आसेल.. २. डान्स स्पर्धेमध्ये मोर नाचेल आणि कावळा महागुरू असेल. ३. क्यु की मै भी कभी स्पायडर था ....असं स्पायडर मॅन वर म्हणण्याची वेळ येईल. ४. कुत्री माणसांना साखळ्यांना लावून फिरायला नेतील ५. सगळ्यात गम्मत होईल तर व्हेटर्नरी डॉक्टर्सची. " अरे गाढवा, उजव्या नाही डाव्या पायाला जखम झाली आहे" असे प्राणीच डॉक्टरना सांगतील. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

१. इंडियन आयडॉल वा तस्तम रियालिटी शो मध्ये कोकीळांमध्ये स्पर्धा होईल आणि गाढव जज्ज आसेल.. अन्नु मलिक आहे ना ऑलरेडी !!!!

In reply to by लंबूटांग

एक नंबर लंबूदादा ... आणि त्या सारेगमा चॅलेंज मधे ही एक रेडा आहे ... इस्माइल दरबार ( की दरबारी ?) रेड्याच्या आवाजात म्हणा ... यल्ल्ल्ल्ल्ल्ल्गाआआअर होओओओ ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

In reply to by प्राजु

. कुत्री माणसांना साखळ्यांना लावून फिरायला नेतील माणसाने जर कुत्र्यासोबत चालताना आगाऊपणा केला तर ...कुत्रा माणसाला बांधुन मारेल.... राम दादा...

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

रोज सकाळी चिमण्या खिडकीत येऊन हिमेशभाईंची गाणी म्हणतील ... त्यांच्यातल्या गाणार्‍या हीरो चे नाव चिमणभाई असेल कावळे मोबाईल वर एकमेकांशी बोलतील. टीव्ही वर त्यांचे स्पेशल चॅनल्स असतील. पक्षी सभा घेतील आणि गणपतीत स्पीकरच्याभिंती वाजवतील कावळे कौन बनेगा कावळेपती कार्यक्रम कन्डक्ट करतील ल्ह्या आता पुढचे डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जया बच्चनच्या मैनेनी मराठी बोललं पाहिजे म्हणून अमिताभ बच्चनचा पोपट मौनव्रत धारण करेल. नो कॉमेंट्स. हाताची घडी तोंडावर बोट.

मंग प्रानि मान्सांना म्हंतील तुमी आमच्या वानी का नाई र्‍हात. आंगाव कापडं का ठुता? प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

शिवाय बोलता येणारे प्राणी नाटकात काम करतील... ... अगदीच सीझन चालू असेल तर ब्रॅडली हेवर्ड यांच्या लेजिटिमेट हुई या नाटकाचा प्रयोग परत होईल... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by प्रकाश घाटपांडे

"मंग प्रानि मान्सांना म्हंतील तुमी आमच्या वानी का नाई र्‍हात. आंगाव कापडं का ठुता?" बर्‍याच दिवसात असे शब्द ए॑कले. -( सणकी )पाषाणभेद

http://vipravani.wordpress.com/ अगदी जोरात गाडी चालु आहे दादा. लगे रहो.

मग प्राण्यांतल्या संवादांत आपल्याला 'काय जनावर आहेस की माणूस???' अशी वाक्यं ऐकायला मिळतील... आणि गाढवं 'जातिवाचक शब्दांनी आमचा उद्धार केला जातो' म्हणून मंत्रालयावर मोर्चे काढतील... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद

वर बर्‍याच प्राण्यांनी आपापले मुद्दे मांडलेले आहेत. प्राणी पक्षी काय बोलतील काय लिहीतील ते वाचा वर (अन् खाली ) माणसाला बोलालायला चान्स च नाही .... :) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

सही !!!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्राणी माणसाच्या भविष्य नाड्या आवळतील ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

१)पोल्ट्री फार्म मधल्या कोंबड्या अंडी चोरीला गेल्याची आणि भ्रूण हत्येची तक्रार नोंदवतील २)खाटीक वैराग्य येवुन निवृत्त होतील ३)गवळ्यांवर गायी सार्वजनीक स्थळी अश्लील वर्तन केले आणि अब्रु लुटली अशा केसेस दाखल करतील. ४)बैले किमान वेतन कायदा आम्हालाही लागु व्हावा अशी मागणी करतील ५)कोंबडे ; तुम्ही लोकाना अन्न (!) दाखवुन उपाशी ठेवता असे म्हणतील ६)मैना नामक विजातीय पक्ष्याशी जोडी का जुळवली म्हणुन पोपटाचे बाबा त्याला बडवतील डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

In reply to by विजुभाऊ

गवळ्यांवर गायी सार्वजनीक स्थळी अश्लील वर्तन केले आणि अब्रु लुटली अशा केसेस दाखल करतील. मुद्दा गंभीर आहे..

प्राण्याचा पक्ष स्थापन होईल ( राजकीय) त्यात पण पक्ष्याचा वेगळा असु शकतो......त्याची ४ थी आघाडी स्थापन होईल कदाचित गाढव पंतप्रधान होईल

In reply to by sanjubaba

गाढव पंतप्रधान झाले तर.. मग .उंदीर मामा सगळी उंदरे एकत्र बोलावुन ...गाढवाकडे ..मांजराच्या विरोधात आंदोलन करेल.. राम दादा...

माणसे उडायला, सरपटायला आणि डरकाळ्या फोडायला लागती. मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

In reply to by राम दादा

अहो सध्या पण काही " रक्तपिसासु प्राणीच " आमचा ट्रेणिंग नावाच्या भयानक प्रकारात छळ करतात. असे आख्यायीका आहे की " जीम कॉर्बेटच्या नरभक्षक वाघांची" ही पुढची पिढी आहे. काही " प्राणी" आम्हाला हस्वलासारखे हसवुन हसवुन मारतात ... अवांतर : आम्ही जे ट्रेणिंग देतो तो " प्राण्यांना माणसवळायच्या प्रोसेस" चा एक छोटासा भाग असतो ... त्याबद्दल शंका नसावी ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by मनस्वी

नागपंचमीसारखी मनुष्यपंचमी साजरी होईल. तसेच मनुष्यपोळा इ. मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

In reply to by मनस्वी

नागपंचमीसारखी मनुष्यपंचमी साजरी होईल. तसेच मनुष्यपोळा इ. अगं पोळातर यावर्षीच नाही का झाला मिपावर साजरा? टारूचा वाढदिवस झाला तेव्हा ... ही बघ लिंक आठवत नसेल तुला तर! http://www.misalpav.com/node/3266

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्राणी आणि पक्षी माणसाप्रमाणे बोलायला लागले तर! मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

राणीच्या बागेत माणसांसाठी वेगळे पिंजरे असतील व त्या माणसांना पाह्यला माकडे रांग लावुन तिकीट काढतील. ऍनिमल प्लानेट व डिस्कव्हरी चॅनल वर मनुष्य प्राणी या विषयावर डॉक्युमेंतट्री लागतील व गंडे व जिराफ तो कर्यक्रम आनंदाने बघतील. माणसांच्या सर्कस ला प्राण्यांची तोबा गर्दी होईल व सिंह रिंग मास्टर असेल व चाबकाचे फटके माणसाच्या पिछवाड्या वर मारुन त्याला आगीच्या गोळ्यातुन उडी मारायला लावतील.. चिकन माणसाचा लेग पिस आवडीने खातील.. काळविट आणि निल गाय त्यांच्या घरी वेगवेगळ्या माणसांची भुसा भरलेली डोकी शो-पिस म्हणुन भिंतीवर लावतील. कासव माणसाच्या पाठीची ढाल बनवतील. कावळे म्हातार्‍या माणसांना पिंडाला टोचायला म्हणुन कामावर ठेवतील. घोडे माणसाला टांगा ओढायला ठेवतील.. उंदीर माणसे पकडणारे सापळे लावती ल.. गाढव माणसांना राब राब राबवतील व खाण्यासाठी उकिरड्यावर सोडुन देतील.. कुत्रे माणसाच्या गळ्यात पट्टे घालुन त्यांना कॉलनीत फिरायला घेऊन जातील.. बैल माणुस मोळा हा सण साजरा करतील.. वाघ ,चित्ते मेलेल्या माणसावर पाय ठेवुन स्वतः हातात बंदुक घेतलेल्या पोझ मधे फोटो काढतील.. मदनबाण>>>>> "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

In reply to by मदनबाण

माणसांच्या सर्कस ला प्राण्यांची तोबा गर्दी होईल व सिंह रिंग मास्टर असेल व चाबकाचे फटके माणसाच्या पिछवाड्या वर मारुन त्याला आगीच्या गोळ्यातुन उडी मारायला लावतील.. राणीच्या बागेत माणसांसाठी वेगळे पिंजरे असतील व त्या माणसांना पाह्यला माकडे रांग लावुन तिकीट काढतील.

ते सभागृहात कशी वागतात ते एकदा टीव्ही वर पाहा............. जनावरे तरी बरे.........असाच वाटणार ! एकएकाचे डोके तर अफलातून चालते...........कधी कधी हाणामारी पण चालते हे आपले नशीबचे भोग बाकी काय...........ही आपली लोकशाही......नाहीच ही प्राण्याचीच शाही आहे.

माणसे उडू लागली तर......... आकाशात ट्रॅफिक जाम होईल ! माणसे सरपटू लागली तर....... ती अगोदरच सरपटातहेत.......लोकसंख्या किती वाढल्ली बाबा ! आणि डा र का ल्या मारू लागली तर....... आपण जसे वाघ पकडतो ना ....... वन अधिकार्‍यांना बोलावून तसेच माणसाना पकडले जाईल

मतलबा करीता प्राणी व मतलबा करीता पक्शी रूप धारण करत आसलेल्या स्वतःला आती हूशार समजनार्या क्रूर,कपटी,खोटारड्या व हीन्स्त्र मानव नावाच्या श्वापदाबद्दल खरे बोलन्याची हिम्मत नसल्यामुळे ते काहीच बोलनार नाहीत.

१. ध्वनी प्रदुषण वाढेल.. कारण काही प्राण्यांचे आवाज किती मोठे आहेत. :)

काही ठिकाणी दुष्काळामुळे पाण्याचा खुप मोठा प्रश्न आहे...त्या भागातील प्राणी पाणी आंदोलन करतील... आणि ते पण माणसाविरोधात्...कारण प्रांण्यांना माहित आहे कि ..माणसांमुळेच पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे.. प्राणी माणसाला बोलतील्..जो पर्यंत आमचा पाणी प्रश्न सुटत नाही ..तो पर्यंत आम्ही तुम्हाला पाणी पिऊ देणार नाही..