Skip to main content

मुसलमान होणे हा हिंदु पुरुषाना घटस्फोटाला पर्याय होऊ शकतो का?

लेखक JAGOMOHANPYARE यांनी सोमवार, 07/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1991
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

एखादी व्यक्ती गायब झाली आणि ती ७ वर्षे नाही मिळाली, तर ती व्यक्ती मृत समजता येते. पण बायको भाम्डून गेली आणि नोटीसा, पोलिस केस यानाही उत्तर देत नसेल, तर हिंदु नवर्‍याला दुसरे लग्न करता येते का? असे किती वर्ष थांबावे लागते? अशा केसेस मध्ये पोलिस इन्क्वायरी करतात. पण सदर स्त्री मिळून येत नाही/सापडून येत नाही, असे लिहून फाइल बंद करतात. भले ही बाई नवर्‍याच्याच गावात रहात असेल आणि ती त्याला रोज दिसत असेल, तरीही. रजिस्टर पोस्टने पाठवलेल्या पत्रावरही सदर व्यक्ती उपलब्ध नाही, असे लिहुन येते. अशा वेळी नवर्‍याने मुसलमान धर्म स्वीकारुन नवीन आयुष्य कायदेशीर रीत्या चालू करता येते का? हिंदु माणसाने मुसलमान धर्म स्वीकारला तरी तो पहिल्या बायकोच्या पोटगीतुन सुटु शकत नाही. पण इथे पोटगी टाळण्यासाठी नवा विवाह अपेक्षित नसून नवीन आयुष्य सुरु करण्यासाठी आहे. बायका घटस्फोट देत नाहीत. कारण त्यांच्या घरातील इतर मुलींची लग्ने तटु शकतात. शिवाय अशा बाईने नावर्‍याच्या नावाने, पत्त्य्याने गैरवय्ववहार केले तरी पोलिस नवर्‍याच्या मागे लागतात. स्वतःच्या पायावर उभे राहणे न जमल्यास अशा बाईला परत नवर्‍याकडे जायचा ऑप्शनही ओपन ठेवायचा असतो.. त्यामुळे अशा बाया वर्षानुवर्षे नवर्‍याकडे येतही नाहीत आणि कागद्पत्राना उत्तरेही देत नाहीत. अशा वेळी हिंदु पुरुषाने मुसलमान धर्म स्वीकारुन स्वतःचे नवीन आयुष्य सुरु करणे कितपत व्यवहार्य ठरेल?

In reply to by JAGOMOHANPYARE

अशा वेळी हिंदु पुरुषाने मुसलमान धर्म स्वीकारुन स्वतःचे नवीन आयुष्य सुरु करणे कितपत व्यवहार्य ठरेल? त्यापेक्षा युयुत्सुंची मदत घ्यावी. ;)

In reply to by स्पा

आज पासुन तुम्ही मिपाचे शेरेलॉक होम्स का काय असतात ना ते ? च्यायला हे काय आहे रे दुस-या हाटेलात्लं गि-हाईक आप्ल्या हाटेलात आणुन फुकटात खाउ घालायचं.

In reply to by ५० फक्त

आज पासुन तुम्ही मिपाचे शेरेलॉक होम्स का काय असतात ना ते ?
देशी बनो, देशी वापरो. हितं त्यास्नी जासूस विजय न म्हंल्याबद्दल खेद. तिनही स्तरातुन.

In reply to by स्पा

तिथे मी लिहिले आहे ना, की मी इथेही कौल लावणार आहे म्हणून.. मल्टीप्लेक्सचा जमाना आहे. दोन दोन स्क्रीनवर शिणेमा रिलीज करावा लागतो. :)

In reply to by JAGOMOHANPYARE

ह्यविषयी कायदेतज्ज्ञच योग्य उत्तर देऊ शकतील. धर्मांतर हा उपाय होऊ शकत असेल असं मला वाटत नाही. पत्नी सोबत रहात नसेल, त्याला १ वर्षाहून अधिक काळ लोटला असेल आणि कोर्टाच्या नोटिशींनाही उत्तर देत नसेल तर इतर खटल्यांप्रमाणे फिर्यादीची बाजू निकालात काढण्याची तरतूद आहे का ते पहावे लागेल. तसे असल्यास सगळाच प्रश्न मिटतो.

In reply to by धमाल मुलगा

पत्नी सोबत रहात नसेल, त्याला १ वर्षाहून अधिक काळ लोटला असेल आणि कोर्टाच्या नोटिशींनाही उत्तर देत नसेल तर इतर खटल्यांप्रमाणे फिर्यादीची बाजू निकालात काढण्याची तरतूद आहे का ते पहावे लागेल. तसे असल्यास सगळाच प्रश्न मिटतो.
पतिपत्नी एकत्र राहत नसतील आणि त्यांच्यात आपण म्हटल्याप्रमाणे म्यारेज सर्टिफिकिटाच्या कागदाच्या तुकड्याव्यतिरिक्त कोणताही संबंध राहिला नसेल, तर अशा परिस्थितीत न्यायालयाद्वारे एकतरफी घटस्फोटाच्या अर्जाची तरतूद बहुधा आहे, असे वाटते, परंतु खात्री नाही. मात्र, अशा अर्जाचा न्यायालयाकडून किमान विचार होण्याकरिता असा एकत्र न राहण्याचा अथवा कोणताही संबंध नसण्याचा काळ हा एका वर्षाइतका कमीही नाही, असेही वाटते. याबद्दल संबंधित कायद्यातील तज्ज्ञच योग्य काय ती माहिती देऊ शकतील.

In reply to by पंगा

पण
अशा अर्जाचा न्यायालयाकडून किमान विचार होण्याकरिता असा एकत्र न राहण्याचा अथवा कोणताही संबंध नसण्याचा काळ हा एका वर्षाइतका कमीही नाही, असेही वाटते.
ह्या संदर्भातील एक वर्षाचा उल्लेख हा साधारणतः घटस्फोटाच्या एक वर्ष विभक्त राहण्याच्या अटीच्या माहितीनूसार मी केला इतकंच. ते योग्य असू शकेलही किंवा नसेलही. :)

In reply to by धमाल मुलगा

पत्नी सोबत रहात नसेल, त्याला १ वर्षाहून अधिक काळ लोटला असेल आणि कोर्टाच्या नोटिशींनाही उत्तर देत नसेल तर इतर खटल्यांप्रमाणे फिर्यादीची बाजू निकालात काढण्याची तरतूद आहे का ते पहावे लागेल. ह्या संदर्भातील एक वर्षाचा उल्लेख हा साधारणतः घटस्फोटाच्या एक वर्ष विभक्त राहण्याच्या अटीच्या माहितीनूसार मी केला इतकंच. भाड्या, लग्नाला २-४ वर्षे न्हाय झाली तरी इतका अभ्यास होय रे?

In reply to by JAGOMOHANPYARE

अशा वेळी नवर्‍याने मुसलमान धर्म स्वीकारुन नवीन आयुष्य कायदेशीर रीत्या चालू करता येते का? आपल्या खा. धरमपा'जी आणि खा. हेमामालिनी भौजाई यांना इचारा की. ;)

आयला, एक नीट नांदली नाही मग दुसरीची तरी काय गॅरण्टी? मग तिसरीची तरी काय....? चवथीची तरी......? [मुसलमानांत चारच पत्न्या (पत्नी:- अनेकवचनात) चालतात म्हणे.....]

ह्यासाठीच आम्ही सांगत असतो की लग्न न करताच एकत्र रहावे. म्हणजे डोक्याला त्रास नाही भेंडी. नान्या तुला तळकोकणातली बामण पोरगी बघु काय रे कोण लग्नाला?

आमचे प्यारे मोहन म्हणे काय तर कायदा करणार आहेत (जन्मात यकदाच लगीन कराच सगळ्यान्नी ते पण फकस्त मामाच्या पोरीसी)

मुसलमान होणे हा हिंदु पुरुषाना घटस्फोटाला पर्याय होऊ शकतो का? _____________________________________ प्रश्नातच काहीशी चुक आहे का ? मुसलमान झाल्याने घटस्फोटाला कसा काय पर्याय ठरेल ? असा पर्याय असता तर मुसलमानात "तलाक" नावाला सुद्धा दिसला नसता. ;)

घटस्फोट घ्यायचाच कशाला ? प्रेमाने राहता येत नाही का ? नाही प्रेमाने राहता येत तर मंग लग्नच का करायचे ? प्रेम करता येत नसेल तर लग्न करुन कोनाचे आयुश्य वाया घालवु नये. ति बिचारी आपल्या आई वडीलांना भाउ बहिनिंना सोडून तुमच्या कडे येते ते फक्त तुमच्या कडे बघुनच ना. मग का घटस्फोट घ्यायचा. घटस्फोट कुनिच कधिहि घेउ नये.