Skip to main content

राष्ट्रकूल स्पर्धेत सानिया मिर्झाने टेनिसमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिले.

लेखक सुनील यांनी रविवार, 10/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1315
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

पाकिस्तानी नागरीकाशी लग्न केल्यानन्तर तिने भारताकडून खेळणे म्हणजे भारतीय नागरीकाना लज्जास्पद आहे असे आपले मला वाटते.

In reply to by आनन्दा

पाकिस्तानी नागरिका बरोबर लग्न करुन तीने भारतासाठी पदक कमवावे हे पाकिस्तानी नागरिकाना अपमानास्पद आहे असे मला वाटते. सानियाचे हार्दिक अभिनंदन... तिला भारत प्रिय आहे हे ह्या वरुन सिध्द होत नाही का?

In reply to by वेताळ

शिवाय ती बिचारी एका दिवशी २//३ मॅचेस खेळत होती. फक्त सिंगल्स खेळती तर कदाचित गोल्ड जिंकली असती. पाकिस्तानने तिला व्हिसा पण दिला नाही म्हणे!

भारताच्या खात्यात एक रौप्य जमा झाले हे चांगलेच झाले. सानियाचा एखादातरी फोटो टाकायला हवा होतात. असो. सानियाताईंचे हाबिणंदण.

In reply to by अप्पा जोगळेकर

सानियाचा एखादातरी फोटो टाकायला हवा होतात हॅ हॅ हॅ!! फोटो टाकण्यात आम्ही माहीर आहोत. पण सध्या मिपावरील कौलात फोटो काय पण कौल टाकण्यामागची पार्श्वभूमी विशद करायलादेखिल जागा नसते! बरं, पार्श्वभूमी ही पहिला प्रतिसाद म्हणून टाकावी तर, तो ही (इंचा-इंचाने) खाली जातो! मिपा तंत्रज्ञ, वाचताहात ना?

इतर ला मत दिले. तीचा पासपोर्ट कुठल्या देशाचा आहे? आणि त्याचा (तिच्या नवर्‍याचा) कुठल्या देशाचा आहे?

In reply to by विकास

माझ्या मते, अशा स्पर्धांत ज्या देशाचे प्रतिनिधित्व करायचे, त्या देशाने नागरीकत्व असणे ही पूर्वअट असावी. जाणकारांनी खुलासा करावा.

In reply to by सुनील

माझ्या मते, अशा स्पर्धांत ज्या देशाचे प्रतिनिधित्व करायचे, त्या देशाने नागरीकत्व असणे ही पूर्वअट असावी. अर्थातच! मी अजाण असून देखील असेच असेल असे म्हणतो... माझ्या वरच्या उत्तरात काहीसा गर्भितार्थ होता, पण तो फारच अस्पष्ट झाला (विशेष करून त्यातील नागरीकत्वाच्या प्रश्नामुळे). मला कौलातील प्रश्नातील "पाकिस्तानी नागरिकाशी लग्न करूनही" ह्या वाक्याचा काही संबंधच नाही असे वाटत होते. तीने कुणाशी/कुठल्या देशाच्या नागरीकाशी लग्न केले हा तिचा प्रश्न झाला. नाहीतर उद्या कोणी ब्रिटीश/अमेरिकन नागरीकाशी माधुरी दिक्षितने लग्न करून नंतर "आजा नचले" मधे भुमिका केली म्हणून आपण (तुम्ही-मी) स्वतःला भारतीय आहोत असे म्हणायला लाज वाटते असे म्हणण्यातलाच प्रकार आहे... ;)

In reply to by विकास

मुळात सानियाने पाकिस्तानी माणसाशी लग्न केलं तर तिने आपलं भारतीय नागरिकत्त्व सोडावं असा हट्ट का? तिचा नवरा भारतीय झाला तर, किंवा दोघांनी आपापलं नागरिकत्त्व राखलं तर काय अडतं? सानियाचं रौप्य पदकासाठी अभिनंदन. पुढच्या वेळेस तिला सुवर्ण पदकासाठी शुभेच्छा.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

(तशाही आमच्या शंका नेहमीच वेडगळ असाव्यात. :) ) लग्नानंतरचं सानिया मिर्झाचं नागरिकत्व कोणतं आहे? (आम्हाला ऐकिव माहितीवर 'ग्रीनकार्डासाठी की असंच कायसं असतं त्यासाठी लग्न करणारे लोक असतात' असं कळलं होतं. ) कायदा काय सांगतो?
  • आंतरराष्ट्रीय विवाह केल्यानंतर नागरिकत्व कोणतं मिळतं?
  • की पती-पत्नी दोघांनाही आपापले मूळ नागरिकत्व अबाधित ठेवण्याचा हक्क असतो?
  • अबाधित ठेवले असेल तर (इथे पत्नीचा विषय आहे म्हणुन हा प्रश्न) त्या स्त्रीला पतीच्या देशामध्ये किती काळ रहाण्याचा हक्क असतो?
  • अशा व्यक्तीला तिच्या जोडीदाराचा देश इतर देशांमध्ये जाण्यासाठी आपला व्हिसा देऊ शकतो का?
  • उत्तर हो असल्यास, जर नागरिकत्व नाही, तर तो देश त्या व्यक्तीस व्हिसा कसा देऊ शकतो? काही विशेष तरतूद असते का?
पाकिस्तान टेनिस फेडरेशन किंवा आणखी कोणती अशी संघटना ह्यामध्ये 'महिला टेनिस'चा संघ आहे का? संघ नसल्यास, महिला टेनिसबद्दल पाकिस्तानी क्रिडाखात्यातर्फे एखाद्या खेळाडूस काही मदत असते का? ----- ह्यापैकी कोणत्याही प्रश्नाचं माझ्याकडं उत्तर नाही. त्यामुळं ह्या कौलावर मतप्रदर्शन करण्याची माझी पात्रता नाही असे मी समजतो. :)

In reply to by धमाल मुलगा

* आंतरराष्ट्रीय विवाह केल्यानंतर नागरिकत्व कोणतं मिळतं?
अशा परिस्थितीत नागरिकत्त्वासाठी अर्ज करावा लागत असावा; ऑपॉप मिळत नसणार. सोनिया गांधींचं उदाहरण आहे.
* की पती-पत्नी दोघांनाही आपापले मूळ नागरिकत्व अबाधित ठेवण्याचा हक्क असतो?
काहीच केलं नाही तर पारपत्र (पासपोर्ट) इनव्हॅलिड होत नसावं. सोनिया गांधींचा इटलीचा पासपोर्ट त्यांच्या लग्नानंतर बरीच वर्ष व्हॅलिड होता.
* अबाधित ठेवले असेल तर (इथे पत्नीचा विषय आहे म्हणुन हा प्रश्न) त्या स्त्रीला पतीच्या देशामध्ये किती काळ रहाण्याचा हक्क असतो?
ते व्हीजावर अवलंबून असावं.
* अशा व्यक्तीला तिच्या जोडीदाराचा देश इतर देशांमध्ये जाण्यासाठी आपला व्हिसा देऊ शकतो का?
प्रश्नच चुकीचा वाटतो (किंवा मला प्रश्न समजला नाही आहे). या केसमधे या दोघांना समजा ऑस्ट्रेलियात जायचं आहे तर पाकिस्तान किंवा भारत यांना व्हीजा कसा देणार?
* उत्तर हो असल्यास, जर नागरिकत्व नाही, तर तो देश त्या व्यक्तीस व्हिसा कसा देऊ शकतो? काही विशेष तरतूद असते का?
नॉट अ‍ॅप्लिकेबल.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>अशा परिस्थितीत नागरिकत्त्वासाठी अर्ज करावा लागत असावा; ऑपॉप मिळत नसणार. असेल नसेल च्या शक्यता नाही वापरता येणार ना? >> सोनिया गांधींचं उदाहरण आहे. हॅ हॅ हॅ!!! सोनिया आणी सानिया मध्ये फक्त एका मात्र्याचा फरक असला तरी पुढचं नाव बरंच वेगळं होतं नै का? ;) >>काहीच केलं नाही तर पारपत्र (पासपोर्ट) इनव्हॅलिड होत नसावं. पण मग त्या देशात कसं राहता येईल? (मी एक व्यक्ती म्हणुन विचारतोय. गांधीघराण्याची 'पावर' वायली.) >>सोनिया गांधींचा इटलीचा पासपोर्ट त्यांच्या लग्नानंतर बरीच वर्ष व्हॅलिड होता. सोनिया राजीव गांधी ह्यांच्याबाबत नियमांवर बोट ठेवता येतं का किंवा येत होतं का? >>ते व्हीजावर अवलंबून असावं. म्हणजे? टुरिस्ट व्हिसा सलग कितीवेळा मिळु शकतो? की त्यामध्ये काही तरतूदी आहेत? टुरिस्ट नसेल तर आणखी वेगळा असा कोणत्या प्रकारचा व्हिसा असतो की ज्यायोगे अशा लोकांना रहाता येऊ शकतं?
प्रश्नच चुकीचा वाटतो (किंवा मला प्रश्न समजला नाही आहे). या केसमधे या दोघांना समजा ऑस्ट्रेलियात जायचं आहे तर पाकिस्तान किंवा भारत यांना व्हीजा कसा देणार?
आय माय स्वारी! विचारांच्या गडबडीत मीच चुकलो. तो प्रश्न रद्दबादल. >नॉट अ‍ॅप्लिकेबल. पुन्यांदा आय माय स्वारी.

In reply to by धमाल मुलगा

प्रिय धमाल, अमेरिकेतील ग्रीन कार्ड किंवा आम्हाला इंडोनेशियात मिळते तसले Permanent Residence Permit सोनियाताईंना मिळाले असेल. (मला अर्थातच नक्की माहीत नाहीं). गांधी घरण्याशी संबंध असल्याने फायदा जरूर होईल, पण त्याची आवश्यकता नसावी. एकाद्या भारतीय व्यक्तीशी केलेला विवाहसुद्धा अशी status मिळवून देऊ शकतो. अशा व्यक्तीला आपले मूळ नागरिकत्व अबाधित ठेऊन Alien म्हणून Permanent Residence Permit दिलेल्या राष्ट्रात हवे तितके दिवस रहाता येते. असे अमेरिकेत ग्रीनकार्डवाले माझे अनेक मित्र खूप वर्षे राहिले होते. (अलीकडे कायदा बदलला असल्यास माहिती नाहीं) इंडोनेशियात बरीच वर्षे Permanent Residence Permit घेऊन रहाणारे कांहीं लोक मला माहीत आहेत. प्रत्येक देशाचे कायदे एकसारखे नक्कीच नसणार! अर्थात सोनियाताईंची केस काय आहे याची मला माहिती नाहीं.

In reply to by सुधीर काळे

सानियाचं लग्न झाल्यानंतर तिला आणि तिच्या वडिलाना पत्रकारानी हा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यानी असं उत्तर दिलं होतं की १. सानिया भारतीय नागरिकत्व ठेवणार आणि भारतीय पासपोर्ट च वापरणार. २. ती नजीकच्या काळातील सगळ्या स्पर्धांमधे भारताचे प्रतिनिधित्व करणार (तिचं सिलेक्शन होत राहील तोपर्यंत). ३. सुरक्षिततेच्या कारणासाठी सानिया व शोएब दुबईत रहातील. लग्नानंतरच्या पाकिस्तानातील स्वागतसमारंभासाठी तिला अगदी थोड्या कालावधीचा आणि फक्त १/२ ठिकाणी जाण्यासाठी व्हिसा मिळाला होता. अर्थात, हे सगळं मी पेपेरमधे वाचलेलं एवढंच आठवतं. त्यात किती तथ्य आहे आणि इतर कायदेशीर बाबींचा गुंतवळा काय आहे, मला माहिती नाही.

In reply to by पैसा

>>३. सुरक्षिततेच्या कारणासाठी सानिया व शोएब दुबईत रहातील. जर खरंच सुरक्षा पहिजे असेल तर दुबईला जाण्याची गरज नाही असे वाटाते, भारतात सुद्धा Z+ सिक्युरिटी मिळु शकते. फक्त एक करायचं 'माय नेम ईज खान' कुठे लागला आहे ते बघुन तिथेच संसार मांडायचा. एवढं कसं साध कळत नाहि देव जाणे. आमच्या सरकारने इतकि चांगली उपाययोजना केली असुन सुद्धा तिचा लाभ घेत नाहीत.

In reply to by धमाल मुलगा

टुरिस्ट नसेल तर आणखी वेगळा असा कोणत्या प्रकारचा व्हिसा असतो की ज्यायोगे अशा लोकांना रहाता येऊ शकतं?
द्मु, भारतीय लोकांशी लग्न केलेल्यांना PIO (persons of Indian Origin) कार्ड मिळवता येतं. हे कार्ड १५ (+१०) वर्ष व्हॅलीड असतं. हे कार्ड आणि योग्य पासपोर्ट असेल तर भारतात येण्यासाठी वेगळा व्हीसा लागत नाही. बांग्लादेश आणि पाकिस्तानी पासपोर्ट धारकांसाठी मात्र काही वेगळे नियम असावेत. संदर्भः www.mha.nic.in/pdfs/oci-chart.pdf आता 'गांधी' आडनावामुळे सोनियांना असं कार्ड कदाचित काहीच त्रास न होता मिळालं असेल, इतर कोणाला थोड्या खेपा माराव्या लागतील.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नाही, मूळ भारतीय वंशाच्या पण सध्या इतरत्र वास्तव्यास ( दुसर्‍या देशांच नागरिकत्व स्वीकारलेल्या )असणार्‍यांना PIO (persons of Indian Origin) कार्ड मिळतं. त्याचीच सुधारित आवॄती OCI (Overseas citizens of India). लाइफलाँग मल्टिपल एंट्री व्हिसा मिळतो. पण हे (मूळ) भारतीयाशी लग्न झालेल्या व्यक्तिला नाही मिळतं. ( अर्थातच पाकिस्तान, बांग्लादेश इ. ठिकाणी नागरिकत्व घेतलेलं असल्यास वेगळे नियम आहेत ). सोनिया गांधींना हे कार्ड कधीच मिळणार नाही. पण राहुलगांधीनी उद्या इटलीचे नागरिकत्व घेतलं तर त्यांना हे कार्ड मिळू शकतं, पण हे कार्ड घेउन भारताचं प्रतिनिधीत्व करता येणार नाही.

In reply to by पुष्करिणी

मी त्या पीडीएफ फाईलमधे वाचल्याप्रमाणे भारतीय पासपोर्टधारकाशी लग्न केल्यासही हे कार्ड मिळू शकतं. PIO हे नाव त्यांच्यासाठी चुकीचं ठरतं, पण त्यांनाही हे कार्ड मिळू शकतं असं त्याच फाईलमधे (आणि इतर काही संस्थळांवरही) वाचलं.

इतरला मत दिले आहे.......ती मुद्दामुन हरली फायनलला!

हे एक रौप्य पदक सोडलं तर आत्ता पर्यंत ३० सुवर्ण २२ रौप्य आणि २७ कांस्य पदक मिळाली आहेत. पण त्या बद्दल एक चकार शब्द नाही कुठे. या एकटीचेच का लाड चालवले आहेत मिपावर?

In reply to by गणपा

सुनील यांनी का धागा काढला याचा संदर्भ थोडासा वेगळा आहे/असावा याची मला कल्पना आहे. त्यामुळे त्यांना हे व्यक्तीगत नाही. मात्र गणपाचा प्रश्न वाचून खालील सुचले... जर तुम्ही धार्मिक असाल तर "स्वधर्मीय" जिंकला तर अभिमान वाटतो जर तुम्ही जातीय असलात तर "स्वजातीय" जिंकला तर अभिमान वाटतो जर तुम्ही मनसे/शिसे इष्टाईल असाल तर तुम्हाला "मराठी" जिंकला तर अभिमान वाटतो जर तुम्ही मुंबईतील "कॉस्मोपॉलीटन" असाल तर तुम्हाला "अमराठी" जिंकला तर अभिमान वाटतो जर तुम्ही स्वतःला "सेक्यूलर" समजत असाल तर "अहिंदू" जिंकला तर अभिमान वाटतो (किमान जाहीर कौतूक करावेसे वाटते) जर तुम्ही "वैश्विक" असाल तर तुम्हाला अभिमान न बाळगण्याचाच अभिमान वाटतो ;)

In reply to by विकास

विकासराव आमच्या चष्म्याला काचाच नाहीत हो. :) सानियाने पदक मिळवल त्याच कौतुक आहेच पण मग बाकीच्या खेळाडुंबद्दल कसलाच उल्लेख आजवर झाला नाही. जर का माझ्या नजर चुकीने काही वाचायच रहुन गेल असेल तर कृपया दुवा द्या. (हा हट्ट नाही.) मुळात हा कौलच थोडासा खोडसाळ आणि धार्मीक/जादियवादाला खतपाणी घालणारा वाटला.

In reply to by गणपा

जर का माझ्या नजर चुकीने काही वाचायच रहुन गेल असेल तर कृपया दुवा द्या. चष्म्याचा नंबर तपासा बर. ;) मुळात हा कौलच थोडासा खोडसाळ आणि धार्मीक/जादियवादाला खतपाणी घालणारा वाटला. मला नाही वाटत ताकाला जाऊन भांडे लपवले गेले असे. ;) पण त्याबद्दल कौलप्रस्तावक श्री. सुनीलच अधिक सांगू शकतील.

In reply to by गणपा

मुळात हा कौलच थोडासा खोडसाळ आणि धार्मीक/जादियवादाला खतपाणी घालणारा वाटला कौल किंचित खोडसाळ (मिश्किल) जरूर आहे पण धार्मिक्/जातीयवादाला खतपाणी घालणारा निश्चितच नाही. निदान माझा हेतू तरी तसा नव्हता! बाकी निकाल रोचक आहेत!

In reply to by गणपा

सोनियाताईंनी राजीवजींच्याबरोबर विवाह केल्यावरही कित्येक वर्षें आपले मूळ इटलियन नागरिकत्व त्यागले नव्हते. आणीबाणीनंतर कै. इंदिराजी राजकीय वनवासात गेलेल्या असतांना राजीवजी आणि दोन्ही मुले यांना घेऊन सोनियाताई इटलीतच होत्या असेही विकीपीडियात वाचले. राजीवजींनी राजकारणात प्रवेश केल्यावर जेंव्हां पंतप्रधानकीची खुर्ची खुणावू लागली तेंव्हांच (१९८३ साली) त्यांनी आपला इटालियन पासपोर्ट परत केला व त्याच वेळी (बहुदा) त्यांनी भारतीय नागरिकत्व घेतले असावे. त्यांचा विवाह १९६८ साली झाला होता म्हणजे तब्बल १५ वर्षांनी त्या भारतीय झाल्या! आपण सर्व भारतीय नागरीक मूळच्या परदेशी असलेल्या (व 'सोयी'साठी भारतीय झालेल्या) सोनियाताईना राष्ट्रपती व पंतप्रधान अशा श्रेष्ठींच्या नेमणुका करायलासुद्धा मुभा देतो. मूळ इतालियन असलेल्या बाईला इतके स्वातंत्र्य असताना जन्माने भारतीय असलेल्या व अद्याप भारतीयच असलेल्या सानियाने भारताचे प्रतिनिधित्व केले त्यात कुणालाही कां आपत्ती यावी? सानियाने पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न केले हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे त्यात नाक खुपसायचे कुणालाच कारण नाहीं. मला हा विवाह आवडला नाहीं तो केवळ नवर्‍याच्या धाकात व नवर्‍याच्या सांगण्यावरून तिच्या हातून देशद्रोही कृत्य होऊ नये एवढ्या एकाच कारणामुळे. एवढी काळजी तिने घेतली म्हणजे झाले!