मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ताज्या घडामोडी एप्रिल २०२२

निनाद · · राजकारण
पश्चिम बंगालच्या बसीरहाट जिल्ह्यात एका ११ वर्षीय मुलीवर तिच्या चुलत भावाच्या प्रियकराने, शहर अली सदरने बलात्कार केला. त्याने पीडितेला भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून बाईकवर एका निर्जन भागात नेल्याचे त्याने सांगितले. आरोपीने देखील कबूल केले की आपण मुलगी मेली आहे असे गृहीत धरले होते आणि म्हणून त्याने तिला टाकून दिले. पीडितेची शारीरिक स्थिती इतकी बिघडली होती की, रात्री सुमारे दोन तास त्याच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्यावर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ममता बॅनर्जी यांच्या राज्यात बंगाल मध्ये सुव्यवस्थेची स्थिती खराब होत चालली असल्याचे दिसते आहे.

वाचने 48698 वाचनखूण प्रतिक्रिया 354

In reply to by निनाद

चंद्रसूर्यकुमार 12/04/2022 - 07:59
जर संघाची मते मान्य नाहीत आणि इतका त्याचा त्रास होत आहे तर त्यांच्या प्रमुखाहस्ते पुरस्कार कशाला घ्यायचा?
इतकी साधी गोष्ट पण काही लोकांना समजत नाही. काय करणार. असल्या लोकांच्या तोंडी न लागणे उत्तम.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मुक्त विहारि 12/04/2022 - 18:58
सहमत आहे काही लोकांचे आणि आपले विचार जुळत नसतील तर, अशा लोकांचे प्रतिसाद वाचून, सोडून देणेच उत्तम.... शिवाय, काही लोकांना एक ना धड, भाराभर आयडी घेण्यातच रस जास्त असू शकतो....

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सुरिया 13/04/2022 - 18:17
पुरस्कारासाठी संघाने निवडलेले नाहिये डॉ़क्टर बंगांना. ते संस्थेने निवडलेय. सरसंघचालकांना फक्त पुरस्कार देण्यासाठी त्याच संस्थेने निवडलेय, इतकी साधी गोष्ट न समजता "काय करणार" वगैरे टेपा लावू नका. असल्या लोकांच्या तोंडी म्हणजे, ना तुम्हाला कुणी शिवीगाळ केलीय, ना कुणी अपशब्द वापरलेत तेंव्हा मुद्द्याला प्रतिवाद करता येत नसेल तर गप्प राहावे. विचारवंती भुमिका घेतलीय तर असे त्रागे करु नयेत.

In reply to by निनाद

सुरिया 13/04/2022 - 17:59
हे सगळे असेच भामटे आहेत हो!
संघावर केलेली टीका हे सोडून डॉ. अभय बंग ह्यांन्च्या भामटेगिरीचा एखादा किस्सा सांगू शकाल? पुराव्यासहीत? नसेल सांगता येत तर माफी मागताल सार्वजनिक माध्यमांवर असे लिहिल्याबद्दल? भामटे असतील तर त्यांना पुरस्कार द्यायला सरसंघचालक, भारत सरकार कसे पुढे सरसावतात? अन्यथा ते तेंव्हा भामटे नव्हते, संघावर टीका केली की भामटे झाले असे तुमचे मत आहे का?

In reply to by सुरिया

निनाद 14/04/2022 - 04:22
इतरत्र का बोलत नाहीत? -- गुजरात उच्च न्यायालयाने गेल्या सोमवारी वरियावा अब्दुल वहाब महमूद नावाच्या इस्लामी धर्मोपदेशकाला अटकपूर्व जामीन नाकारला. याने किमान १०० हिंदूंचे इस्लाममध्ये धर्मांतर केल्याचा आरोप आहे. या आधी उत्तर प्रदेश मध्ये गेल्या वर्षी मोहम्मद उमर गौतम आणि मुफ्ती काझी जहांगीर कासमी नावाच्या दोन व्यक्तींनी अवैध धर्मांतर रॅकेट चालवून किमान १००० हिंदूंचे धर्मांतर केले आहे. मग या सर्व कार्याला मदत करणार्‍या संस्थांविषयी यांच्या तोंडून एक शब्द कसा येत नाही? येथे हिंदू भावना दुखावत नाहीत का? -- यावर साळसूद पणे प्रतिसाद टाळला - हे लक्षात आले आहे. हीच ती भामटेगीरी!

In reply to by सुरिया

सुबोध खरे 14/04/2022 - 10:36
डॉ अभय बंग यांचे हे समाजवादी/ गांधीवादी विचारांचे आहेत. त्यामुळे रा स्व संघाचा द्वेष करणे हे वारसा हक्काने येणारच. मग त्याचा आपल्या कामाशी संबंध असो व नसो. कोव्हीड काळात त्यांनी ज्या तर्हेने अकलेचे तारे तोडले आहेत ते पाहून त्यांच्याबद्दल माझा आदर नक्कीच कमी झाला. https://indianexpress.com/article/india/faced-with-the-covid-crisis-gandhi-would-ask-us-to-first-shed-fear-of-virus-dr-abhay-bang-6467093/ कुठल्याही काळात गांधीजींचे विचारच केवळ देशाला तारू शकतील हा भाबडा आशावाद वाचून हेच का डॉ बंग असा विचार आला. https://idronline.org/podcasts/on-the-contrary-podcast-social-impact/health-experts-debate-indias-response-to-the-second-wave-of-covid19/ त्यांचे माझा साक्षात्कारी हृदयविकार हे पुस्तक सुद्धा मी फार आदराने वाचले होते पण मध्यानंतर ते पुस्तक जसे वाहवत गेले ते पाहून मला आश्चर्य वाटले होते. पण नंतर जसे जसे त्यांचे विचार वाचत गेलो तसे त्यांचे विचार कालबाह्य झालेले आहेत असेच माझे मत होत गेले. शेवटी आमच्या गुरूंनी सांगितलेली एक गोष्ट आठवत आहे. एखादा माणूस आपल्या कर्माने एखादे दैदिप्यमान काम करून जातो म्हणजे तो आयुष्यभर उत्तम कामच करत राहील हे मानणे हि फार मोठी चूक आहे. हे फार वेळेस दिसून येत आहे.

In reply to by सुबोध खरे

चंद्रसूर्यकुमार 16/04/2022 - 10:39
सहमत. हल्लीच्या काळातील गांधीवादी एक नंबरचे ढोंगी आहेत याचा पुरावा २६ जानेवारी २०२१ च्या दिल्लीतल्या घटनेनंतर मिळाला. तथाकथित शेतकरी आंदोलनात दिल्लीत धुडगूस घालून पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून २००+ पोलिसांना त्या लोकांनी जखमी केले होते. अन्यथा गांधीजींच्या नावाचा उदोउदो करणार्‍या किती गांधीवाद्यांनी या घटनेचा निषेध केला? आपल्या आंदोलनात हिंसाचार झाल्यानंतर साधनशुचितेला बाधा येते म्हणून पूर्ण आंदोलन गांधीजींनी मागे घेतले होते हे त्यापैकी सगळे लोक विसरले का? समजा सध्याच्या काळात त्या कारणाने आंदोलन मागे घेतले नाही तरी या प्रकारात झालेल्या हिंसाचाराचा गांधीवाद्यांनी निषेध केला का? की मोदींच्या निर्णयाविरोधात आंदोलन होते आणि असे आंदोलन केल्याने मोदी अडचणीत येतील अशी शक्यता असल्याने हिंसाचार झाला तरी तो या स्वयंघोषित गांधीवाद्यांना चालणार्‍यातला होता? हा मुद्दा इन जनरल सगळ्या गांधीवादी म्हणविणार्‍यांना लागू होतो.

In reply to by मुक्त विहारि

वामन देशमुख 11/04/2022 - 20:12
संघाकडून समाजात धार्मिक द्वेषाचे बीज ; डॉ. अभय बंग यांची परखड टीका
आव्हाडांनी कसमुसे यांना आपली बाजू ज्याप्रकारे समजावून सांगितली त्याप्रकारे संघ बंगांना आपली बाजू समजावून सांगणार नाही अशी खात्री असल्याने अशी टीका होत असावी का? --- संघावर यापूर्वी अशी टीका झाली होती का? त्यांनंतर अयोग्य टीका होऊ नये म्हणून संघाने काही पाऊले उचलली होती का? आत्मसन्मान (अयोग्य अशा टीकेपासून बचाव) जपण्यासाठी संघ (खरंतर एकूणच हिंदू नेते) काही करतो का? --- एके काळी एका हिंदू राजाने एका परकीय आक्रमकाला सोळा वेळा पराभूत करून जीवदान दिले होते; सतराव्यांदा मात्र त्याला तशी संधी मिळाली नाही. यातून हिंदू नेते काही शिकलेत का? स्व-अस्तित्वालाच हानी पोहोचवणारा सहिष्णूपणा हिंदू नेते कधी सोडणार का? --

In reply to by मुक्त विहारि

निनाद 12/04/2022 - 05:19
इकोसिस्टिमचा भाग आहेत, तेच बोलणार ज्यासाठी फंड येतो! चतूर फंड गोळा करणारा माणूस आहे. एखाद्या कॉर्पोरेट सारखे चालवात त्यांची संस्था. पैसा किंवा फायदा नसेल तर तेथे कार्य होत नाही. त्यामुळे पैसा आला तितके हे बोलणार आणि पैसा आटला की हे बंद पडणार. दुसरा मुद्दा म्हणजे मोठ्या धोरणाचा हा एक भाग असणार ज्यात यांच्या कडून एक वाक्य बोलवून घ्यायचे. मग त्याचा आधार घेऊन इतर आंदोलने/चळवळी/कार्यक्रम वगैरे निर्माण करायचे.
महसूलमंत्र्यांच्या भावासाठी चक्क बायपास वळवला; ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad/turned-the-bypass-road-for-the-revenue-minister-brother-aurangabad-news-today/amp_articleshow/90770368.cms आजकाल, माझा योगायोगावरती, विश्र्वास बसायला लागला आहे...

In reply to by मुक्त विहारि

औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे वारे आले… नि भर उन्हाळ्यात फळबागा फुलल्या, गुपित काय? https://www.google.com/amp/s/www.tv9marathi.com/maharashtra/aurangabad/aurangabad-paithan-road-gevrai-tanda-villagers-accuses-of-unnecessarily-bypassing-683525.html/amp निव्वळ योगायोग असावा ....
मित्राच्या बर्थडे पार्टीहून रक्तबंबाळ होऊन परतलेल्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू, गँग रेपच्या आरोपाखाली TMC नेत्याच्या मुलाला अटक https://www.lokmat.com/crime/west-begal-minor-girl-dies-after-suspected-gang-rape-tmc-leader-son-arrest-a653/amp/ हाथरसच्या वेळी जसे, परमपूज्य राहुल गांधी मदतीसाठी धावून गेले, तसे इथे नक्कीच जाणार नाहीत, हा माझा अंदाज आहे ...
आता घर विकताना सोसायटीच्या NOC ची गरज नाही: गृहनिर्माणमंत्री आव्हाड यांची घोषणा https://www.tv9marathi.com/latest-news/homeowners-have-the-right-to-own-a-home-it-is-up-to-him-to-decide-who-to-sell-the-house-to-permission-of-the-society-684898.html/amp म्हणजे आता, सोसायटीची देणी बुडवून, एखाद्याने घर विकले तर? आमच्याच सोसायटीत ही भानगड झाली होती. सुदैवाने, घर विकत घेणार्याने, आधीच्या माणसाची, सोसाययटीची देणी फेडली. हाच व्यवहार परस्पर झाला असता, तर सोसायटीचे पैसे एकतर बुडीत खात्यात गेले असते किंवा कोर्ट कचेरीत वेळ वाया गेला असता...
https://www.esakal.com/amp/maharashtra/sharad-pawars-comment-on-raj-thackerays-ultimatum-regarding-musjid-speakers-ss01 कायदा काय म्हणत? त्याप्रमाणे, निर्णय घेणे उत्तम... ह्यात उगाच धर्माला आणण्याची गरज नाही... कारण हाच कायदा, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, ह्या काळांत होणार्या ध्वनी प्रदूषणा बाबतीत देखील राबवता येईल...
13 वर्षीय नाबालिग हिन्दू लड़की से सादिक ने रजत त्यागी बन किया रेप https://hindi.opindia.com/national/haridwar-minor-hindu-girl-rape-accused-sadiq-arrested/amp/ अशा वेळी, परमपूज्य राहुल गांधी आणि त्यांचा परिवार, जाणार नाहीत, असा अंदाज आहे ....
तिरंगे से साइकिल साफ कर रहा था रफीक, वीडियो वायरल होने के बाद लोगों ने दर्ज कराई शिकायत: उत्तराखंड पुलिस ने किया गिरफ्तार https://globaltimesbharat.com/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AB-%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%B9/ अशा माणसांना, काय बोलणार?
रामनवमी की शोभायात्रा पर पथराव में घायल वृद्ध की मौत, हजारों की तादाद में लोग अंतिम यात्रा में हुए शामिल https://www.google.com/amp/s/www.bhaskar.com/amp/local/gujarat/news/the-death-of-an-old-man-injured-in-stone-pelting-on-the-procession-of-ram-navami-thousands-of-people-attended-the-last-journey-129644775.html काय बोलावं ते सुचेना ....

In reply to by श्रीगुरुजी

मुक्त विहारि 14/04/2022 - 09:58
माहिती मिळाल्याशी कारण... आता खालचीच बातमी बघा... मला तरी ही बातमी, मराठी वृत्तपत्रांत मिळाली नाही... ‘हिंदुओं को चुन-चुनकर मार डालना चाहिए, मैं उनकी बहनों का बलात्कार करूँगा’: सबनम और दोस्त नदीम का ऑडियो क्लिप (https://hindi.opindia.com/national/hindus-girls-should-be-raped-and-killed-audio-clip-shabnam-and-nadeem-goes-viral-instagram/)

In reply to by मुक्त विहारि

गामा पैलवान 14/04/2022 - 15:57
मुक्तविहारी, ज्ञानास बंधन नको हे तत्त्वत: बरोबर आहे. नेमक्या याच कारणासाठी मराठीत ज्ञान आणायला हवं. कारण की मराठी अशी ज्ञानाभिमुख बनवल्याने तिचं संवर्धन होईल. ज्ञानावर बंधनं नसल्याने ज्ञानासोबत मराठी भाषेवरची बंधनंही आपसूकंच दूर होतील. आ.न., -गा.पै.

In reply to by श्रीगुरुजी

मुक्त विहारि 14/04/2022 - 20:57
वरील बातम्यातून मला तरी इतकेच समजले की, रामनवमी शोभायात्रा काढली तर, आज दगडफेक झाली, उद्या कदाचित, शस्त्रांच्या सहाय्याने हल्ले देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.... इतरांच्या मनांत काही वेगळे मनन आणि चिंतन होत असेल .... घटना त्याच असल्या तरी, प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने, वेगवेगळी अनुमाने काढत असतातच... साधे एक बॅरोमीटर देखील, इमारतीची उंची मोजायची असेल तर, 5-6 प्रकारे वापरता येते .... मुळ लेख इंग्रजी मध्ये आहे .... जमल्यास जरूर वाचा .... http://wearcam.org/barometer.html

In reply to by श्रीगुरुजी

अमरेंद्र बाहुबली 14/04/2022 - 19:14
मराठी संकेतस्थळावर फक्त मराठी हवे. +१ हिंदीवादी हळूहळू आपली भाषआ लादत चाललेत.

In reply to by कॉमी

दिल्लीसारख्या योजना पंजाब किंवा इतर राज्यांमध्ये मध्ये शक्य नाहीत अशी चर्चा इथे झाली होती, कारण दिल्लीमध्ये केंद्र सरकार जास्त खर्च करते. पण हिमाचल प्रदेश आणि पंजाब दोन्ही राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात सेम योजना राबविल्या जात आहेत.
रशिया-युक्रेन यांच्या संघर्षा मधली सगळ्यात महत्वाची घटना घडली ती म्हणजे युक्रेन ने नेप्च्युन मिसाईल्सचा वापर करुन रशियाची मोस्कोवा काळ्या समुद्रात बुडवली. या घटनेवर अधिकची माहिती :- जाता जाता :- रशियन डिफॉल्टच्या बातम्या परत जालावर दिसत आहेत. [ Russia may be in default, Moody's says ]

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hanuman Chalisa

In reply to by मदनबाण

गामा पैलवान 16/04/2022 - 15:16
मदनबाण, इथे वेगळी माहिती आहे ( इंग्रजी दुवा ) : https://news.usni.org/2022/04/13/russian-navy-confirms-severe-damage-to-black-sea-cruiser-moskva-crew-abandoned-ship या बातमीनुसार मोस्क्वा वर आग लागली होती आणि ती ओढून नेत असतांना आग अनावर होऊन दारुगोळा पेटला व स्फोट होऊन ती बुडाली. मात्र ही आग नेमकी कशाने लागली हे कळू शकलेलं नाही. ते कदाचित क्षेपणास्त्रही असू शकतं. माझ्या मते वरील लेखातलं हे वाक्य महत्त्वाचं आहे :
Moskva the flagship of the Black Sea Fleet was severely damaged and the crew abandoned ship, the Russian Defense Ministry told TASS on Wednesday.
हे जर खरं असेल तर खलाशांना नौका सोडून जायला पुरेसा वेळ मिळालेला दिसतोय. क्षेपणास्त्राने आघात केल्यास इतका वेळ मिळणं असंभव वाटतं. अर्थात, जाणकार याबाबत अधिक प्रकाश टाकू शकतील. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मदनबाण 16/04/2022 - 20:42
मी दिलेला पहिला व्हिडियो आता प्रायव्हेट केला गेला आहे. त्या व्हिडियोत क्षेपणास्त्र जहाजाच्या उजव्या बाजुने येऊन आदळते ते स्पस्ट दिसते. मॉस्को ने हे मान्य केले आहे. इलॉन मस्कच्या स्ट्रारलिंक सॅटलाईट्स चा वापर करुन हा हल्ला पूर्णत्वास नेला गेला. हे फ्लॅगशिप शिप बुडवल्या गेल्याने रशिया चवताळला गेला असुन आता आपण घमासान युद्धाकडे रशियाला वळताना पाहु असे मला असे वाटते... ते इंग्रजीत काय म्हणतात... वी आर स्लीप वॉकिंग इनटू अ न्यूक्लिअर वॉर. जाता जाता :- लंका बुडाली ! [ श्रीलंका डिफॉल्ट झाली. ]

In reply to by मदनबाण

गामा पैलवान 17/04/2022 - 01:44
मदनबाण, ते चलचित्र बघितलं मी. त्यात शेवटी जमिनीवरून केलेलं चित्रण होतं. मोस्क्वा जमिनीच्या इतकी जवळ यायचं संभाव्य कारण एकंच आहे. ते म्हणजे तिला दुरुस्तीसाठी बंदरात ओढून आणत असावेत. अशा वेळेस एखाद्या क्षेपणास्त्राने हल्ला केलेला असू शकतो. या हल्ल्याच्या आधीच खलाशी नौका सोडून गेले असावेत. त्यामुळेच बहुधा प्राणहानी झालेली दिसंत नाही. आ.न., -गा.पै.

कपिलमुनी 16/04/2022 - 16:39
इथे सतत साधू हत्याकांड बद्दल गळा काढणारे भक्त पुजारी बहुधा गोव्यात अल्पवयीन लहान मुलीवर रेप चार्जेस (कोर्टाने ठेवलेत उगा सोमय्या चार्जेस नाहीत ) आसलेल्या माणसाने मंत्री म्हणून घेतलेली शपथ विसरले वाटत. अर्थात आता भाजप मध्ये असल्याने सगळे चार्जेस काळी नदीत धुतले जातील हे १००%

अमरेंद्र बाहुबली 16/04/2022 - 16:49
Kolhapur North By Election Result: "...तर हिमालयात जाईन बोललो होतो"; भाजपाच्या चंद्रकांत पाटलांनी मारली पलटी https://www.lokmat.com/maharashtra/kolhapur-north-by-election-results-bj...

In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्रीगुरुजी 16/04/2022 - 19:23
आता महाराष्ट्रातील विधानसभा व स्थानिक निवडणुकीत भाजपला फारसे भवितव्य दिसत नाही. मागील तीनही विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार आयाराम होते, त्यातील फक्त १ जिंकला. भाजपच्या आताच्या १०६ आमदारांपैकी २ मित्रपक्षांचे आहेत व अंदाजे २० आयाराम आहेत जे बहुतांशी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपने आणलेत. या व्यतिरिक्त निवडून न आलेले आयाराम वेगळेच. पुढील विधानसभा निवडणुक मविआने एकत्रित लढविली तर उमेदवारी न मिळालेले भाजपत येतील. भाजपची वाटचाल राष्ट्रवादीचा 'ब' संघ होण्याच्या दिशेने सुरू आहे. मागील वर्षी बंगालच्या निवडणुकीत भाजपच्या २९४ उमेदवारांपैकी १४८ (म्हणजे निम्याहून अधिक) आयाराम होते व त्यातील फक्त ६ जिंकले. महाराष्ट्रातील पुढील विधानसभा निवडणुकीत साधारणपणे असेच चित्र असेल.
लष्करप्रमुख नरवणे यांच्यासह लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी TATA Advanced System Limited (TASL) आणि भारत फोर्ज या खासगी कंपन्यांनी विकसित केलेल्या अनेक स्वदेशी संरक्षण वाहनांचा लष्कराच्या सामग्रीत समावेश केला. TASL ने सांगितले की, “आपत्कालीन खरेदी धोरणांतर्गत, आम्ही एकट्या लष्करासाठी नऊ IPMV वाहने डिझाइन, विकसित आणि तयार केली आहेत. हे एक विशेष आर्मर्ड संरक्षित वाहन आहे आणि ते पायदळ सैनिकांना सर्व प्रकारच्या भूप्रदेशांमध्ये घेऊन जाऊ शकते, ज्यात उत्तर आणि उत्तर पूर्व क्षेत्रातील उच्च-उंचीच्या प्रदेशांचा समावेश आहे. आम्ही या सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक चाचणी केली आहे आणि दलाच्या ऑपरेशनल आवश्यकता पूर्ण केल्या आहेत. आम्ही भविष्यात अशी आणखी वाहने देऊ शकतो." आता भारताकडून याच्या निर्यातीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

In reply to by निनाद

मुक्त विहारि 18/04/2022 - 19:05
योग्य तो निर्णय नक्कीच घेत आहे .... केंद्रीय पातळीवर, माझी तरी ही पण एक अपेक्षा आहे ..
https://maharashtratimes.com/india-news/a-day-after-satish-kumar-singh-killing-rajput-community-in-shock-and-despair-mulling-leaving-kashmir-valley/articleshow/90854247.cms नेहरूंनी केलेल्या चुकीची फळे निस्तरायला अजून किती तरी वर्षे लागतील ....
रामनवमी हिंसाचाराचा कट विदेशात रचला!; धक्कादायक माहिती उघड https://maharashtratimes.com/india-news/ram-navami-violence-in-khambhat-was-pre-planned-conspiracy-hatched-abroad/articleshow/90864632.cms उदारमतवादी हिंदू, आता काय मत व्यक्त करणार? हे वाचणे रोचक ठरेल ....

In reply to by मुक्त विहारि

रामनवमी जुलूस के दौरान 4 राज्यों में भारी उपद्रव, खरगोन में SP को लगी गोली, गुजरात में 1 की मौत https://www.abplive.com/news/india/during-ram-navami-procession-from-gujarat-to-bengal-there-was-arson-stone-pelting-on-the-procession-one-person-died-in-the-uproar-2099597 गुजरात, मध्य प्रदेश, पश्र्चिम बंगाल आणि झारखंड, येथे एकाच दिवशी दंगल झाली...