तांत्रिकदृष्ट्या नोव्हेंबर महिना सुरू व्हायला काही तासांचा अवधी आहे. तरीही आताच धागा काढत आहे. उद्या नवा धागा काढून काही लिहायला एकसलग वेळ मिळेलच याची खात्री नसल्याने आताच नवा धागा काढत आहे.
या धाग्याच्या गाभ्यात दोन गोष्टी लिहित आहे.
१. ममता बॅनर्जी आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी स्वतःला मोदींच्या विरोधात पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे आणायचा प्रयत्न करत आहेत असे दिसते. माजी मुख्यमंत्री लुईझिनो फालेरो तृणमूलमध्ये आल्यापासून ममता गोवा विधानसभा निवडणुका गांभीर्याने घेत आहेत. काल त्यांनी गोव्यात जाऊन 'काँग्रेस निष्प्रभ झाली असल्याने मोदी इतके बलिष्ठ झाले आहेत' असे वक्तव्य केले. हे वक्तव्य तांत्रिकदृष्ट्या बरोबर दिसले तरी काँग्रेस निष्प्रभ झाल्यामुळे मोदी बलिष्ठ झाले की मोदी बलिष्ठ झाल्याने काँग्रेस निष्प्रभ झाली असा उलटा प्रश्नही विचारता येऊ शकेल. काहीही असले तरी २०२४ मध्ये विरोधी पक्षांचे नेतृत्व काँग्रेसकडे (आणि त्यातही राहुल गांधींकडे) आलेले आपण मान्य करणार नाही असा स्पष्ट संकेत ममतांनी दिलेला दिसतो. विरोधी पक्षातील इतर पक्षांना (द्रमुक, शिवसेना, समाजवादी पक्ष वगैरे) ममतांचे नेतृत्व मान्य करण्यात काही अडचण असेल असे वाटत नाही. मागे स्वतः राहुल गांधींनी पंतप्रधानपदासाठी काँग्रेस दावा करेलच असे नाही असेही म्हटले होते. पण ते प्रत्यक्षात कितपत येते हे बघायचे. मागील एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे काँग्रेसची इतकी वाताहत होऊनही पक्षाला २०१९ मध्ये पूर्ण देशात १२ कोटी मते होती आणि २६० च्या आसपास लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार पहिल्या किंवा दुसर्या क्रमांकावर होते. याचाच अर्थ जवळपास अर्ध्या लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस लढायच्या स्थितीत आहे. म्हणजे इतकी पडझड झाली असली तरी काँग्रेसने आपले राष्ट्रीय स्थान टिकवले आहे. अशा परिस्थितीत ममतांच्या नेतृत्वात विरोधी आघाडी झाली तर आपला नेता पंतप्रधान होणार नाही अशा स्थितीत काँग्रेसची मते सगळी आघाडीला मिळतील का हा प्रश्न आहे. काँग्रेसही आपला दावा इतका सहजासहजी सोडायला तयार होईल का हा पण प्रश्नच आहे. लखिमपूर खेरी प्रकरणावरून इतर कोणत्याही विरोधी पक्षापेक्षा काँग्रेसने जास्त आवाज उठवला यातून काँग्रेसचा स्वतःला ठामपणे पुढे आणायचा हेतू आहे का हा प्रश्न पडतो. तसेच ममता त्यापासून दूर राहिल्या आहेत म्हणजे परत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आपल्याला जायचे नाही हा संदेश ममतांना द्यायचा आहे असे दिसते.
कदाचित यापुढील काळात हा काँग्रेस विरूध्द ममता संघर्ष होऊ शकेल. गोव्यात एकेकाळी काँग्रेस बर्यापैकी ताकद ठेऊन होता पण मागच्या वेळेस निवडून आलेले काँग्रेसचे बरेचसे आमदार भाजपमध्ये गेले आहेत त्यामुळे पक्ष गोव्यात पांगळा झाला आहे. तेव्हा गोव्यात काँग्रेस जिंकायची शक्यता त्यामानाने कमी आहे. उत्तराखंडमध्ये
आणि पुढच्या वर्षी हिमाचल प्रदेशात काँग्रेसला विजयाची शक्यता आहे. या दोन राज्यात अलीकडच्या काळात सत्ताधारी पक्ष विधानसभा निवडणुक जिंकलेला नाही. त्यानंतर मे २०२३ मध्ये कर्नाटकात विधानसभा निवडणुक असेल. कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचे गणित इतर राज्यांपेक्षा पूर्ण वेगळे असते. तेव्हा त्या राज्यात काँग्रेस जिंकल्यास पक्ष सहजासहजी ममतांसाठी मार्ग मोकळा करेल ही शक्यता कमीच.
तेव्हा येणार्या काही महिन्यात परिस्थिती रोचक असेल.
२. ३० ऑक्टोबरला नांदेड जिल्ह्यात देगलूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. या मतदारसंघातून २०१९ मध्ये काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर निवडून आले होते. त्यांनी शिवसेनेच्या सुभाष साबणेंचा पराभव केला होता. काही महिन्यांपूर्वी अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणुक होत आहे. २०१९ मध्ये ही जागा काँग्रेसने जिंकल्यामुळे 'आघाडीचा धर्म' म्हणून महाविकास आघाडीकडून या जागेवर काँग्रेसचा उमेदवार येणे क्रमप्राप्त होते. काँग्रेसने तिथे रावसाहेबांचे चिरंजीव जितेश यांना उमेदवारी दिली आहे. २०१४ मध्ये चारही पक्ष स्वतंत्र लढले होते तेव्हा शिवसेनेचे सुभाष साबणे जिंकले होते. सुभाष साबणे १९९९ आणि २००४ मध्येही मुखेड मतदारसंघातून जिंकले होते. या मतदारसंघाच्या सीमारेषा बदलल्यानंतर साबणे नंतर देगलूरमधून निवडणुक लढवू लागले. तीनदा आमदार असलेल्या सुभाष साबणेंना आता आघाडीच्या धर्मामुळे शिवसेनेकडून निवडणुक लढवता येणार हे स्पष्ट झाल्यावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते आता भाजपचे उमेदवार आहेत. २५ वर्षे युती असताना अनेक मतदारसंघांमधून भाजपने एकदाही निवडणुक लढवली नव्हती. त्यात हा देगलूर मतदारसंघ आहे.२०१४ मध्ये भाजपने पहिल्यांदा तिथे भीमराव क्षीरसागर हा उमेदवार दिला पण त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली. तेव्हा या मतदारसंघात भाजपचे फार बळ आहे असे नाही. तसेच शिवसेनेचे निष्ठावान मतदारही काँग्रेसला किती प्रमाणावर मते देतील हा प्रश्न आहेच. त्यात त्याच सुभाष साबणेंना भाजपने उमेदवारी दिल्याने ते अशी मते आपल्याकडे वळवू शकतील का यावर या पोटनिवडणुकीचा निकाल अवलंबून असेल. सध्या तरी भाजपचे पारडे हलके वाटत आहे. मतमोजणी २ नोव्हेंबरला होणार आहे.
वाचने
23180
प्रतिक्रिया
163
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोण करणार? मनसे की वंचित
In reply to औरंगाबादचे, संभाजीनगर कधी होणार....? by Nitin Palkar
गडचिरोलीत २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान
सुतक?
In reply to गडचिरोलीत २६ नक्षलवाद्यांना कंठस्नान by Nitin Palkar
ठार झालेल्यांमध्ये मिलिंद
In reply to सुतक? by चंद्रसूर्यकुमार
हो
In reply to ठार झालेल्यांमध्ये मिलिंद by श्रीगुरुजी
जे.एन.यु
In reply to सुतक? by चंद्रसूर्यकुमार
प्रश्न . .
In reply to जे.एन.यु by चंद्रसूर्यकुमार
नक्षलवादी
In reply to प्रश्न . . by सुक्या
धन्यवाद चंद्रसूर्यकुमार . .
In reply to नक्षलवादी by चंद्रसूर्यकुमार
अमरावती हिंसाचार
औरंगाबादेत शिवसेनेच्या आक्रोश मोर्चाला सुरुवात,
2018 साली झालेल्या भारत रशिया
मोदी है तो मुमकिन है ..
In reply to 2018 साली झालेल्या भारत रशिया by रात्रीचे चांदणे
राष्ट्र प्रथम ....
In reply to मोदी है तो मुमकिन है .. by Nitin Palkar
s400 करारानंतर अमेरिकेचे व्यापारी निर्बंधाची टांगती तलवार ....
In reply to 2018 साली झालेल्या भारत रशिया by रात्रीचे चांदणे
भारत सरकारने अमेरिकेच्या
In reply to 2018 साली झालेल्या भारत रशिया by रात्रीचे चांदणे
गौतम बुद्धांनी कधीही जगावर युद्ध लादले नाही – योगी आदित्यनाथ
“हिंदूंवरील हल्ल्यांविरोधात भागवतांनी आंदोलन करत ....
अमरावती महापालिका
ह्या माहिती बद्दल धन्यवाद....
In reply to अमरावती महापालिका by श्रीगुरुजी
बळवंत मोरेश्वर उपाख्य
ब.मो.पुरंदरे, यांना आदरांजली
In reply to बळवंत मोरेश्वर उपाख्य by श्रीगुरुजी
_/\_
In reply to बळवंत मोरेश्वर उपाख्य by श्रीगुरुजी
बाळासाहेबांच्या तालमीत तयार
जीवेत शरदः शतम
In reply to बाळासाहेबांच्या तालमीत तयार by अमरेंद्र बाहुबली
शिवसेनेचे हिंदूत्व आणि मराठी बाणा ...
In reply to जीवेत शरदः शतम by चंद्रसूर्यकुमार
तथास्तु! शिवसेना संपत आली तर
In reply to जीवेत शरदः शतम by चंद्रसूर्यकुमार
मनसे आहे
In reply to तथास्तु! शिवसेना संपत आली तर by श्रीगुरुजी
कपटी मित्रापेक्षा दिलदार
In reply to तथास्तु! शिवसेना संपत आली तर by श्रीगुरुजी
शिवसेना स्वतःच कपटी
In reply to कपटी मित्रापेक्षा दिलदार by अमरेंद्र बाहुबली
महाविद्यालय परिसरात नमाज पठणावरून वाद ;
Malegaon हिंसाचाराची भयंकर साखळीः 1 नगरसेवक, 1 आक्षेपार्ह क्लिप,
'कितीही आवाज दाबला तरी आता हिंदू मार खाणार नाही’,
शिवशाहिरांना विनम्र
मदनबाण.....
वर लिहिले तेच पुन्हा लिहितो.
In reply to शिवशाहिरांना विनम्र by मदनबाण
कांजुरमार्ग कारशेडला तूर्त स्थगितीच
नैराश्यग्रस्त राजकीय घटकांमुळे शांततेला गालबोट- शरद पवार
राष्ट्रवादीची युवती प्रमुख कार्यकर्ती निघाली 'बबली',
हिंदुंना एकत्र करण्यासाठी दारुच्या पैशांची गरज पडत नाही....
हिंदुंची दुकान तोडली, जाळली, त्यावर कोणी बोललं का? - देवेंद्र
हिंदूहीतासाठी फडणवीसानी
In reply to हिंदुंची दुकान तोडली, जाळली, त्यावर कोणी बोललं का? - देवेंद्र by मुक्त विहारि
आता असे वाटते की, भाजपने योग्यच केले ....
In reply to हिंदूहीतासाठी फडणवीसानी by अमरेंद्र बाहुबली
बिहारात मात्र ऊलटय.
In reply to आता असे वाटते की, भाजपने योग्यच केले .... by मुक्त विहारि
आपल्या वाचना विषयी, आमच्या मनांत आधीही शंका न्हवती...
In reply to बिहारात मात्र ऊलटय. by अमरेंद्र बाहुबली
ज्याचा जागा अधिक त्याचा
In reply to आता असे वाटते की, भाजपने योग्यच केले .... by मुक्त विहारि
रस्त्यावर विमान उतरवले
रस्त्यावर विमान उतरवले
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to रस्त्यावर विमान उतरवले by Nitin Palkar
आपले राज्य सरकार मात्र
In reply to माहिती बद्दल धन्यवाद by मुक्त विहारि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- किसी के पास यकीन का कोई इक्का हो तो बतलाना... हमारे भरोसे के तो सारे पत्ते जोकर निकले.बाटगी सेना प्रश्न
In reply to आपले राज्य सरकार मात्र by मदनबाण
बाटगी सेना प्रश्न सोडवण्यासाठी नव्हे तर निर्माण करण्यासाठी सत्तेत आलेली आहे.आपण ५ वर्षे काहीतरी प्रचंड काम केलंय असं वारंवार सांगणाऱ्यांनी अशा संपत आलेल्या पक्षाला खूप जास्त जागा देऊन स्वतःच्या जागा कमी करून स्वत:चे नुकसान का करून घेतले? मुळात सेना मुख्यमंत्रीपदावर हक्क सांगू शकेल इतके सेनेचे आमदार निवडून आणण्यासाठी कोणी व का मदत केली? सेना व भाजपत जे काही ठरले होते ते दोन्ही बाजूंनी एकत्र येऊन जाहीर का केले नव्हते? भविष्यात पुन्हा एकदा सेनेशी युती करून स्वतःच्या पायांवर पुन्हा एकदा कु-हाड मारून घेण्यास भाजपचे नेते एका पायावर तयार असतील याची मला खात्री आहे.