Skip to main content

ताज्या घडामोडी - ९

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 07/08/2017 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
१५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा.

वाचने 73244
प्रतिक्रिया 154

प्रतिक्रिया

In reply to by अमितदादा

महाराष्ट्रातील भाजप सरकार ला सुरवातीला राष्ट्रवादीने इंडिरेक्टली मदत केलेली विसरलात का की गुजरात मध्ये राष्ट्रवादीच्या आमदाराने भाजप ला राज्यसभे ला मदत केली हे विसरलात. पुण्या सारख्या अनेक शहरात राष्ट्रवादी चे बागलबच्चे भाजप घेऊन पोसतोय हे विसरलात. की मोदी जाहीर सभेत येऊन पवार हे माझे राजकीय गुरु आहेत हे म्हणलेलं विसरलात. १) भाजपने न मागता राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केला होता. भाजपने तो स्वीकारला नव्हता. २) गुजरातमध्ये तसेच घडले आहे. ३) पुण्यात राष्ट्रवादीचे कोणते बगलबच्चे भाजप पोसतोय? ४) मोदींच्या पवारस्तुतीमागील उपरोध लक्षात आलेला दिसत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

1. म्हणजे यात आतमध्ये काही गुप्तगु झाले नसतील असे म्हणायचे आहे का. काहीही हा श्री...गुरुजी 3. लक्ष्मण जगताप कोण आहेत? 4. उपरोध? काय सांगता. म्हणजे हे असे झाले की भाजप ची काही आश्वासने हे जुमले होते आणि काही टीका/स्तुती ह्या उपरोध होत्या. यापुढे भाजप ने आश्वासन किंवा टीका करताना disclaimer द्यावं एक मोठं स्टार करून, की आम्ही जे आता बोलतोय ते भविष्यात जुमला किंवा उपरोध म्हणून धरावा। (हलके घ्या ही विनंती)

In reply to by अमितदादा

१) नक्की काय गुप्तगु झाले? ३) लक्ष्मण जगताप म्हणजे अनेक बगलबच्चे? आणि राष्ट्रवादीतल्या भाजपच्या बगलबच्च्यांचं काय? ४) आयुष्यभर राजकारण करून ज्याला ४-५ जिल्ह्यांच्या पलिकडे अस्तित्व नाही, तो देशात बहुमत मिळविणाऱ्याचा गुरु असेल तर ईशांत शर्माला डेल स्टेनचा गुरु समजावे लागेल.

In reply to by श्रीगुरुजी

1. 1. मला नाही माहीत काय झाले म्हणून, मात्र काहीतरी गुप्तगु झाले असणार हे माझे मत आहे. याचा पुरावा काय तर काही नाही मग संशय का तर दोन्ही पक्षाचे परस्थितिजन्य एकमेकांना फायदा होईल असे वागणे. अजित पवार ना अटक करणार असे विनोद तावडे म्हणाले होते कधी होणार अटक, कधीच नाही कारण दोन्ही पक्षाचं एकमेकांना धरून असणे. या विधानाला पुरावा काय तर काही नाही माझे आतापर्यंत चे वाचनातून बनवलेलं मत, जसे भाजप बाबत तुमचं मत आहे तस. 2. 2. लक्ष्मण जगताप तुम्हाला छोटी असामी वाटली काय? राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड मधील कर्तेधरते होते ते, फक्त ते नाहीत आले भाजपात तर त्यांना मानणाऱ्या नगरसेवकांना घेऊन आलेत ते. हे आहेत राष्ट्वडीचे बच्चे. बरं हे एक उदाहरण आहे का तर नाही सांगलीचे खासदार संजय काका पाटील, नंदुरबार चे भ्रष्ट मंत्री विजयसिंह गावित आणि खासदार हिना गावित तसेच यांच्या कार्यकर्त्यांची फळी आहे अशी भाजप मध्ये आलीय। आठवल्यास आणखी उदाहरणे देतो। 3. 3. अचरेकरांची शतके सचिन पेक्षा जास्त आहेत काय? तुमचं अरगुमेन्ट अयोग्य आहे, परंतु मला हे माहीत आहे की पवार हे काय मोदींचे गुरू नाहीत पण यातून सांगायचा मुद्दा असा की मोदी त्यांचा दृष्टीने भ्रष्ट पक्ष किंवा त्यांचे प्रमुख याच्याशी राजकारणासाठी हातमिळवणी करू शकतात. BJP is no more a party with difference.

In reply to by अमितदादा

मला नाही माहीत काय झाले म्हणून, मात्र काहीतरी गुप्तगु झाले असणार हे माझे मत आहे. याचा पुरावा काय तर काही नाही I rest my case. लक्ष्मण जगताप तुम्हाला छोटी असामी वाटली काय? राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड मधील कर्तेधरते होते ते, फक्त ते नाहीत आले भाजपात तर त्यांना मानणाऱ्या नगरसेवकांना घेऊन आलेत ते. हे आहेत राष्ट्वडीचे बच्चे. बरं हे एक उदाहरण आहे का तर नाही सांगलीचे खासदार संजय काका पाटील, नंदुरबार चे भ्रष्ट मंत्री विजयसिंह गावित आणि खासदार हिना गावित तसेच यांच्या कार्यकर्त्यांची फळी आहे अशी भाजप मध्ये आलीय। आठवल्यास आणखी उदाहरणे देतो अशी येजा प्रत्येक पक्षातच सुरू असते. राष्ट्रवादीत तर सेना व भाजपच्या बगलबच्च्यांची भाऊगर्दी आहे. अचरेकरांची शतके सचिन पेक्षा जास्त आहेत काय? तुमचं अरगुमेन्ट अयोग्य आहे, परंतु मला हे माहीत आहे की पवार हे काय मोदींचे गुरू नाहीत पण यातून सांगायचा मुद्दा असा की मोदी त्यांचा दृष्टीने भ्रष्ट पक्ष किंवा त्यांचे प्रमुख याच्याशी राजकारणासाठी हातमिळवणी करू शकतात. BJP is no more a party with difference. आचरेकर म्हणजे ईशांत शर्मा! धन्य आहे. मोदींनी पवारांशी नक्की कोठे व कशी हातमिळवणी केलीये ते सांगता का जरा (स्वत:चे मत नको. प्रत्यक्ष उदाहरणे द्या.). परंतु मला हे माहीत आहे की पवार हे काय मोदींचे गुरू नाहीत तेच सांगितले मी. मोदी जे म्हणाले ते उपरोधिक होते. काही भाबडे त्यास सत्य समजून आगपाखड करतात.

In reply to by श्रीगुरुजी

अशी येजा प्रत्येक पक्षातच सुरू असते. राष्ट्रवादीत तर सेना व भाजपच्या बगलबच्च्यांची भाऊगर्दी आहे.
हे जर तुम्हाला माहित होतं तर पहिल्या प्रतिसादात का विचारलं की कुठे आहेत की बागलबच्चे म्हणून ? याचा अर्थ उघडे पडल्याशिवाय चूक मान्य करायची नाही. तुमचं वाक्य हेच सिद्ध करतंय जे मी म्हणतोय ते की bjp is no more party with difference.
मोदींनी पवारांशी नक्की कोठे व कशी हातमिळवणी केलीये ते सांगता का जरा (स्वत:चे मत नको. प्रत्यक्ष उदाहरणे द्या.)
महाराष्ट्रातील आणि गुजरात मधील पाठिंबा अजित पवार यांची चोकशी थंडावणे ही काय माझी उदाहरणे आहेत काय? या गोष्टी का होतायत हे सामान्य लोकांना कळतंय जरी बाहेर पुरावे नसले तरी, तुमच्या सारख्या भाजप समर्थकांना हे दैवी योगायोग वाटणार किंवा राष्ट्वडी स्वतःहून भाजप वर उपकार करतेय असे वाटणार यात काय शंका नाही.
तेच सांगितले मी. मोदी जे म्हणाले ते उपरोधिक होते. काही भाबडे त्यास सत्य समजून आगपाखड करतात
याच थोडं स्पष्टीकरण देतो, मोदी नि पावरबाबत exagration केलं हे मान्य, परंतु पवार हे मोदी ना आदर्श आहेत हे नक्की याच करण जेंव्हा upa च सरकार होत तेंव्हा पवार सोडून सगळ्या केंद्रीय मंत्र्यांनी मोदी शी असहकार पुकारला होता. पवार यांनी मोदींची शेती आणि अन्न प्रशासन विभागाच्या संदर्भातील कामे केली होती, हे मोदी नि मान्य केलंय. तसेच गरज भासल्यास आपण पवारांचा सल्ला घेतो हे ही मान्य केलाय. पवार आणि मोदी यांचा असणार सौख्य चा भाजप आणि राष्ट्रवादी च्या love and hate relationzhip च गुपित आहे. लोक मोदींच स्टेटमेंट आहे असे घेऊन आगपाखड नाही करत तर त्यांचं निवडणुकी आधीच टीका आणि।निवणुकी नन्तर च सौख्य आणि जवळीक पाहून टीका करतायत हे कधी तरी लक्षात घ्या।

In reply to by अमितदादा

भाजप राष्ट्रवादी संबंधावर ताज्या घडामोडी ८ ह्या भागात देखील माझी आणि श्रीगुरुजी ह्यांची चर्चा झाली होती. पण पडद्यामागे गुफ्तगु न होता आणि भाजपाने न मागता देखील राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता ह्या आपल्या भाबड्या मतावर ते ठाम आहेत. आणि जरी त्यांनी न मागता पाठिंबा दिला तरी भाजपाने का घेतला ह्याचे कोणतेही उत्तर त्यांच्याकडे नाही. कोणतीही चर्चा करताना मी दोनच गोष्टी लक्षात ठेवतो. एक म्हणजे माणसाची मते शक्यतो कधीही बदलत नाहीत आणि दुसरी म्हणजे झोपलेल्या माणसाला उठवता येते झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही.

In reply to by अभिजीत अवलिया

पण पडद्यामागे गुफ्तगु न होता आणि भाजपाने न मागता देखील राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता ह्या आपल्या भाबड्या मतावर ते ठाम आहेत. आणि जरी त्यांनी न मागता पाठिंबा दिला तरी भाजपाने का घेतला ह्याचे कोणतेही उत्तर त्यांच्याकडे नाही.
अगदी अगदी. राजकारणामध्ये मोठी लोक आपल्यासारख्या सामान्य लोकांना फाट्यावर मारून स्वतःचा सोयीनुसार निर्णय घेत असतात हे वेळोवेळी सिद्ध झालाय (ताज उदाहरण नितीश कुमार), भाजप हि राजकारण्यांचे याच माजलेल्या मनोवृत्तीचा प्रतिनिधीत्व करणारा एक पक्ष आहे. नितीश कुमारवर बिहार मध्ये टीका करताना मोदी नि त्यांचा dna मध्ये मिलावट आहे असे काहीतरी म्हंटले होते आणि मते मागितली होती, आता मोदी नि जेनेटिक science वापरून मिलावट दूर केली काय ? शेवटी सत्ता महत्वाची तत्वे आणि विचारसरणी हि बोलायची गोष्ट आहे भाजप साठी सुद्दा हे आता भाजपेयीनी मान्य करावे.

In reply to by अमितदादा

आता मोदी नि जेनेटिक science वापरून मिलावट दूर केली काय ?
हो शक्य आहे. तसे पण जेनेटिक science आपल्याकडे पूर्वीपासून होतेच म्हणा. कर्णाचा जन्म किंवा गणपतीला हत्तीचे तोंड बसवले गेले होतेच. http://www.thehindu.com/todays-paper/tp-in-school/genetic-science-exist… त्यामुळे रक्तातील मिलावट दूर करणे म्हणजे किस झाड की पत्ती.

In reply to by अभिजीत अवलिया

भाजप राष्ट्रवादी संबंधावर ताज्या घडामोडी ८ ह्या भागात देखील माझी आणि श्रीगुरुजी ह्यांची चर्चा झाली होती. पण पडद्यामागे गुफ्तगु न होता आणि भाजपाने न मागता देखील राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता ह्या आपल्या भाबड्या मतावर ते ठाम आहेत. आणि जरी त्यांनी न मागता पाठिंबा दिला तरी भाजपाने का घेतला ह्याचे कोणतेही उत्तर त्यांच्याकडे नाही. यात भाबडे काय आहे? जर भाजपने स्वतःहून राष्ट्रवादीचा पाठिंबा मागितला होता अशी खात्रीशीर माहिती असेल तर त्याचे संदर्भ द्यावेत ही विनंती. जर त्यांच्यात काही गुप्तगु झाले असेल तर त्याची माहिती द्यावी ही विनंती. राष्ट्रवादीने स्वतःहून पाठिंबा दिला होता, तरीही भाजपने तो स्वीकारलेला नव्हता ही वस्तुस्थिती आहे. यापेक्षा काही वेगळे झाले असेल तर त्याचे संदर्भ द्यावेत ही विनंती. कोणतीही चर्चा करताना मी दोनच गोष्टी लक्षात ठेवतो. एक म्हणजे माणसाची मते शक्यतो कधीही बदलत नाहीत आणि दुसरी म्हणजे झोपलेल्या माणसाला उठवता येते झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही. माझे देखील हेच मत आहे.

In reply to by अमितदादा

होते , अमेरिकेने व्हिसा नाकारलेले तेव्हा इस्राईल ला पवार साहेब त्यांना शिष्टमंडळातून घेऊन गेले , अदानी हे १९८८ पासून पवार आणि प्रफुल भाई पटेल ह्यांच्या संपर्कात होते . त्याची मदत मोदी ह्यांना झाली . उगाच नाही आल्या आल्या पदमविभूषण , अगदी बारामती ला जाऊन भेटी , दिल्लीत भेटी , पवार ह्यांचा सल्ला नेहमी घेतो हे जाहीर सांगितले . पवार ह्यांचा काही फायदा आहे का आता मोदींना . तरी सांगत आहेत . भाबड्या आशेवर ,संघ , मोदी कसे स्वच्छ ह्या विश्वासावर असलेल्याना शुभेच्छा .

In reply to by वरुण मोहिते

अमेरिकेने व्हिसा नाकारलेले तेव्हा इस्राईल ला पवार साहेब त्यांना शिष्टमंडळातून घेऊन गेले , अदानी हे १९८८ पासून पवार आणि प्रफुल भाई पटेल ह्यांच्या संपर्कात होते . त्याची मदत मोदी ह्यांना झाली . उगाच नाही आल्या आल्या पदमविभूषण , अगदी बारामती ला जाऊन भेटी , दिल्लीत भेटी , पवार ह्यांचा सल्ला नेहमी घेतो हे जाहीर सांगितले . पवार ह्यांचा काही फायदा आहे का आता मोदींना . तरी सांगत आहेत . भाबड्या आशेवर ,संघ , मोदी कसे स्वच्छ ह्या विश्वासावर असलेल्याना शुभेच्छा . २००६ मधील त्या भेटीत सर्वपक्षीय शिष्टमंडळ होते. त्यात अनेक राज्यांचे प्रतिनिधी होते. त्यात पवारांबरोबर तत्कालीन राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, मोदी, सिब्बल, कमलनाथ, ओरिसा/नागालँड सह अनेक राज्यांचे मंत्री व वरीष्ठ अधिकारी होते. इस्राईली नेत्यांसमोर वसुंधरा राजेंनी एक पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनसुद्धा केले होते. त्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात पवारांबरोबर मोदी होते म्हणजे त्यांचे साटेलोटे होते असा अर्थ काढायचा असेल तर सिब्बल, कमलनाथ इ. चे सुद्धा मोदींबरोबर व वसुंधरा राजेंसहीत अनेक पक्षांबरोबर साटेलोटे होते असा बादरायण संबंध लावावा लागेल. बारामतीला भेट दिलेले मोदी हे एकमेव मोठे नाहीत. यापूर्वी माजी पंतप्रधान चंद्रशेखर, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी इ. नी सुद्धा पवारांच्या आमंत्रणावरून बारामतीला भेट दिलेली आहे. राष्ट्रीय नेत्यांना बारामतीला आमंत्रण देऊन त्यांचा पाहुणचार करणे व शिष्टाचार म्हणून ते यजमानाबद्दल ४ शब्द बरे बोलतात ते माध्यमातून छापून आणून आपले महत्त्व वाढविणे हा पवारांचा जुना छंद आहे. मी पवारांचा सल्ला घेतो इ. सांगणे हे उपरोधिक आहे हे लक्षात आलेले दिसत नाही.

In reply to by अमितदादा

हे जर तुम्हाला माहित होतं तर पहिल्या प्रतिसादात का विचारलं की कुठे आहेत की बागलबच्चे म्हणून ? याचा अर्थ उघडे पडल्याशिवाय चूक मान्य करायची नाही. मुळात तुम्ही लिहिलंत की भाजपने अनेक शहरात राष्ट्रवादीचे
अनेक
बगलबच्चे घेतलेले आहेत. मी विचारल्यावर फक्त एक बगलबच्चा सांगितलात. पुन्हा विचारल्यावर अजून ३-४ बगलबच्चांची नावे दिलीत. फक्त ३-४ नावे म्हणजे अनेक शहरातील अनेक बगलबच्चे होतात का? असले २-४ चिल्लर बगलबच्चे भाजपमध्ये किंवा इतर कोणत्याही पक्षात गेले तर पक्षाला फारसा फरक पडत नाही. असे चिल्लर नेते इकडून तिकडे ये-जा करीत असतातच. तुमचं वाक्य हेच सिद्ध करतंय जे मी म्हणतोय ते की bjp is no more party with difference. बरं नसू देत. महाराष्ट्रातील आणि गुजरात मधील पाठिंबा अजित पवार यांची चोकशी थंडावणे ही काय माझी उदाहरणे आहेत काय? या गोष्टी का होतायत हे सामान्य लोकांना कळतंय जरी बाहेर पुरावे नसले तरी, तुमच्या सारख्या भाजप समर्थकांना हे दैवी योगायोग वाटणार किंवा राष्ट्वडी स्वतःहून भाजप वर उपकार करतेय असे वाटणार यात काय शंका नाही. अजून किती वेळा सांगायचं की हा पाठिंबा भाजपने मागितला नव्हता व राष्ट्रवादीने तो स्वतःहून दिला होता व भाजपने तो स्वीकारलेला नव्हता. अजित पवारांची चौकशी अजिबात थंडावलेली नाही. २०१४ पासून राष्ट्रवादीवर भरपूर वेळा कुर्‍हाड चाललेली आहे. गुगलल्यास त्याविषयी माहिती मिळेल. याच थोडं स्पष्टीकरण देतो, मोदी नि पावरबाबत exagration केलं हे मान्य, परंतु पवार हे मोदी ना आदर्श आहेत हे नक्की याच करण जेंव्हा upa च सरकार होत तेंव्हा पवार सोडून सगळ्या केंद्रीय मंत्र्यांनी मोदी शी असहकार पुकारला होता. पवार यांनी मोदींची शेती आणि अन्न प्रशासन विभागाच्या संदर्भातील कामे केली होती, हे मोदी नि मान्य केलंय. तसेच गरज भासल्यास आपण पवारांचा सल्ला घेतो हे ही मान्य केलाय. पवार आणि मोदी यांचा असणार सौख्य चा भाजप आणि राष्ट्रवादी च्या love and hate relationzhip च गुपित आहे. लोक मोदींच स्टेटमेंट आहे असे घेऊन आगपाखड नाही करत तर त्यांचं निवडणुकी आधीच टीका आणि।निवणुकी नन्तर च सौख्य आणि जवळीक पाहून टीका करतायत हे कधी तरी लक्षात घ्या। पवार यांनी मोदींची शेती आणि अन्न प्रशासन विभागाच्या संदर्भातील कामे केली होती, हे मोदींनी कधी मान्य केलंय? पवारांनी मोदींची नक्की कोणती कामे केली? "गरज भासल्यास आपण पवारांचा सल्ला घेतो" हे सुद्धा उपरोधिक वाक्य आहे. हे खरे समजणे म्हणजे आपण चौथी नापासाची शिकवणी लावलीये असे एखाद्या विद्यावाचस्पतीचे म्हणणे खरे समजण्यासारखे आहे. निवणुकीपूर्वी किंवा नंतर आजतगायत भाजप व राष्ट्रवादीची जवळीक कोठेही दिसलेली नाही. मागील ३ वर्षात झालेल्या सर्व निवडणुकीत राज्यात व राज्याबाहेर दोन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले आहेत. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादीने रालोआच्या उमेदवाराला मत दिलेले नाही. राष्ट्रवादीचे काही नेते तुरूंगात आहेत. लवासाची विशेष परवानगी काढून घेण्यात आली आहे. राज्य सहकारी बँक व इतर सहकारी संस्थावरील राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडून काढण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

पवार यांनी मोदींची शेती आणि अन्न प्रशासन विभागाच्या संदर्भातील कामे केली होती, हे मोदींनी कधी मान्य केलंय? पवारांनी मोदींची नक्की कोणती कामे केली?
खलील लिंक वाचा बातमी मोदींच्या तोंडून डायरेक्ट "I keep talking with Pawar at least twice or thrice a month and we exchange notes on various issues faced by the country. We need to use Pawar’s more than five decades (of) experience in the public life.” Whenever the UPA (United Progressive Alliance) government used to block schemes and projects related to Gujarat, as the chief minister I used to always seek help from Pawar and...he used to help me sort out my issues with the central government,” आता कृपया मोदींना खोटे ठरवू नाका.

In reply to by अमितदादा

तुमच्या भाबडेपणाचे कौतुक वाटते. पवारांनी मोदींना बारामतीला आमंत्रित केल्यानंतर बारामतीत मोदींनी हे सांगितले होते. आपल्याला एखाद्याकडे आमंत्रण दिले व तिथे आपला पाहुणचार केला तर आपण शिष्टाचार म्हणून त्या व्यक्तीबद्दल दोनचार बरे शब्द बोलतो. त्याच्या घराचे, मुलांचे वगैरे कौतुक करतो. शिष्टाचार या पलिकडे त्यात अर्थ नसतो. इथेही तसेच आहे. शिष्टाचार म्हणून मोदींनी मावळते राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्यावरही स्तुतीसुमने उधळली आहेत. ज्या व्यक्तिणे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशात आपली प्रतिमा निर्माण करून बहुमत मिळविले ती व्यक्ती एखाद्या राज्यात ४-५ जिल्ह्यांच्या पलिकडे अस्तित्व नसणार्‍याचा काय कप्पाळ सल्ला घेणार? असे करणे म्हणजे सचिन तेंडुलकरने फलंदाजीसाठी एखाद्या शाळकरी मुलाकडून टिप्स घेण्यासारखे आहे.

In reply to by श्रीगुरुजी

अवघड आहे, जेंव्हा आपण कुणाचे कौतुक करतो तेंव्हा ते वस्तुस्थितीचा विचार करून करतो, जी लोक वस्थुस्थितीचा विचार न करता बोलतात किंवा कौतुक करतात त्यांना मूर्ख, खोटारडे, आणी लालघोटे करणारे समजले जाते. आता मान्य करा की एकतर मोदी खरं बोलले किंवा ते खोटारडे/ थापडे आहेत ते. नाहीतर असे म्हणा मोदी खोटी स्तुती करतात आणि खरी टीका करतात ते. असो आम्ही भाबडी लोक, आम्हीच थांबतो आता.

In reply to by अमितदादा

अहो, एखाद्याच्या निमंत्रणावरून आपण त्याच्याकडे गेलो आणि त्याने आपला पाहुणचार केला तर त्याच्याबद्दल चार शब्द चांगले बोलणे हा सर्वसंमत शिष्टाचार असतो. त्याच्या घरी काही खटकले किंवा चुकीचे वाटले तरी त्याकडे फारसे लक्ष न देता आपण त्याचे तोंडभरून कौतुक करतो. जेवणात काही कमीजास्त असले तरी त्याबद्दल टिप्पणी न करता गृहिणीच्या स्वयंपाकाचे कौतुक करतो. इथे खर्‍याखोट्याचा संबंधच नाही. हा शिष्टाचार आहे. असल्या कौतुकाच्या शब्दांना फारसे गांभिर्याने घ्यायचे नसते. यापूर्वी जेटली, प्रणव मुखर्जी, चंद्रशेखर इ. नी सुद्धा पवारांच्या आमंत्रणावरून बारामतीला भेट देऊन त्यांचे कोडकौतुक केले आहे. ते फक्त एका कानाने ऐकून घेऊन दुसर्‍या कानाने सोडून द्यायचे असते. त्यावर फार विचार करायचा नसतो.

In reply to by अमितदादा

४-५ दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेत पवारांच्या राजकीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला गेला. दुसर्‍याच दिवशी साम्यवादी नेते गणपतराव देशमुख व इंदिरा गांधींबद्दलही असाच ठराव मंजूर केला गेला. दोन्ही दिवशी तिन्ही नेत्यांबद्दल सर्वपक्षीय नेत्यांनी गौरवोद्गार काढले. त्यांच्यावर भरपूर स्तुतीसुमने उधळण्यात आली. त्यांच्याबाबत असलेल्या कटु गोष्टींचा चुकुनही उच्चार केला नाही. विधानसभेतील ती भाषणे त्या ठरावापुरतीच मर्यादीत होती. त्यावर जास्त विचार करण्याची गरज नव्हती.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी तो एक शिष्टाचार असतो. आता ह्यांच्या कडे किंवा ज्याना हे नेत्रुत्व मानतात त्यांच्याकडे ना तर मुद्दे कुठले असतात हे ओळखता येतात ना त्या मुद्दाना त्यांना जनतेच्या मध्ये नेउन ऐका आंदोलनाच रुप देउन त्या मुद्दांना न्याय मिळवुन देण्याची कुवत कुठल्या विरोधि नेत्यांमध्ये राहिलिय. मोदि दर आठ पंधरा दिवसाला एक खुळखुळा देतात बसा वाजवत लेको. ऐ सर्किट बता ऐसे रोतलु से कौन शादि करेगा ;)

In reply to by थिटे मास्तर

एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या समारंभात शिष्टाचार म्हणून चार बरे शब्द बोलले तर लगेच त्या दोघांचे साटेलोटे आहे, त्यांचे डील झाले आहे असा निष्कर्ष काढणार्‍यांची गंमत वाटते. २००१ मध्ये पवारांच्या ६१ व्या वाढदिवसादिवशी दिल्लीत एका जाहीर समारंभात सर्वपक्षीय नेते हजर होते व त्या सर्वांनी त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली होती. २०१५ मध्ये पवारांच्या ७५ व्या वाढदिवशी पुन्हा एकदा एका सर्वपक्षीय जाहीर समारंभात पवारांबद्दल स्तुतीसुमने उधळली गेली. त्या समारंभात सोनिया गांधी, येचुरी, मोदी, कराट असे डावीकडून उजवीकडील सर्व नेते हजर होते. दस्तुरखुद्द सोनिया गांधींनी देखील पवारांचे कौतुक केले होते. म्हणजे सर्व पक्षाच्या सर्व नेत्यांबरोबर पवारांचे डील झाले होते असा अर्थ काढायचा का? वाढदिवस समारंभात कितीही कौतुक केले (शिष्टाचार म्हणून) तरी प्रत्यक्षात त्यांचे एकमेकांशी संबंध वेगळेच असतात. असल्या औपचारिक कार्यक्रमातून कोणतेही निष्कर्ष काढता येत नाहीत व तसे काढूही नयेत.

In reply to by अमितदादा

२०१४ मध्ये राष्ट्रवादीची पडद्याआड मदत घ्यायचा प्रकार तेव्हा आवडला नव्हता आणि आताही आवडलेला नाही. तसेच त्यावेळी कुठलेही डिल न होता (भले ते दिशाभूल करायला केलेले खोटे डिल असले तरी) राष्ट्रवादीने महाराष्ट्रात स्थिर सरकार यावे या 'उदात्त' हेतूने भाजपला पाठिंबा नक्कीच दिला नसणार हे तर नक्कीच कळते. आपल्याला काही मिळाल्याशिवाय राजकारणात कोणीही काहीही दुसर्‍यासाठी करत नसतो. आणि पवार तर नक्कीच नाही.
We need to use Pawar’s more than five decades (of) experience in the public life.
तरीही हा दोन पक्षांमध्ये डिल होते हे दर्शविणार नाही. अमेरिकेचे माजी अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे १९९४ मध्ये निधन झाले आणि ते तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी व्हाईट हाऊसमध्ये जाहिर केले. त्यावेळी बिल क्लिंटन यांनीही रिचर्ड निक्सन यांच्या अनुभवाचा आपल्याला फायदा झाला असे म्हटले होते. या व्हिडिओमध्ये साधारण ३ मिनिटे ४० सेकंदांनंतर बिल क्लिंटन यांचे स्टेटमेन्ट येईल. सत्तापदावर गेलेल्या व्यक्ती इतरांशी सल्लामसलत करत असतात. तोच प्रकार मोदी-पवार यांच्या बाबतीत म्हणता येईल. या दोन पक्षांत डिल झाले नाही असे नाही पण हा त्यासाठी पुरेसा आधार आहे असे वाटत नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

सल्लामसलत करणे म्हणजे डील झाले असे कसे म्हणता येईल? दुसरं म्हणजे निक्सन आणि क्लिंटन हे एकाच पदावर होते. वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा सुद्धा नरसिंहरावांनी आपल्याला आयत्यावेळी रद्द कराव्या लागणार्‍या अणुचाचणीची माहिती देऊन आता तुम्ही ही चाचणी पूर्ण करा असे सांगून युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या होत्या असे वाचनात आले आहे. नरसिंहराव व वायपेयी हे सुद्धा एकाच पदावर होते. एकच समान पद भूषविणार्‍या आजी-माजी व्यक्तींमध्ये सल्लामसलत होणे समजू शकते कारण तेच पद भूषविणार्‍या माजी व्यक्तीच्या अनुभवाचा फायदा विद्यमान व्यक्तीला मिळू शकेल. परंतु दोन असमान पदावर असणार्‍या व्यक्तींमध्ये अशी सल्लमसलत होणे खूपच अवघड वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

सल्लामसलत करणे म्हणजे डील झाले असे कसे म्हणता येईल?
तेच म्हटले आहे. सत्तेवर जाऊन निर्णय घ्यायची जबाबदारी असलेल्या व्यक्ती सल्लामसलत करतच असतात. याचा अर्थ त्यांच्यात डिल झाले असा नक्कीच काढता येणार नाही.
दुसरं म्हणजे निक्सन आणि क्लिंटन हे एकाच पदावर होते.
अशी सल्लामसलत करायला त्याच पदावर असलेल्या व्यक्तीशी करायला पाहिजे असे बंधन नक्कीच नाही. शेतीविषयक प्रश्नांवर पंतप्रधान आणि कृषीमंत्री गेल्या ५०-६० वर्षांपासून एम.एस.स्वामीनाथन यांच्याशी सल्लामसलत करत आलेले आहेत. स्वामीनाथन अर्थातच पंतप्रधान किंवा कृषीमंत्री नव्हते. पण त्यांचा शेतीविषयक प्रश्नांचा दांडगा अभ्यास असल्यामुळे ते चांगला सल्ला देऊ शकतील अशी खात्री वाटल्यामुळे त्यांच्याशी सल्लामसलत करणार्‍या सत्ताधार्‍यांना वाटत असल्यामुळेच ते त्यांचा सल्ला घ्यायला जात असतील. १९९८ मध्ये अणुचाचण्या झाल्यानंतर २-३ महिन्यांनंतर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी माजी परराष्ट्रमंत्र्यांना असेच सल्लामसलतीसाठी बोलावले होते. त्यात चरणसिंग सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री असलेले श्यामनंदन मिश्रांपासून प्रणव मुखर्जी, विद्याचरण शुक्ला हे पण माजी परराष्ट्रमंत्री सामील झाले होते. वाजपेयी त्यावेळी पंतप्रधान असल्यामुळे केवळ माजी पंतप्रधानांशीच सल्लामसलत करावी असे नक्कीच नव्हते. त्याचप्रमाणे शरद पवार १० वर्षे कृषीमंत्री असल्यामुळे ते काहीतरी सल्ला देऊ शकतील असे वाटल्यामुळेच मोदींनी तसे म्हटले असावे (हा माझा तर्क).

In reply to by गॅरी ट्रुमन

२०१४ मध्ये राष्ट्रवादीची पडद्याआड मदत घ्यायचा प्रकार तेव्हा आवडला नव्हता आणि आताही आवडलेला नाही. तसेच त्यावेळी कुठलेही डिल न होता (भले ते दिशाभूल करायला केलेले खोटे डिल असले तरी) राष्ट्रवादीने महाराष्ट्रात स्थिर सरकार यावे या 'उदात्त' हेतूने भाजपला पाठिंबा नक्कीच दिला नसणार हे तर नक्कीच कळते. आपल्याला काही मिळाल्याशिवाय राजकारणात कोणीही काहीही दुसर्‍यासाठी करत नसतो. आणि पवार तर नक्कीच नाही. बरोबर आहे. भाजपने न मागता पाठिंबा जाहीर करण्यामागे पवारांचा नक्कीच काहीतरी हेतू असणार. परंतु प्रश्न असा आहे की भाजपने त्यांचा पाठिंबा स्वीकारला होता का? आणि ज्या हेतूने पवारांनी स्वतःहून पाठिंबा जाहीर केला ते हेतू साध्य झाले का? पहिल्या प्रश्नाचे उत्तर "नाही" असे आहे. भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा स्वीकारला नव्हता, पण तो नाकारला पण नव्हता. त्यांनी त्यावर फक्त मौन पाळून आपले पत्ते उघडे केले नाहीत. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या पाठिंब्यामुळे सेनेची बार्गेनिंग पॉवर एकदम संपुष्टात आली आणि तसे होणार हे ओळखून फडणविसांनी चातुर्याने त्याचा वापर करून शेवटी सेनेला स्वतःच्या अटींवर पाठिंबा देण्यास भाग पाडले. दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड आहे, कारण पवारांनी नक्की कोणत्या हेतूने स्वतःहून पाठिंबा जाहीर केला होता हे बाहेर आलेले नाही. सर्वसाधारणपणे असे समजले जाते की आपल्या पक्षाच्या नेत्यांना भ्रष्टाचाराच्या कारवाईपासून वाचविण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला होता. हा हेतू असेल तर तो फारसा साध्य झालेला दिसत नाही. दुसरा हेतू असा असू शकतो की पवारांना रालोआत जाऊन मंत्रीपद मिळवायचे असावे. हा हेतू असेल तर तो अजिबात साध्य झालेला नाही. माझ्या मते मूळ हेतू वेगळाच होता (हे माझे मत आहे. यावर माझ्याकडे कोणताही पुरावा नाही.). तो हेतू म्हणजे निवडणुकपूर्व काळात सेना-भाजप संबंध इतक्या विकोपाला गेले होते की निकालानंतर ते परत एकत्र येतील असे पवारांना वाटले नसावे. अशा परिस्थितीत त्यांना एकत्र येण्याची बारीकशी संधी सुद्धा मिळू नये यासाठी त्यांनी घाईघाईने भाजपला पाठिंबा जाहीर केला. त्यांचे गणित असे असावे की आपण पाठिंबा जाहीर केल्यानंतर सेना विरोधात बसेल. आपला पाठिंबा घेतल्याने भाजपची पुरेपूर नाचक्की होईल व पाठिंब्याचा दडपणामुळे आपल्या पक्षाच्या आमदारांवरील भ्रष्टाचाराची कारवाई टाळता येईल. काही महिने पाठिंबा सुरू ठेवून नंतर पाठिंबा काढून घेतल्यावर सरकार पडेल व नंतर नव्याने जुळणी होऊन सत्तेत परतण्याची संधी मिळेल किंवा मुदतपूर्व निवडणुक झाल्यास भाजपला जोरदार फटका बसेल व त्यावेळी आपल्याला संधी निर्माण होईल. परंतु भाजपने पाठिंब्याबाबत मौन पाळून शेवटी सेनेला सत्तेत येण्यास भाग पाडले व पवारांची खेळी अयशस्वी ठरली.

In reply to by श्रीगुरुजी

मला आमच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये येणाऱ्या काही कीर्तनकारांची आठवण आली. ३-४ गोष्टी (ते दृष्टांत म्हणत) त्यांच्या कडे असत. मग कोणता पण अभंग घ्या त्या अभंगाचे विवेचन करत असताना तेच ते दृष्टांत फिरवून फिरवून चपखल वापरायचे. काम चालून जायचे. तसे काहीतरी शरद पवारांबद्दलच्या प्रतिसादावरून दिसते...!!

In reply to by श्रीगुरुजी

अगदी शक्य आहे. पण सुरवातीला पडद्याआड राष्ट्रवादीची मदत घेतली हे चित्र उभे राहिल्यामुळे भाजप समर्थक मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली होती हे पण तितकेच खरे आहे.

गणपतीकिळात तेजसने प्रवास करणार्यांना चकटफू उकडीचा मोदक द्यायचा प्रस्ताव रेल्वेने दिला आहे. मागच्या वर्षी दिल्ली राजधानी एक्स. मधे दिले होते.

सत्तेवर आल्यास राज्यातील जनतेला टोल माफी असे आश्वासन भाजपाने निवडणुकीच्या वेळी दिले होते. त्यानंतर ५५ फुटकळ टोल नाक्यांवर खासगी मोटारी आणि एसटीच्या गाडय़ांना १ जून २०१५ पासून टोलमाफी दिली गेली. पण हा एक चुनावी जुमला होता हे उघडकीस आले आहे. पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे याबाबतची माहिती मागितली असता टोलमाफी दिल्यानंतर शासनाकडून संबंधित ठेकेदाराला दरवर्षी भरपाई दिली जात असल्याचे समोर आले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने १५ टोलनाक्यांबाबत आर्थिक वर्ष २०१५ पासून २०१७ पर्यंत ठेकेदारांना सुमारे ४५ कोटींची भरपाई दिली आहे. त्यात पहिल्या वर्षांच्या तुलनेत दुसऱ्या वर्षीची भरपाई दुप्पट आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या कालावधीत एकूण १५९ कोटी रुपयांची भरपाई दिली आहे. जरी टोलमाफी केली असली तरी कंत्राटदारांना २०४० पर्यंत किंवा संबंधित कंत्राट संपुष्टात येईपर्यंत प्रतिवर्ष नुकसान भरपाई देण्याचे सरकारने मान्य केले आहे. त्यामुळे पुढील किमान पंचवीस वर्षे सरकारी तिजोरीतून या कंत्राटदारांना टोलचे पैसे दिले जाणार असून पुढील २५ वर्षांत सरकार अशा प्रकारे ३८०० कोटी रुपये मोजणार असल्याचेही उघड झाले आहे असे वेलणकर यांनी सांगितले. http://www.esakal.com/pune/pune-news-cheating-toll-naka-६५९७८ http://www.loksatta.com/pune-news/government-not-stop-yet-toll-naka-sca…

In reply to by अभिजीत अवलिया

टोलमाफीची नक्की कल्पना काय होती लोकांची? रस्ते बांधल्याचे पैसे द्यायचेच नाहीत ठेकेदाराला अशी होती काय? कोणीच?

In reply to by अनुप ढेरे

लोकांची काय होती माहीत नाही. पण माझी अपेक्षा अशी होती. ज्या टोल नाक्यांवर वसुली पूर्ण झाली/होईल आहे ते त्वरित बंद होणे, सर्व टोल नाक्यांवर किती वाहने गेली, किती टोल जमा झाला त्याचा इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले लावणे, ज्या रस्त्यासाठी टोल वसूल केला जातो तो नेहमी सुयोग्य स्थितीत ठेवणे. पिण्याचे पाणी, शौचालय व अन्य सुविधा उपलब्ध करणे. पूर्ण टोल बंद करावा हे आश्वासनच चुकीचे होते. पण आम्ही ते करू असे खोटे आश्वासन दिले गेले. जे कंत्राटदारांना भरपाई दिल्याशिवाय पूर्ण होणे शक्यच न्हवते. त्यामुळे अशी पूर्ण न होणारी आश्वासने देऊ नयेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर टोल वसुली पूर्ण झाली आहे तरी देखील टोल बंद नाही. https://www.mumbailive.com/en/civic/expressway-toll-plaza-is-fleecing-y… पुणे सातारा रोडचे ६ पदरीकरणाचे काम गेली ४ वर्षे तरी सुरु आहे. ह्या कामाची डेडलाईन २०१६ ची होती. ती सतत वाढवली गेली. काम चालू करायच्या आधीच वाढीव टोल मान्य केला गेला (तत्कालीन काँग्रेस आघाडीच्या सरकारची चूक) आणि आता देखील काम पूर्ण नाही. ज्या भागात झाले आहे त्याचा दर्जा चांगला नाही पण टोल मात्र दर वर्षी वाढतच आहे. रस्ते बांधल्याचे पैसे द्यावेत की पण न बांधताच का दरवर्षी वाढीव टोल?

In reply to by अभिजीत अवलिया

चुकीची दुरुस्ती. पुणे सातारा रोडचे ६ पदरीकरणाचे काम मार्च २०१० ला सुरु झाले आणि डेडलाईन मार्च २०१३ ची होती. http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Pune-Satara-highway-wideni…

श्रीगुरुजी, इतक्या उच्च पदावर गेलेल्या काही व्यक्ती पद सोडताना इतक्या खुज्या का होतात हे एक गूढच आहे. राष्ट्रपतीपद फक्त नावापुरतं उच्च आहे. खरंतर ते केवळ बुजगावणं आहे. जेव्हा माननीय अब्दुल कलाम राष्ट्रपती बनतात तेव्हा कलमांचा सन्मान होत नसतो. उलट राष्ट्रपतीपदाचा गौरव होत असतो. आ.न., -गा.पै.

सिंहगड रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सिंहगड रोडला पर्याय म्हणून पुणे महापालिकेने विठ्ठलवाडी ते वारजे पूल दरम्यान नदीपात्राच्या कडेने १६ कोटी रुपये खर्च करून रस्ता तयार केला होता. नदीपात्रातून जाणारा हा अडीच किलोमीटरचा रस्ता तयार करताना पूररेषेच्या आत तब्बल ३५ हजार ट्रक राडारोडा टाकण्यात आला होता. यामुळे नदीची वहनक्षमता कमी होऊन नदीकाठच्या रहिवासी भागात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाल्याने पर्यावरणवाद्यांनी एनजीटीमध्ये याचिका दाखल केली. ज्यावर कोर्टाने हा रस्ता उखडून टाकण्याचे आदेश पालिकेला दिले. रस्ता करताना पूररेषेच्या आत भराव टाकण्याचा मूर्खपणा केला जात असताना ह्या कामावर पालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष न्हवते असा अर्थ निघतो.हा रस्ता तयार करण्यासाठी १६ कोटी रुपये, तर आता काढून टाकण्यासाठी ६ कोटी रुपये, असा २२ कोटी खर्च पूर्ण वाया गेलेला आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/pmc-starts… काही वर्षांपूर्वी पुणे पालिकेने मगरपट्टा चौकात उड्डाणपूल उभारला. आणि तो इतका विचित्र उभारला की उड्डाणपुलाचे पिलर भर रस्त्यात मधेच आलेत. त्यामुळे स्वारगेटकडून येणाऱ्या आणि हडपसरला जाणाऱ्या वाहनांना समोरचा पिलर अडथळा करतो तर हडपसर वरून येणाऱ्या आणि चौकातून पुढे स्वारगेटकडे जाणाऱ्या तसेच खरेदी कडे जाणाऱ्या वाहनांना अतिशय शार्प टर्न मारावा लागतो. परिणाम खर्च वाया गेला कारण वाहतुकीची कोंडी होती तशीच आहे जवळपास. हा उड्डाणपूल उभारताना चूक झाली अशी कबुली बहुतेक अजित पवार ह्यांनी नंतर दिली होती. मग ज्यावेळी पुलाचे डिजाईन बनवले गेले तेव्हा ते कुणी तपासले न्हवते का? शहरात सामान पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल १७०० कोटी रुपये खर्चाची योजना मंजूर केली गेली. त्यासाठी २०० कोटींचे कर्जरोखे उभारण्यात आले. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू झाल्यावर कर्जरोखे उभारायचे सोडून अगोदरच (कर्जरोखे उभारणारी देशातील पहिली महापालिका असा बिनकामाचा मान मिळविण्याच्या नादात) कर्जरोखे काढण्याची घाई करण्यात आली. आता ह्या सर्व प्रक्रियेला स्थगिती दिल्याने पुन्हा नव्याने निविदा मागवण्यापासून सुरवात करावी लागणार आहे. ज्याला ५-६ महिने जातील. तोपर्यंत ह्या २०० कोटींचे दरदिवशीचे ५ लाख व्याज महापालिकेला भरावेच लागणार. म्हणजे करदात्यांच्या पैशाचा अपव्यय. जंगली महाराज रोडवर तो परदेशातल्या रस्त्यांसारखा करण्यासाठी मोठा फूट्पाथ करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे मूळ रस्त्याची रुंदी कमी झाली. भरीस भर म्हणजे ह्या रस्त्यावरून परत मेट्रोचे काम केले जाणार आहे ज्यावेळी हे फूटपाथचे काम बऱ्याच प्रमाणात तोडावे लागणार आहे. परिणाम -> खर्च वाया. शहरात बरेच अंतर्गत रस्ते, गल्लीबोळ काँक्रीटचे केले गेले. पण ते करताना रस्त्याखाली गटार बांधणे वगैरे कामे केलीच नाहीत. त्यामुळे भविष्यात जेव्हा गटाराचे काम करायची वेळ येईल तेव्हा हे रस्ते परत खोदावे लागणार. परिणाम -> पैशाचा अपव्यय. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार किती भोंगळवाणा, भ्रष्ट असतो ह्याची ही उदाहरणे आहेत. भ्रष्ट राजकीय पक्ष आणि त्याला साथ देणारी नोकरशाही हे आपली शहरे, गावे व्यवस्थित विकसित न होण्याचे कारण आहे. आणि कुणीही सत्तेवर आले तरी ह्यात फरक पडत नाही. मग ते पुण्यासारखे मेट्रो शहर असो का एखादे छोटे शहर वा खेडे. ह्या असल्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे निव्वळ स्थानिक कार्यकर्त्यांची सत्तेची हौस फेडण्यासाठी असलेली कुरणे झालीत. कुठेतरी बाकडी बसावा, सोसायट्या रंगवून द्या, पेव्हिंग ब्लॉक काढून फूटपाथ वर फरश्या बसावा किंवा फरश्या असल्यास पेव्हिंग ब्लॉक बसावा, किंवा वर नमूद केलेली उफराटी कामे करा आणि त्यातून मलिदा खा ह्यापुढे ह्या नगरसेवकांची झेप नाही. ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका असल्या संस्था बंद करून प्रत्येक गोष्टींचे खाजगीकरण केले जावे असे मनापासून वाटते.

In reply to by अभिजीत अवलिया

बाकीबद्दल माहिती नाही पण जंगली महाराज रस्त्यावरचा नवा पदपथ अत्यंत उत्तम आहे. गांड्यांना आहे ती जागा भरपूर आहे. पादचार्‍यांचा विचार होतो ही उत्तम गोष्टं आहे. मेट्रो नक्की जाणारे का ज.म रस्त्यावर? मला वाटलं की नदी पात्रातून जाणारे.

In reply to by अभिजीत अवलिया

स्थानिक स्वराज्य संस्थाच काय राज्य सरकारं आणि केंद्र सरकार देखिल प्रायवेटाईज करावं वाटावं इतका गलथान मामला त्यांच्या कारभारात आहे. पण भ्रष्टाचार वा लाच म्हटलं कि वाहतूक पोलिस पहिल्यांदा आठवतो. वास्तविक एकूण भ्रष्टाचारात त्याचा रोल जवळजवळ नसतोच म्हणावा इतका कमी असतो. =========== लोकल बॉडिजनी असे पैसे वाया घालवले तर फार काही फरक पडत नाही. शेवटी त्यांचं प्लॅन बजेटच किती असतं? मात्र राज्य सरकार वा केंद्र सरकारच्या कार्यप्रणालीत चांगले बदल झाले तर याच्या शेकडो पट पैसे वाचतील. पण भारतात हे संभव नाही. आपल्याकडे सगळ्या विद्वान लोकांना एन आर आय बनायची हौस आहे. उरलेल्या न जाऊ शकणारांना एम एन सींची हौस आहे. मग सरकार मधे काम करायला उरतंच कोण? सगळी मेंढरं!!!! म्हणून सरकारनं सगळी कामं ज्यात मेहनत, डोकं, तंत्रज्ञान, निर्णयक्षमता इ इ लागेल, ती स्वतः करणं पूर्णतः थांबवलं आहे. या सगळ्या तिन्ही पातळीवरच्या सरकारी यंत्रणांना फक्त योग्य काम ओळखणे, तिचे प्राधान्य ठरवणे, बजेटमधे अलोकेशन करणे, स्कोप निट लिहून काढणे आणि योग्य गुणवत्तेचा कंत्राटदार नेमणे इतकंच क्लर्कि काम आहे. पण ते तरी करतील (नीट असोच) तर शिंचे भारतीय कसचे? त्यात कुणी काही केलं, पुढाकार घेतला कि भ्रष्टाचाराचे आरोप, सी बी आय, चौकश्या, बदनामी आणि जेल ठरलेले. कॉमनवेल्थ गेम्स झाले नसते तर शिलाबाईंने देशाचे शीलहरण केले असा आरोप झाला असता, फटाफट टेंडरे पास केली म्हणून भ्रष्टाचाराचा झाला. ======================== भारतीय लोकांची एकूण नैतिक लायकी पाहता त्यांना जे नेते लाभले आहेत ते त्यांच्याइतक्यात नैतिक वा अनैतिक लोकांच्या देशांतल्या नेत्यांपेक्षा १० पट छान आहेत. इथला मिडिया, इथली न्यायपालिका, इथले नोकर (शहा का म्हणायचं नोकरांना?) आणि इथले लोक यांच्यावर अधिक उत्तम टिका करता येईल.

चिनी व्रुत्तपत्र ग्लोबल टाईम्स व त्यांच्या ईंग्लिश न्युज (युट्युब) आणि पाकिस्तानि व्रुत्तपत्र Dawn आणि काहि सिलेक्टेड (क्वालिटि वाईज) न्युज चँनल्स मि रेग्युलरली पाहतो. ऐक निरीक्षण म्हणुन सांगतो चिनि आणि पाक दोन्हिकडे ते भारत सरकार, हिंदोस्तानी Gov. , Government of India OR Indian Government न म्हणता मोदि कि Gov. Government of Modi असा उद्देश करतात. 2019 ला बहुधा जिनपिंग किंवा नवाज सुद्धा युपिए मध्ये येतिल बहुधा नानि के लाडले को कुर्सि पे बिठाने.

वाईट आहे! विषण्ण ! खरच अजुन किति काळ हा चलता है attitude आपण सहन करणार आहोत. हिंदि न्युज बघण सोडलय राव....आज योगि सरकार के १०० दिन पुरे....आज योगिजि गोरखपुर मे गाय को चारा खिला रहे है.....च्यामारी ४ महिने झाला काव आणलाय नुसता. अन काय हे.... अरे मान्य आहे महाराज मुख्यमंत्रि काहि देव नाहि अंतर्यामि असायला. अरे पण त्याला काय खुर्चि ला उब मिळावि म्हणुन तिथे बसवलाय का ? ईतका भयानक कांड होउन सुद्धा कारवाई किति लोकांवर झालि आणि किति कडक ? प्रत्येक झण आपलि जबाबदारी दुसर्‍यावर ढकलणार, साला किति हा गलथान पणा चा कळस. hospital employees who handle the storage plant at the hospital from where oxygen is piped to different wards, wrote २ letters to the Chief Medical Officer informing him that the stock of liquid oxygen was dangerously low and would not last the night. C.M.O. काय गांजा पिउन ड्युटि वर यायचा काय ? अबे भेंडि if it was clear to him that it is not within his powers or control about the pending amount / dues why did not he raise his hands and escalate it to D.M. or directly to C.M. अ‍ॅडल्ट पेशंट पासुन ते NICU मधले निष्पाप बालके मरे पर्यंत हा काय योगि च्या गाई ला चारा खाउ घालत होता. Medical Negligence, Fails to perform duty, Culpable homicide आणखि काय काय लावता येईल ते लाउन असल्या incompetent लोकांना आज अद्द्ल नाहि घडवलि तर हे होतच राहणार मग सरकार योगि चे असो कि भोगि चे. साला जे दोषि असतिल त्यांना तात्काळ बरखास्त करुन पेंशन सुद्धा खाउन टाका नालयकांचि. पण हे होणार नाहि हे सगळ्यांनाच ठाउक आहे जे खुर्चि उबवत होते त्यांनाहि आणि ज्या गरिबांचे लेकर अशि हकनाक गेलि त्यांनाहि.

पाकिस्तानात मार्शल लॉ चे म्हणजेच पुन्हा एकदा COAS च्या हाती पुर्ण सत्ता जाण्याचे चांसेस वाढलेत. बहुधा लवकरच जनरल बाजवा सुत्रे हाती घेतील.

भारत-चीन यांच्यातील तणावामुळे भारत आणि नेपाळची माऊंट एव्हरेस्टची उंची मोजायच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे अशा बातम्या आहेत. काहीही संदर्भ नसताना आणि कसलीही गरज नसताना ६-७ वर्षे जुन्या धाग्यांचा महापूर आलेला आहे त्याला अटकाव घालण्यासाठी फालतू का होईना मिळाली ती बातमी इथे देत आहे.

घटनाक्रम १, जुलै २०१६: - डॅलस शहरात 'ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर'चा (बीएलएम) निषेध मोर्चा निघाला. - या मोर्चात सर्व वर्णांचे लोक सामील झाले होते. बव्हंशी कुठल्याही हत्यांराशिवाय. - आर्मीतून निवृत्त झालेल्या एका माथेफिरू 'लोन वूल्फ'ने या मोर्चाच्या आडून पोलिसांवर हल्ला केला आणि पाच पोलिस अधिकारांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं. - संबंधित 'लोन वूल्फ'ला पोलिसांनी एका रोबोटद्वारे ठार केलं. संबंधित 'लोन वूल्फ'चा 'बीएलएम' चळवळीशी वा त्या मोर्चाशी काही संबंध आढळून आला नाही. या हल्ल्याचा 'बीएलएम'ने तीव्र निषेध केला, पण चळवळीला असलेली सहानुभूती मोठ्या प्रमाणात घटली आणि पुढील काही दिवसांत आधीच विकेंद्रित, उत्स्फूर्त असलेले हे निषेध मोर्चे संपुष्टात आले. - पोलिसांवरील या हल्ल्याचा सर्व थरातल्या, सर्वपक्षीय राजकारण्यांनी (यात ओबामाही आले) निषेध केला. - यानंतर ओबामाने व्हाईट हाऊसमध्ये एक सर्वपक्षीय बैठक बोलावली. त्यात स्थानिक राजकारणी, राज्याचे गव्हर्नर, पोलिस अधिकारी, सुरक्षाविषयक सल्लागार आणि 'बीएलम'चे प्रतिनिधी होते. एकून ४० लोकांपैकी केवळ दोन व्यक्ती बीएलएमशी संबंधित होत्या. काही रिपब्लिकन राजकारण्यांनी या घटनाक्रमाची मांडणी 'पोलिसांवर हल्ला करणाऱ्या बीएलएम मेंबर्सना ओबामाने व्हाईट हाऊसमध्ये बोलावले' अशी केली. फॉक्स न्यूजने इमानेइतबारे आपल्या धन्याचं काम करून ही विधानं सातत्याने आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोचत राहतील, याची दक्षता घेतली. आधीच फॉक्स न्यूजचा कोअर प्रेक्षकवर्ग म्हणजे ओबामाला 'केनियन मुस्लिम + सिक्युलर + अँटाय-ख्राईस्ट' समजणारा. या बातम्यांमुळे ओबामा हा देशद्रोही असून तो स्वत: जातीने कृष्णवर्णीय-श्वेतवर्णीय यांच्यातील तेढ वाढवण्याचे प्रयत्न करतो आहे, असाही काहींनी समज करून घेतला. एकदा या स्लिपरी स्लोपवर गाडी गेली की, ओबामा तिसऱ्यांदा निवडणूक लढवायच्या तयारीत आहे (वास्तव: 'घटनेनुसार ते शक्य नाही. अर्थात, अमेरिकन सिटिझन्सना आपल्याच देशाची घटना कितपत माहीत असते, हा प्रश्नच आहे') किंवा फ्लोरिडात ज्या १७ वर्षीय ट्रेवन मार्टिनला राहत्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये गोळी घालण्यात आली, तोच कसा या बाबतीत दोषी होता आणि ओबामाने कसं बिचाऱ्या झिमरमनला यात अडकवलं (वास्तव: 'प्रस्तुत खटला फ्लोरिडा राज्यात तेथील स्थानिक ज्युरींच्या समोर चालला. पोलिस डिस्पॅचने कारमधून बाहेर न पडण्याचा सल्ला दिल्यानंतरही झिमरमनने तो धुडकावून ट्रेव्हन मार्टिनचा पाठलाग केला होता; मात्र तो पुराव्याअभावी सुटला. या खटल्यानंतरही त्याला दोनदा त्याच्या मैत्रिणींवर हल्ला करण्याबद्दल आणि एकदा 'रोड रेज'च्या केसमध्ये अटक झाली आहे.') यासारख्या कपोलकल्पित गोष्टींवरही काही लोकांचा विश्वास बसू लागला. घटनाक्रम २, ऑगस्ट २०१७: - शार्लट्सव्हिल, व्हर्जिनिया शहरात व्हाईट सुप्रिमसिस्ट्स निओनाझींचा निषेध मोर्चा निघाला. या मोर्चात ओबामा आणि ज्यू धर्मीयांविरुद्ध* घोषणा देण्यात आल्या. (*निओनाझींचा इस्त्रायलला पाठिंबा असतो, तो ख्रिस्तजन्माने पुनीत झालेली धरती म्हणून. अमेरिकेतल्या ज्यूद्वेषी घटनांची संख्या ही मुस्लिमद्वेषी घटनांहून कितीतरी अधिक आहे.) - या मोर्चात फक्त श्वेतवर्णीय सामील झाले होते. बव्हंशी हत्यारांसह आणि पेटते पलिते घेऊन. - आर्मीतून निवृत्त झालेल्या एका माथेफिरू 'लोन वूल्फ'ने मोर्चाच्या विरोधकांवर गाडीने हल्ला केला. त्यात एक महिला ठार आणि वीसहून अधिक लोक जखमी झाले. - जेम्स ॲलेक्स फिल्डला पोलिसांनी दुसऱ्या दिवशी अटक केली. - जेम्स ॲलेक्स फिल्ड 'व्हॅनगार्ड अमेरिका' ह्या व्हाईट सुप्रिमसिस्ट, निओनाझी संघटनेतर्फे मोर्चात सामील झाला होता. - या हल्ल्याचा सर्व थरातल्या, सर्वपक्षीय राजकारण्यांनी निषेध केला. एरवी ट्विटरवर ॲक्टिव्ह असणारे प्रेसिडेंट ट्रम्प मात्र बराच काळ शांत होते. बहुधा आपल्याच मालकीच्या गोल्फकोर्सची तुंबडी करदात्यांच्या पैशातून भरली जात असताना, २०२० सालच्या रिइलेक्शनची ॲड शूट करण्यात व्यग्र असावेत! - मग अगदी मुळमुळीत शब्दांत, ट्रम्पने या घटनेचा जनरल टर्म्समध्ये निषेध व्यक्त केल्यावर अनेक रिपब्लिकन सिनेटर्सनी या शिखंडी वृत्तीचे वाभाडे काढले आहेत. U.S. President Donald Trump's reelection campaign released its first television advertisement on Sunday...The ad's release comes amid intense criticism of Trump's response to the events in Charlottesville, Virginia, where a planned rally by white supremacists led to violence that killed a counter-protester. Speaking on Saturday from his golf resort in Bedminster, New Jersey, Trump stopped short of calling the demonstrators "white supremacists" and instead criticized groups on "many sides." Even members of his own party said he had failed to adequately condemn those behind the violence. हा वॉल स्ट्रीट जर्नलमधल्या (मर्डॉकच्या मालकीचे) घरच्या अहेराचा दुवा: https://www.wsj.com/articles/gop-leaders-criticize-trumps-response-to-c… बाकी फॉक्स न्यूजवर हे प्रकरण डाऊनप्ले करण्याचा जो केविलवाणा प्रयत्न चालला आहे, तो प्रेक्षणीय आहे. . . . . . . . ट्रम्पच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचे रामराज्य अवतरणार होते आणि अमेरिका ग्रेट होणार होती. कुणी सांगावं, कदाचित काही ट्रम्पसमर्थकांचा हाच निकष असेल!

In reply to by नंदन

नंदन, घटनाक्रमांच्या माहितीबद्दल आभार! :-) त्यावरून अशीच एक घटना आठवली. १२ जून २०१६ रोजी ओर्लांडो येथे उमर मतीन नावाच्या एकांड्या माथेफिरूने गे नाईटक्लबात गोळीबार करून सुमारे पन्नास जणांना कंठस्नान घातलं. पोलिसांनी केलेल्या कारवाईत मतीन ठार झाला. इथवर ही घटना वरील दोहोंप्रमाणेच आहे. मात्र नंतर जेम्स वेस्ली हॉवेल म्हणून एक युवक पुढे आला आणि त्याने आपण मतीनचा साथीदार असल्याचं सांगितलं. ओर्लांडो गोळीबार हा गे लोकांवर करण्याच्या अनेक हल्ल्यांच्या मालिकेतला पहिला हल्ला असून तो सी.आय.ए. ने योजला आहे असंही म्हणाला. मतीन मरणार नाही म्हणून आपल्याला आश्वस्त केलं होतं, पण प्रत्यक्षात मतीन मारला गेला. म्हणून मला सी.आय.ए. कडून संरक्षण हवंय असा हॉवेलने पोलिसांत अर्ज केला. सांगण्याचा मुद्दा काय आहे की लोन वूल्फ म्हणजे साधारणत: सी.आय.ए. वा एफ.बी.आय.चा कोणीतरी चमचा असतो. आ.न., -गा.पै.

In reply to by नंदन

मी ह्या संदर्भातल्या न्युज फॉलो करत आहे. मला खरंच माहिती नव्हतं की अजुनही जगात उघडपणे नाझी आणि व्हाईट सुप्रीमसीचा पुरस्कार करणारे लोक आहेत. ट्रम्पने तर ज्या पद्धतीने "दोन्ही बाजुंची चुक होती" असे म्हणलेय, ते पाहुन जाम आश्चर्य वाटलं. रोज नवीन लेव्हलचे कारनामे करतो हा माणुस...

In reply to by पिलीयन रायडर

पण परवाच एका प्रतिसादावर इथलेच एक सभासद असलेले 'कॅप्टन जॅक स्पॅरो' ह्यांनी सगळ्यात शेवटी 'हाईल फ्युहर्रर' असे लिहिलेलं वाचल्याचे आठवते आहे लख्ख. असो.

In reply to by जेम्स वांड

त्याच प्रतिसादात हुकूमशाहीचा थेट चाहता वगैरे पण होतं लिहिलेलं, ते 'सारकॅजम' असल्यास माहिती नाही पण लिहिलं होतं खरं.

In reply to by जेम्स वांड

It was Sarcasm. इकडच्या मनमानी हुकुमशहांना उद्देशुन होतं ते.

India's Soaring Space Ambitions इसरो चे भविष्यातील महत्वकांक्षी प्रोजेक्ट.. आदित्य-1 (सूर्य मिशन), चंद्रयान-2 (चंद्र मिशन), शुक्र orbitar. भारताचे तसेच इतर देशांचे उपग्रह इसरो यशस्वी रित्या पाठवत आहे अभिमानाची गोष्ट आहे, कमीत कमी किंमतीत उपग्रह पाठवण्यासाठी भारत एक उत्तम बाजारपेठ बनत चाली आहे. आता एक इच्छा आहे की जसे एलॉन मस्क च्या स्पेसक्स ने advance reusable rocket falco-9 हे विकसित केले आहे तसे इसरो ने तयार करावे, अर्थात इसरो सुद्धा एका reusable vehicle वर काम करतेय पण त्याच design खूप वेगळं आहे. खलील दिलेल्या लेखात स्पसेक्स आणि इसरो च्या reusable रॉकेट आणि वेहीकल याची उत्तम माहिती दिली आहे। SpaceX Falcon 9 vs ISRO’s Reusable Launch Vehicle

एम.पी.मिल झोपू योजनेच्या फाईलमध्ये गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता ह्यांनी 'मुख्यमंत्र्यांना अवगत केले' असा शेरा मारला होता असे समोर आले आहे. त्यामुळे जर मुख्यमंत्र्यांना अवगत केले होते तर ह्याचे दोन अर्थ निघतात. एक जर मुख्यमंत्र्यांना माहीत होते तर ह्या योजनेतील अनुचित गोष्टी थांबवण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत? किंवा दुसरी जर त्यांना योजनेतील अनुचित गोष्टी माहीत न्हवत्या तर प्रकाश मेहता ह्यांनी कशाच्या आधारावर मुख्यमंत्र्यांना अवगत केले असा शेरा मारला ? ही जमीन संरक्षण खात्याची असल्याने वाढीव FSI देता येणार नाही हे माहीत असूनही तो देण्याचा निर्णय २००९ साली तत्कालीन आघाडी सरकारने दिला. त्यामुळे ह्या योजनेच्या बाबतीत ४*१०० रिले शर्यतीसारखे भ्रष्टाचाराचा बॅटन आघाडी सरकारने युती सरकारच्या हातात दिला असे म्हणावे लागेल. http://www.loksatta.com/mumbai-news/devendra-fadnavis-orders-lokayukta-…

श्रीलंकेचा एक डाव आणि १७१ धावांनी पराभव करून भारताने कसोटी मालिका ३-० ने जिंकली. परदेशात ३ किंवा जास्त सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याची बहुतेक ही पहिलीच वेळ भारताची. लंकेचा संघ भारताच्या तुलनेत कमजोर होता. तरी देखील मायदेशात सामने असल्याने लंका एक तरी सामना जिंकेल असे मला वाटत होते. पण ह्या पूर्ण सिरीज मध्ये श्रीलंकेने आपल्यापुढे सपशेल शरणागती पत्करली.

लोकसत्तेने दिलेल्या रोचक शीर्षकामुळे इथे नोंद घ्यावीशी वाटली. अर्थात केलेला दंड हा सरकारच्या आणि रिलायन्सच्या कारातल्या तरतुदींचे एक्झेक्युशन असणार त्यामुळे मोदींचे इथे काही क्रेडिट नसायला हवे, नाहीका? अंबानींच्या रिलायन्सला मोदी सरकारचा दणका; १७०० कोटींचा ठोठावला दंड

http://indianexpress.com/article/india/us-designates-hijbul-mujahideen-… अमेरिकेने पाकिस्तानस्थित हिजबुल मुजाहिदीनला परकीय अतिरेकी संघटना असे अधिकृतरित्या जाहीर करून या संघटनेची खाती गोठविण्यात आली आहेत. दोन महिन्यांपूर्वी मोदी अमेरिकेला भेट देण्याच्या आदल्या दिवशी या संघटनेचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीनला आंतरराष्ट्रीय अतिरेकी असे अमेरिकेने घोषित केले होते. त्याच्या संघटनेवर बंदी घातल्याने त्याच्या अतिरेकी कारवायात नक्की किती फरक पडेल याविषयी साशंक आहे.

भाजप ची सरशी . भाजप २६ ,काँग्रेस १४ आणि अपक्ष ३ अश्या नगरपालिका ताब्यात . तरी भाजप च्या मागील वेळेपेक्षा ३ जागा घातल्या . मंदसौर येथे जे शेतकरी आंदोलन झाले होते आणि ५ शेतकरी दुर्दैवाने मृत्युमुखी पडले होते तेथे काँग्रेस निवडून आलेली आहे ३ हि जागांवर .

अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्डतात्या ट्रम्प यांनी अ‍ॅमॅझॉनवर पुढील ट्विट केले: मोबाईल फोनमध्ये कॅमेरे आल्यामुळे कोडॅक कंपनी गाळात गेली त्याबद्दल मोबाईल फोनमध्ये कॅमेरे आणायच्या प्रकाराला दोष देणे जितके हास्यास्पद आहे तितकेच अ‍ॅमॅझॉनने रिटेल क्षेत्राला धक्का पोहोचवला हे म्हणून अ‍ॅमॅझॉनला दोष देणेही हास्यास्पद आहे. अ‍ॅमॅझॉनने नव्या बदलत्या काळानुरूप स्वतःचे वेगळे बिझनेस मॉडेल आणले. बिझनेसच्या जगतात नवीन कल्पना येणे, नवीन बिझनेस मॉडेल आणली जाणे आणि जुनी मॉडेल कालबाह्य होणे हे चालूच असते. किंबहुना अमेरिकेने इतकी वर्षे या प्रकाराला प्रोत्साहन दिले म्हणूनच अमेरिका ही 'Land of opportunities' बनली. आणि आता हा यडबंबू त्यालाच आव्हान देत आहे. ट्रम्पतात्यांच्या या टिवटिवाटानंतर काल अ‍ॅमॅझॉनचा शेअरही आपटला.

In reply to by गॅरी ट्रुमन

>>> नवीन बिझनेस मॉडेल आणली जाणे आणि जुनी मॉडेल कालबाह्य होणे हे चालूच असते. किंबहुना अमेरिकेने इतकी वर्षे या प्रकाराला प्रोत्साहन दिले म्हणूनच अमेरिका ही 'Land of opportunities' बनली. आणि आता हा यडबंबू त्यालाच आव्हान देत आहे. --- =)) =)) पण ट्रम्पतात्या एवढा खोलवर विचार करत नाहीत हो! 'वॉशिंग्टन पोस्ट'चा मालक बेझोस हाच अ‍ॅमेझॉनचाही मालक. वॉशिंग्टन पोस्ट दर आठवड्याला रशियन भेटीगाठींचा आणि एकंदरीत व्हाईट हाऊसमध्ये चाललेल्या सावळ्या गोंधळाचा पंचनामा करते; म्हणून पर्यायाने अ‍ॅमेझॉनवर राग! ओबामाच्या काळात ब्रिटिश पेट्रोलियमला समुद्रातल्या तेलगळतीबद्दल दंड ठोठावला गेला; म्हणून त्याला बिझनेसद्वेष्टा म्हणणारे रिपब्लिकन्स आता कसे चिडीचूप आहेत.

आवरा यांना पुष्पक विमान कवी कल्पना नसून वास्तव एरवी ह्या बातमीची दखल घेतली नसती परंतु हे व्याख्यान एका अभियंत्याने एका अभियंत्याच्या संघटनेपुढं दिले आहे. काही बुलेट पॉईंट्स १. रामाकडे हे विमान होते ते होतेच पण अलीकडच्या (रामाच्या तुलनेत) राजा भोज कडे हे विमान होत, त्यामुळे महमंद गझनीने आक्रमण केलं नाही २. विमान एकदम ३६० अंशामध्ये वळू शकत होत. (कसे ते विचारू नका, जुने ग्रंथ काढा आणि वाचा ) ३. जमिनीतील स्फोटके शोधण्यासाठी ग्रहगर्भ यंत्र ४. पॅराशूट सुद्धा होते ५. विषारी वायूपासून वाचण्यासाठी सत्याकर्षण यंत्र विनोदी व्याख्यान होत बहुतेक :)

In reply to by अमितदादा

सकाळी हे पेपरमध्ये वाचले होते आणि भयानक हसलो. तरी अजून रामसेतू, हनुमाने उचलून आणलेला द्रोणगिरी पर्वत यांच्यावर काही पुड्या आलेल्या नाहीत याचेच नवल वाटते.

In reply to by अमितदादा

अमितदादा, ते १८० अंश आहे. ३६० अंश मूळ लेखात म्हंटलंय ते चुकीचं आहे! असो. समरांगणसूत्रधार आणि वैमानिकशास्त्रात विमानांचे आराखडे दिले आहेत. शिवशंकर बापूजी तळपदे नामक विद्वानाने त्यानुसार विमान बनवून ते मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर १८९५ साली उडवलेलंही आहे. हो, राईट बद्च्या तब्बल दहा वर्षं आगोदर. या प्रसंगास बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड उपस्थित होते. विनोदाचं म्हणंत असाल तर आज शाळाकॉलेजांत ढगांतल्या विजेविषयी जे काही शिकवलं जातं, ते एक ठार विनोद आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by अमितदादा

@अभिजित अवलिया :) @गामा पैलवान तुम्हाला आमची पूर्ण सहमती आणि अनुमोदन आहे याची खात्री बाळगा।
ते १८० अंश आहे. ३६० अंश मूळ लेखात म्हंटलंय ते चुकीचं आहे!
180 तर 180, फार मामुली चूक आहे हो ही, 360 अंशात फिरण्यासाठी बटन दोनदा दाबत असतील (180+180). हाय काय आणि नाय काय:)

http://m.indiatoday.in/story/india-today-mood-of-the-nation-poll-10-big… 'इंडिया टुडे'च्या षण्मासिक सर्वेक्षणानुसार आज निवडणूक झाली तर रालोआला ३४९ जागा (त्यात भाजपला २९८) व संपुआला ७५ (त्यात खांग्रेसींना ४७) जागा मिळण्याची शक्यता आहे.

http://www.loksatta.com/thane-news/dahi-handi-2017-organisers-reduce-pr…
दहीहंडी उत्सवावर गतवर्षी आलेले निर्बंध यंदा बऱ्याचप्रमाणात कमी झाले असले तरी ठाण्यात उत्सवाचा उत्साह कमी असल्याचे चित्र आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून कोटीच्या बक्षिसांची लयलूट करणाऱ्या आयोजकांनी यंदा हात आखडता घेतला आहे. त्यामुळे ठाण्यात मोठमोठय़ा दहीहंडय़ा दिमाखात लागणार असल्या तरी, यानिमित्ताने रंगणारी आर्थिक दिखाऊपणाची चढाओढ कमी झाल्याचे चित्र आहे. पाचपाखाडी भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामार्फत उभारली जाणारी हंडी गेल्यावर्षीपासून आवरती घेण्यात आली आहे. शिवसेना नेत्यांनी उत्सव आयोजनातील स्पर्धा कायम ठेवली असली तरी यंदा मात्र बक्षिसांचे थर कमी केले आहेत.
हा नोटबंदीचा परिणाम असू शकेल काय ? मुख्य हंडी फोडणाऱ्या पथकाला काही लाखात आणि सलामी देणाऱ्या प्रत्येकाला काही लाख/हजार रुपयांचे बक्षीस दिले जात असे, तसेच रस्ता अडवून ध्वनिक्षेपकाच्या भिंती, दूरदर्शनवरील कलाकार, रशियन नृत्यांगनांचे 'सात्विक' नृत्य.... ह्या सगळ्याला पैसे उरले नाहीत की काय ?

In reply to by तेजस आठवले

सध्या कोणतीही निवडणूक नाही हे मुख्य कारण असेल असे होण्यामागे.