Skip to main content

आता काही लिहीन म्हणतो.

लेखक बाबुराव यांनी मंगळवार, 20/10/2009 या दिवशी प्रकाशित केले.
[मास्तर चतुरंग यांची प्रेरणा आणि मुळ लेखकाची क्षमा मागून] वाचन खूप झाले, आता लिहीन म्हणतो. आडून प्रतिसादाच्या गंभीर लिहीन म्हणतो पेन खिशातला हा मी काढणार आहे जे जे दिसेल ते ते सारे लिहीन म्हणतो. बरेच प्रतिसाद आहे मी उधळलेले या जागी आहेत विचार डोक्यात जे इथे लिहीन म्हणतो दिवाळी अंकातून मी निर्दोष आज सुटलो ? (लेख लिहिण्याचा कोणीच आग्रह केला नाही :( ) शब्द शब्द जमा करुन काही लिहीन म्हणतो सारेच सिद्धहस्त लेखक, ना साधा इथे कोणी नसलो मोठा तरिही आता लिहीन म्हणतो. ती टीका नव्हती सदस्यांची कधीच खोटी समजून गेलो इशारे सारे, तरी लिहीन म्हणतो माझ्याच लेखनाची आता मलाच हाव आहे विषय द्या दोस्तांनो, काही जबरा लिहीन म्हणतो (वृत्त आणि मात्रांचा कवी पूर्ण आदर करतो )
लेखनविषय:

वाचने 2267
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

बाबुराव...मस्त झालंय इडंबन!

माझ्याच लेखनाची आता मलाच हाव आहे विषय द्या दोस्तांनो, काही जबरा लिहीन म्हणतो नक्कीच लिहा... :) मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

हा घ्या विषय, कहीतरी 'जबरा' लिहायला: भारतात 'गोरे' (इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज वगैरे सगळे) कधी 'आलेच नसते' तर आजचा भारत कसा असता ? (अतिशय रोचक विषय आहे माझामते)

हे विडंबन, मूळ काव्य, त्यावरचे रेवती आणि बहुगुणी यांचे प्रतिसाद भन्नाटच! मस्त मिसळीवर चरचरीत सोडा!