Skip to main content

नेहमीचेच यशस्वी कलाकार

लेखक नाना चेंगट यांनी शनिवार, 26/01/2013 या दिवशी प्रकाशित केले.
अ ब क ड अ ब क ड वेगळे विचार वेगळी कृती वेगळी मते अ ला ब पटत नाही तर ब ला क अ क ला अ ड आणि ड ला अ ब नाही नाही अ ला ब क पटत नाही ब ला क पटतो पण क ला ड पटतो हे पटत नाही क ला अ पटत नाही पण अ ला ब पटत नाही हे ड ला अ पटत यापेक्षा जास्त दु:खदायक वाटते नाही नाही थांबा परत सांगतो पहिल्यापासून अ ला...जाऊ द्या ना अ ब क ड ला काहीतरी पटतं काहीतरी पटत नाही एवढं तरी पटल ना तुम्हाला मग पुढे सांगतो अ ब क ड अ एक मुद्दा मांडतो ब सरसावून पुढे येणार तोच य पटकन येवून काहितरी बोलतो य बोलला म्हणून र बोलतो र बोलला म्हणून य गुरगुरतो र च्या बाजूने ल येतो य च्या बाजूने व येतो प आणि फ मधेच येतात पण आपण कोणत्या बाजूचे हे न समजल्याने +१ करुन निघून जातात य र ल व चर्चा करतात अ ब क ड प्रमाणेच अ पुन्हा पुन्हा समजावून सांगतो ब त्याची री ओढतो किंवा त्याची खिल्ली उडवतो काहीतरी होत रहाते य आणि र ला हाकलले जाते क आणि ड चर्चेत पिंक टाकतात परत धुराळा उडतो परत काही दिवस जातात अ किंवा ब काही मुद्दा मांडतात य१ र१ ल१ व१ पुन्हा तोच इतिहास तीच पद्धती तीच हकालपट्टी याहीवेळेस क आणि ड नंतर येऊन पिंक धुराळा तेच ते परत परत तीच वाक्ये तेच मुद्दे तसेच बोलणे तसेच वागणे य पासून य१ ते यअनंत र पासून लपासून वपासून रअनंत लअनंत वअनंत.... अनंत क आणि ड मात्र नामानिराळे नंतर येऊन पिंक धुराळा तेच आणि तसेच क आणि ड चा यरलव शी संबंध आहे का हे अधि़कारी वर्ग पाहत नाही की त्यांना समजत नाही की त्यांना समजूनच घ्यायचे नाही? तोवर चालूच राहिल हा प्रयोग नेहमीच्याच यशस्वी कलाकारांच्या सहकार्याने !
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3773
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

नाना हे काय र बाबा ?पाठ केलेली बाराखडी पन पार विसरलोकी र बाबा......

अ ते ज्ञ अक्षरांची बाराखडी. तेच ते नि तेच ते. हे चालूच रहाणार. कारण अक्षरं तीच ती!

आज काय देशी काय रे नान्या ? लेका, संपादक असतास कुठल्यातरी संस्थळावरती, तर ह्या लेखनाला 'सदाबहार' , 'डोळ्यात अंजन घालणारे' वैग्रे वैग्रे म्हणालो देखील असतो. असो..

@नाना, भापो. मिपा पूर्वीसारखे राहिले नाही.. आजकाल कुणी अंमळ हळवे होत नाही, कुणाचे ड्वाले पाण्वत नाहीत.. येव्हढेच काय कुणीच कुणाशी बाडीस ही नसते.. ( असो, बदलेन.. :) @ पैसा : ते 'णाणा' असं नसतं लिहायचं हो.. 'णाना' असं लिहायचं असतं... आता शंभर वेळा लिहा पाहू..( संपादिकेचा अभ्यास जssरासा कमी पडला म्हणते मी !! ::) @ परा : विलायती असती ना तरी फार्फार तर अ, ब, क, ड जाऊन ए, बी, सी, डी आले असते .. नाव बदलल्यामुळे पात्रे बदलतात असे थोडेच आहे... :) अवांतर : @ परा: यंदा शुचि मामींना डायरी द्यावयाची राहिली काय? ::) अतिअवांतर : आता लवकरच 'पिंका का टाकतात' किंवा ' पिंका कशा टाकाव्यात' असा धागा मीच काढावा म्हणते.. :)

ह्म्म्म असेच काहीसे विचार हल्ली मनात येत असतात. (च्यायला या नान्याचा व्हायरल इथ पर्यंत पोहोचला वाटते.) पण मग एक म्हण आठवते सो चुहे वाली....... आणि मग मी निव्वळ उसासे टाकून गप्प बसतो.

काव्यातील भावनेशी "भयानक" सहमत! जसे (फक्त मिपाच नाही पण कुठल्याही)संस्थळावर यशस्वी कलाकार असतात, तसेच यशस्वी विषय देखील असतात. त्यावर पण असेच भयानक काव्य करता येईल.