वाटेने अनवाणी जाता ,केला मी इतरांचा हेवा
मनात म्हटलं " साधी तरि चप्पल मला दे रे देवा"
.... ..
पाय घातला चपलेत आणि वाटलं आता जिंकलं जग
चप्पल मात्र जुनी पुराणी वाटु लागली लगेच मग
म्हटलं "आतi नवीन हवी,सुन्दर आणि सुखदायी
तेवढं जर दिलंस देवा आणखी काही मागणार नाही"
...........
ते ही मिळालं मग वाटलं एक आता पुरत नाही
अजुन एक,अजुन एक हौस काही भागत नाही.
हे हवं ..ते ही हवं.. मिळवुन ना तर खेचुन घ्यावं
जगामधलं सारं सुख माझ्या पायाखाली हवं
उरापोटी धावुन शेवटी, केलंच सारं जमा भोवती
पर्वाच केली नाही जरी, तुटली सारी नाती-गोती
..........
सगळ्या सुखात आहे एकटा, निर्जीव भिंती, निर्जीव वाटा
ढिगभर सुंदर चपलांमधे बुडुन गेलो आहे पुरता
...............
आता मात्र हाव नाही, खरंच सांगतो नको काही
चपला तर खुप आहेत, पाय मात्र उरले नाहित...
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2253
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुक्तक फार
सहमत!!
In reply to मुक्तक फार by मदनबाण
खूपच सुंदर
अंतर्मुख!!!
शेम टु शेम
In reply to अंतर्मुख!!! by बिपिन कार्यकर्ते
नेहमी
खुपच सुंदर
आता मात्र
मस्त रे...!
मस्तच....!