त्वमेव सर्वमम देव देवः
सातारा -कास पठार
महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वाचे शहर म्हणजे 'राजधानी सातारा'.राजगड,रायगड,जिंजी नंतर महाराष्ट्राची चौथी राजधानी
सातारा जाणून घेण्यासाठी पाहण्याची इच्छा होतीच.साताऱ्यात संध्याकाळी चार वाजता पोहचल्यावर फ्रेश होऊन अजिंक्यतारा किल्ल्यावर गेलो.
श्री गणेश लेखमाला २०२४ - फॉल्ट लाइन एक्स्प्लॉयटेशन - दुभंग विस्तार
फॉल्ट लाइन एक्स्प्लॉयटेशन - दुभंग विस्तार
जगातील कुठल्याही समाजात काही गोष्टी सर्वसहमतीच्या असतात, तर काही गोष्टींबाबत दुमत असते. जगात जिथे जिथे मानवी समाज आहे, तेथे सत्ता, संपत्ती, स्त्री, जमीन आदी अनेक कारणांवर लोकांमध्ये वादविवाद असतात. या वादविवादात पूर्वी भांडणे आणि युद्धे होत आणि राजा तसेच राजघराणे बदलले जाई. औद्योगिक क्रांती आपल्याला मध्ययुगीन जगातून आधुनिक जगाकडे घेऊन आली. त्याबरोबर नवनवीन तंत्रज्ञान, विचारधारा, आयुष्याची नवनवीन मांडणी समोर येत गेली.
नवीन तंत्रज्ञान घेऊन नवीन बाजारपेठा शोधत असणाऱ्या युरोपात जगाची बाजारपेठ ताब्यात घ्यायची स्पर्धा लागली.
भयंकर प्रामाणिकपणे काम करणारा कलासाधक: संकर्षण कर्हाडे
✪ ‘व्हायफळ' गप्पा पॉडकास्टवर उलगडत जाणारा संकर्षणचा प्रवास
✪ ओळखीच्या चेहर्याच्या मागे असलेल्या दिलदार माणसाचा परिचय
✪ परभणी, अंबेजोगाई, औरंगाबादच्या आठवणी व लहानपणीच्या खोड्या
✪ प्रशांत दामले, श्रेयस तळपदे व सिनियर्सकडून त्याचं शिकणं आपण शिकावं असं!
✪ “स्टेजवरचा माज खाली दाखवलास तर तो स्टेजवर उतरवला जाईल!”
✪ “तुला मनलं होतं ना तुला बक्षीस द्यायचं हाय, रताळ्या!”
✪ “Soak the pressure and be there!”
✪ पुस्तकं व माणसं वाचणारा अवलिया
संकर्षण कर्हाडे! बस नाम ही काफी है! घराघरात पोहचलेला चेहरा! कलाकार, नाटककार, अभिनेता, सूत्र संचालक, लेखक आणि कवी!
श्री गणेश लेखमाला २०२४ - आनंदाचा कोपरा-माझी बाल्कनी
मोहम्मदवाडीचा सुर्योदय
कवीवर्य अभिजित दाते यांची गझल सेवानिवृत्त मंडळींची कथा,व्यथा नेमक्या शब्दांत मांडते.
गोंजारतो अताशा माझ्याच वेदना मी
सांगा तरी नशा ही दुसर्या कशात आहे
खेळात या नव्याने माझ्यात जन्मतो मी
माझ्या शहास अंती माझीच मात आहे
सेवानिवृत्तांकडे लोकांचे फारसे लक्ष नसते, जणू साईडला टाकलेली मालगाडी.कुण्या कवितेची ओळ
निबिडात दडलेल्या
निळ्याभोर पाखराची
लवलवती लकेर
जेव्हा कानावर येते....
निळ्यासावळ्या निर्झरा
फेसाळत, कवळून
पाणभोवर्याची माया
जेव्हा पैंजण बांधते...
मावळतीच्या बिलोरी
आभाळाला तोलूनिया
एक इवले पाखरू
जेव्हा पंखावर घेते...
काजळल्या नभावर
निळी रेष रेखाटत
दिशा, कोन झुगारून
जेव्हा उल्का कोसळते....
.....काळजात रुजलेल्या
कुण्या कवितेची ओळ
ध्यानीमनी नसताना
तेव्हा ओठावर येते
श्री गणेश लेखमाला २०२४ -सिंदुरात्मक गणेश
माझे आजोळ आणि मामाचे गाव शेंदुरवादा. एक शेत सोडले की मामाची शेती आणि माझे आजी-आजोबा सख्खे शेजारी. बालपण इकडेच दोघामध्ये गेलेले. छत्रपती संभाजीनगरातील डोंगरातून सुरू झालेली ही खाम नदी शहरातून वाहत वाहत शेंदुरवाद्यास येते. पाच-पन्नास वर्षांपूर्वीच्या नदीपात्राच्या विविध आठवणी आहेत. गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा हे खाम नदीच्या काठावर वसलेले गाव.
|| उत्कीर्ण विनायक ||
"काय नाव आहे म्हणे?" मी उत्सुकतेने विचारल.
तो : उत्कीर्ण !
"काय? उत्कीर्ण? हे असलं कसलं म्हणे नाव? उत्तीर्ण वै ऐकलंय.. पण हे उत्कीर्ण वेगळंच काही तरी दिसतंय!"
तो : "अरे, उत्कीर्ण म्हणजे खोदून किंवा कोरून तयार केलली कलाकृती"
कोरलेलं .. अर्थात उत्कीर्ण
अच्छा असं आहे तर! माझ्या वाचण्या ऐकण्यात हा शब्द आला नव्हता.
अच्छा असं आहे तर! माझ्या वाचण्या ऐकण्यात हा शब्द आला नव्हता.श्री गणेश लेखमाला २०२४ - आली गौराई अंगणी
आली गौराई अंगणी..
“गऊ, त्या झाडाच्या जवळ नको गं जाऊ सारखी. सोड एकटं त्याला थोडा वेळ.” आई खिडकीतून बघत ओरडली.
“झाडांशीही बोलावं. कळतं त्यांना सगळं. पुस्तकात आहे आमच्या. आईला काही कळत नाही, हो नं?” नवीनच लावलेल्या प्राजक्ताच्या रोपट्यापाशी गऊचं हितगुज चालूच होतं. तोवर आई तिथे पोहोचलीच. तिला लेकीची झाडांवरची माया आणि हट्टी स्वभाव दोन्ही चांगलंच माहीत होतं.
“अगं हो, पण तुझ्या बोलण्याकडे लक्ष देण्यासाठी त्याला थोडं स्थिर तर होऊ दे इथे. आपली माती सोडून आलंय ते इकडे. भांबावलं असेल.. आणि असंही.. एकदा झाड लावलं की थोडा वेळ काळजी घ्यावी.
मिसळपाव