पिंपळ
त्या तीरावर आहे तो पिंपळ
पानांतुन ज्याच्या सळसळते ऋतुंची जाग
आणि नखांनी ओरबाडतात ज्याला
बिलंदर खारी ढोलीतल्या.
तळहातच जणू!
पिंपळपानं आहेत काही तांबुस कोवळी
रेषांतुन जीवन घेऊन ओलंकंच
लालसावलेलं, आभा ल्यालेलं प्रकाशाची.
जडमूढ मुळांनी धरली आहे माती घट्ट
पसरून आपली बोटं लांबचलांब
आपोष्णी करायला पृथ्वीच्या गाभ्यातुन!
फांद्यांचे बाहू फेकत अस्ताव्यस्त
निळावंतीच्या वाणीने सांगतो तो
घरट्यातल्या पिल्लांना आणि चोचीतल्या अळ्यांनाही,
जन्मजन्मांतरीच्या कर्मकहाण्या
वाऱ्यावर दहादिशा होणाऱ्या रुई-म्हाताऱ्यांच्या
नी शीळ वाजवणाऱ्या पक्षांच्या.
पांथस्थांच्या सावल्या टेकतात त्याच्या बुंध्याशी
सुखदु:खांच्या बोला
उत्सव...
आजही काहीच पत्ता लागला नाही. दोन दिवसांपासून घरात अक्षरश: सुतकी वातावरण होतं. मुलांच्या डोळ्यातील पाण्याला तर खळ नव्हता. धाकट्या मुलीने तर कालपासून काहीही खाल्लेदेखील नव्हते. तोदेखील विषण्ण होऊन घरात बसला होता. एवढा शोध घेऊनही सापडत नसल्याने स्वत:वरच चरफडत होता. भिंतीवरचा त्याचा फोटो पाहून तर त्याला रडूच कोसळले.
... तेवढ्यात फोन वाजला. त्याने क्षणाचाही विलंब न लावता फोन कानाला लावला.
‘हॅलो, मी वृद्धाश्रमातून बोलतोय. तुम्ही दिलेली जाहिरात वाचली. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेला तुमचा कुत्रा इथे आलाय. तुमच्या आईशी खेळतोय. लवकरात लवकर या आणि तुमच्या कुत्र्याला घरी घेऊन जा!’
फोन कट झाला.
कारण तू
हल्ली मी कुठेच जात नाही.
कारण काय विचारतेस?
कारण तूच.
सवय लागलीये मनाला,
नको तिथे तुझे संदर्भ शोधायची..
तुझ्या पाऊलखुणा,
पुन्हा पुन्हा शोधायची.
एक दिवस उबग आला तुझा,
तुझ्या आठवणींचा,
मग ठरवलं आता जायचंच नाही कुठे..
काय म्हणालीस?
तसंही मला कुठे हौस होती फिरायची?
नव्हतीच ती, आजही नाही
मंदिरात जायची तर कधीच नव्हती हौस
पण तरी यायचो तुझ्याबरोबर..
गर्दीनं रेटून रेटून देवापुढे आणल्यावर
ते एक दोन क्षण काय तृप्त भाव असायचे तुझ्या चेहऱ्यावर
ते टिपायला म्हणून यायचो..
तिथून बाहेर पडल्यावर 'छान झालं नाही दर्शन'
असं घंटेसारख्या किणकिणत्या आवाजात
म्हणायचीस ना?
माझी पहिली सायकल राईड
माझ्या नवऱ्याला श्रीनिवासला सायकल चालवण्याचं फार वेड आहे. मी केव्हाही त्याला कुठे जाऊया म्हटलं कि लगेच त्याच पुढचं वाक्य 'सायकल ने जाऊया' हेच असतं. मी ४ चाकी गाडी चालवायला लागल्यावर ४ चाकीवर फिदा होऊन प्रसंगी एकटीसुद्धा फिरायला लागले. पण श्रीनिवास काही चिकाटी सोडायला तयार नव्हता. माझ्या सासर आणि माहेरच्या घरामध्ये फक्त ३५ किमीच अंतरआहे. केव्हाही त्याला आईकडे जाऊया म्हटलं कि सायकलने जाऊया हे ठरलेलं. त्याच्या जोडीने मी हळू हळू सायकलिंगला सुरवात केली होती पण ३५किमी तेही मधले घाट पार करून जाण्याची कल्पना करवेना.
Cold Blooded - २
Cold Blooded - Final - २
"हॅलो, वरळी पोलीस स्टेशन, सब् इन्स्पे. महाडीक बोलतोय..."
"गुड मॉर्निंग ऑफीसर! मी डॉ. सदानंद देशपांडे बोलतो आहे. इथे वरळी सी फेसवर एका मुलीची डेडबॉडी पडलेली आहे. तुम्ही ताबडतोब इथे या!"
"ठीक आहे डॉक्टरसाहेब! आम्ही लगेच येतो आहोत. फक्तं आम्ही तिथे येईपर्यंत कोणालाही बॉडीला हात लावू देवू नका, आणि तुम्ही तिथेच थांबा!"
"ओके ऑफीसर!"
भल्या सकाळी सहाच्या सुमाराला आपल्यासमोर अशी काही भानगड येईल याची महाडीकांना अजिबात अपेक्षा नव्हती, त्यामुळे त्यांची तारांबळच उडाली.
सूतक
वासुदेवरावांचा मृतदेह वाडयाच्या अंगणात ठेवला होता. भेटायला बाहेर सगळं गाव लोटलं होतं. चैतन्य सर्वांशी बोलण्यात आणि बाकीची व्यवस्था बघण्यात गुंतला होता. वासुदेवरावांचे जेष्ठ बंधू बाळासाहेब पण बैठकीत बसून त्याच्या समवयस्कांशी काहीतरी बोलत बसले होते. शेजारीच काही आप्तेष्ट तिरडीचे सामान तपासून पुढचं कसं काय करायचं ह्याची चर्चा करत होते. आत माजघरात स्त्रियांची गर्दी होती. कुणी हुंदके देत होतं, कुणी सांत्वन करत होतं तर कुणी स्वयंपाकघरात आवराआवर करत होतं. विमलाबाईंच्या भोवती बायकांचा घोळका जमला होता.
एक कविता हवी आहे
नमस्कार मंडळी !
एका निसर्ग-पर्यावरण कविता अंकासाठी (व्यावसायिक नाही) एखाद्या सुप्रसिद्ध मराठी कवीची एक कविता निवडायची आहे. जरा मदत करता का ? अभंग पण चालेल.
फडणवीस बुलेटिन ९
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी एक चांगले काम केले आहे. ऑर्डीनन्स काढून APMC नावाचा शेतकऱ्यांसाठी अत्यंत घातक असा कायदा बंद केला. ह्यामुळे दलाल लोकांचा माज कमी होईल आणि आपले शेतकरी बंधू आणखीन चार दिवस जगतील अशी अशा करण्यास हरकत नाही.
आता रेइलायन्स, द मार्ट सारख्या कंपन्या थेट शेतकऱ्याकडून माल खरीदू शकतील.
https://indianexpress.com/article/cities/pune/msp-agrarian-crisis-farme…
दिवाळी किल्ला: दगड, माती न वापरता !!! (पुनः प्रकाशित)
नमस्कार मंडळी,
दिवाळीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
दिवाळीचं जस फराळ, आकाशकंदील, फटाके, नवीन कपडे , गुलाबी थंडी, उटणं यांच्याबरोबर अतूट नातं आहे तसंच नातं आणखीन एक गोष्टीबरोबर आहे. किल्ला !!!
आपण प्रत्येकानेच लहानपणी किल्ला केलेला आहे. अगदी स्वतः नाही तरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे किल्ल्याच्या निर्मितीत भाग घेतलेला आहेच. ज्यांचं बालपण वाड्यात किंवा जुन्या सोसायटीत गेल आहे त्यांनी तर हा आनंद मनमुराद लुटलेला आहे.
परंतु सध्याची पिढी या बाबतीत थोडी कमनशिबी आहे अस म्हणायला लागेल.
मिसळपाव