Skip to main content

"नारळी पौर्णिमा स्पेशल" ओल्या नारळाच्या पोळ्या by Namrata's CookBook : १५

लेखक Namokar यांनी बुधवार, 14/08/2019 02:46 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ: १ तास लागणारे जिन्नस: ओलं खोबर (२५०ग्रॅ. ) गूळ/साखर(१५० ग्रॅ. ) वेलची पुड तुप गव्हाचे पीठ (१५० ग्रॅ. ) तेल पाणी मीठ क्रमवार पाककृती: १. सगळ्यात आधी कणिक मळून घेऊ २. एका परातीमध्ये गव्हाचे पीठ ,त्यामध्ये चवीनुसार मीठ घ्या ,लागेलतसे पाणी घालून कणिक मळून घ्या ३.

ज्वारीच्या लाह्या by Namrata's CookBook : १४

लेखक Namokar यांनी बुधवार, 14/08/2019 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
खरतर नागपंचमीसाठी ही पाककृती लिहायची होती पण काही अडचणींमुळे जमले नाही लागणारा वेळ: १ दिवस लागणारे जिन्नस: साहित्य: १ कप ज्वारी २ कप पाणी क्रमवार पाककृती: १. पाणी गरम करा २. ज्वारी गरम पाण्यात १५ मिनिटे भिजवा ३.

रसम पुरी

लेखक रमेश आठवले यांनी मंगळवार, 13/08/2019 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सर्वजण पाणी पुरी आवडीने खातो. दक्षिण भारतात जेवणात रसम वाढतात, आणि काही हॉटेलात रसम वडा असा प्रकार ही मिळतो. ह्या रसम ची द्रवता पाणी पुरीतल्या पाण्या सारखी असते. आज माझ्या पत्नीने घरी रसम बनवले होते. एम टी आर चे मद्रास रसम चे पॅकेट वापरले . त्यावर दिलेल्या कृती प्रमाणे हे रसम बनवले. त्याच्यात चिंच आणि गुळाचे पाणी घालायलाही सांगितले आहे. त्यांनी मसूर डाळ वापरायला सांगितले आहे. पण आपण साधे वरण किंवा बेसन वापरून हे रसम बनवु शकतो.पाणी पुरीच्या पुरी मध्ये हे रसम नेहमीच्या पाण्या ऐवजी घालून खाल्ले. हा वेगळा उपक्रम मला आवडला. आपणही अजमावून पहा

भित्यापाठी ब्रम्हराक्षस

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 13/08/2019 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
भित्यापाठी ब्रम्हराक्षस ------------------------------------------------------------------------------------------------ नदीकाठचं वातावरणच वेगळं असतं. त्याचं सौंदर्य दिवसा वेगळं भासतं तर रात्री वेगळं. दिवसा लोकांची लगबग चालू असते . आयाबाया धुणं धूत असतात . पोरं धबाधब पाण्यात उड्या घेत असतात ,डुंबत असतात . कुठे कोणी गुरं खंगाळत असतं . दिवसा लख्ख प्रकाशात नजर लांबवर जाते . कुठे एखादा चुकार खंड्या असतो तर कुठे बगळ्यांची माळ. पण नदीकाठचं वातावरण वेगळंच असतं; विशेषतः जेव्हा लोकांची गजबज नसते तेव्हा .प्रेमीजनांना तर फारच प्रणयरम्य भासणारं.

युगांतर - आरंभ अंताचा भाग २९

लेखक मृणालिनी यांनी मंगळवार, 13/08/2019 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
"महामहीम, एक दु:खद वार्ता आहे...." "बोल." "महामहीम, वनातून संदेश आला आहे." काहीतरी अघटित घडलेले असल्याचा अंदाज आला आणि भीष्माचार्य आसनावर रोवून बसले. आणि दसा कडे पाहू लागले. "पंडुंचे देहावसान झाले." "पंडु....." जोरात किंचाळून शेजारी उभी असलेली अंबालिका कोसळली. 'पिताश्री, चित्रांगद, विचित्रवीर्य..... आणि आता पंडु? हृदयाच्या निकटचे आप्तजन! हस्तिनापुरा, पाहतो आहेस ना हा नियतीचा खेळ? माझा शिष्य..... पंडु! या भीष्माला 'तातश्री' म्हणून मनापासून आदर देणारा....हस्तिनापुरच्या सीमा विस्तारत नेणारा......

३३ कोटींची मुक्ती

लेखक मायमराठी यांनी मंगळवार, 13/08/2019 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांबरोबर हॉटेलात मनसोक्त हादडंपट्टी करताना, रस्त्यात उभी अतिशय कृश अशी सवत्स धेनु, आमच्याकडे, आमच्या खाण्याकडे बघताना दिसली.

एक महाराष्ट्रीय स्त्री जेव्हा देशाची लाज काढते ? :(

लेखक माहितगार यांनी सोमवार, 12/08/2019 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
पाकीस्तान कडून भारतीय पत्रकारांना इनफ्ल्युएन्स करण्याचे प्रयत्न कसे केले जातात याचा पाकीस्तानच्या माजी राजदुत अब्दुल बासीत याने उघड गौप्य स्फोट केला आहे.

युगांतर - आरंभ अंताचा भाग २७

लेखक मृणालिनी यांनी सोमवार, 12/08/2019 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
युगांतर - आरंभ अंताचा! भाग २८ नंदघरी राहायला यशोदेने रोहिणीला बोलावून घेतले तेव्हापासून नंदाचे घर बलराम आणि कृष्णाच्या किलबिलाटाने भरून गेले होते. कृष्णाच्या दैवी चमत्काराच्या कैक वार्ता हवेच्या लहरींसोबत सर्वत्र पसरत होत्या. त्याच्या निळ्या रुपाची आणि विशाल काळभोर नेत्रांची भूल पडणार नाही अशी एक गोपिका गोकुळी मिळाली तर नवल! गोपिकांच्या पाण्याच्या घागरी फोडण्यापासून ते कोणाचाही घरात घुसून शिंकाळ्यातलं लोणी मित्रांसोबत वाटून खाण्यापर्यंत घडलेल्या प्रत्येक गोष्टींची तक्रार करायला गावभरच्या बायका नंदच्या घरी रांग लावत असतं. यशोदेचा दिवस त्या तक्रारी ऐकून कृष्णाला शोधण्यात जायचा.

सावज (भाग १)

लेखक अनाहूत यांनी सोमवार, 12/08/2019 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
काही लोकांच्या नजरेतच ती गोष्ट असते जिने त्यांना एखादी गोष्ट करायला फारसे कष्ट करावे लागत नाहीत . तिला काय झालं होत काय माहीत पण तिने आपोआप त्याच्या मागे चालायला सुरुवात केली . ते आलिशान हॉटेल होत . त्याने दरवाजा उघडला आणि त्याच्या नजरेच्या इशाऱ्याने ती आत गेली . त्याने एकवार बाहेर नजर टाकली आणि दरवाजा बंद करून घेतला. ================================================== " करायला सगळं काही करता येत पण त्यासाठी मोबदला मोजावा लागतो आणि मोबदला नेहमी पैशात असत नाही तो कधीकधी वेळ , समर्पण , आणि कधीकधी ...

धुरंधर

लेखक खिलजि यांनी सोमवार, 12/08/2019 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
पेटता पेटता विझलो कधी माझे मलाच कळले नाही दिला होता शब्द खरा पण काय ते नीट आठवलेच नाही या स्मृतीला कोण जाणे कुणाचा विखारी दंश झाला जो तो ओळखीचा असूनही इथे मलाच परका झाला कोणता हात धरू मी ? कोणता सोडून देऊ ? या हातांच्या विळख्यातच माझा नक्की कोणता ? तोच कळेनासा झाला समजत होतो धुरंधर स्वतःला पण या हळव्या हृदयाने घात केला मेंदूने बरेच समजावून पहिले त्यास पण हळूहळू तोही त्या हृदयात गेला इथेच घेतली समाधी मनाने इथेच माझा अंत झाला हाच तो विखारी दंश होता ज्याने धुरंधर परागंदा झाला {{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}