Skip to main content

बोलती बंद

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 01/01/2020 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे चाळीसगावच्या काकांना फोन करावा, असं मला दोन तीन दिवसांपासून वाटत होतं. असं अचानक आठवण येण्याचं कारणही समजत नव्हतं. आज रविवार. वेळ आहेच आता दुपारी तर करूया फोन असं वाटून फोन लावला. रेकॉर्ड ऐकू आली, ‘या नंबरची सेवा तात्पुरती बंद आहे.’ दोन तीन वेळा प्रयत्न केला. तेच तेच ऐकू यायचं. आधी मराठी मग हिंदी नंतर इंग्रजी. नंबर बंद. करू नंतर म्हणून डोक्यातून विषय बाजूला केला. यालाही दोन तीन दिवस झाले म्हणून पुन्हा एका संध्याकाळी फोन करून पाहिला. आताही नंबर बंदच. बायकोला सांगून ठेवलं, ‘चाळीसगावचा फोन लँडलाईनवरून ट्राय करत रहा.

ही वाट भटकंतीची : आठवण आणि उजळणी २०१९

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 31/12/2019 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
आज २०१९ चा शेवटचा दिवस, या वर्षातल्या घटना मागे वळून पाहताना छान वाटते आहे. लिखानाचे म्हंटला तर राजकीय आणि त्याच बरोबर सामाजिक मुद्द्यांमुळे मी पुन्हा मनातले बरोबर चुकीचे विचार शब्दात उतरवू लागलो... कविता , लेख हे जरी मी लिहित असलो तरी लिखान हा माझा मेन छंद कधीच नव्हता आणि नसेलही. त्यामुळेच कदाचीत, माझ्या लेखांवरील विरोधी मतांना मी कधी तावातावाने, हमरी तुमरीवर उत्तरे दिली नसतील. आणि हे माझ्या स्वभावाच्या कदाचीत उलटे आहे :). शब्दांना कदाचीत चेहरा चिकटला की ते अहंकाराचे रुप बनत असावेत ... येथे शब्द, लेख आणि लिखान हे माझे विचार असले, तरी त्यावर माझाच चेहरा उमटला आहे असे माझे मतच नाही.

फिटेल का हे ऋण माझे

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 31/12/2019 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
फिटेल का हे ऋण माझे विवंचना आत दाटली याच काळजीने मीच माझी वर जागा शोधली रोप मीच लावले बघून स्वप्न उद्याचे काय ठावं , याच जागी इथेच सुळी चढायचे रोज रोज तोच सूर्य तीच आग ओकतो रोज रोज मीच का पण ? तेच तेच भोगतो मीच जर का अन्नदाता रिक्त का रे चूल माझी ? घेतला नांगर हाती हीच का रे भूल माझी ? ऐकतो सरकारनामे अभय कर्जांना दिले फासली पाने पुन्हा ती भाव तैसेच राहिले ===================== सिद्धेश्वर विलास पाटणकर

लहरी (waves): द्रव्यांमधल्या धडकांचे बातमीदार (The Reporters of Interaction among elements)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी मंगळवार, 31/12/2019 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
(*** मागील लेखाविषयीची  'क्वांटम फिजिक्स किंवा 'तळ्यात की मळ्यात' फिजिक्स (..Why Quantum Physics is also the Probabilistic Physics)' टीप तळाशी आहे.) राजा विक्रमाचं राज्य जुनं, राजदरबाऱ्यांची आणि प्रजाजनांची निष्ठा प्रबळ, प्रजेचा राजावर, राज्याच्या तत्वनिष्ठतेवर नितांत विश्वास.. राज्य टिकणे, राज्याची संस्कृती टिकणे, राज्याचे भूप्रदेश शत्रूला न गिळता येणे, बाहेरील आक्रमकांना, आक्रमणांना तोंड देऊनही न डगमगणे, फुटीरांना फार वरचढ न होऊ देणे या सर्वात राजाचा नाही तर प्रजेचा मोठाच वाटा..

नाताळ, नववर्ष आणि पॉप संगीत

लेखक सुधीर कांदळकर यांनी मंगळवार, 31/12/2019 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
काही सूर अवखळ मनाला बेईमान बनवतात. ते कानी आले की मनाला फुलपाखरांचे मोहक पंख फुटतात. स्पॅनिश गिटार टणकारले वा सेक्साफोन फणकारले की असे होते. ऍकॉर्डिअनमधून रेशीमलहरी बाहेर पडल्या की मग आपले आपण राहात नाही. मन स्मृतींच्या फुलपाखरांवर स्वार होते, कालाचे अदृश्य तट विरघळून जातात आणि ते सूर आपल्याला गतकाळात घेऊन जातात. ते स्वर कानी आले की प्रथम आठवतो तो नाताळ आणि त्यापाठोपाठ येणारा नववर्षोत्सव. एके काळी पॉप संगीताशिवाय हे उत्सव साजरे होत नसत. धीरू पटेल आणि बाळ्या नाईक यांच्यामुळे गुजराती जवाहर मर्चंट, कन्नडिग रत्नाकर आचार्य, इ. नवे मित्र मिळाले.

भाषा आणि संस्कृती: एक अवलोकन

लेखक सर टोबी यांनी सोमवार, 30/12/2019 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
'सध्ध्याचा काळ मोठा कठीण आहे' हे वाक्य तुमचा सततच पाठलाग करायला लागले कि समजावे तुमची तारुण्याची गाडी उताराला लागली आहे. सहसा जगण्याची उस्तवार करताना जो संघर्ष करावा लागतो त्याचा आणि या वाक्याचा फारसा संबंध नसतो. पण जेंव्हा तुमच्या डीएनएचाच भाग बनून राहिलेल्या तुमच्या समजुतींना आता काही किंमत नाही हे कळायला लागते तेंव्हा एक वेळ अशी येते कि अगदी क्षुल्लक करणानेदेखील तुमच्या निग्रहाचा बांध फुटतो आणि ते सुरवातीचे वाक्य आपोआप तुमच्या ओठावर येते. सुरवातीपासून सुरुवात करायची म्हटले कि प्राथमिक शाळेत विरुध्ध अर्थाचे शब्दांच्या जोड्या जेंव्हा शिकलो ते दिवस आठवतात.

Kingआख्यान 2: फायरस्टार्टर

लेखक शा वि कु यांनी सोमवार, 30/12/2019 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
Kingआख्यान 1:- डोलोरस क्लेबोर्न टेलिकायनेसीस, टेलीपथी किंगच्या आवडत्या कथा आहेत. किंगची पहिली प्रकाशित कादंबरी "कॅरी" (Carrie- 1974) पण एका टेलिकायनेटिक शक्ती असणाऱ्या तरुण मुलीची गोष्ट होती. अपरिमित जीवितहानी करण्याइतपत शक्ती असलेली, पण बुजरी आणि एकलकोंडी असणारी एक teenage मुलगी, धर्मांध आणि वेडसर असलेली तिची आई, आणि याउप्पर कडी करायला तिला त्रास द्यायला टपलेल्या मुलामुलींचं टोळकं. या सगळ्यांच्या मिलापातून किंग विनाशाचं एक थरारक आणि तितकंच ह्रदयद्रावक तांडव रचतो.

बालकथा -लाडकं पाखरू

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी सोमवार, 30/12/2019 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
बालकथा -लाडकं पाखरू ----------------------------------------------------------------------------------------------------------------------- दिवस चांगला वर आला होता . दिन्या आळोखे - पिळोखे देत उठला . उठल्याबरोबर त्याने उशापासली गलोल चाचपली . दिन्याची आई चुलीपाशी बसली होती . उन्हाळ्याचे दिवस होते . गरम होत होतं अन चुलीपाशी तर जास्तच .तिने दिन्याला पाहिलं व ती म्हणाली , “ दिनू , लवकर आवर बाळा . मला शेतात जायाचं .बा गेलाय ना फुडं .” दिन्या तोंड धुवून आला .

लेखकाचे मानधन : कथा आणि व्यथा

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 30/12/2019 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्याच्या प्रांतात लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. मुळात एखादे साहित्य निर्माण होण्यासाठी लेखक हा मूलभूत स्त्रोत आहे. त्याने काही लिहिल्यावरच अन्य तीन घटकांचा प्रश्न उपस्थित होतो. लेखक स्वतःच्या प्रतिभेने लिहितो आणि मग ते लेखन लोकांनी वाचावे या आशेने निरनिराळ्या माध्यमांत प्रकाशित केले जाते. लेखन करताना लेखकाची बुद्धी आणि कष्ट खर्ची पडतात. त्याच्या लेखनातून वाचकांचे रंजन होते आणि त्यांना अन्य काही फायदेही होऊ शकतात. त्याचा मोबदला म्हणून लेखकाला काही मानधन मिळावे अशी प्रथा पडली. जे लेखक बाजारात यशस्वी ठरतात ते व्यावसायिक म्हणून गणले जातात.

भारतीयांचे अपमानास्पद पराभव:- प्रकरण -१ खडकीची लढाई :-

लेखक kvponkshe यांनी सोमवार, 30/12/2019 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २ नाकर्त्याचे कर्तेपण -पेशव्याची युद्धपूर्व तयारी :- रावबाजी हा नाकर्ता , करंटा,पळपुटा म्हणून कुप्रसिद्धच आहे . तर अशा या पेशव्याने युद्धाची तयारी तरी काय केली होती तेही जरा पाहू . १. नागपूरचा इंग्रजी एजंट जेनकिन्स याने गव्हर्नर जनरल यास लिहिलेल्या पत्रात ( फेब्रुवारी १८१४) पेशवे आणि भोसले यांच्यात इंग्रजांविरुद्ध सुरु असणाऱ्या खलबतांचा उल्लेख केलाय . यात पेशव्याच्या नेतृत्वाखाली संभाव्य इंग्रजविरोधी युतीचा उल्लेख आहे . २. फेब्रुवारी १८१५ मध्ये रणजित सिंग यांच्या दरबारात संपूर्ण भारतात इंग्रज विरोधी युती करण्याच्या संबंधी बोलणी करण्यासाठी रावबाजीचा माणूस असल्याचा उल्लेख आहे . ३.