Skip to main content

शब्दवेध- भाग २

लेखक मारवा यांनी शुक्रवार, 17/01/2020 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो अगोदरच्या भागात न आलेले सर्व शब्द एकत्रित इथे देतो. १- समरसता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या, १४ एप्रिल २०१६ रोजी साजरा करण्यात आलेल्या १२५व्या जयंती दिवसापासूनच भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने शासकीय कामकाजात ‘सामाजिक समता’ ऐवजी ‘सामाजिक समरसता’ या शब्दाचा वापर सुरू केला असून यापुढे त्यांचा जन्मदिवस ‘सामाजिक समरसता दिवस’ म्हणून पाळण्यात येणार असल्याचेही जाहीर केले आहे संघाचा जाणीवपुर्वक समता या शब्दाला विरोध आहे त्याच्या मते समरसता हेच अधिक योग्य असे मुल्य आहे. या मागे असलेली विचारसरणी डॉ.

कूर्ग डायरीज ६

लेखक अभिरुप यांनी शुक्रवार, 17/01/2020 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
कूर्गला निरोप : आज आमचा कूर्ग मधील शेवटचा दिवस. वेळ कसा पटकन निघून गेला हे कळलेच नाही. आमच्या या प्रवासात पर्यटनाबरोबरच आराम हे सुद्धा आमचे दुसरे ध्येय होते. वेळेअभावी बरीचशी स्थळे जरी या प्रवासात पाहता आली नसली तरीही त्याचे शल्य तितकेसे मनाला टोचत नव्हते कारण ज्या स्थळांना आम्ही भेट दिली होती ती एकतर खूपच छान होती आणि त्यांना भेट देण्याचा अनुभव एकदम पैसे वसूल होता. कूर्ग हे स्थळ पुन्हा पुन्हा पाहण्यासारखे आहे यात शंकाच नाही. इथल्या निसर्ग सौंदर्याने अगोदरच मनावर गरुड केले होते. त्यात दाक्षिणात्य जेवणही अप्रतिम. त्यामुळे कुर्गचा निरोप घेणे कसेसेच वाटत होते. पण पर्यायही नव्हता.

भाग ६ अंधारछाया प्रकरण ५ - पोलक्यावर काळ्या फुल्या! काळ्या कुळकुळीत! डिजाईन सारख्या फुल्या! मी पटकन तिचा पदर पाठीवरून ओढून घेतला.

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 17/01/2020 21:05 या दिवशी प्रकाशित केले.

अंधारछाया

पाच मंगला सदासुखला तीनचा शो पाहिला. तिथेच कॅफे रॉयलमधे आंबोळ्या, टॉमॅटो आम्लेट खाल्ले. परत टांग्यातून येता येता साडे आठ झाले. काकू वाट पहातच होत्या आमची. अंथरुणे घालून पडलो. मुलं झोपल्यावर हे दारांना कड्या कुलुपं लावून आले. उशी खाली किल्ल्या ठेवून झोपलो. पण कालचा प्रकार आठवून झोप थोडीच येत्येय? रात्र अस्वस्थेतच गेली. हे ऑफिसातून संध्याकाळीच एकदम येणार असा निरोप तातोबा घेऊन आला. मग आम्ही तिघींनी जेवणं उरकून घेतली. पडलो मधल्या खोलीत मासिकं वाचत. इतक्यात दारावरची बेल वाजली. जरा त्रासातच दार उघडले, तर दोन अनोळखी बायका दारात. म्हणाल्या, ‘आम्ही सांगलीहून आलोय.

सनकी भाग ६

लेखक शब्दांगी यांनी शुक्रवार, 17/01/2020 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
शिवीन कायाने घातलेल्या काँट्रॅक्टच्या अटी मान्य करायला तयार नव्हता. कारण त्या अटी खुपच जाचक व पूर्ण कायाच्या फायद्याच्या होत्या. शिवीन कायाकडे पाहत बोलू लागला. शिवीन,“ it’s very unfair to me. I can’t afford that. काय आहे हे its not joke. पहिली अट १ कोणते ही डिजाईन तुम्ही अप्रुव केल्या शिवाय मी वर पाठवू शकणार नाही पण तुम्ही केलेले डिजाईन मा‍झ्या अप्रुअल शिवाय पाठवणार. मला अमान्य आहे. २ जर मी मध्येच कोणत्याही कारणास्तव प्रोजेक्ट सोडला तर मी प्रोजेक्ट मध्ये लावलेले पैसे बुडणार व तुम्हाला मी वरून दंड म्हणून 15cr द्यायचे.

भाग ५ अंधारछाया प्रकरण ४ - मी हिला धरतो. आता हित मटनाचं जेवान बिवान देतो म्हनत्यात. तू फक्त सोड तिला. मी बघतो तिच्याकडं. बघ कसा बकाबका खातो ते.’

लेखक शशिकांत ओक यांनी गुरुवार, 16/01/2020 20:17 या दिवशी प्रकाशित केले.

अंधारछाया

चार मंगला गेले चार रात्री काही माझा डोळ्याला डोळा नाही. ह्यांनी सांगितलं, ही बेबी अशी कड्याकाढून बाहेर जाते म्हणून. मी हबकलेच. हे रात्री जागे झाले म्हणून बरं. गेली असती पुढे चालत एकटी तर शोधायची कुठे तिला ? आधीच ही नवीन गावात. रस्ते माहित नाहीत. काही म्हणता काही होऊन बसलं असतं बरं. मी यांना सांगितलं, ‘आधी सगळ्या दारांना कुलुपं घाला रात्रीची. मगच मला झोप येईल.’ हे म्हणाले मला, ‘विचार तिला काय होतय झोपल्यावर म्हणून. पण ती म्हणते, ’काही नाही मी झोपते छान. इथे आल्यापासून झोप छान लागतेय ’. मला पुढे काही सुचेना विचाराव कसं ते.

फेंगशुई,कासव आणि चिरंजीव

लेखक Cuty यांनी गुरुवार, 16/01/2020 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
D mart मध्ये खरेदी करत असताना चिरंजीवांची भुणभुण सुरू होती. त्याला एक काचेचे पारदर्शक रंगाचे कासव आवडले होते. ते त्याला खेळायला हवे होते. मी पाहिले, त्या ठिकाणी फेंगशुईच्या अनेक वस्तू ठेवल्या होत्या. त्यातच ते कासवपण होते. मी नाक मुरडूनच तिथून पुढे निघून गेले. माझा अश्या गोष्टींवर विश्वास नाही मात्र नवरोबांचा आहे. घरी आल्यावर सामान भरून ठेवताना पाहते तो काय! चक्क ते कासव सामानाच्या पिशवीत दिसले. मग लक्षात आले,हा उद्योग चिरंजीव आणि त्याच्या पप्पांचा आहे. दोघांनी मला नकळत खरेदी करून ते घरी आणले होते. मग दोन दिवस ते कासव कुठे ठेवायचे यावर बापलेकांत वाद सुरू होता.

चित्रपट परीक्षण/रिव्यू : 'Tanhaji: The Unsung Warrior'

लेखक bhagwatblog यांनी बुधवार, 15/01/2020 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य उभे केले ते चतुराई, कर्तबगारी, खंबीर नेतृत्व, विचाराची कल्पकता, लढाऊपणा, गनिमी कावा, पराकोटीचा पराक्रम, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाख मोलाची स्वराज्या साठी घाम गाळणारी, पराक्रम आणि बलिदान देणारी माणसं त्यांनी जमा केली. त्यापैकी एक होते “नरवीर तानाजी मालुसरे”. हे नाव उच्चारताच फक्त एक नाव आठवते ते म्हणजे सिंहगड. त्यासोबत महाराजांचे प्रसिद्ध विधान आठवते “गड आला पण सिंह गेला”. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे कित्येक मावळे, सरदार, गनिमीकावा तंत्र, विविध आरपारच्या लढाई, किंवा त्यांच्या मोहिमे वर चित्रपट निघू शकतो.

ज्युनियर सिनियर

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 15/01/2020 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे इथल्या प्रत्येक कथेतला ज्युनियर वेगवेगळा आहे. एकच नाही. इथल्या प्रत्येक कथेतला सिनियर वेगवेगळा आहे. एकच नाही. म्हणून तर त्यांच्या वागण्याबोलण्याच्या नाना तर्हाक. विविध जीवननिष्ठा असलेल्या ज्युनियर लोकांची किती नावं ठेवायची. म्हणून प्रातिनिधीक एक ज्युनियर. तसेच सिनियरांचेही. असाच अजून एक ज्युनियर आपल्या साहित्यकुंज रसिक मंडळात नेहमीच जात असतो. कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार बसायची बैठक सजवलेली असते. हॉलची समोरची जागा म्हणजे व्यासपीठ. इथे गाद्या टाकलेल्या असतात. गाद्यांच्या समोर सतरंज्या अंथरलेल्या असतात. सतरंजीनंतर उघड्या फरश्या.