Skip to main content

बाल्कनीत ओला कचरा कुजवणे

लेखक कंजूस यांनी सोमवार, 08/06/2020 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
घरातला ओला कचरा हा कुजल्यावर झाडांसाठी उत्तम खत आहे. झाडं लावताना आपण कुजलेले खत बुंध्याशी देतो किंवा कुंडीत माती भरताना त्यात मिसळतो. बाल्कनीत झाडे ठेवताना कुंडीत झाडाभोवती कुजलेली तयार झालेली खत- माती टाकली की फुलझाडे, वेलभाज्या चांगल्या वाढतात. पण कचऱ्यातून ते कुजलेले खत होण्यासाठी कुठेतरी तयार करावे लागते आणि कमीतकमी तीन महिन्यांचा काळ. मोठा प्लाट अथवा गच्चीवरील जागा असेल तर हे करणे सहज शक्य आहे.

गनिमी कावा

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 08/06/2020 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
``तू पहिल्यासारखा राहिला नाहीस.`` पहिल्याच वाक्यानं त्याचं कामातलं लक्ष उडालं. ``आता काय झालं?`` त्यानं काळजीनं विचारलं. ``काही नाही. जाऊ दे.`` तिनं दोनचार तोंडवाकडे, लालबुंदे, भुवईउडवे इमोजी टाकले. अशा प्रसंगी काय करायचं असतं, हे त्याला लग्नाच्या दहा आणि व्हॉट्स अपच्या सहा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर नीटच माहीत झालेलं होतं. ``अगं सांग ना, काल तुला फोन केला नाही, त्याचा राग आलाय का तुला?`` ``कालचं काय विशेष? हल्ली फोनच करावासा वाटत नाही तुला! चॅट करायलाही वेळ नसतो!`` ``….`` ``आता काही बोलणार नाहीस, माहितेय मला. मी इकडे एकटी असते, सगळं घर सांभाळते, काही कुरकुर न करता.

पन्नाशीचा टप्पा

लेखक मनोज यांनी सोमवार, 08/06/2020 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
आता आता दादा होते कसे मग काका झाले तरुणाच्या यादी मध्ये बघा किती मागे गेले दिसते आहे टक्कल पांढर्‍या झाल्या मिश्या हळू हळू मोठ्या होती कश्या प्रौढत्वाच्या रेषा शत्रूवर येऊ नये तो प्रसंग येतो असा तिशीची बाई म्हणते काका जागा आहे बसा पटापट हातातून आयुष्य जात पळून पन्नाशीचा टप्पा आला मागं पहावं वळून काय काय राहिलंय केली पाहिजे यादी काय माहित कधी धरावी लागेल गादी तू लक्ष नाही द्यायचे कुरबुर केली कुणी ऐकत बसावं मस्त आवडती गाणी जुनी कारणाशिवाय एक टाकून द्यावी रजा पोरा सोबत आपल्या खूप करावी मजा खर आहे घरासाठी तर झिझल पाहिजे एकदा सरीत पण चिंब भिजलं पाहिजे राहिलं असेल बघ ते डोंगर

ओला कचरा निर्मूलन- इच्छा आणि त्रास

लेखक जेडी यांनी सोमवार, 08/06/2020 01:15 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात सद्या महत्वाची समस्या म्हणजे घनकचरा आहे . अर्थातच कचरा निर्मूलन जिकिरीचे होऊन बसले आहे. आजकाल साफसफाई कामगारांना सोसायटीत वरच्या मजल्यावर प्रवेश नाही . रोज कचरा खाली नेवून टाकावा लागत आहे. बरेच लोक आता हे सर्व स्वतःच करत असले तरी प्लॅस्टीकच्या पिशव्यात भरून तशीच पिशवी टाकत आहेत . ती ओल्या कचऱ्याच्या डब्यात जरी ओतली तरी निम्मा अर्धा ओला कचरा त्या पिशवीला चिकटून सुक्या कचरायच्या डब्यात जात आहे. खरे पाहता प्रत्येक घराने आपला ओला कचरा घरातच जिरवला पाहिजे, असे महापालिका सांगत आहे . अनेक ठिकाणी काही दिवस महापालिका कचरा उचलत नाही आणि घाणीचे साम्राज्य पसरते.

श्री शेषाद्री स्वामी - संक्षिप्त परिचय

लेखक मूकवाचक यांनी रविवार, 07/06/2020 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
श्री शेषाद्री स्वामी हे रमण महर्षींना समकालिन असलेले सिद्ध सांप्रदायिक सत्पुरूष होते. रमण महर्षी आणि स्वामींमधे सर्वसामान्यपणे सत्पुरूषांमधे असते तसेच आंतरिक जिव्हाळ्याचे आणि परस्पर आदराचे नाते होते. शेषाद्री स्वामींविषयी उल्लेख केला नाही तर महर्षींच्या चरित्राला पूर्णत्व येत नाही. महर्षींच्या आयुष्यात त्यांच्या भूमिकेला एक अनन्यसाधारण असे महत्व होते. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी सर्वसंगपरित्याग करून रमण महर्षी अरूणाचलाच्या आश्रयाला आले.

लोकडाउन सुरु आहे - भाग अंतिम - ते अतरंगी किस्से १

लेखक श्रीकांतहरणे यांनी रविवार, 07/06/2020 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या अतरंगी स्वभावामुळ अन आमच्या अजब गजब कारनाम्यां मुळ, आमी लवकरच कॉलेज कॅम्पसमध्ये फेमस झालो होतो. मित्र ही आता लय वाढले होते. राहुल्या, दिसाले एक्दम शांत, पण एकदा सुप्तगुण नाई, त मंग तो अमरावतीकर कसला? टपरीवर पोट्याचा गोळका असला, की आमी तिघ तिथं पोहचाच. मग काय बिनकामाच्या गप्पा मारत, एक, एक कटिंग चा कदी होऊन जाचा समाजातच नसे. हळूहळू आमच्या दोस्त्याच्या डोक्यात प्रकाश पळाले लागला. "अबे!! लेका, हे त फुकटे, कधी चहाले पैसे काढत नाई." झाल आता खरी मजा. आमी टपरीवर आलो, कि यायले चा पाजाचा नाई, अस पोट्टे ठरवूनच असायचे.

बिन स्प्राऊट कोंबडी

लेखक चौकस२१२ यांनी रविवार, 07/06/2020 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: - बिन स्प्राऊट - कोंबडी ( लांबट काप करावे ) - कोरडी तांबडी मिरची - ताजी मोठी तांबडी मिरची ( शक्यतो तिखट नसावी ...) - पातीचा कांदा - लसूण काप - लांबट कापलेला कांदा - काजू - शेंगदाण्याचे तेल - सोया सॉस कोंबडी लसूण आणि थोडे सोया सॉस मध्ये भिजवूं १-२ तास ठेवावे प्रथम मोठ्या वॊक मध्ये मध्यम आचेवर तेल तापवून त्यात कोरड्या मिरची चे तुकडे तळून घावेत व बाजूला काढून ठेवावे ( तेलास मिर्चांचा स्वाद लागेल ) नंतर या तेलात काजू तळून घायवेत व बाजूला काढून ठेवावे, जे थोडे तेल उरले आहे ते हि बाजूला काढावे - आच चांगली मोठी करावी आणि वॊक चांगलाच तापवू द्यावा ..

दोसतार - ४८

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 07/06/2020 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
अशा सहा उदबत्त्यांची एक मोठी माळ करायची. आणि पलंगाखाली ठेवायची. सहव्या उदबत्तीच्या शेवटच्या टोकाला मोठ्ठा दंड्या फटाका वातीला बांधून ठेवायचा. सहावी उदबत्ती शेवटच्या टोकापर्यंत यायला सकाळचे पाच साडेपाच होणार. दंड्या फटाका उडणार. येवढा मोठा दंड्या फटका अगदी पलंगाखाली ढाम्म करून उडाल्यावर कुंभकर्णाला सुद्धा जाग यायला पाहिजे. मागील दुवा http://misalpav.com/node/46878 लवकर उठायचे म्हणून कुंभकर्णाला जाग आणायचा गजर स्वतःसाठीच लावल्यावर झोपी गेलो. आपल्याला सकाळी तानुमामाच्याही अगोदर नक्की जाग येणार . तानुमामा सकाळी काहितरी गम्मत करणार म्हणतोय.