Skip to main content

इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 24/08/2020 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
(महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अनावलोकन व टिप्पणी असंशोधित खाजगी मंडळ, पुणे-१२) इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट (प्रस्तावना : कोरोना आजारापश्चात एखाद्या इयत्तेतील अभ्यासक्रमात एखादा पाठ कसा असू शकेल, हे लेखकाच्या मनात आल्याने 'इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट' हा पाठ लिहिला आहे. ) जगात सर्वप्रथम कोरोना अर्थात कोविड-१९ या आजाराचा उद्रेक चीन देशातील वुहान या शहरात डिसेंबर २०२०च्या दरम्यान झाला होता. या शहरातून इतरत्र तसेच इतर देशात गेलेल्या व्यक्तींमार्फत हा आजार इतर देशांत पसरला. साधारण जानेवारी २०२०च्या शेवटी कोरोना या आजाराची लागण असलेले रुग्ण भारतात सापडले.

काठियावाडी मिरच्या

लेखक Bhakti यांनी सोमवार, 24/08/2020 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर तुम्हाला वाटत असेल गणपतीमध्ये गोडधोड सोडून हे काय तिखट मिरची?खूप खूप मोदक करून,खाऊन झाले. तेव्हा अशाच लोळत पडलेल्या दोन पोपटी लांब लांब मिर्च्यांकडे लक्ष गेले.आल्या तेव्हा चांगल्या तरतरीत होत्या,आता पार आळसावल्या होत्या.चिडून कि काय लाल व्ह्यायला लागल्या होत्या.विचार करीत असतील आम्हाला ही घेते की म्हाताऱ्या झाल्यावर फेकते. तेव्हा डोक्यात आलं,ते काठीयावाडी पद्धतीने बेसन पिठ पेरून खूप दिवसांपासून मिरच्या करायच्या होत्या.तेव्हा आजचा मुहूर्त चांगला आहे.तसही यापूर्वी नोकरी सांभाळून २० मिनिटांत स्वयंपाक करण्याची कला मी आत्मसात केली होती.ती मोडली ,पण हे यु ट्यूब वर पाककृती पाहून करण्यात एक श

अंधेरी, सेनस्केस आणि ट्रेन

लेखक लेखनवाला यांनी सोमवार, 24/08/2020 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
**************** सकाळचा तो लोकल ट्रेनच्या आतला भाग. नाकीनऊ करत का होईना ट्रेनच्या आतल्या गर्दीत एकदाचे दोन्ही पाय डब्यात टेकवायला जागा झाली खरी, आणि थोडं थोडं पुढे आतमध्ये शिरत, आता एका कोप-यात टेकून उभं राहता आलं शेवटी त्याला, माणसां मागून माणसं आत रेटत होती, मघास पासून आत खिश्यात असलेला मोबाईल एकदाचा हातात आला, आजूबाजूला एकदा त्यानें सभोवार नजर मारली, खूपजण त्यांच्यासारखेच मोबाईलमध्ये गुंतले होते, तितक्यात अचानक एकजण उठल्यामुळे बसण्याजोगी ‘चौथ्या’ सीटची जागा झाली आणि तो बसला.

श्रीगणेश लेखमाला २०२० - अजाणता

लेखक आजी यांनी सोमवार, 24/08/2020 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
1 मी त्या वेळी चार-साडेचार वर्षांची असेन. आम्ही त्या वेळी मलकापूरला राहात होतो. मी सगळ्यांत धाकटी, शेंडेफळ. त्यामुळे सर्वांची लाडकी. वडील डॉक्टर. घरापासून दवाखाना जवळच होता. मलकापूर तसं खेडंच. घरापासून दूर एस टी स्टँड होता. रेल्वे नव्हती. घरापासून जरासं दूर एक देऊळ होतं. त्या देवळातच शाळा भरायची. प्राथमिक. शाळेत मुलं फारशी नव्हती.

श्रीगणेश लेखमाला २०२० - आठवणींच्या आठवणी

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 24/08/2020 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
1 ४२चा सुमार असावा. ठाण्यात गडबड होती. कलेक्टर कचेरीवर मोर्चा निघणार होता आणि अर्थातच तो मोडून काढण्याचा सरकारचा प्रयत्न होता. भेटून देणं दूरच, पण कुणाला कचेरीच्या आसपासही फिरकू न देण्याचे आणि मोर्चा लांब, दूरवर अडवण्याचे हुकूम होते. कडेकोट बंदोबस्त होता.

पार्टी

लेखक Govind यांनी रविवार, 23/08/2020 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
सुगी संपली आणि ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला. सालाबादप्रमाणे गावोगावचे मजूर ऊसतोडीसाठी निघाले. आमच्या गावातील काहीजण दूरदूरपर्यंत जायचे.त्यांच्या नेण्याआणण्याची आणि रोजंदारीची व्यवस्था शेजारच्या गावातील काही जण करायचे. त्यांना मुकादम म्हणतात. आठ दहा टोळ्या त्यांच्या हाताखाली असतात. कामगारांची ने आण करायला तेव्हा ट्रक नव्हते. या टोळ्या रबरी टायरची चाके लावलेल्या बैलगाड्यांमधून उसाची वाहतूक करीत. अशा टोळ्या आमच्या गावावरून निघाल्या कि त्यांची ती भलीमोठी रांग पाहायला भारी मजा यायची. बैलांच्या गळ्यातील घुंघरमाळांची ती कलकल ऐकून कितीतरी वेळा भान हरपून जाई. आजही तिचा आवाज माझ्या कानांमधे घुमतो.

रुजवण

लेखक ज्येष्ठागौरी यांनी रविवार, 23/08/2020 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
रुजवण अक्का गाडीत बसून अगदी दिसेनाश्या होईपर्यंत ती तिथेच उभी होती.डोळ्यातलं पाणी निखळलं पूर्ण आणि मग ती आत वळली.उण्यापुऱ्या सात दिवसात काय जीव लावला ह्या बाईनं! म्हणायला गेलं तर आत्तेसासू पण सर्वार्थाने ह्या घरची एकमेव बाई.लग्न झाल्यानंतरच्या आठ दिवसात घरातलं पीठामिठासकट सगळं सगळं दाखवलं त्यांनी.आज त्या त्यांच्या घरी परत जाताना तिला लग्नाच्यादिवशी डोळ्यात आलेल्या पुराची आठवण करून गेल्या.आता तिला एकदम पोक्त वाटायला लागलं. घरात सासरे,नवरा,वीस वर्षाचा, तिच्यापेक्षा एखाद्या वर्षानी मागे एक दीर, आणि दहा वर्षांचे जुळे, आवळेजावळे दीर.

पालक मसाला डोसा

लेखक मृगतृष्णा यांनी रविवार, 23/08/2020 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
" पालक " ही पालेभाजी घरातील सर्व सदस्यांनी खावी अशी इच्छा एकंदरीत सगळ्या "पालकांची " असते , सगळ्या पालकांची म्हणजे अगदी आजी - पणजी पासून सगळे आपापल्या मुलांना सांगताना आपण ऐकतो, कारण सगळ्यांना ही पालेभाजी आवडेलच असे नाही . आजकाल "पालक - पनीर " या हॉटेल मध्ये मिळणाऱ्या आणि त्यात पनीर आहे म्हणून खाणाऱ्यांचं प्रमाण थोडे बहुत अधिक आहे. असो आज एक नवीन रेसिपी लिहीत आहे जी पौष्टिक , झटपट नाही जरा वेळ लागतोच, खमंग, चटपटीत आहे ....