Skip to main content

"मित्रा"स पत्र...!!

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी रविवार, 27/09/2020 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
*"मित्रा"स पत्र...!!* आज *"रवि"* वार, माझा आवडता वार. रोजच्याप्रमाणे सकाळी, पक्षांच्या किलबिलाटाने लवकर जाग आली. लोळत बसण्याचा कंटाळा आहेच मला. पटकन चहा घेऊन तुझ्या आठवणीने माडीवर गेले. आजही तुझं दर्शन नशिबात दिसेना... मस्त ढगाळ हवा होती. गार वाराही सुटला होता... काय रे हे.....? किती वेळ वाट पाहू..? दोन दिवस झाले आपली भेटच होत नाहीये. नुसत्याच मनात आठवणी दाटून येत आहेत. डोळ्यासमोर येतोय तुझा तेजस्वी चेहरा.. सकाळी भेटतोस, तेव्हा नं तू अगदी नुकत्याच न्हाऊ-माखू घातलेल्या लहान बाळासारखा निरागस, लालचुटूक दिसतोस.. तेव्हा मला खूप आवडतोस.. पण आज मात्र....

एस. पी. आम्ही फक्त तुलाच नाही तर आमच्या तारुण्याला देखील गमावलं आज....

लेखक अबोलघेवडा यांनी रविवार, 27/09/2020 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
हॅलो SP ... कालच बातमी आली तू आम्हाला सोडून गेल्याची आणि खरं सांगतो तुझा चेहरा आणि आमच्या आठवणीतलं आमचं तारुण्य दोन्हीही पकडीतून निसटून गेलं बघ... बातमी वाचली तेव्हा कुठे कळलं की तू ७४ वर्षांचा होतास. हो कारण या अगोदर आम्ही तुला तुझ्या आवाजामुळे सतत तरुणच समजत होतो. आवाजाला कुठे रे असतं कधी वय? आणि तू जी हिट गाणी दिलीस ना तेव्हा आमचं तारुण्य ऐन भरात होतं त्यामुळे SP कधी म्हातारा होऊच शकत नाही अशी ठाम समजूत झाली होती आमची. मैने प्यार किया (१९८९) पासून तू जो आमच्या तारुण्यात आलास तिथपासून ते हम आपके है कौन (१९९४) पर्यंत म्हणजे आमचं सगळं कॉलेज विश्व तू बरोबर व्यापून राहिलास.

गायक S.P. बालसुब्रहमण्यम् यांचे निधन

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 25/09/2020 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीपति पंडिताराध्युला बालसुब्रहमण्यम् अर्थात एस. पी. बालसुब्रहमण्यम् यांचे आज वयाच्या ७४ व्या वर्षी चेन्नईत निधन झाले. सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक म्हणून सहा वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि गायनक्षेत्रातले विविध पुरस्कार मिळवलेले , ४० हजारहून अधिक गाणी गायलेले गायक आणि अभिनेते म्हणून प्रामुख्याने ते आपल्याला माहित आहेत. हिंदी,संस्कृतसह दक्षिणेच्या चारही राज्यभाषांमधे त्यांनी गाणी गायली आहेत. त्यांनी गायलेली अवीट गाणी आपल्या सर्वांना नेहमीच आनंद देत राहतील. एस.पी. बालसुब्रहमण्यम् यांच्या माझ्या आवडीच्या सिनेगीतांच्या युट्यूब लिंक्स देत आहे.

अमरनाथ-वैष्णोदेवी-अमृतसर - 2012 - भाग 2

लेखक नयना माबदी यांनी शुक्रवार, 25/09/2020 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
22 जुन 2012 गाडीने वेग पकडला व आम्ही जम्मु कडे प्रस्थान केले. मुंबई ते जम्मु हे अंतर 1950 कि.मी आहे ते पार करण्यासाठी स्वराज एक्सप्रेस 30 तास घेते. आम्ही पहिल्यांदाच इतक्या लांबचा प्रवास करत होतो. मजा येत होती. 22 जुन चा संपूर्ण दिवस गाडीमधेच गेला. मुंबई-सुरत-रतलाम-कोटा-मथुरा-दिल्ली-अंबाला-जालंधर-पठानकोट असे करत आम्ही 23 जुन ला दुपारी 3 वाजता जम्मु ला पोहोचलो. 23 जुन 2012 काश्मीरला जातोय म्ह्टल्यावर डोळ्यासमोर येतात बर्फाच्छदीत डोंगर , खुप थंडी. आम्हाला ही असेच वाटले होते पण जम्मुला उतरताच आमची भ्रमनिराशा झाली. जुन महीना असल्याकारणाने जम्मुला खुप उकडत होते.

लघुसिद्धान्तकौमुदी

लेखक साहना यांनी शुक्रवार, 25/09/2020 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कृत भाषेच्या अभ्यासाच्या निमित्ताने `लघुसिद्धान्तकौमुदी` ह्या पुस्तकाची ओळख झाली. इथे ओळख ह्या शब्दाचा अर्थ अक्षरशः मी पुस्तकाचे फक्त बाह्यपृष्ठ आणि प्रथम पान पहिले असा होतो. भाषाशास्त्राची मला फार आवड आणि त्यातल्या त्यांत शब्दांचे इतिहास जाणून घ्यायची फार इच्छा. पुस्तक उघडून ते वाचण्याआधी मी आधी लघुसिद्धान्तकौमुदी ह्या शब्दाचा अर्थ जाणून घेतला. लघुसिद्धान्तकौमुदी हे पुस्तक पाणिनी महर्षींच्या अष्ठाध्यायी ह्या पुस्तकाचे एक छोटे स्वरूप आहे.

दौलतगड उर्फ दासगावचा किल्ला

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 25/09/2020 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
सावित्री, गांधारी आणि काळ नदीच्या तीरावर असलेल्या महाड तालुक्यात गांधारी नदीकाठी सातव्या शतकातील गांधारपाले या बौद्धकालीन लेणी आहेत. सावित्री नदीच्या मार्गाने याठिकाणी गलबतातुन मोठया प्रमाणात व्यापार चालत असे. इतिहासकाळी महाड, खेड, गोवळकोट, चिपळूण ही नामांकित बंदरे होती. अरब, रूमशान, ग्रीस इथपासूनचा माल चौल, दाभोळ आणि नालासोपारा अश्या मोठ्या बंदरात यायचा. या मोठ्या बंदरातून मग तो माल छोट्या गलबतामधून महाडसारख्या आतल्या बंदरात आणला जायचा. सावित्री नदीच्या मार्गाने महाड परिसरात मालाची आवक-जावक होत असे.

परतीचे प्रवास

लेखक मका म्हणे यांनी शुक्रवार, 25/09/2020 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
म्हातारी माणसे एकटीच बसून अश्रू ढाळतात. कधी सहजच पाणी येते त्यांच्या डोळ्यातून उगाच. अचानक विकल होतात ती मागचे काहीबाहि आठवून. सैरभैर होतात माना हलवत चेहेऱ्यावर अपराधी भाव घेऊन... काय बर होत असेल त्यांना ? कोण आठवतय आता या वयात ? कशाने असे बावरले जात असतील ? कसल्या वेदना पाझरताहेत मनातून? आता खूप दूर निघून गेलेल्या माणसांना काही सांगायचे असेल, का आता जवळ असलेल्यांना काहीच सांगता येत नसेल? भोगलेल्या वेदनाचे माप ओतायचय त्यांना कोणाकोणाच्या पदरात की दिलेल्या दुखांच्या डागण्या पुसायच्यात कापऱ्या हातांनि? खोटे मुखवटे ओरबाडायचेत उरल्या सुरल्या ताकतीने का पडलेले चेहेरे पुन्हा एकवार ठाकठीक करायचेत

भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी कसे पैसे बनवते ?

लेखक ताजे प्रेत यांनी गुरुवार, 24/09/2020 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
हि अत्यंत धक्कादायक माहिती हाती आली आहे या कंपनीने बराच काळ नेटवर्क फुकट ऑफर केले आणि मग सत्यात स्वस्त सेवा सुरु केली . हे खूप पैसे घेणार असे बोलले जात होते पण यांनी दर कमीच ठेवले आहेत आणि इतर स्पर्धकांची वाट लावली आहे तर हे नक्की पैसे बनवतात कसे ? मोबाईल संपर्क दोन्ही बाजूने असतो..( mobile communication is 2 way ) तर वापरकर्ता पण टॉवर कडे डेटा पाठवत असतो , म्हणजे wave communication चालू असते. तर यांचे 4जी हे hyper efficient network आहे, म्हणजे फोन चार्ज करायला खरे तर जवळपास एक तृतीयांश ( खरे तर 31.7595 %) वीज लागते. आता कोणाचे वीज बिल यांचे नेटवर्क वापरत असल्याने कमी झाले आहे का ?

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प सायकल राईड, २५ ऑगस्ट, २०२०

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी गुरुवार, 24/09/2020 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प सायकल राईड २५ ऑगस्ट, २०२० 500 दोन वर्षांपूर्वी विजयदुर्ग किल्यावर गेलो होतो, तेव्हा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प खाडीच्या पलीकडे दिसत होता. या प्रकल्प परिसराला भेट देण्याचे तेव्हाच नक्की केले होते. आज सायकलिंग करत जैतापूरला जाण्यामुळे माझ्या बकेटलिस्ट मधील एक इच्छा पूर्ण होणार होती. सकाळीच राजापुरातील वाल्ये गावातून सुरुवात करून कोंडये घाटी रस्ता निवडला.