गुरुविण कोण दाखविल वाट ?
गुरुविण कोण दाखविल वाट ?
संवेदनाशील व्यक्तिमत्वच चाकोरीबाहेरील जीवनाचा विचार करु शकते. प्राप्त जीवनात काहीतरी करायचे आहे या ध्येयवादाने पछाडले गेलेले असे व्यक्तिमत्व मग गुरुच्या शोधास लागते.
एकदा खात्री झाली की आपणाला याच मार्गदर्शनाची आवश्यकता आहे की मग नकळत गुरु-शिष्यांचे नाते निर्माण होते. प्रेम व भक्ति जागृत होते. श्रध्दा बसते. श्रध्देमध्ये जबरदस्त शक्ति असते. आत्म-विश्वास निर्माण होतो. आणि नकळत शिष्याची मजल गुरुच्याही पुढे जाते.
गुरुपासून ज्ञानप्राप्ती करुन घेत असता शिष्याची अभ्यासू वृत्ती वृध्दिंगत होते. पर्यायाने इच्छित ज्ञानाबरोबरच तदानुषंगिक इतर ज्ञानांचा फुलोरा फुलत जातो.
मिसळपाव