Skip to main content

अदृश्य डोळ्यांनी अनुभवलेलं साहित्य संमेलन

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 30/03/2010 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या साहित्य संमेलन बरंच गाजतंय...नव्हे, गाजवलं जातंय! नवे नवे वाद, नव्या बातम्या, नवे विषय.... अशाच ह्या बातम्या वाचताना मला 'त्या' साहित्यसंमेलनाची आठवण झाली. एक असं साहित्य संमेलन जे मी तिथे हजर न राहताही अनुभवलं.... नाही, नाही.... मला संजयासारखी दिव्यदृष्टी नव्हती प्रदान केली कोणी! ना मला धृतराष्ट्रासारखा चिंतातुर बाप ''काय काय दिसतंय ते सांग झणी'' म्हणून सतावत होता. मी इकडे पुण्यात..आणि संमेलन तर दूर गावी!

निश्चयाचा महामेरु - शिवपुण्यतिथीच्या निमित्ताने

लेखक Manish Mohile यांनी मंगळवार, 30/03/2010 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
आज हनुमान जयंती. शिवाजी महाराजांची पुण्यतिथी. संपूर्ण महाराष्ट्राचे आदरस्थानच नाही तर भक्तीस्थान असलेले आपले शिवाजी महाराज. आपल्या सगळ्यांनाच शिवाजी महाराजांचा इतिहास तोंडपाठ आहे. सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ, अफजलखानाचा वध, शाइस्तेखानाची बोटे कापण्याचा प्रसंग, आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक हे त्यांच्या पन्नास वर्षांच्या आयुष्यातील प्रमुख नाट्यपूर्ण प्रसंग. पण महाराजांचे मोठेपण ह्या नाट्यमय प्रसंगांपेक्षाही दिसते ते ह्या गोष्टीमुळे की सतत साडेतीनशे वर्षे गुलामगिरीत राहून मनाने गुलाम बनलेल्या महाराष्ट्राला त्यांनी जाग्रुत केले. त्यांच्या मनात अस्मिता जागी केली.

लाभले दुर्भाग्य आम्हास...

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 30/03/2010 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
"माझ्या आयुष्यातील 68 वर्षांपैकी 41 वर्षे मी महाराष्ट्रात घालविली आहेत. मी स्वतःला महाराष्ट्राचेच एक अंग मानतो आणि त्याबद्दल मला अभिमान आहे.'' ...गेली चार दशके केवळ रुपेरी पडदाच नव्हे, तर तमाम भारतीयांचे हृदयही व्यापून उरणारा महानायक अमिताभ बच्चन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून हे गौरवाने सांगत होता....हिंदी भाषेतून! वेळात वेळ काढून मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाला उपस्थित राहून अमिताभ यांनी मनाचा मोठेपणा दाखविला; पण त्यांचा "महाराष्ट्राभिमान' फुलून आला, तो भाषणाच्या सुरवातीला मराठी उच्चारशैलीतील "नमस्कार', सुरेश भट आणि गडकरी (फक्त "गडकरी'च!

बीजगणीत आणि भुमितिचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग आहे का?

लेखक परिणिता यांनी मंगळवार, 30/03/2010 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
दहावीला पुष्क्ळ जणाना बीजगणित आणि भुमितिचा पेपर कठिण जातो.तुम्हाला काय वाट्ते, हे विषय आपल्याला प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगी पडते का?(ता.क. कॄपया इन्जिनियर, वैज्ञानीक्,गणितज्ञ यानी प्रतिक्रिया देउ नये, हि चर्चा सामान्य वाचकासाठी आहे, याची दखल घ्यावी)

सोनसाजिरी पौणिमा..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 30/03/2010 05:46 या दिवशी प्रकाशित केले.
पुनवेवरती राग धरूनी, आवस धुसफ़ुसली काळोखाला घेत साथीला, चंद्रकळा लपविली.. भरात आला खेळ मोडला, अवनी थरथरली अवकाशाला रिक्त पाहूनी, मूकपणे रडली उदास झाल्या अवनीसाठी, 'प्रथमा' मग धावली चंद्रकोर ती नाजूक रेखीव, आकाशी सजली रोज नव्याने पुन्हा पुन्हा ती, कोर नटू लागली संध्याराणी तिच्या दर्शने, गोड हसू लागली नव्या यौवनी चंदाराणी, मोहरूनिया गेली तिला रिझविण्या सागरलाटही, उचंबळू लागली लाटांनी मग शुभ्र फ़ुलांची रांगोळी रेखिली क्षितिजावरती सोनसाजिरी, पौणिमा झळकली - प्राजु
काव्यरस

कसाब - माकडीणीचे पिल्लू

लेखक विकास यांनी मंगळवार, 30/03/2010 00:58 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या काथ्याकुटाची विभागणी मला वास्तवीक विनोद या भागात पण करायची होती. पण २६/११ म्हणले की आजही अस्वस्थता येते म्हणून टाळले... मात्र आज (काल) अंतिम युक्तीवाद संपवताना कसाबचे वकील, अ‍ॅड पवार म्हणाले ते थोडक्यात खाली (दुव्यावर संपूर्ण वाचू शकता.)
लेखक मारुती चितमपल्ली यांच्या एका लघुकथेचा उल्लेख करीत आज पवार यांनी कसाबला माकडिणीच्या पिल्लाची, तर तपासयंत्रणेला लांडग्याची उपमा दिली.