Skip to main content

सावधानतेचा इशारा

लेखक प्रमोद सावंत१ यांनी शुक्रवार, 05/11/2010 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
कोळशाचा उपयोग मागच्या तीन दशकांत तिप्पट झाला आहे. तो येत्या दशकात आजच्या तुलनेत दुप्पट होईल. आपली ऊर्जेची गरज २०३० सालापर्यंत आजच्या तुलनेत त्यात कोळशापासून होणा-या ऊर्जेचा सर्वात मोठा भाग असेल. कोळश्यामुळे वातावरणात कार्बन-डाय ऑक्साईड पसरतो, प्रदूषण वाढते. त्यामुळे वातावरणात उष्णता वाढते व त्याचे परिणाम विशेषतः हवामानावर होतात. येणा-या शतकात पर्जन्यवृष्टी नियमबध्द होणार नाही. नद्या व तलाव धोक्यात येतील, पाण्याची समस्या वाटेल. शिवाय नद्यांच्या प्रत्यक्ष प्रदुषणांमुळे त्यांची स्थिती बिकट होईल.

पोलीस राइस

लेखक स्पा यांनी शुक्रवार, 05/11/2010 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ : छत्रपती शिवाजी टर्मिनल च्या आसपास चा परिसर वेळ : साधारण रात्रीचे ८ अशीच एक स्त्याच्या कडेची चायनिस ची गाडी ... कुठल्याही सामान्य इतर खाण्याच्या गाड्या असतात तशीच , लालभडक रंगात रंगवलेली द्र्यागन ची भडक चित्र असलेली , आणि तसंच काहीसं नाव असलेली .. फक्त C .S .T . परिसरात म्हणून, सोन्याची किंमत.. गाडीच्या आजूबाजूला ४ फळकुट ,४ टेबलं, गाडीच्या आतल्या बाजुला गिऱ्हाइकांच "उरलेलं ,उष्ट-माष्ट" टाकण्यासाठी एक डबा, पाण्याचं एक पिंप एवढीच काय ती investment आजूबाजूच्या ५ स्टार,2 स्टार , किंव्हा अतिशय सामान्य हाटेलात सुद्धा जायची ऐपत नसणाऱ्या लोकांचं आश्रय स्थान .

चर्चा दिवाळी अंकाची

लेखक बाबुराव यांनी शुक्रवार, 05/11/2010 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. दिवाली आली म्हणल्यावर त्याच्यामागं दिवाळी अंकबी याला सुरवात होते. ऑनलाइन दिवाळी अंक आन छापील दिवाळी अंक यायची आता लय रेलचेल होऊन राह्यली. आता सारं वाचाच म्हणल्यावर पुढली दिवाळी येईन. तव्हा ह्यो धागा दिवाळी अंकातलं काय आवडलं. कोणते लेखन वाचाला पाह्यजेन यासाठी धागा काढला आहे. तव्हा कोणकोणते दिवाळी अंक प्रकाशित झाले त्याचीबी माहिती या धाग्यात द्यावी ही नम्र इनंती. मायबोली,पुस्तकविश्व, उपक्रम,मनोगत,मोगरा फुलला,दीपज्योती अशा अजून जे असतीन त्या सर्वाची इथे चर्चा अपेक्षीत हाये.

लहानपणीच्या ३ गोष्टी

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 05/11/2010 07:13 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी मे महीन्याच्या सुट्टीत दुपारी एकमेकांना कोडी सांग, सागरगोटे खेळ, उखाणे घाल, विनोद सांग असे नाना खेळ आम्ही बिल्डींगच्या सावलीमध्ये जमून खेळत असू. कारण ऊन मी मी म्हणत असे त्यामुळे काहीतरी बैठे छंद जोपासावे लागत. काही बोलघेवडी मुलं-मुली गोष्टी सांगत. जरा चवथी, पाचवीमध्ये गेल्यावर विनोद वगैरे कळायला लागले होते. त्यापैकी एक विनोद मला आजही आठवतो. कारण पुढे येईलच. - एकदा चीन, अमेरीका आणि भारत हे देश बढाया मारत असतात. चीन सुरुवात करतो. चीन म्हणतो आमच्या कुशल तंत्रज्ञानाने आम्ही इतकी बारीक तार बनवली आहे की ती तार साध्या डोळ्यांना दिसतच नाही.

शुभ दिपावली

लेखक जयदेव यांनी शुक्रवार, 05/11/2010 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
शुभ व्हावे सारे ह्या रयतेचे भरतभुमीसह सा र्‍या वसुन्धरेचे दिवस यावे आरोग्याचे अन भरभराटीचे पाप सरुनी सारे, यावे राज्य रामरायाचे वचन घेवू या सन्मार्गाचे अन अथक परिश्रमाचे लीलया बलाढ्य होउ लेकुरे आपण भारतमातेचे/strong>

महालक्ष्म्ये॑ च विद्महे | विष्णुपत्न्ये॑ च धीमहि | तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात ||

लेखक प्रशु यांनी गुरुवार, 04/11/2010 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज लक्ष्मीपुजन, धनसंपत्ती देणार्या लक्ष्मीमातेच्या पुजनाचा दिवस. सागरमंथनातुन जी १४ रत्ने निघाली त्यात लक्ष्मीचा समावेश होतो. हि लक्ष्मी आपल्या जेष्ठ भगीनी जिला 'जेष्टा किंवा अलक्ष्मी असे नाव देण्यात आले आहे, तीच्यासह वा तीच्या नंतर उत्त्पन्न झाली. अलक्ष्मीही काळयातोंडाची, तांबड्या डोळ्याची, रुक्ष व पिंगट केसांची आणि सुरुकतलेल्या देहाची. तर लक्ष्मीही सुंदर, लावण्यवती. लक्ष्मीने विष्णुला वरले. परंतु जेष्ठेच्या आधी कनिष्ठेचा विवाह कसा होईल? म्हणुन आधी तीचा विवाह उद्दालक ऋषीशी करण्यात आला. परंतु ह्या ऋषीनी तीचा त्याग केला. ह्या अलक्ष्मी चा निवास हा कचरा, कोळसा, कलह हा होय.

ती दिवाळी पण दिवाळी होती

लेखक गजानन१८५७ यांनी गुरुवार, 04/11/2010 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
ती दिवाळी पण दिवाळी होती तीची माझी पहीलीच नजर भेट होती, मंदीराच्या पाय-या अलगत ती चढत होती पंजनाच्या सहाय्याने सुर ती छेडीत होती, नजरेचे बाण हळूच ती सोडीत होती, सोबतीला हास्याचा फुलबाजा उडवीत होती, आवाज नव्हता,धुर नव्हता ,पण...... रोशनाई भरपुर होती,खरच...... ती दिवाळी पण दिवाळी होती

किल्ला - एक करणे

लेखक विनायक पाचलग यांनी गुरुवार, 04/11/2010 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या बारावीच्या पुस्तकात एक प्रश्न होता, ''जुन्या खेळाऐवजी नवीन प्रकारचे खेळ आल्याने आपली मानसिक वाढ खुंटली आहे का?'' दर परीक्षेला हा प्रश्न हमखास असायचा आणि सगळेच काही ना काही पुस्तकी उत्तरे द्यायचे याप्रश्नातुन आणि आजच्या जमान्यात दिवाळीची वा उन्हाळी सुट्टी लागली की, काय करावे, करू नये वगैरे याच प्रश्नांची उत्तरे शोधणारे अनेक लेखातुन संगणकीय खेळ त्रासदायकच हेच सत्य शेवटी फिरून फिरून सांगितले जाते. आणि खरे आहे ते ..! पण, निदान दिवाळीच्या सुट्टीत तरी हा प्रश्न मला कधी पडायचाच नाही, का म्हणता? अहो किल्ला ...... आमचा जीव की प्राण .