Skip to main content

कोण?

लेखक मिसळपाव यांनी शुक्रवार, 26/08/2016 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
उन जळत रणरणे, मृग़जळास लांबवी सकल जनही त्रस्त ते, दु:ख दाटले मनी जीव कसा तगमगे, जन गृहात कुंठती वाटसरू कुणी नसे, वाट उरे एकली ग्रीष्माने त्रासून हा, आसमंत पेटवी सूर्यही बघ जळतसे, सागरास आटवी अवेळ हीच साधूनी, आस तुझी का गमे? तृष्णा ही मज गिळे, कंठ तुझा शुष्कवी भेटीलाच माझिया, सांग कोण परी निघे? ग्रीष्माला वारूनिया, कोण सखी अवतरे?
काव्यरस

अर्पिते मी तुला ,जे तुला हवे ते.

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 25/08/2016 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
दिसलास तू, उमले यौवन हसलास तू, लाजले नयन. आवेग प्रीतीचा,तनूत मोहरे गंध पसरवे, यौवन वारे. रोम रोमात रे फुलतो फुलोरा देहात उसळे, बेभान वारा जाळते तन, धुंद चांदणे, घे मिठीत, हेच मागणे, अधरा वरती तू लिहिले ते गुपित आपले अधरी जपते मिठीत तुझ्या हि तनू विरघळते श्वासांत मिसळता श्वास, नयन मिटते, देहास आलिंगता ,मी एकरूप होते, अर्पिते मी तुला ,जे तुला हवे ते.

रंजीश हि सही

लेखक महासंग्राम यांनी गुरुवार, 25/08/2016 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
तसं पाहिलं तर १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली त्यात खूप साऱ्या गोष्टी विभागल्या गेल्या. माणसं, नदी, पर्वत, संस्कृती वेगवेगळ्या झाल्या. पण अश्या काही गोष्टी होत्या ज्यांच विभाजन होणं कधीच शक्य नव्हतं ज्यात भाषा, साहित्य, कला यांचा समावेष होता, नशिबाने राजकीय वैर,वेगळेपण यांचा यावर काहीच प्रभाव पडू शकला नाही, त्यापैकी म्हणजे उर्दू भाषा. जी भारत आणि पाकिस्तान दोन्ही कडे तेवढ्याच आत्मीयतेने लिहिली वाचली जाते. अशाच या उर्दू भाषेचे अहमद फराज हे प्रतिभावान शायर होते. त्यांची गझल जेवढी पाकिस्तानी होती तेवढीच भारतीय सुद्धा.

एक संघ मैदानातला - भाग २०

लेखक शि बि आय यांनी गुरुवार, 25/08/2016 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
काही वैयक्तिक कारणांमुळे हा भाग टाकायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व.. --------------x--------------x---------- योग्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. उद्यासाठीचा सॉलिड टॉपिक तिला मिळाला होता. तुप्याने तिला झापडून शांत केलं. ती गप्प बसणार नाही हे आम्हाला माहित होत पण तिला जे हवं ते आम्ही तिला आत्ता करू देणार नव्हतो. सगळीकडे प्रचंड शांतता होती. हवेत उकाडा असल्यामुळे आत जावेसेही वाटत नव्हते पण म्हणून रात्र बाहेर काढणे पण योग्य नव्हते. अजून थोडा वेळ बाहेर काढून आम्ही नाइलाजले आत जाऊन झोपलो. मनावर आलेल्या ताणाने म्हणा किंवा त्या रागाने म्हणा नीट झोप काही लागली नाही.

घाटवाटांची सायकल राईड - v2.0 - कशेडी घाट (भाग २)

लेखक मोदक यांनी गुरुवार, 25/08/2016 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
***************************** भाग १ - कुंभार्ली घाट ***************************** चिपळूणमध्ये सकाळी उठलो तेच देशभक्तीपर गाण्यांच्या आवाजाने. आंम्ही मुक्काम ठोकलेल्या हॉटेलच्या शेजारीच एक शाळा + कॉलेज होते त्यामुळे सकाळी अलार्मची गरज भासलीच नाही. गाणी ऐकत ऐकत आवरले.. सहज म्हणून टीव्ही लावला तर बोल्टची १०० मीटरची रेस थोड्या वेळात सुरू होणार होती. मग त्या रेसमुळे आमचे वेळापत्रक कोलमडले.. बोल्टचे सुवर्णपदक बघून आंम्ही हॉटेलच्या डायनींग हॉलकडे मोर्चा वळवला आणि पोहे चहा अशी दिवसाची सुरूवात झाली. या हॉटेलमध्ये बहुदा नाश्ता लिमीटेड होता.

स़ादत हसन मन्टो आदरांजली - २ ‘‘खोल दो !’’

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 25/08/2016 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
‘‘जेव्हा त्याच्या संवेदनांना ठेच पोहोचते तेव्हाच लेखक त्याची लेखणी उचलतो.....’’ - मन्टो त्याच्यावर चालविलेल्या गेलेल्या खटल्यात न्यायधिशाला. स़ादत हसन मन्टो Simple, Free Image and File Hosting at MediaFire मित्रांनो, ज्या प्रमाणे इस्मत चुगताईच्या तीन कथांचे भाषांतर करुन मी त्यांना आदरांजली वाहिली होती त्याचप्रमाणे अजून एका लेखकाला आदरांजली वाहतोय. तीन कथांचे भाषांतर करुन.

पावसाळी कोकणातली सायकल सफर भाग:१

लेखक अमित M यांनी गुरुवार, 25/08/2016 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
--------------------------------------------------------------------------------- मोदक उर्फ मनोजने घाटवाटांवरच्या सायकलिंगचा पहिला भाग टाकला आहेच ! त्याच्या पूर्वपरवानगीने आमच्या सायकलिंग चा पहिला भाग माझ्या शब्दात --------------------------------------------------------------------------------- अशीच एक संध्याकाळ…. असेच तीन मित्र… अन रंगलेली बैठक .... “ चला आता लै झालं ! हा पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही.” “एखादी पावसाळी राईड होऊनच जाऊद्या !” तसेही बरेच दिवस झाले होते उन्हाळ्यामुळे आणि कंटाळ्यामुळे कुठे जाणं झालं नव्हतं.

दापोली एक रम्य स्थळ भाग -१ :- केशवराज आसुदबाग

लेखक प्रमोद देर्देकर यांनी गुरुवार, 25/08/2016 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वी मामाकडे आजोळी बांध-तिवरे येथे जायचो तेव्हा कुठल्या का कारणासाठी होईना आमच्या मामाची दापोलीची २ दिवसा आड एक फेरी ठरलेली असायची. तेव्हा मामा आईला "मी कापात जाऊन येतोय गं काय आणायचंय का? असे विचारत असे तेव्हा कापात म्हणजे काय हे कळायचे नाही. पुढे कळलं की कापात म्हणजे कॅम्पचा अपभ्रंश आहे. या गाववाल्यांनी खर तर कॅम्पचा उल्लेख कापात असा केला आहे. इंग्रजांनी दापोलीचे महत्व ओळखले होते आणि त्यांच्या काळात एक कॅम्प दापोली येथे होता. इंग्रजांनी बांधलेले आल्फ्रेड गॅडनी हायस्कुल आजही तिथल्या मुलांच्या शिक्षणाची आस पुरी करत आहे.

गोविंदा!...

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 25/08/2016 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
थर थर वरवर लावून भरभर चढतो सरसर गोविंदा ... मनात हुरहुर भयाण काहूर धपापतो उर गोविंदा... अखेरचा थर निसटला जर लटकतो वर गोविंदा... खालुनि घुमतो गर्दीचा स्वर गोपाळा रे गोविंदा!!

धाक... दहशत

लेखक मन यांनी गुरुवार, 25/08/2016 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
दहिहंडी, गणपती दिवस जवळ येउ लागतात. कुणा महापुरुषाची जयंती आलेली असते. उरुस , जुलूसही मागे नसतातच. त्याच्या काळजात धस्स होतं. तो थबकतो. बिचकतो. नजर चोरुन खालमानाने अंग चोरुन चालू लागतो. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. उत्सवप्रिय जंतू आहे. हे त्याच्या मनी बिंबवलं जाणार असतं. डोक्यात शिरवलं जाणार असतं कानांचे पडदे फाडून. छाती हादरवणार्‍या डीजेच्या दणदणाटात ; आणि भल्या मोठ्या हेडलाइट्सच्या प्रकाशात तो घरी येतो. दारं खिडक्या गच्च बंद करतो. जमल्यास कानात कापसाचे बोळे. लाइट बंद करतो. बिचकलेला सामाजिक प्राणी मग खोल घट्ट कुट्ट अंधारात एकटाच दबून झोपू पाहतो. जीव मुठित धरुन.