Skip to main content

'टमरेल' प्रवृत्ती संपणार कधी ?

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी शनिवार, 02/12/2017 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
'टमरेल' प्रवृत्ती संपणार कधी ? जिल्ह्यात सध्या स्वच्छता मोहिमेने चांगलाच जोर धरला आहे. हागणदारीमुक्त आणि शौचालययुक्त समाजाची निर्मिती करण्यासाठी प्रशासन सरसावले असल्याचे दिसत आहे. दररोज सकाळी जिल्हा तथा नगर प्रशासनातर्फे उघड्यावर शौचास जाणाऱ्याला कायद्याचा दंडुका दाखवला जात आहे. दुसरीकडे स्वच्छ भारत अभियानाअंर्तगत खेड्यापाड्यात शौचालय बांधण्याचं काम मोठ्या प्रमाणात सरकार करत आहे. गावातील लोकांमध्ये शौचालय, स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. प्रत्येक गाव हे हागणदारी मुक्त व्हावं, लोकांनी स्वच्छेतेकडे आणि चांगल्या आरोग्याकडे विशेष भर द्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहे.

चुकले...

लेखक अजब यांनी शनिवार, 02/12/2017 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
गंध उधळला इकडुन तिकडे, वाऱ्याचे चुकले निखळुन पडला वरून खाली, ताऱ्याचे चुकले दूर जाउनी परतुन आली, वाटेचे चुकले किनाऱ्यावरी विसावली अन लाटेचे चुकले घाव लागला वर्मी, होते बाणाचे चुकले तडफडला पण गेला नाही, प्राणाचे चुकले बुडून गेली वस्ती सगळी, प्रलयाचे चुकले इतके कुणास अपुले म्हटले, हृदयाचे चुकले...

'लोकपाल'फ़क्त आंदोलनापुरतेचं..?

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी शनिवार, 02/12/2017 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
'लोकपाल' फक्त आंदोलनापुरतेचं..? सरकार, प्रशासन आणि सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचाराचा मुद्दा जसा घासून घासून गुळगुळीत झाला आहे, तसाच भ्र्रष्टाचार संपविण्यासाठी केल्या जाणाऱ्या आंदोलनांचाही चावून चावून चोथा झाला आहे. देशात बोकाळलेला भ्रष्टाचार संपवून लाचखोरी करणाऱ्यावर वचक बसावा यासाठी आजवर अनेक आंदोलने करण्यात आली, विविध कायदे आणि नियम आणल्या गेले. 'भ्रष्टाचार निर्मूलन' हा मुदा जनआंदोलनातून बहुतांश राजकीय पक्षांच्या मॅनिफेस्टो मध्ये आला. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाने काहींना 'महात्मा' बनविले, तर काहींसाठी सत्तेच्या राजकारणाची दारे उघडी केली.

राजाची नियत

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 02/12/2017 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
राजाची नियत आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. राजा फार दयाळू आणि प्रजेचे हित पाहणारा होता. वेश पालटून आपल्या राज्यात फिरे. लोकांची सुख दुखे समजून घेई. एकदा फिरता फिरता एका गावात पोहचला. तहान लागली होती. दूर एक लहानसे घर दिसले. घरा भोवती ऊसाचा मोठा मळा होता. तिथे गेला. एक म्हातारी सामोरी आली. त्याने प्यायला पाणी मागितले. ती शेतात गेली. एक उस तोडला. उभ्या कांडक्यावर आडवा कोयता मारला. एक मोठा ग्लास भर रस निघाला. राजा बघतच राहिला! उसावर कोयता मारायचा अवकाश कि लगेच एवढा रस! रस पिऊन राजा तृप्त झाला. त्याने विचारले, ‘माई, हा काय जादूचा ऊस आहे का? इतका रस?

किक !!!

लेखक किल्लेदार यांनी शनिवार, 02/12/2017 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
"किक" कोणाला कशातून,केव्हा आणि किती मिळेल याचं "तार्किक" विश्लेषण करणं जरा अवघडच आहे. रोजच्या आहाराप्रमाणेच या किकचा लागणारा खुराक देखील व्यक्तिसापेक्ष असतो. रोजच्या आहारातली कमतरता भरून काढायला जशी बाजारात व्हिटॅमिन सप्लिमेंट्स मिळतात तशी काही यासाठी उपलब्ध नाहीत . हे "किक" जीवनसत्व ज्याचे त्यालाच शोधावे लागते. हाच वार्षिक खुराक पूर्ण करण्यासाठी किक च्या शोधात रॉलीला किक मारतो आणि कुठल्यातरी प्रवासाला निघतो. उत्तुंग पीर पन्जाल पर्वतरांगा आणि चित्रासारखी सुंदर छोटी गावं दाखवत पहाटे विमान काश्मिर खोऱ्यावरून अलगद खाली उतरते. आपले पाय मात्र जमिनीवर विमानतळाबाहेर आल्यावरच येतात.

डेस्टिनेशन - देवभूमी अर्थात हिमाचल प्रदेश मु. पो . सांगला , किन्नर कॅंप्स भाग ३

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 01/12/2017 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
असाच सुंदर निसर्ग बघत आम्ही चाललो होतो आणि एका वळणार आम्हाला सतलज नदीचं दर्शन झालं. खूपच छान वाटलं ते पाहून. नदीच पात्र चांगलेच रुंद होतं. आणि पाणी फारच उथळ होत. आम्ही एके ठिकाणी चहा प्यायला थांबलो तिथून नदी अगदीच जवळ दिसत होती. नदीचा खळखळाट चांगलाच जाणवत होता. सतलज नदीत रिव्हर राफ्टिंग सारखे गेम्स चालतात अशी माहिती ड्राइवरने दिली. पण आम्ही जिथे जाणारा होतो तिथे हि सोय नव्हती. आम्ही सतलज एका कडेला ठेवून तिच्या बाजूने प्रवास सुरु केला. हळूहळू वस्ती विरळ होत चाललेली आणि गावं लांबच्या लांब पसरलेली दिसत होती. गावात कधी कधी मोजकीच घरं लगत होती. पण एक या टोकाला तर दुसरं त्या टोकाला.

अनवट किल्ले २३: फारुकी राजवटीचा "थाळनेर" ( Thalner )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 01/12/2017 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचा ईतिहास आभ्यासताना आपल्याला सातवाहनांपासून ते यादवांची कारकिर्द माहिती असते. बहामनी कालखंड व त्याची शकले झाल्यावर निजामशाही, आदिलशाही, ईमादशाही यांनी महाराष्ट्राच्या विशिष्ट भुप्रदेशावर कसे राज्य केले ते ही ज्ञात असते. पण महाराष्ट्राच्या उत्तरेकडील टोकाकडच्या प्रदेशात म्हणजे खानदेशात फारुकी राजवट नांदली याचा थांगपत्ता नसतो. थाळनेरच्या भुईकोटाच्या धाग्यात आपण हि माहिती घेउ व ईतिहासाचे एक नवे पान उलटूया. सध्या खानदेश म्हणले कि नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्याचा क.स.मा.दे. (कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा ) हा परिसर येतो.

Being ALONE n not LONELY!

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 01/12/2017 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
एक सांगू का? आपण सगळेच एक साचेबंद आयुष्य जगत असतो. आपले आई-वडील हौसेने आपल्याला जन्माला घालतात... लहानपणी शाळा... तरुणपणी कॉलेज... मग एखादी चांगलीशी नोकरी किंवा व्यवसाय.... यथावकाश लग्न. असा सरधोपट मार्ग आपल्यापैकी बहुतांशी सगळेच जगतो. पुढे आपण देखील हौसेचे आई-वडील होतो. साधारण एवढ सगळ होईपर्यंत आपण पस्तिशीत पोहोचलेलो असतो. अर्थात अजून आर्थिक स्थिरता मनासारखी साधलेली नसतेच.... मग थोडं सुखासीन आयुष्य जगण्याच्या इच्छेने म्हणा किंवा नोकरी-व्यवसायातल्या कॉम्पिटीशनला तोंड द्यायचं असत म्हणून म्हणा आपण पळत असतो. अचानक कधीतरी आपल्या लक्षात येत की आपण पंचेचाळीशी गाठली देखील.

आजारी पडणे मना आहे!

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 01/12/2017 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे कोणत्याही माणसाला कोर्ट, पोलिस स्टेशन आणि रूग्णालयाची पायरी चढावी लागू नये, असे म्हटले जाते. जनमानसात अशा भितीदायक प्रतिमा तयार व्हायला त्या त्या क्षेत्रातली कठोर वागणूक जबाबदार असते. एखादा आजार उद्‍भवला तर रूग्णालयात जायचे म्हणून अशिक्षित लोकांच्याच नव्हे तर उच्चशिक्षित- सुशिक्षित लोकांच्याही अंगावर सर्रकन काटा येतो. आजाराचे निदान चुकीचे होईल वा आपण अतोनात लुबाडले जाऊ, हा समज या मागचे कारण असते. म्हणून अनेक लोक आपले दुखणे एकतर अंगावर काढतात वा स्वत:च डॉक्टर असल्यासारखे मेडिकल स्टोअर्समधून त्या त्या आजाराच्या गोळ्या मागवून घरी बरे होण्याचा प्रयत्न करतात.

लोक

लेखक शब्दानुज यांनी शुक्रवार, 01/12/2017 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
सखी तिचे गुपित माझ्यासमोर उघड करते तिने मुलांवर टाकलेल्या जाळांचे हिशोब देते प्रसंगावर या मला खळखळून हसायचे होते पण बाजुला माझ्या लोक उभे होते. नजरेने त्याच्या माझे काळीज चिरत होते वासनांचे कैवारी माझ्या पुढ्यातच बसले होते शिव्यांच्या लाखोलीसाठी अोठ अधिर झाले होते पण बाजुला माझ्या लोक उभे होते "त्यास" आज मी अखेरचे न्याहळत होते डोळ्यात त्याच्या माझा भुतकाळ पहात होते मिठित त्याच्या आजतरी पोटभर रडायचे होते पण बाजुला माझ्या लोक उभे होते. परतीच्या वाटेवरचे वाहन माझे डोळे दिपवते दुस-याच क्षणी धक्याने मी खाली कोसळते अपेक्षेने मी आजुबाजुच्या लोकांकडे मदतीसाठी पाहते पण बाजुला माझ्या लोक उभे होते