भारतीय सिनेमातील स्टार सिस्टीम
"भारतीय सिनेमातील स्टार सिस्टीम"
.
धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके यांनी (हिंदुस्थान फिल्म कंपनी च्या माध्यमातून) निर्मिलेला हा मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट, पहिला भारतीय मूक चित्रपट , राजा हरिश्र्चंद्र हा ०३ मे १९१३ रोजी मुंबई येथील कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, आणि भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया घातला गेला.
भारतीय इतिहासातील ही एक महत्वाची घटना, म्हणावी लागेल.
मुळात चित्रपट कला , तिची विविध अंगे ही भारतीयांना नवीन होती.
सुरुवातीच्या काळात निर्मिती, दिग्दर्शन, छायाचित्रण, संकलन, वितरण, प्रदर्शन या साऱ्या जबाबदाऱ्या दादासाहेब फाळके (प्रत्यक्ष अथवा
पावसाळी भटकंती: आंबे-हातविज, दुर्ग देवराई
ह्यावेळी पावसाळ्यात खूप फिरणं झालं, धुव्वाधार पावसात भंडारदरा, महाबळेश्वर, श्रावणातल्या जलधारांत नाणेघाट, आहुपे, भीमाशंकर आणि आत्ता सरत्या पावसात आंबे-हातविज.
अगदी १० दिवसांपूर्वीच ऐन गणेशोत्सवात आंबे- हातविजला जाणं झालं. खरं तर मूळ प्लॅन होता तो आहुपे घाटात जायचा, पण काही कारणास्तव मंचर ऐवजी पुढे नारायणगावनजीक मित्राच्या गावाला पिंपळवंडीला जावे लागले, तिकडून परत मंचरला जाण्याऐवजी जुन्नर जवळ, आणि जुन्नरवरुन आंबे - हातविज जवळ त्यामुळे तिथे आधी जाऊन मग तिथूनच आहुपेला जाण्याचे ठरवले. हा भाग अति परिचयाचा, नाणेघाटात इकडून अनेकदा गेल्यामुळे संपूर्ण रस्ता माहितीचा.
दिवा
चंद्राची धग क्षीण होत सरता
घेरून ये गारवा
रात्रीचा तम प्राशुनी घुमतसे
वृक्षातळी पारवा
तेजाचे ऋण फेडण्यास भटके
तार्यांसवे काजवा
जीर्णाचे अवशेष येथ कुठले
उन्मेष जेथे नवा
प्रज्ञेचे स्थल-काल अक्ष हटता
भोवंडल्या नेणिवा
अस्ताचे भय भास्करास कुठले
जो चेतनांचा दिवा
अवयव दान
गेले दोन आठवडे वडिलांच्या आजारपणामुळे ICU बाहेर वेळ काढणे चालू आहे. इथे माझ्यासारखे अनेक नातेवाईक बाहेर बसलेले आहेत. इथे अनेक जण आपल्या आप्तांसाठी कोणी अवयव दाता मिळेल का याची वाट बघत, आशेवर बसलेले आहेत. या वेळात काहींचे आप्त दाता भेटल्याने बरे होउन घरी जाताना, तर काहींचा दात्यची वाट बघता बघता मृत्यू होताना, तर काहींसाठी वाट बघताना जे उपचार द्यावे लागतात त्या मधे पैशांचा प्रचंड चुराडा होताना बघतो आहे. काही लोकं पर राज्यतून येउन महिनोंमहीने दात्याची वाट बघत आहेत.
माणूस जिवंतपणी सुद्धा आणि मेल्यावर पण अवयव दान करू शकतो.
चोळ राजांच्या प्रदेशात भाग दुसरा.
चोळ राजांच्या प्रदेशात भाग दुसरा.
( ज्येष्ठ नागरिक, भाविक आणि इतिहासप्रेमी यांच्यासाठी पर्यटन) मागचा भाग
चोळ राजांच्या प्रदेशात भाग पहिला
https://misalpav.com/node/52470
चिदंबरम . गंगैकोंडाचोलापुरम. कुंभकोणम हे पाहिले.
या भागात तंजावूर आणि त्रिची.
या चार शहरांमधल्या प्रवास तास दीड तासांचा आहे.तंजोर -त्रिची आणि इतर हमरस्ते सुरेख, कडुनिंबाची झाडे कडेने. रस्ते चांगले आहेत आणि टोल नाक्यांचा बुजबुजाट नाही.
तंजावूर
इथे दहाला पोहोचल्यावर रुम घेऊन तयार होऊन बाहेर पडलो.
फोटो १
तंजावूर नकाशा
( ज्येष्ठ नागरिक, भाविक आणि इतिहासप्रेमी यांच्यासाठी पर्यटन) मागचा भाग
चोळ राजांच्या प्रदेशात भाग पहिला
https://misalpav.com/node/52470
चिदंबरम . गंगैकोंडाचोलापुरम. कुंभकोणम हे पाहिले.
या भागात तंजावूर आणि त्रिची.
या चार शहरांमधल्या प्रवास तास दीड तासांचा आहे.तंजोर -त्रिची आणि इतर हमरस्ते सुरेख, कडुनिंबाची झाडे कडेने. रस्ते चांगले आहेत आणि टोल नाक्यांचा बुजबुजाट नाही.
तंजावूर
इथे दहाला पोहोचल्यावर रुम घेऊन तयार होऊन बाहेर पडलो.
फोटो १
तंजावूर नकाशा
साक्षरता, बेरोजगारी आणि आरक्षण
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण साक्षरतेचा बेरोजगारी आणि आरक्षणाची सरळ संबंध आहे. मेकॉले पूर्वीच्या शिक्षण व्यवस्थेत बेरोजगारी नावाचा प्रकार नव्हता. "द ब्युटीफुल ट्री" या पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनीने १८३० ते १८५० मध्ये भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत केलेले सर्व्हे उपलब्ध आहे. त्याकाळी देशात सहा लाखांच्या वर गुरुकुल होते. प्रत्येक गावात एक गुरुकुल निश्चित होते. वयाच्या 13 वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना स्थानिक भाषा गणित इत्यादीचे ज्ञान दिले जात होते. सामान्य व्यक्तीसाठी एवढे ज्ञान पुरेसे आहे. त्यानंतर अधिकांश विद्यार्थी त्यांच्या परंपरागत व्यवसायांचे ज्ञान गुरुं कडून प्राप्त करायचे.
मिसळपाव