दगड, धोंडे, पानं, झाडं, माती या सर्वांना निसर्ग या मोठ्या शब्दात आपण टाकून मोकळे होतो खरं पण यात या स्थायूंचं अस्तित्वच लोपून जातं.. प्रत्येक स्थिर राहणाऱ्या डोंगरात, घळीत, घरात, मंदिरात, किल्ल्यात, मोठ्या वटवृक्षात, समुद्र किनार्याच्या खडकांमध्ये या अनेकविध आकाराच्या स्थायूं नीच स्थिरता, आधार, भक्कम पणा दिला .. धबधबे झेलले स्थायूंनीच, तोफगोळे व तोफांचा मारा स्थायूंचाच, झोपाळे स्थायूंचेच, ऊन -वारा -पावसापासून निवारा स्थायूंचाच, भेदक कडे, सुळके ही त्यांचेच.. हिमनग सुद्धा त्यांचेच.. हिरे , माणके, कोळसे, हाडे सर्व ठिकाणी हा स्थायूच भरून राहिलाय..