Skip to main content

भेट

लेखक कविता१९७८ यांनी शुक्रवार, 30/11/2018 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
खरतर हे लिखाण आधीच लिहुन ठेवलं होतं पण बोका — ए — आझमच्या दुखद बातमीने अचानक स्मशान वैराग्य आल्यासारखं झालंय , सतत हे आठवतंय.... भेट... एक ठरवुन न ठरवलेली.... असेल कदाचित ती मागच्या जन्मी ठरलेली, किंवा त्याहुन आधीची... नाहीतर उगाच का माणसे येतात समोरासमोर काहीही लागेबांधे नसताना? उगाच का पहिल्यांदा पाहिल्यावर जन्मोजन्मीची खुण पटते? चेहरा जरी बदलला असला तरीही आत्मा आत्म्याला बरोबर ओळखतो. कुणाला पाहुन आनंद होतो तर कुणाला पाहुन राग येतो. आधी पाहिलेच नाही तर अशा भावनांचं कारणच काय? कदाचित सर्वच आहोत प्रवासी , अनादि काळापासुन , काळाचा फेरा आला की लागतो प्रवासाला.

यूं ही चला चल राही - भाग 2

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 30/11/2018 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
10th November, 2018 दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली. आम्ही ४.३० ला उठून तयार होऊन ठरल्याप्रमाणे ५. ३० ला सुमंताचं घर सोडलं. थंडी नसली तरी हवेत थोडा गारवा होता. चिपळूणहून बाजारपेठेतून रस्ता जातो तो डायरेक्ट मुंबई – गोवा हायवेला परशुराम घाटाच्या पायथ्याशी पोचतो. सुमंता आम्हाला तिथपर्यंत सोडायला आला. त्याला बाय करून आम्ही घाट चढायला सुरवात केली. अजूनही सगळीकडे काळोख होता. डोक्यावर हेडलाईट्स होते. सायकलला ब्लिंकर लावलेले होते. तरीही प्रचंड धुके त्या हेडलाईटच्या मध्ये येत होते. हेडलाईट वापरायची सवय नसल्याने रस्त्यातले खड्डे चुकवायला जमत नव्हतं. पण येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमुळे काम भागत होत.

ओंकार पत्की - काही आठवणी....

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 29/11/2018 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
ओंकारवर लेख लिहायला घेतला होता, पण काय लिहू आणि काय नाही असं झालं.... या केवळ त्याच्या आठवतात तशा आठवणी.... त्याची आणि माझी मैत्री गेल्या तीस - बत्तीस वर्षांची. मला आठवतं आम्ही सहावीत असताना तो आमच्या शाळेत आला आणि पहिल्या दिवसापासून असा काही रमला होता की जणू माँटेसरीपासूनच आमच्याबरोबर होता! तेव्हापासूनच तो असा बिनधास्त आणि काहीसा विक्षिप्त होता. पुढे सातवी - आठवी दोन वर्ष आम्ही एका बेंचवर शेजारी बसत असल्याने बडबड केल्यामुळे कित्येकदा एकत्रं शिक्षा भोगली असेल याचा हिशेबच नाही! मला आठवतं सातवीत असताना त्याच्या हात फ्रॅक्चर झाला होता.

बोकाशेठना श्रद्धाजली !!

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 29/11/2018 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर बोका-ए-आझम उर्फ ओंकार पत्की यांना चारेक वर्षांपूर्वी पहिल्यांदा भेटलो. त्यानंतरही कट्ट्यानिमित्ताने वारंवार भेटी होत राह्यल्या, अधुन मधून फोनवरही बोलणं व्हायचं. अगदी पहिल्या भेटीपासून दिलखुलासपणे बोलणारा माणूस. पण आज दुपारची त्यांच्या निधनाची बातमी माझ्यासाठी अगदी अनपेक्षित आली आणि 'मोसाद' ही लेखमालिका डोळ्यासमोर झटकन उभी राह्यली. माझ्यासारखेच इथले बहुतांश मिपाकर त्यांच्या लेखमालिकेचे फॅन आहेत. मोसाद, स्केअरक्रो अशा अनेक उत्कृष्ट लेखमालिकांची मेजवानी त्यांच्या लेखनीतून आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळाली. बोकाशेठना माझ्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !!

बोका-ए-आझमला भावपूर्ण श्रध्दांजली

लेखक गॅरी ट्रुमन यांनी गुरुवार, 29/11/2018 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
बोका गेला. अरे ४२ हे काय जायचे वय होते का?त्याला झालेल्या आजाराविषयी ६-७ महिन्यांपासूनच कल्पना होती आणि त्यातून तो बरा होणे फारच कठिण आहे हे पण माहित होते. तरीही मानवी वेडं मन शेवटपर्यंत हार मानायला तयार होत नाही. अगदी कालपर्यंत वाटत होते की काहीतरी चमत्कार होईल आणि एक दिवस व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर त्याचे मेसेज बघायला मिळतील.

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): १. चाकण ते केडगांव चौफुला

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 29/11/2018 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
जे सत्य सुंदर सर्वथा.... : १. चाकण ते केडगांव चौफुला नमस्कार! नुकतीच १४ दिवसांची व ११६५ किलोमीटरची सायकल मोहीम पूर्ण केली. आता त्याचे अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहे. ह्या सायकल मोहीमेची योजना कशी बनली, हे थोडक्यात सांगतो. मे २०१८ मध्ये योग प्रसारासाठी ५९५ किलोमीटर सायकल प्रवास केला होता. तेव्हा एक सामाजिक माध्यम म्हणून सायकलची क्षमता काय आहे, हे जाणवलं होतं. तेव्हा अशी आणखी सायकल मोहीम करायची इच्छा मनात होती. आणि सायकल चालवायची आहे तर एखादा सामाजिक संदेश व सामाजिक उद्दिष्ट असावं, असं वाटत होतं. परभणीचे माझे सायकल मित्र डॉ.

माझी पहिली मराठी साहस कथा : मिशन वारी

लेखक अमोल पोतनीस यांनी गुरुवार, 29/11/2018 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! मी मिसळपाव वर पहिल्यांदाचं लिहीत आहे. जर चुकीच्या विभागात ही माहिती लिहिली असेल तर कृपया सांभाळून घ्यावे ही नम्र विनंती. नुकतेच मी माझे पहिले मराठी पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तकाचे नाव आहे "मिशन वारी". कव्हर पेज पंढरीच्या वारीच्या पुणे ते सासवड या टप्प्याला अतिरेकी आपले लक्ष्य करतात आणि बॉम्बस्फोट घडवून आणायची योजना आखतात. मिल्ट्री इंटीलिजन्सला याचा सुगावा लागतो आणि हे आव्हान पेलण्याची जबाबदारी टाकण्यात येते कॅप्टन आकाश आणि त्याच्या टीमवर.