Skip to main content

मनात आले म्हणून

लेखक सर टोबी यांनी मंगळवार, 04/06/2019 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज काही प्रवासाशी संबंधित वाचण्यात आले आणि वाटले कि आपणही काही आठवणी लिहाव्यात. प्रवास म्हटलं कि बऱ्याच वेळेला मुंबईतील लोकांची आठवण आल्या शिवाय राहत नाही. जवळपास दररोजच नोकरीनिमित्त आणि सुटी असली तरी खरेदी, नातेवाईकांना भेटणे या निमित्ताने प्रवास करण्याशिवाय मुंबईकरांना पर्याय नसतो. तसे धुळे, जळगाव येथील लोकांनाही बराच प्रवास करावा लागत असावा. पण त्यांच्या प्रवासाचा इतरांनाही त्रास होतो हे कधीकाळी रेल्वेने ज्यांनी त्या मार्गावर प्रवास केला असेल त्यांना चांगलेच ठाऊक असेल. मी पहिल्यांदा मुंबई आलो ती आठवण सुरुवातीला तरी सुखावह नव्हती.

मी पण अमिताभ बनलो असतो भाय

लेखक खिलजि यांनी मंगळवार, 04/06/2019 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
मी पण अमिताभ बनलो असतो भाय पण आपल्याला रोलच कधी मिळाला न्हाय " अय साला " करून, डिट्टो करतो हाणामारी स्टाईल आपली बघून येड्या होतात साऱ्या पोरी बिग बी ची ऍक्टिंग म्हणजे खाऊ वाटलं काय उंची सोडली तर बाकी इथं सर्व ठीक हाय मी पण अमिताभ बनलो असतो भाय पण साला तसा रोलंच मिळाला न्हाय शहेनशहा बनुन बाहेर पडलो एका काळ्याभोर रात्री चमकणारा हात बघून लागली भरपूर मागे कुत्री लटपट लटपट धावत होतो जणू अग्निपथावरती जंजीर धरुनी दिवार चढलो मग पडलो तोंडावरती तोंड फुटुनी पार सुजले , आला गळ्यात माझ्या पाय मी पण अमिताभ बनलो असतो भाय पण काय करू , आता पाय गळ्यात आलाय भाय नायतर नक्की बनलो असतो बि

राजा विक्रमादित्य

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 04/06/2019 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
० उज्जैनचे प्रसिद्ध राजा विक्रमादित्य यांच्या भावाचे नाव राजा भर्तृहरी होते. एकेकाळी राजा भर्तृहरी यांना अत्यंत विद्वान, ज्ञानी राजा म्हणून ओळखले जायचे. परंतु दोन पत्नी असूनही ते पिंगला नावाच्या अतिसुंदर राजकन्येवर मोहित झाले. राजाने पिंगलाला तिसरी पत्नी बनवले. पिंगलाच्या रूपरंगावर आसक्त झालेला राजा विलासी झाला. राजा पिंगलाच्या तालावर नाचू लागला होता. याच गोष्टीचा फायदा घेत पिंगला व्यभिचारिणी(चारित्र्यहीन स्त्री) झाली. . ती घोडे सांभाळणार्‍या सेवकाच्या प्रेमात पडली.

व्हॉटसॅपवरची माणसं!!!

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 04/06/2019 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
१. *देवघेवकर* - हे समुहाच्या विषयाला धरुन असणारी माहिती देतातही आणि विचारतातही.हे समुहासाठी खरेखुरे उपयुक्त सदस्य असतात. २. *घेणेकर* - हे फक्त आयते प्रश्न विचारायला,स्वत:ची समस्या सोडवायला येतात. *यांच्याकडे समुहाला देण्यासारखं उपयुक्त असं काहीही नसतं.* समुहाचं कस्टमर केअर करण्यात यांचा हात कोणी धरत नाही.समुहात कोणी उत्तर नाही दिलं तर हे समुहातल्याच एखाद्या जाणकाराला 'यांना हवं तेव्हा' फोन कॉल करुन पिडत बसतात.असे हे 'वेताळ' समुहातल्या सदस्यांना विक्रमराजा समजतात. ३. *भानहरपी* - हे आनंदाचं,उत्साहाचं भरतं आलेले असतात.समुहाचं नाव काय,विषय काय?आपण पाठवतो काय?

पुणे मिसळ हॉटेल

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 04/06/2019 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ//पुणे मिसळ हॉटेल..बाहेर पावसाची बुरबुर.. त्याने मस्त मिसळ चापली..चहा घेतला..बिलाचा कागद व बाजुला ठेवलेली छत्री घेवुन तो उठला व समोरच्या इसमाने त्याला हटकले.. माफ करा आपण माधवराव जोशी का? नाहि..मी हेमंत देशपांडे.. ओह्ह..मी माधवराव जोशी जी छत्री आपण घेतली ति माझी असुन त्यावर नाव पण लिहिले आहे.. त्यावर खजील होऊन देशपांडेे म्हणाले..ओह्ह माफ करा..तरी प्रष्ण उरतो माझी छ्रत्री कुठे गेली असावी?... तुम्हि असे करा मनोहर लेले ना विचारा बहुतेक त्यांच्या कडे असावी..मागच्या पावसाळ्यात त्याला दिली होति.... पण आपणास हे सारे कसे माहित???

जिलब्या

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 04/06/2019 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
का म्हणून दिवसेंदिवस जिलब्या टाकत राहावे ? का म्हणून आपणच समूहा पाकमय करावे ? थोडं जागं होऊन बघा , मोठ्ठी कढई नि झारा दिसेल तो हातात घेऊन बसलेला एक साधा खादाड दिसेल एक दिवस तरी बुभुक्षित बनून बघावे भुभुकार करून पाहावे न पटेल तिथे फाट्यावर मारून बसावे रुसेल त्याचे फुगवे निपटावे शांत निवांत राहून जिलब्या धागे वाचावे वाचता वाचता वाचकाने लेखकाचे पेन घेऊ नये साधा वाचक जे जे करतो ते ते मनापासून करावे खदखदून खदखदून हसावे विरोधकांनी पण तोंडात बोट घालावे इतके साऱ्या धाग्यावर मौनावे रमत गमत इन बॉक्स वर राहावे हम, तुम झुम करत टिचक्या मारावे एखादा धागा वाचून प्रतिसादावे न हळूच निसटावे का

संवाद

लेखक अन्या बुद्धे यांनी मंगळवार, 04/06/2019 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
खूप जुना किस्सा आहे.. 1996-97चा.. आमच्याकडे एक माळी होता बागकाम करायला. आई त्याला पगार देत नसे. त्याच्या नावे तिने अकाउंट ओपन करून दिलेलं. त्यात ती भर टाकत असे. एके दिवशी आईने मला सांगितलं, तो बँक जवळ येईल त्याला पैसे काढून दे. मी ठरल्यावेळी तिकडे थांबलो. त्याला यायला उशीर लागला. कंटाळून सिगारेटच्या टपरीकडे गेलो. सिगरेट अर्धी झाली असतानाच तो आला.. आमच्यात झालेला संवाद असा.. थोडं थांब. सिगरेट संपली की जाऊ बँकेत. तुला घेऊ सिगरेट? नको. मी नाय वडत. सिगरेट तमाखू कायच नाय. दिवसभर काम केलं की 200 भेटतात. त्यात दारू सिगरेट साठी कुठे खर्चु? चांगलंय.. हे तुला आता समजतंय हे बरोबर.

आठ चौपन्न

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 04/06/2019 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
आठ चौपनचा सगळा ग्रुप दहा मिनिटं आधीच प्लॅटफॉर्मवर गोळा झाला आणि पेपरांची देवाणघेवाण सुरू झाली. फलाटावरल्या स्टॉलवरच्या पोऱ्यानं पाण्याच्या दोनतीन बाटल्या आणि कचोरीचं पुडकं एकीच्या हाती आणून दिलं तेवढ्यात गाडी फलाटावर येतच होती. हातातल्या पर्स, पिशव्या, छत्र्या सावरत सगळ्याजणींनी एकमेकींकडे पाहून डोळ्यांनीच इशारे केले, आणि झेपावायच्या तयारीत त्या उभ्या राहिल्या... गाडी पुरती थांबायच्या आधीच सगळ्याजणी जागा पटकावून स्थिरावल्या होत्या... पुढच्या दोनतीन मिनिटांत डबा खचाखच भरून गेला आणि पुन्हा इशारे झाले...

एक वादळ शांत होतांना

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 04/06/2019 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा बॉक्सिंग हा शब्द मनात येतो तेव्हा- तेव्हा तुमच्यासमोर सर्वात पहिले नाव येत ते The undisputed heavyweight champion of the world ‘महंमद अली’चं! १७ जानेवारी १९४२ ला केंटकी मधल्या लुइजविल शहरात त्याचा जन्म झाला. त्याचं आधीचं नाव 'कॅशियस क्ले' १२ वर्षाचा असताना त्याची सायकल चोरीला गेली होती, त्याची तक्रार करण्यासाठी तो मार्टिन नावाच्या एक पोलिस ऑफिसरकडे गेला, तिथे त्याचा आवेश पाहून, मार्टिनमामांनी हि उर्जा बॉक्सिंगमध्ये खर्च करायला सांगितली आणि एक जग्गजेत्याचा प्रवास सुरु झाला. त्याचा उर्जेवर आणि चपळतेवर प्रचंड विश्वास होता.

लाल परी

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 03/06/2019 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
दादरच्या रस्त्यावरून संध्याकाळनंतर मुंबईबाहेर जाणाऱ्या एसटीच्या लालपरी रातराण्या पाहिल्या की मला आजही, इतक्या वर्षांनंतरही गावाकडची आठवण येते, आणि मी उत्सुकतेने गाडीचा बोर्ड पाहू लागतो. कधीकधी तो वाचता येत नाही. मग गाडीच्या मागे नंबरखालची अक्षरे शोधतो, आणि देवरूख डेपोची गाडी दिसली की मनानेच गावाकडच्या आठवणींचा, भूतकाळाचा प्रवास सुरू होतो... ... आजही तसेच झाले. देवरूख डेपोची ‘मुंबई-देवळे मार्गे -पाली’ गाडी दिसली, आणि आठवणींचे सारे झरे जिवंत झाले. या गाडीने मी पूर्वी मुंबईहून देवरूखला, देवरूखहून साखरप्याला, पालीहून देवळ्याला, अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर असंख्य वेळा प्रवास केला आहे.