Skip to main content

सूर

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 24/08/2019 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
सूर अष्टमीच्या अंधाऱ्या रात्री कारागृहात जन्मलेल्या बाळाला डोईवरल्या टोपलीत टाकून वसुदेवानं यमुना पार केली आणि गोकुळातल्या नंदाच्या राजवाड्यात यशोदेच्या झोळीत आपलं बाळ टाकून डोळे पुसत त्या बालिकेला घेऊन तो कारागृहात परतला. ...सारं काही ठरल्यासारखं पार पडताच काळोख मिटवून उगवलेल्या सूर्याच्या पहिल्या किरणांनी कारागृहाच्या झरोक्‍यातून कोठडीतल्या त्या ‘देवकीच्या बाळा’चं पहिलं दर्शन घेतलं, आणि ‘अवतारकार्य’ सुरू करण्याचा इशारा केला. त्या किरणांकडे पाहात त्या नवजात बालिकेनं पहिलं "ट्यॅऽहां' केलं... पहारेकऱ्यांना जाग आली.

श्रीकृष्णायनम:!

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 24/08/2019 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीकृष्णायनम:! नमस्कार, या वर्षाच्या सुरवातीपासून मी माझा ब्लॉग 'मनस्पंदन' सुरू केला आहे. दर शुक्रवारी मी त्यावर एक पोस्ट टाकते. मात्र कालचा पहिला शुक्रवार की मी माझ्या ब्लॉगवर काही पोस्ट केलं नाही. रात्री बारा वाजून गेले आणि माझ्या लक्षात आलं की आजची पोस्ट राहिलीच. खूप चिडले मी स्वतःवर. पण मग विचार केला; काही हरकत नाही. लेख तर तयार आहे... नृत्यांगना.... अहं... चा भाग 3. सकाळी लवकर पोस्ट करून टाकू. रात्री झोपायला तसा बराच उशीर झाला होता. श्रीगोपाळाच्या जन्मोत्सवाला गेले होते ना. घरी येताना त्याचेच विचार मनात घोळत होते. गंमत म्हणजे झोपेत देखील तोच मनात पावा वाजवत होता.

कृष्णजन्म

लेखक मायमराठी यांनी शुक्रवार, 23/08/2019 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
कान्हा ! कुठून रे अक्षरं आणू? कसे शब्द बांधू? कश्या भावना गुंफू? हजार नावं घेऊ? का शब्दब्रह्म गाऊ? तुळशींनी सजवू? मनमखरात बसवू? का पंचप्राणंच अर्पू? सगळंच उष्टावलयंस तू ? कशाचा नैवेद्य दाखवू? निळाईसंग उत्तुंग आभाळी, सावळदंग अभंग सावली, मिस्कीलढंग अनंग माऊली, मयूरपंखी रंग तुझ्या कपाळी ।। सावरीत मुग्ध अलगुज, ऐकवीत गुप्त हितगुज, खेळवीत मुक्त गाईगुजं, प्रकटीत तृप्त आत्मगुज ।। तुज प्रकाशे चेतविती, संध्या या गर्भवती, शुद्ध चैतन्या प्रसविती, पुन्हा आकाशी उगविती ।। जन्मांचा जन्म जिथे, मृत्यूंचाचा मृत्यु जिथे, दिशांचा अंत जिथे, नियतीला खंत जिथे ।। शब्दांना सारूनी मागे, देहाला ठेवुनी जागे, बुद्धीच

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३७

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 23/08/2019 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
कोणाला साधी कल्पनाही नव्हती की गोकुळातले सारे चैतन्य असे एका क्षणात निघून जाईल. त्या निलवर्णी गिरिधराच्या बासरीचे सुमधुर, भावस्पर्शी सूर हवेच्या लहरींसोबत घुमले नाहीत. कानांना तृप्ती दिली नाही, गोपिकांना वेड लावले नाही आणि त्या स्वरांवर धुंद होऊन नाचणाऱ्या राधेच्या पायातील पैंजणांची मंजुळ छुमछुम सुद्धा कोणाला ऐकू आली नाही. तो दिवस! कंसाच्या सैनिकाने आणलेला निरोप. कृष्णाला बोलावून घेतले हे कळाल्यावर यशोदेचा जीव नुसता घाबराघुबरा झाला होता.

महापूर

लेखक बी.डी.वायळ यांनी शुक्रवार, 23/08/2019 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
महापूर वरुणराजाच्या अंतरी आले | काळे मेघ जमा केले | अचानक बरसु लागले | भूमीवरी ||1|| पाऊस पडला मुसळधार | तंव नद्यांना आला पूर | बुडाली खेडी आणि शहरं | तयांमध्ये ||2|| सांगली आणि कोल्हापूर | तेथे आला महापूर | कित्येकांचे घर संसार | वाहून गेले ||3|| पाण्याची पातळी वाढता | लोकांची वाढली चिंता | पुढे काय होईल आता | कळेना काही ||4|| पुराचे पाणीजेंव्हा वाढले | लोकं घरात अडकुन पडले | कोणी गच्चीवरती चढले | भिती पोटी ||5|| मिडियांनी खबर घेतली | बातमी लोकांसमोर आणली | सरकारी यंत्रनाही धावली | मदतीला ||6|| एनडीआरएफ़चे जवान आले| बचाव कार्य सुरु झाले | जीव धोक्यात घालून गेले| पाण्यामध्ये ||7|| तेंव

लक्षात राहिलेले प्रसंग...

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 23/08/2019 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या इथे गाजलेल्या हिंदी-मराठी सिनेमांची संख्या कमी नाही. गुरुदत्त पासून ते अनुराग कश्यपपर्यंत अनेक निर्माता-दिग्दर्शकांचे सिनेमे गाजले. सिनेमे येतात...गाजतात....आणि जातात. मागे उरते ती त्यांची चर्चा. त्या सिनेमातल्या चांगल्या गाण्यांची, प्रसंगांची आणि कलाकारांच्या अभिनयाची चर्चा पुढे वर्षानुवर्षे सुरु असते. उदाहरणार्थ...शोले म्हटल्यावर पहिल्यांदा आठवतो तो म्हणजे गब्बरसिंग आणि त्याच्या एंट्रीचा सीन....कितने आदमी थे???? गब्बरसिंगची एंट्री ह्याहून जबरदस्त होऊच शकली नसती. मान्य....एकदम मान्य!! पण मुद्दा जरा वेगळा आहे.

इंद्रधनुष्य

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 23/08/2019 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
इंद्रधनुष्य लहान मुलांचं जग काही वेगळच असत. आपल्याला सुचणार नाहीत अशा कितीतरी गोष्टी या मुलाना सहज सुचतात आणि आपल्याला नवल वाटत राहत. गणपतिला आम्ही आमच्या गावाला वेळणेश्वरला गेलो होतो. ईशानला माझ्या मुलाला इथे एक नवीन अन्वी नावाची मैत्रीण मिळाली. आम्ही बाहेर फिरायला जाताना ईशान बरोबरच अन्वीला देखील घेतली. अतिशय बडबड करणारी हि गोड मुलगी ४ वर्षाची आहे. येताना हलकीशी पावसाची सर पडली आणि लगेचच लख्ख ऊनदेखील पडल. सहजच वळून बघितलं तर पूर्ण इंद्रधनुष्य पडलं होतं. अगदी पूर्ण १८० अंशात. खूपच सुंदर देखावा होता तो. मुद्दाम गाडी थांबवून मुलांना दाखवलं ते सुंदर दृश्य. मुलं देखील खूप खुश होती.