Skip to main content

संदीपची हुषारी

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 01/12/2019 04:13 या दिवशी प्रकाशित केले.
"राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी विद्यानिकेतनत हायस्कूल मधील संदीप सर्जेराव कवडे या विद्यार्थ्याची निवड" अशी पेपरमधील बातमी वाचून सर्जेरावांना आपल्या मुलाचा अभिमान वाटला. "मी साखर कारखान्यावर जावून येतो ग. वेळ लागेल. जेवणाची वाट पाहू नको. गोविंदाला टॅक्टर घेवून डिझेल भरायला पाठवून दे. पैसे टेबलावर काढून ठेवलेत", सर्जेराव सकाळच्या कामाचे नियोजन करत आपल्या बायकोला सुचना देत होते. पिंपळदचे सर्जेराव कवडे मोठी आसामी होती. ते प्रतिथयश प्रयोगशील शेतकरी तर होतेच पण सोबतच त्यांचा तालूक्याच्या एमआयडीसीतल्या जागेत एक जॉबवर्कचा कारखानाही होता. सकाळपासून त्यांच्याकडे कामाची रीघ असे.

देव मानीत नाहीत मंदिराचे कर्मचारी ।।

लेखक बाजीगर यांनी शनिवार, 30/11/2019 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
तुळजाभवानीचे दागिने कर्मचा-यांकडून लंपास लोकसत्ता 30 नोव्हेबर 2019 देव मानीत नाहीत मंदिराचे कर्मचारी ।। म्हणून लंपास केली मंदिराची तिजोरी ।। तुम्ही करत बसा कोर्ट आणि कचेरी ।। देव मानीत नाहीत मंदिराचे कर्मचारी ।। सोने, चांदी, भांडीपात्र, काही शिल्लक नाहीमात्र।। तुम्ही बसा तपासत, नोंदी आणि हजेरी ।। देव मानीत नाहीत मंदिराचे कर्मचारी ।। तीर्थी धोंडा पाणी म्हणाले तुकोबा जत्रा मे फत्रा बिठाया तिरथ बनाया पानी वाणी ती कबीरी देव मानीत नाहीत मंदिराचे कर्मचारी ।। मंदिरांच्या तिजोरीत सोने चांदी सडती ।। इथे गोरगरीब अन्नाविना रडती ।। करा देव-तिजोरीची निलामी साजरी।। देव मानीत नाहीत मंदिराचे कर्मचा

दोसतार - २५

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 30/11/2019 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
दगडावर पडल्यावर पाण्याचा कसलासा खिसफीस खिसफीस आवाज येत होता . आत्तापर्यंत पाणी किती गार आहे ते समजले होते त्यामुळे पाण्याच्या धारेत ओंजळ धरल्यावर अगोदर बसला होता तसा शॉक बसला नाही. ओंजळीतले ते पाणी तोंडात घेतले. आहाहाहा... जगातल्या कुठल्याच सरबताला त्या पाण्याची चव आली नसती. जादुची चव होती. प्रत्येकजण ते पाणी प्याला. ताजेतवाने की काय तसे झालो. तेथून पाय निघत नव्हता पण आता आम्हाला यवतेश्वरला पण पोहोचायचे होते.. मागील दुवा: http://misalpav.com/node/45748 खरे तर अजून तेथे थांबावेसे वाटत होते.

Kingआख्यान:- डोलोरस क्लेबोर्न

लेखक शा वि कु यांनी शुक्रवार, 29/11/2019 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
नववीत गेलो आणि वाचनासाठी नवी दारं खुली झाली. वडीलांच्या अँड्रॉइड फोनवर पीडीएफ फाइल्स डाउनलोड करून मून रीडर किंवा adob reader ऍप वर वाचणे. यातून मोठया कटकटी दूर झाल्या, लायब्ररीत चकरा मारायला नकोत, पैसे देऊन नवी पुस्तकं पण घ्यायला नकोत. आणि पुस्तकांचा तर नुसता महापूरच. जवळजवल सगळी प्रसिद्ध पुस्तकं फुकट उपलब्ध.याआधी घरातली वाचलेलीच पुस्तकं परत परत वाचायची असा प्रकार होता. आता मात्र जगभरातल्या सगळ्या पुस्तकांचा खुल्ला acces होता ! मग सॉंग ऑफ आईस अँड फायर झालं. ते आजपर्यँत हॅरी पॉटरच्या पुढे न गेलेल्या माझ्यासाठी फारच भारी अनि रोमांचक होतं. त्याच्या धुंदीत नववी संपली.

चाळ तशीच आहे.

लेखक आदिजोशी यांनी शुक्रवार, 29/11/2019 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
चाळ तशीच आहे. आमच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंत चाळ तशीच आहे. जुनीच. तिथे तरूणपणी रहायला येऊन वयोवॄद्ध झालेल्या अनेकांनाही चाळ अशीच आठवते. तुकतुकीत, तरणीताठी दिसणारी चाळ कुणीच बघितली नाही. कधी तरी ती तशी असेलही नक्कीच. १०० वर्ष सहज होऊन गेली चाळीला. कदचित १५० ही झाली असतील. आता त्या वयाचं चाळीशिवाय चाळीत कुणीच नसल्याने नक्की सांगता येत नाही. कधी कधी रंगरंगोटी केली जाते. पण ती म्हातारपणी कलप लावल्यासारखी वाटते. वय लपत नाही. पण चाळ तशीच आहे. पायर्‍या तेव्हाही वाजायच्या, आत्ताही वाजतात. दिवे त्यांच्या मूडनुसार दिवस-रात्र न बघता हवं तेव्हाच पेटतात. चाळीतले ते बोळ आणि जिनेही तसेच आहेत.

स्फुट : अनुभव

लेखक राघव यांनी शुक्रवार, 29/11/2019 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसांपासून एखादे (कामाव्यतिरिक्त अवांतर असे) पुस्तक वाचायचे म्हणून ठरवत होतो. काल रात्री मोठ्या उत्साहाने (होय, ही एक अगदी खास सांगण्यासारखी गोष्ट आहे!) एक पुस्तक वाचायला बसलो. जेमतेम ५-६ पानं झाली असतील वाचून तर बाहेर आकाशातली वीज कडाडली अन् घरच्या वीजेने घाबरून अंधारात दडी मारली!! असला वैताग आला म्हणता की ज्याचं नाव ते! जातोय कुठे, बसलो अंधारात!! हे नेहमी (माझ्यासोबत!!) असेच का होते म्हणून जरा "स्वतःला सहानुभुती" देण्यापासून ते "माणसाला अंधारातही दिसले असते तर काय बहार झाली असती!" इथपर्यंत बरेच विचार मनात एकदम "फास्ट ट्रॅक"ने येऊन गेले.

महाराष्ट्र सत्तानाट्य २०१९, विश्लेषण

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 28/11/2019 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
नोटः प्रत्यक्ष राजकारणावरील हा माझा अलिकडच्या काळातील पहिलाच लेख... मला वयक्तीक राजकिय मते आहेत. पण तीच मते बरोबरच आहेत असा माझा कुठलाही दावा नाही. एक सामान्य माणुस म्हणुन समोर जे दिसते आणि जे मनाला वाटते यावरुन हे लिखान आहे. त्यात मला देशातील ३ नेते सर्वात जास्त आवडतात आणि ते आहेत स्व. माननीय अटलबिहारी वाजपेयी, लोकनेते श्री. शरद पवार आणि हिंदू ह्रद्य सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे. तसेच, राजकीय विचार हे प्रत्येक माणसाचे असावेतच, या मताचा मी आहे. त्यात सर्व पक्षाचे समर्थन करणारे माझे अगदी जवळचे मित्र आहेत त्यामुळे हेच बरोबर आणि तेच चुकीचे असे माझे म्हणणे नाही.