Skip to main content

[अंतिम भाग] भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण २१ - कर्माचा सिद्धांत, प्रारब्ध आणि कर्म स्वातंत्र्य

लेखक मूकवाचक यांनी शुक्रवार, 03/07/2020 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
या प्रकरणात कर्माचा सिद्धांत, प्रारब्ध आणि कर्म स्वातंत्र्याविषयीचा भगवान श्री रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणात आहोत. डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा गोषवारा असा आहे: पौर्वात्य जगतात प्रचलित असलेल्या बहुतांशी सगळ्या धर्मांच्या सिद्धांतप्रणालींनी 'कर्माचा सिद्धांत' मांडलेला आहे. या सिद्धांताचे सगळ्यात लोकप्रिय स्वरूप लक्षात घेतले तर तो असे गृहीतक मांडताना दिसतो, की प्रत्येक व्यक्तीने केलेल्या चांगल्या आणि वाईट कृत्यांची स्वतंत्र खात्यात नोंद ठेवणारी एक वैश्विक गणनप्रणाली अस्तित्वात आहे.

राजयोग - १९

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 03/07/2020 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग-१८ *** श्रावण महिना सुरु असताना त्रिपुरामधॆ उंदरांचा उपद्रव सुरु होता. शेतांमध्ये मक्याची कणसं तयार होत होती. डोंगराळ प्रदेशातल्या शेतीत आता पिकांमध्ये दाणे भरू लागले होते. बघता बघता तीन महिने पूर्ण झाले. मार्गशीर्ष महिन्यात जेव्हा देशावरची पिकं तयार होऊन, कापणी करायची वेळ आली तेव्हा सगळीकडे आनंदाचे वातावरण झाले. शेतकरी, स्त्रिया, तरुण, वृद्ध, लहान मुले सगळे हसतखेळत शेतावर पोचले. हैय्या हैयाच्या आरोळ्यांनी एकमेकांना उत्साहित करू लागले. तरुण तरुणींच्या गीतांनी शेतं आवारं दुमदुमली. राजाविषयी असलेली नाराजी दूर होऊ लागली.

ऍपल फोन पासून अँड्रॉइड

लेखक चौकस२१२ यांनी शुक्रवार, 03/07/2020 07:53 या दिवशी प्रकाशित केले.
ऍपल फोन पासून अँड्रॉइड ( सॅमसंग ) बदल करताना फोन मधील डाटा/ संपर्क आणि व्हाट्स अप मधील सर्व इकडून तिकडे नेण्यासाठी काही सोपे उपाय आहेत का?

जब I met मी :-4

लेखक Cuty यांनी गुरुवार, 02/07/2020 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार सुट्टीचा दिवस! हा एकच दिवस मिळायचा जरा आराम करायला. निदान दुपारी जरा वेळ निवांत लवंडता यायचं बेडवर. मी अशीच आतल्या खोलीत पडले होते. जरा डोळा लागतो तोच भर दुपारी कुणाचातरी कोंबडा आरवला. झालं झोपेचं खोबरं ! डोळे चोळते तोच बाहेर अंगणात समोरच्या काकूंचा आवाज आला आईशी बोलताना, ' मग शेवट काय ठरलं, जमतंय का?' ' पोरगीच नालायक!! स्वतःला काय अप्सरा समजते कुणास ठाऊक? कितीही चांगला मुलगा असला तरी, अस्सा नको न तस्सा नको! एवढा शिकलेला पाहिजे न तेवढाच पगार पाहिजे अन शहरातलाच पाहिजे. चांगली चांगली पोरं हातची घालवून मिळूदे शेवट गाळ! आम्हीतरी काय करणार मग. आम्हाला काय साधं टेन्शन आहे का या पोरीचं.

भाजी घ्या भाजी,स्वतःसाठी ताजी!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 02/07/2020 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज 3 महिन्यांनी गुलटेकडी मार्केटयार्डला गेलो (कित्ती सुख वाटलं म्हणून सांगू!? वारकऱ्यांना पंढरपूर, तैसे आम्हा मार्केटयार्ड!) उद्याच्या कामाची फुल फळ घेतली आणि भाजीत-शिरलो. फळभाज्या 1किलोच्या आत मिळत नाहीत हे खरं आहे. पण पावशेर ते अर्धाकिलोला आपल्या लोकल बाजारातला जो दर पडतो, त्यातच त्या एक किलो येतात आणि फ्रेश येतात.कोलिटी ला 1नंबर! पालेभाज्याही निम्म्या किंवा त्याहून कमी दरात मिळतात.शिवाय ताज्या! मसाला म्हणजे-कोथिंबीर,मिरच्या,आलं,लसूण,कडीपत्ता,लिंबू ,पुदिना हे तर तिप्पट चौपट स्वस्त मिळतं.

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ६ - अध्यात्मपर सैद्धांतिक उहापोहः प्रकरण २० - (मानवी जीवनातले) दु:ख आणि नैतिकता

लेखक मूकवाचक यांनी गुरुवार, 02/07/2020 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
या प्रकरणात मानवी जीवनातल्या दु:ख, व्यथा तसेच नैतिकतेविषयी भगवान रमण महर्षींचा उपदेश आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे: ईश्वरवादी सिद्धांतप्रणालींमधे स्पष्टपणे दिसत असलेल्या विसंगती आणि विरोधाभासांचा उलगडा करण्यात गेली कित्येक शतके पाश्चात्य जगतातले ब्रह्मवेत्ते आणि तत्वज्ञानी गुंतुन पडलेले आहेत. वानगीदाखल सांगायचे तर - ईश्वर आपली कामे (विश्वनिर्मिती) बिनचूकपणे करत असेल, तर जगात इतके पाप, ताप, दैन्य तसेच अनिर्बंधपणे विघातक कृत्ये करत असलेल्या दुष्ट प्रवृत्ती का आहेत?