Skip to main content

हल्लीचे काही वार्ताहर

लेखक रणजित चितळे यांनी मंगळवार, 25/08/2020 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मराठी बातम्या देणाऱ्या वाहिन्या व माध्यमांच्या विश्वासाहर्तेनी एकदम तळ गाठला आहे. छापील व डिजीटल माध्यमांचा पैसा कमावणे हा मोठा व्यवसाय झाला आहे. ह्या कारणामुळे वाहिन्यांचे व माध्यमांचे काम चालवण्यासाठी व पैसा मिळवण्यासाठी कोणत्या बातम्या कशा द्यायचा ह्याचे धोरण आखले जाते. ते बातम्या देत नाहीत तर त्यांच्या आवडत्या राजकीय पक्षाला साजेसं जनमत तयार कसे करता येईल त्या दृष्टिकोनातून बातम्यांची निवडकरून लोकांपर्यंत पोहोचवतात. असली माध्यमे व वाहिन्या PR Agency सारखे काम करतात. हे झाले माध्यमांचे. त्यात नोकरी करणाऱ्या वार्ताहरांची कथा तर अजून आगळी आहे.

आली आली गौराई

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 25/08/2020 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण महिन्यातले रिमझिम पावसासोबत केलेले उपास,व्रतवैकल्य, मंगळागौरीचा घातलेला पिंगा, झिम्मा, फुगड्या संपल्या कि सगळ्यांना वेध लागतात ते गौरी-गणपतीचे महाराष्ट्रात बहुतांश घरात महालक्ष्मी-गौरी बसवल्या जातात. गणपती बसल्यानंतर गौरी च्या रूपाने माहेरवाशिणीच घरी येतात. त्या आल्यानंतर त्यांचं स्वागत मोठ्या जल्लोषात केल्या जातं. वऱ्हाडात त्यांना 'महालक्ष्मी' तर उर्वरित महाराष्ट्रात 'गौरी' नावाने ओळखतात, तर कुठे त्याना जेष्ठा-कनिष्ठा सुद्धा म्हंटले जाते. महालक्ष्म्या जेव्हा घरी येतात तेव्हा जेष्ठ घरधनीण सवाष्णी तिला घरात आणते.

सच बोलू तो

लेखक Govind यांनी मंगळवार, 25/08/2020 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
  गोष्ट आमच्या लहानपणी घडलेली आहे. मी तेव्हा सहावीत असेन.आमचा मित्र फिरोज आणि त्याच्या घरातील हा किस्सा आहे. फिरोजचा अब्बा म्हणजे मोतीलाल हा एक अट्टल बेवडा होता. तो चोवीस तास नशेत असायचा. जेव्हा शुद्धीवर यायचा तेव्हा बायकापोरांना एवढ्या तेवढ्या कारणावरून बदडणे हा त्याचा छंद होता. त्याला कुठलंही कारण पुरायचं. म्हणजे अगदी शेजारच्या घरातील कुत्रा जरी भुंकला तरी तो तेवढ्या कारणावरून बायकोला मारहाण करी. त्यामुळे ती बिचारी सदाची घाबरलेली असे. नवर्‍याला वर डोळा करून बोलायची सोय नव्हती. नाहीतर मग बेदम मार खावून पुन्हा वर तलाक द्यायच्या धमक्या मिळत.

श्रीगणेश लेखमाला २०२० - साध्यासुध्या आठवणी

लेखक नूतन यांनी मंगळवार, 25/08/2020 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
1 जादूच्या दिव्यातल्या राक्षसासारखी, आज्ञा करताच तत्क्षणी इच्छापूर्ती करणारी 'तू नळी' आज आपल्या सेवेस सादर आहे. नाटक, सिनेमा, भाषणं, गाणी.. अगदी कीर्तनदेखील आपण 'कधीही कुठेही' बघू शकतो, ऐकू शकतो. आज तंत्रज्ञानाचे असंख्य फायदे आहेत.

बाप

लेखक Govind यांनी सोमवार, 24/08/2020 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
  सकाळची वेळ. सगळीकडे एकप्रकारचं चैतन्य संचारलेलं. सूर्याची कोवळी किरणं सगळीकडे पसरलेली. सार्वजनिक नळावर बायकांची पाणी भरण्यासाठी लगबग चाललेली. घरोघर दारात सडे टाकून त्यावर सुंदर रांगोळ्या काढण्यात गुंतलेल्या मुलीबाळी. कुणी शेतकरी आपली गुरे घेऊन शेताकडे निघालेला. पाणी भरता भरता बायकांचा आवाज वाढायला लागला. वाढत्या उन्हाबरोबर पाणी भरण्याची घाई वाढू लागली आणि त्यासोबतच भांडणांनाही सुरूवात झाली. रस्त्याच्या कडेलाच असणार्‍या झोपडीसमोर फाटक पोतं अंथरूण बसलेलं सुधाकरचं म्हातारं आपले मिचमिचे डोळे उघडायचा प्रयत्न करत होतं पण ऊन्हामुळं डोळ्यांसमोर अंधारी येत होती.

दक्षिण भारतीय मंदिरे

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 24/08/2020 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण भारतीयांच्या एका समुहावर एका लेखासाठी थोडी मदत हवी आहे. _/\_ बृहन्मुंबई/ठाणे शहर/पनवेल शहर या ठिकाणी दक्षिण भारतीयांमार्फत(तमिऴ/तेलुगू/कन्नड/केरळी)लोकांकडून चालवली जाणारी हिंदू मंदिरे/धार्मिक संस्था कोणत्या?

पाचूंडी!

लेखक चिनार यांनी सोमवार, 24/08/2020 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
पाचूंडी ! पाचवी-सहावीत असताना शाळेत एक प्रवचनकार/कीर्तनकार आले होते. त्यांनी सांगितलेली ही गोष्ट.. एका युद्धमोहिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह रायगडावर परतत होते. जवळजवळ ऐंशी हजार मावळे महाराजांसोबत होते. मजल दरमजल करत येताना, कुतुबशाहाच्या सीमेवर महाराज पोहोचले. तिथंच त्यांनी तळ ठोकला. कुतुबशहाला बातमी मिळाली. राजे सीमेवर आलेत म्हणून तो आनंदित झाला. इकडे राजे,कुतुबशाहाकडून भेटीचं आमंत्रण येईल ह्याची वाट बघत होते. कुतुबशाहाला राजे स्वतःहुन भेटायला येतील असं वाटत होतं. दोन-तीन दिवस झाले काहीच घडलं नाही. थोड्याश्या नाराजीनेच महाराजांनी तळ हलवायचा निर्णय घेतला. लगबग सुरु झाली.

एका खेळियाने - स्वयमेव मृगेंद्रता |

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी सोमवार, 24/08/2020 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
ये दौडेगा तो पुजारा को उसीके लिय रखा है, ताली बजानेके लिये नहीं है पहली बॉल तेज डालना - ये आगेसे खेलेगा जड्डू जाग के जरा... उसका पैर जैसे हिल रहा है.. उसके हिसाबसे अँटिसिपेट कर इशांत - अगर चौका गया तो मेरा रिस्क है... तू बिंदास डाल एक बार बोला है बार बार नहीं बोलूंगा - पैर पे खिलाना है तो पैर पे खिलाना है भारतीय क्रिकेटनी अशी वाक्यं कधी ऐकली नव्हती. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः म्हणतात खरे. पण आमच्याकडे रणजींपासून ते विराट कोहलीपर्यंत कितीतरी अतिरथी महारथी अर्जुन होऊन गेले तरी भारतीय क्रिकेटला असा "सारथी" कधी मिळाला नव्हता!

जग जेव्हा ग्रँटेड घ्यायला लागते...

लेखक पंचमहाभूते आणि थोडं यांनी सोमवार, 24/08/2020 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
जग जेव्हा ग्रँटेड घ्यायला लागते... सूर्य ही थकतो कधी कधी... ज्या तेजाने पृथ्वी जगवतो... स्वतःही काजळतो कधी कधी... तेव्हा जे हात समोर येतात... सूर्याला लागलेलं ग्रहण ओढून... पुन्हा एकदा सूर्य धरतीच्या दारावर... तोरण म्हणून बांधायला... ते खरे दिन'कर'...