Skip to main content

श्रीगणेश लेखमाला २०२० - आठवणी मिपाकर्सच्या

लेखक प्रशांत यांनी मंगळवार, 01/09/2020 07:11 या दिवशी प्रकाशित केले.
1 नमस्कार मिपाकर. सर्वप्रथम मिपाच्या १४व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा. या वेळी श्रीगणेश लेखमालेचा विषय 'आठवणी' असा असल्यामुळे काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करू या, असा विचार करतच होतो, तेवढ्यात सुचले की मिसळपावच्याच खूप साऱ्या आठवणी आहेत, त्याबद्दल काहीतरी लिहून काढू... फोरम मिसळपाव.कॉमची ओळख - चौदा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.

श्रीगणेश लेखमाला २०२० - पेशंट एच एम

लेखक आनंदिनी यांनी मंगळवार, 01/09/2020 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
1 पेशंट एच एम जाताजाता सहज कानावर पडलेली गाण्याची एखादी ओळ कधीकधी वर्षानुवर्षांपूर्वीची आठवण घेऊन येते. कधी विचार केलाय की ही आठवण नेमकी कुठून येते? हीच नव्हे, तर इतर साऱ्या लहान-मोठ्या आठवणी कुठे असतात? आणि जर आपल्याला इतक्या वर्षांपूर्वीची एखादी गोष्ट रंग-गंधासकट आठवते, तर मग परवा भेटलेल्या त्या माणसाचं नाव कसं काय आठवत नाही!

श्रीगणेश लेखमाला २०२० - Maroon Color

लेखक गणेशा यांनी सोमवार, 31/08/2020 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
1 तू हसलीस की, फुले उमलू लागतात, आणि त्याचे रंग तुझ्या ओठांवर दिसू लागतात. तू अशीच हसत रहा, सर्वांचे मन मोहत रहा माझी नसताना पुन्हा, माझीच होत रहा.. मेघा, तुझ्या डायरीतील ह्या ओळी माझ्या अजूनही लक्षात आहेत. हातात घेतलेल्या फूलपाखराचे रंग जसे उडून जातात, तशा आठवणी थोड्याच त्या रंगांसारख्या असतात? काही आठवणी असतात त्या फूलपाखरासारख्या, नाजूक..

श्रीगणेश लेखमाला २०२० - अण्णासाहेब

लेखक अनिकेत अजित पुजारी यांनी सोमवार, 31/08/2020 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
1 आयुष्यात लोक उगाच भेटणं हा योगायोग म्हणावा लागेल. पण ज्या भेटलेल्या व्यक्ती आपल्यासाठी आठवणीत राहतात, त्यांचा आदर आणि त्यांच्याबद्दलच्या भावना काही औरच असतात. अण्णासाहेब देशपांडे हे असंच माझ्या आठवणीतलं एक नाव. आई महिला मंडळामध्ये कार्यकारी सभासद असल्यामुळे अण्णासाहेब देशपांडे आणि शुभाताई दोघांशी ओळख झाली होती. काही वर्षांपूर्वी एक प्रथा होती.

श्रीगणेश लेखमाला २०२० - पडद्यावरचे चित्रपट

लेखक किसन शिंदे यांनी सोमवार, 31/08/2020 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
1 ९०च्या दशकातला सुरुवातीचा काळ. मला चांगलं आठवतंय, जातीयवादी दंगलींमुळे आणि बाॅम्बस्फोटांच्या मालिकेमुळे लोकांमध्ये भीतिदायक वातावरण पसरलं होतं. त्यानंतर लातूरचा भूकंपही बरीच मोठी मनुष्यहानी करून गेला होता. महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीयांसाठी आणि त्यातल्या त्यात मुंबईकरांसाठी हा काळ थोडासा तणावग्रस्तच होता.