आज काय घडले... फाल्गुन व. १ बुक्कराय यांचे निधन !
आज काय घडले...
फाल्गुन व. १
बुक्कराय यांचे निधन !
शके १२९९ च्या फाल्गुन व. १ रोजी सर्व हिंदुस्थानांत मुसलमानांचा धुमाकूळ सुरू असतांना दक्षिणेस तुंगभद्रेच्या तीरावर माधवाचार्यांच्या साह्याने विजयनगरच्या वैभवशाली हिंदुसाम्राज्याची स्थापना करणाऱ्या हरिहर आणि बुक्क या बंधूंपैकी बुक्कराय यांचे निधन झाले.
चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस इस्लामी संस्कृतीच्या टोळधाडी दक्षिणेत धुमाकूळ घालू लागल्या होत्या. शके १२४० मध्ये देवगिरीच्या यादवांचे राज्य बुडाल्यावर थोड्याच दिवसांत तेलंगणांतील वरंगळचे राज्यहि कायमचें नष्ट झाले सर्व दक्षिण भारतांत हिंदूचा पाडाव होऊन मोठी बिकट परिस्थिति निर्माण झाली.
मिसळपाव
फाल्गुनी पौर्णिमेचा दिवस होळी पौर्णिमा म्हणून भारतात प्रसिद्ध असला तरी स्थानपरत्वें त्याला शिमगा, होलिका, हुताशनीमहोत्सव, दोलायात्रा, कामदहन अशी नावे आहेत.
या सणाच्या उत्पत्तीसंबंधी एकवाक्यता नाही. वसंतऋतूच्या आगमनासाठी हा वसंतोत्सव चालू असतो असाही एक समज आहे. उत्तरेतील.लोक हा उत्सव कृष्णाप्तंबंधी मानतात.
भारताच्या विस्तृत किनाऱ्यावर अपरंपार मीठ तयार होत असूनहि या रोज लागणाऱ्या वस्तूवर सरकारला कर द्यावा लागत असे. त्याविरुद्ध गाधींजींनी लढा पुकारला. सरकार दाद देत नाहीसे पाहून सत्याग्रह करण्याचे त्यांनी ठरविले.
गुजराथमधील दांडी हे क्षेत्र निवडण्यात आले. फाल्गुन शु.
शके १६१७ च्या फाल्गुन शु. ११ रोजी इंग्रज आणि मराठे यांच्यामधील प्रसिद्ध असा पुरंदरचा तह झाला.
सुवर्णमय असणाऱ्या भारतांत गोवें आणि उत्तर कोंकण येथे पोर्तुगीझांनी आपले बस्तान स्थिर केले आणि मद्रास व बंगाल इकडे इंग्रजांचा उत्कर्ष होत राहिला.
शके १८६२ च्या फाल्गुन शु. १० रोजी भारतांतील भाषाशास्त्राच्या अभ्यासाचे जनक, पुरातत्त्ववेत्ते सर जॉर्ज आब्राहम ग्रियर्सन यांचे निधन झाले.
वयाच्या तेविसाव्या वर्षी सिव्हिल सर्व्हट म्हणून हे नोकरीत रुजू झाले. तेव्हांपासून ग्रियर्सन आपला वेळ भारतातील भाषा आणि लिप्या यांच्या संशोधनांत घालवू लागले.
शके १५८७ च्या फाल्गुन शु. ९ ला श्रीछत्रपति शिवाजीमहाराजांनी रायगडावरील सर्व निवडक मंडळींचा निरोप घेऊन पुत्र संभाजी राजे, कांहीं सोबती व.चार हजार स्वार यांच्यासह औरंगजेबाच्या भेटीसाठी उत्तरेस आग्याकडे प्रयाण केले.
जयसिंहाच्या मध्यस्थीने शिवाजी राजे -औरंगजेब यांच्या भेटीचा योग घडून येणार होता.