Skip to main content

चेहरे मुखवट्याआडचे

लेखक चंद्रकांत यांनी मंगळवार, 03/08/2021 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
पद, पैसा, प्रतिष्ठेला अवास्तव महत्त्व आलं की, माणसं चाकोरीतलं, चाकोरीबाहेरचं सगळंकाही करायला तयार असतात. अर्थात, यामागे सोस अन् कोणत्यातरी आसक्ती असतात. माणूस स्वतःला विचारांनी कितीही समृद्ध वगैरे म्हणवून घेत असला, तरी स्वार्थाची कुंपणे ओलांडून पलीकडच्या परगण्यात पोहचता नाही येत हेच खरं. अंतरी असणारे अहं आसक्तीपासून विलग नाही होऊ देत त्याला. आयुष्य देखणं वगैरे असावं. जगणं सुंदर असावं असं वाटण्यात वावगं काहीच नाही. पण ते नाही म्हणून झुरत राहणं विपरीत आहे. जगण्याच्या परिघात काहीतरी कमतरता राहिली की, मनात अस्वस्थता दाटत जाते. ही अस्वस्थताच आयुष्याच्या सुघड वाटा अवघड करते.

कहाणी महापुराची - माझ्या नजरेतून (भाग 3)

लेखक मालविका यांनी मंगळवार, 03/08/2021 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
23 जुलै ला पाणी बरचसं उतरलं होत पण अनेक ठिकाणी अजूनही साचून होत. काही ठिकाणी पाणी उतरलं असलं तरी चिखल, आडवी झालेली झाडे, विजेचे खांब, तारा इत्यादी मुले जाणे अशक्य होते. मित्राचे आई वडील होते त्या शंकरवाडीत हीच परिस्थिती होती. ते सुखरूप आहेत हे समजलं पण त्यांची भेट घडू शकली नाही. 2 दिवसात इन्व्हर्टर संपल्याने नेलेल्या मेणबत्त्या आणि कडेपेट्या उपयोगात आल्या. चिपळुणात निदान 3 4 दिवस लाईट येणार नाहीत हे समजून चुकलो होतो. उदयाला पाणी पूर्ण उतरेल आणि मग प्रत्यक्षात सगळीकडे कामाला सुरुवात होईल याचा अंदाज आला. भाऊ ज्याचं कापडाच दुकान होत, त्याच्या इथे देखील अजून ढोपर भर पाणी रस्त्यावर होत.

हंपी एक अनुभव - भाग १

लेखक ज्योति अळवणी यांनी मंगळवार, 03/08/2021 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
गेले अनेक दिवस... दिवस का गेलं वर्षभर हंपीला जावं असं मनात होतं. पण 2020 आलं आणि सगळ्यांचं आयुष्य आणि भविष्यातली स्वप्न बदलून गेलं. दिवाळीपर्यंत पुढचा काही... विशेषतः आपल्या स्वप्नांचा काही विचार करण्याची हिंमत देखील नव्हती. पण मग हळूहळू आयुष्य काहीसं पूर्व पदावर येतं आहे असं वाटायला लागलं आणि मग पूर्वी बघितलेली स्वप्न परत डोकं वर काढायला लागली.... मला पुन्हा एकदा हंपीची स्वप्न पडायला लागली. अर्थात इतक्या लांब स्वतः ड्राईव्ह करून जायचं म्हंटल्यावर नीट विचार करून योग्य नियोजन करणं अत्यंत आवश्यक होतं. विशेषतः सध्याच्या परिस्थितीमध्ये स्वच्छता राखणे (Sanitization) हा अत्यंत महत्वाचा मुद्दा होता.

ऋग्वेद: खगोल विज्ञान : पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 02/08/2021 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
आयं गौः पृश्निरक्रमीदसदन्मातरं पुरः। पितरंच प्रयन्त्स्व:॥ ऋषिका: सार्पराज्ञी, देवता: सार्पराज्ञी, सूर्य (ऋ. १०/१८९/१) अर्थ: पृथ्वी गति करते. पृथ्वी आकाशगंगा रुपी मातेच्या घरात आहे. पृथ्वी आपल्या पिता सूर्याची परिक्रमा करते. ऋग्वेद म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाची खाण. या खाणीत अनेक अनमोल रत्न आहेत. पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते, हे सत्य आपल्या वैदिक ऋषिंना माहित होते, तरीही याचे श्रेय त्यांना देण्याचा प्रयत्न आपण केला नाही याचे कारण आपली गुलाम मानसिकता. आपल्या वैदिक ज्ञानाची माहिती सर्वांना कळावी यासाठी हा प्रपंच. गमन करणारी प्रत्येक वस्तूहि "गौः" असते.

मी आणि कानयंत्र..

लेखक आजी यांनी सोमवार, 02/08/2021 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर मी म्हातारी झाले. वय चोरुन बघितलं पण शरीर ऐकेना. अनेक वस्तू मला ॲक्सेसरीज् म्हणून गरजेच्या वाटू लागल्या. मला ऐकू येईनासं झालं. घरातला टीव्ही मी खूप मोठ्या आवाजात लावून बसू लागले. त्या आवाजाचा घरच्यांना त्रास होऊ लागला. गेले दीड वर्ष मुलाचं वर्क फ्रॉम होम होतं आणि नातवाची ऑनलाईन शाळा होती. मी आणि सूनबाई तोंडात मिठाची गुळणी घेऊन बसायचो. टीव्ही वरील कोरोनाच्या आणि हे सरकार कोसळणार की पाच वर्षे टिकणार, याबद्दलच्या बातम्या कितीदा ऐकायच्या? मग मी टीव्हीवर मनोरंजक कार्यक्रम बघायची. मला ऐकू येत नाही म्हणून आवाज मोठा करायची. संवादच ऐकू आले नाहीत तर सिरीयल ची मजा ती काय हो?

कहाणी महापुराची - माझ्या नजरेतून (भाग 2)

लेखक मालविका यांनी सोमवार, 02/08/2021 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
22 तारीख. सकाळी 10.30 ची भरती होऊन ओहोटी सुरू झाली. समुद्राच्या जवळ आणि खाडी असल्याने भरती ओहोटी च्या वेळी वाशिष्ठी मध्ये पण पाण्याचे चढ उतार नेहमी होत असतात. पाणी आता थोडं कमी होईल अशी आशा वाटत होती. पण डोळयांसमोर पावसाने भरलेले ढग दिसत होते. पाणी 2 फूट कमी झाल्याचे मेसेज आले. थोडं हायस वाटलं पण पाणी ज्या वेगात भरलं त्या वेगात कमी होत नव्हतं. खर तर ओहोटीच्या वेळी पाणी वेगाने उतारावरून धावत जावं तसं जात असत पण यावेळी बाहेर गेलेल्या पाण्याला आत घ्यायला नदी तयार नव्हती. त्यामुळे हे 2 फूट कमी झालेल पाणी फक्त एक खेळ होता हे लवकरच जाणवलं.

तुमचे VI किंवा जीओ असल्यावर खर्च कमी कसा करावा

लेखक एकुलता एक डॉन यांनी सोमवार, 02/08/2021 02:01 या दिवशी प्रकाशित केले.
तुमचे VI किंवा जीओ असल्यावर खर्च कमी कसा करावा १) जिओ समझ तुमचे ड्युअल सिम मोबाईल आहे आणि एकच सिम जिओ जीओ चे सिम रिचार्जे करूच नका कारण ,जिओ रिचार्जे नाही केले तरी इनकमिंग चालू राहते,माझे ३ सिम आहेत तीनही चालू आहेत परिणामी एकाच सिम चा रिचार्जे होईल २) vi 1. Vi brings you ATTRACTIVE DISCOUNT + DAILY EXTRA 1GB DATA + FREE CALLERTUNES (28 Days) Price Rs.149 2. Vi brings you EXTRA DOUBLE DATA: 1.5GB+1.5GB = 3GB/Day + FREE CALLERTUNES (56 Days) Price Rs.399 3.

कहाणी महापुराची - माझ्या नजरेतून (भाग 1)

लेखक मालविका यांनी रविवार, 01/08/2021 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
सुरवातीलाच सांगते मी पूरग्रस्त नाही, पुरामुळे माझं कोणतंही नुकसान झालेलं नाही.आधी अप्रत्यक्षपणे आणि पुरानंतर मी प्रत्यक्ष यात सहभागी होते आणि त्याचाच हा अनुभव. तर माझं गाव चिपळूण. दर पावसाळ्यात बाजारपेठेत पाणी भरणं ही अगदी वार्षिक कार्यक्रम असल्यासारखी गोष्ट. क्वचित थोडं कमी जास्त होत पाणी. पण त्यात विशेष वाटावं असं काही नाही इतकी त्याची सवय झालेली. आज मी 10 वर्षाच्या मुलाची आई आहे. मी जेव्हा पहिली दुसरी मध्ये होते तेव्हापासून मला आठवतंय त्याप्रमाणे पावसाळ्यात पाणी भरल्याची सुट्टी मिळायची किंवा अर्ध्यातुन शाळा सोडून द्यायचे.

‘‘डंख व्यालेलं अवकाश’’

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 01/08/2021 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे ‘‘डंख व्यालेलं अवकाश’’ या कवितासंग्रहाची व्दितीय आवृत्ती तब्बल बावीस वर्षांनंतर चेन्नईच्या ‘नोशन प्रकाशना’कडून नुकतीच प्रकाशित झाली आहे. २६ जानेवारी १९९९ ला या संग्रहाची प्रथमावृत्ती ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’च्या अनुदानाने (परस्पर) नागपूरच्या लाखे प्रकाशनाने प्रकाशित केली होती. पहिल्या आवृत्तीत १९८९ ते १९९२ या चार वर्षातील निवडक सत्तर कविता समाविष्ट होत्या. या आधीच्या आणि नंतरच्या कविता पहिल्या आवृत्तीत समाविष्ट नव्हत्या.